२१ ऑक्टोबर दिनविशेष – 21 October in History

आजचे पंचांग 
  • तिथि-पंचमी – 26:31:19 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 06:50:29 पर्यंत, मृगशिरा – 29:51:08 पर्यंत
  • करण-कौलव – 15:19:31 पर्यंत, तैतुल – 26:31:19 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-वरियान – 11:09:57 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय-06:34:42
  • सूर्यास्त-18:11:06

दिनविशेष
महत्वाच्या घटना
  • १२९६: अल्लाउद्दिन खिलजी हे दिल्ली येथील शासक बनले.
  • १८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
  • १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
  • १८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
  • १९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.
  • १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना
  • १९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
  • १९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
  • १९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.
  • १९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
  • १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • १९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर
  • २००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
  • २०१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतील आपत्ती प्रतिसाद कार्यात सहभागी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८३०: हिमालय भागाचा शोध लावणारे पहिले भारतीय व्यक्ती नैन सिंह रावत यांचा जन्मदिन.
  • १८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)
  • १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)
  • १९१७: राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)
  • १९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले. चार वेद, सहा शास्त्रे, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावर १९७ ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मभास्कर’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मऋषी’ या पदव्या मिळाल्या होत्या.
  • १९३१: शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)
  • १९३८: प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि नर्तक हेलन यांचा जन्मदिन.
  • १९४०: एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू
  • १९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९वे पंतप्रधान

 

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)
  • १८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५)
  • १९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)
  • १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)
  • १९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५)
  • २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
  • २०१२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

   Follow us on        

BJP Candidates List : आता होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपची पहिली उमेदवार यादी 

  1. नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
  2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
  3. शहादा – राजेश पाडवी
  4. नंदूरबार- विजयकुमार गावीत
  5. धुळे शहर -अनुप अग्रवाल
  6. सिंदखेडा – जयकुमार रावल
  7. शिरपूर – काशीराम पावरा
  8. रावेर – अमोल जावले
  9. भुसावळ – संजय सावकारे
  10. जळगाव शहर – सुरेश भोळे
  11. चाळीसगाव – मंगेश चव्हाण
  12. जामनेर -गिरीश महाजन
  13. चिखली -श्वेता महाले
  14. खामगाव – आकाश फुंडकर
  15. जळगाव (जामोद) – संजय कुटे
  16. अकोला पूर्व – रणधीर सावरकर
  17. धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
  18. अचलपूर – प्रवीण तायडे
  19. देवली – राजेश बकाने
  20. हिंगणघाट – समीर कुणावार
  21. वर्धा – पंकज भोयर
  22. हिंगना – समीर मेघे
  23. नागपूर दक्षिण – मोहन माते
  24. नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
  25. तिरोरा – विजय रहांगडाले
  26. गोंदिया – विनोद अग्रवाल
  27. अमगांव – संजय पुरम
  28. आर्मोली – कृष्णा गजबे
  29. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  30. चिमूर – बंटी भांगडिया
  31. वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
  32. रालेगाव – अशोक उडके
  33. यवतमाळ – मदन येरवर
  34. किनवट – भीमराव केरम
  35. भोकर – श्रीजया चव्हाण
  36. नायगाव – राजेश पवार
  37. मुखेड – तुषार राठोड
  38. हिंगोली – तानाजी मुटकुले
  39. जिंतूर – मेघना बोर्डीकर
  40. परतूर – बबनराव लोणीकर
  41. बदनापूर -नारायण कुचे
  42. भोकरदन -संतोष दानवे
  43. फुलंब्री – अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
  45. गंगापूर – प्रशांत बंब
  46. बगलान – दिलीप बोरसे
  47. चंदवड – राहुल अहेर
  48. नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
  49. नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
  50. नालासोपारा – राजन नाईक
  51. भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
  52. मुरबाड – किसन कथोरे
  53. कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
  54. डोंबिवली – रवींद्र चव्हाण
  55. ठाणे – संजय केळकर
  56. ऐरोली – गणेश नाईक
  57. बेलापूर – मंदा म्हात्रे
  58. दहिसर – मनीषा चौधरी
  59. मुलुंड – मिहिर कोटेचा
  60. कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
  61. चारकोप – योगेश सागर
  62. मालाड पश्चिम – विनोद शेलार
  63. गोरेगाव – विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम – अमित साटम
  65. विले पार्ले – पराग अलवणी
  66. घाटकोपर पश्चिम – राम कदम
  67. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
  68. सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
  69. वडाळा – कालिदास कोळंबकर
  70. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  71. कुलाबा – राहुल नार्वेकर
  72. पनवेल – प्रशांत ठाकूर
  73. उरन – महेश बाल्दी
  74. दौंड- राहुल कुल
  75. चिंचवड – शंकर जगताप
  76. भोसली -महेश लांडगे
  77. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
  78. कोथरुड – चंद्रकांत पाटील
  79. पर्वती – माधुरी मिसाळ
  80. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
  81. शेवगाव – मोनिका राजले
  82. राहुरी शिवाजीराव कर्डिले
  83. श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
  84. कर्जत जामखेड – राम शिंदे
  85. केज – नमिता मुंदडा
  86. निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
  87. औसा – अभिमन्यू पवार
  88. तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
  89. सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
  91. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
  92. मान -जयकुमार गोरे
  93. कराड दक्षिण – अतुल भोसले
  94. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
  95. कणकवली – नितेश राणे
  96. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
  97. इचलकरंजी – राहुल आवाडे
  98. मिरज – सुरेश खाडे
  99. सांगली – सुधीर गाडगीळ

 

Facebook Comments Box

२० ऑक्टोबर दिनविशेष – 20 October in History

आजचे पंचांग 
  • तिथी-कृष्ण चतुर्थी
  • नक्षत्र-कृतिका
  • करण-बावा
  • पक्ष-कृष्ण-पक्ष
  • योग-दुपारी 02:11:04 पर्यंत व्यातिपात
  • दिवस-रविवार
  • सूर्योदय – 06:34:06 AM
  • सूर्यास्त – संध्याकाळी 06:11:29

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • लोकशक्ती दिन
  • जागतिक अस्थिसुषिरता (Osteoporosis) दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १५६८: साली मुघल शासक अकबर यांनी चित्तोडगढ वर हल्ला केला.
  • १७७४: साली कोलकाता(तत्कालीन कलकत्ता)  ही भारताची राजधानी बनली होती.
  • १८२२: साली ब्रिटीश वर्तमानपत्र ‘लंडन संडे टाईम्स‘ चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता.
  • १९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
  • १९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • १९६२: चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.
  • १९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना
  • १९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर
  • १९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
  • १९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
  • १९५०: कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.
  • १९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.
  • १९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
  • १९९५: ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर
  • २००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर
  • २०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८५५: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)
  • १८९१: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २४ जुलै १९७४)
  • १८९३: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)
  • १९१६: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)
  • १९२०: साली भारतीय कायदेपंडित, मुत्सद्दी आणि पश्चिम बंगालमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंजाब राज्याचे माजी राज्यपाल व अमेरिकेचे भारतीय राजदूत अशी अष्टपैलू कामगिरी सांभाळणारे सिद्धार्थ शंकर राय यांचा जन्मदिन.
  • १९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)
  • १९३०: साली भारताची राजधानी दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचा जन्मदिन.
  • १९६३: नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
  • १९७८: वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९०: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म: १९ मार्च १८२१)
  • १९८२: भारतीय वरिष्ठ नागरी सेवक अधिकारी तसचं,  केरळ आणि मध्य प्रदेश राज्यांचे राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचे निधन.
  • १९६१: व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली. (जन्म: ? ? ????)
  • १९६४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० ऑगस्ट १८७४)
  • १९७४: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (जन्म: २० जानेवारी १८९८)
  • १९८४: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)
  • १९९६: दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • १९९९: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: ? ? १९१५)
  • २००९: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म: ४ मे १९२९)
  • २०१०: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म: ५ जानेवारी १९४८)
  • २०११: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म: ७ जून १९४२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Indian Railway: वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचारण

   Follow us on        
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित Retired कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे.
६५ वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक आणि ट्रॅक पुरुष यासारख्या भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. मुदतवाढीच्या पर्यायासह नियुक्त्या दोन वर्षांसाठी राहतील. सर्व रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक या सेवानिवृत्तांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती Fitness आणि गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या रेटिंगच्या आधारे नियुक्त करू शकतील अशा सूचना देण्यात आल्या  आहेत.
रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांना निवृत्त होताना असलेले वेतन दिले जाणार आहे मात्र त्यातून त्यांचे मूळ पेन्शन वजा केले जाईल. त्यांना प्रवासासाठी आणि अधिकृत टूरसाठी प्रवास भत्ते देखील मिळतील परंतु अतिरिक्त लाभ किंवा पगार वाढीसाठी ते पात्र नसतील.
वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागात Zones एकूण २५००० कर्मचारी भरती करण्याचे उद्दिष्ट आहे.
Facebook Comments Box

अभिमानास्पद! छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘गनिमीकावा’ जेएनयुच्या अभ्यासक्रमात

   Follow us on        
राज्यातील तमाम जनतेला अभिमान वाटावा अशी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वार अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या – कुलगुरू प्रा. शांति श्री घुलीपूडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.
हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रैटिजिक स्टडीज वा नावाने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे.  या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाईल. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजि, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्रापट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षात सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.
महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींचा निधी
“आम्हाला भारतीय ज्ञान व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता आणि भारताच्या सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यासासाठी पर्यायी मॉडेल्स आणायचे होते. जेएनयुमधील सध्याचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने पाश्चात्य अँग्लो-अमेरिकन मॉडेलचा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, विशेषतः त्यांची नौदल शाखा, त्यांची नौदल युद्धाची संकल्पना आणि हिंदवी स्वराज या संकल्पनेचा नीट अभ्यास केलेला नाही. आम्हाला वाटले की यांचाही अभ्यास करायला हवा. महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी खूप उत्साह दाखवला आणि आम्हाला १० कोटी रुपयेही दिले. भारत बदलाच्या काळातून जात आहे आणि म्हणूनच आपला इतिहास आणि प्रतीके पुनर्मूल्यांकन करणे देखील महत्त्वाचे आहे. असं जेएनयूच्या प्राचार्या शातिश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितलं.
Facebook Comments Box

महत्वाचे: रेल्वे आरक्षण नियमांत १ नोव्हेंबर पासून होणार मोठा बदल

Indian Railway: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांत एक मोठा बदल केला आहे. सध्या आगाऊ आरक्षण 120 दिवस आधी करता येते त्यात बदल करून ही मर्यादा 60 दिवसांवर आणण्यात आली आहे . म्हणजे आता रेल्वे आरक्षण फक्त 60 दिवस अगोदर करता येणार आहे. गुरुवारी (17 ऑक्टोबर 2024) रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आगाऊ आरक्षणाची अंतिम मुदत कमी करण्यात आली आहे. यामुळे लोकांना आगाऊ तिकीट काढण्यासाठी कमी वेळ मिळेल.
रेल्वेने या अधिसूचनेत म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2024 पासून, ट्रेनमधील आगाऊ आरक्षणाची सध्याची वेळ मर्यादा 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केली जाईल (प्रवासाची तारीख वगळता). तथापि, 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 120 दिवसांच्या ARP अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील. हा नवा नियम नोव्हेंबरपासून केलेल्या बुकिंगवर लागू होणार आहे.
ताजसारख्या ट्रेनला नियम लागू होत नाहीत
ताजसारख्या दिवसा काही वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही, असेही रेल्वेने म्हटले आहे. एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादींमध्ये आगाऊ आरक्षणाची वेळ मर्यादा कमी आहे. याशिवाय विदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या मर्यादेत कोणताही बदल होणार नाही.

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली ही गाडी आता एलएचबी स्वरूपात धावणार; स्लीपर डब्यांमध्येही कपात

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर सुरवातीपासून धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार असल्याची माहिती दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. अलीकडेच या गाडीच्या छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यामुळे या गाडीचे जुने डबे बदलून नवीन स्वरूपाचे एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी प्रवासी संघटनेनंकडून होत होती.
दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२६२०/१२६१९ मंगुळुरु – एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस दिनांक १७ फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार आहे.
डब्यांच्या संरचनेत बदल 
ही गाडी सध्या २३ आयआरएस कोच सहित धावत असून सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार २२ एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार आहे.
सध्याची संरचना – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४,  सलीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर  – ०२  असे मिळून एकूण २३ आयआरएस डबे
सुधारित संरचना  – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४, एसी थ्री टियर इकॉनॉमी – ०२, सलीपर – ०८, जनरल – ०४, दिव्यांगनासाठी  – ०१, ब्रेकव्हॅन  – ०१  असे मिळून एकूण २२ एलएचबी  डबे
सुधारित संरचनेत या गाडीच्या जनरल डब्यांत कपात करण्यात आली असून त्यांची संख्या ११ वरुन ८ वर आणण्यात आली आहे. तर एसी थ्री टियर इकॉनॉमीचे २ जोडण्यात येणार आहेत.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी मे १९९८ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या २६ वर्षांत या रेल्वेगाडीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रेल्वेगाडीचे डबे खराब झाले असून, मोडकळीस आले होते. गेल्या पाच वर्षांपासून प्रवासी संघटनाकडून या रेल्वेगाडीला लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि दक्षिण रेल्वेकडे करण्यात येत होती. तर, जुलै २०२४ रोजी उडुपी – चिकमंगलुरू येथील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी एलएचबी डबे जोडण्याची मागणीही केली होती. अलीकडेच या गाडीच्या छताचा काही भाग कोसळल्याचा विडिओ एका प्रवाशाने X या समाज माध्यमावर पोस्ट केला होता.

Facebook Comments Box

Mumbai Local: मुंबई पश्चिम उपनगरीय लोकलचे वेळापत्रक बदलले; नविन वेळापत्रक येथे डाऊनलोड करा

   Follow us on        

Mumbai Local: पाश्चिम उपनगरीय मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक दिनांक 12 ऑक्टोबर पासून बदलण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रकात १२ नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ६ लोकल सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात अप दिशेने सहा आणि डाउन दिशेने सहा लोकल सेवांचा समावेश केला आहे.

अप दिशेने बोरिवली – चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता चालविण्यात येत होती. ती लोकल आता भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटेल आणि चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहोचेल. विरार – अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. ही गाडी विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल. तर वसई रोड – चर्चगेट जलद लोकल विरारहून चालविण्यात येणार आहे. वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोचणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १० जलद लोकलला १५ डब्यांत रूपांतरित केले आहे. अप मार्गावर १०.३९ वाजताची विरार – चर्चगेट, १०.४४ ची विरार – दादर लोकल, दुपारी १.१४ वाजता सुटणारी विरार – अंधेरी, दुपारी १.४२ वाजता सुटणारी विरार – चर्चगेट, दुपारी २.४८ वाजता सुटणारी विरार – बोरिवली या लोकल १५ डब्बा चालविण्यात येणार आहेत. तर डाउन दिशेने दुपारी १२.६ वाजता सुटणारी दादर – विरार लोकल, दुपारी १२.०९ वाजताची चर्चगेट – विरार, दुपारी २ वाजताची अंधेरी – विरार, दुपारी ३. १८ वाजता सुटणारी चर्चगेट – विरार, दुपारी ३. २३ वाजता सुटणारी बोरिवली – विरार जलद लोकल १५ डब्याची चालविण्यात येणार आहे.

नवीन १२ लोकल कोणत्या? 

अप दिशेने सकाळी ५.३२ वाजता अंधेरी – चर्चगेट धीमी लोकल, सकाळी ७ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी १०.२५ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी ११.३५ ची जलद विरार – चर्चगेट लोकल, दुपारी २. २८ ची गोरेगाव – चर्चगेट धीमी लोकल आणि रात्री ९.५८ वाजता बोरिवली – चर्चगेट धीमी लोकल चालविण्यात येणार आहे. तर डाऊन दिशेने सकाळी ४.५० वाजता विरार – डहाणू रोड दरम्यान धीमी लोकल, सकाळी ९.०७ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, ९.३० वाजता विरार – डहाणू रोड धीमी लोकल, दुपारी २. २३ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, रात्री ९.२७ वाजता चर्चगेट – अंधेरी धीमी लोकल, रात्री १०. ५ वाजता चर्चगेट – नालासोपारा जलद लोकल चालविण्यात येणार आहे.

बदललेले वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक क्लिक करा.

अप लोकल

https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545484440-UP-AC-78-PTT-W.E.F.-12.10.2024.pdf

डाऊन लोकल

https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545420850-DN-AC-PTT-78-W.E.F.-12.10.2024.pdf

 

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघांच्या संख्येत वाढ

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आठ वाघांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच विक्रमी ८ वाघांची नोंद झाली आहे. यात तीन नर आणि पाच मादींचा समावेश आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत हे वाघ टिपण्यात आले आहेत.
सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून जनावरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढू लागले होते. त्यामुळे हे हल्ले वाघाकडूनच होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. तसेच काही ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना दिसले.

सिंधुदुर्ग वनविभाग तसेच सह्याद्री टायगर रिझर्व्ह, फॉरेस्ट  डब्लू सी टी ही स्वयंसेवी संस्था अशा तिघांनी मिळून जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यात सावंतवाडी पासून दोडामार्ग तालुक्यातील जंगलात तब्बल आठ वाघ आढळून आले. एवढे मोठ्याप्रमाणात वाघ दिसण्याचे सिंधुदुर्ग च्या इतिहासात प्रथमच घडले आहे.कारण २०१४ च्या जनगणेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्य वर आली होती मात्र आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.विशेष म्हणजे यात तीन नर व पाच मादीचा समावेश आहे.

 

Facebook Comments Box

ओंकार लाड; वैभववाडीचा ‘संदेश जिमन’

   Follow us on        
सिंधुदुर्ग: समाज माध्यमांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला संदेश संबंधित यंत्रणेकडे पोहोचवून इच्छित परिणाम  साधता येतो. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना केवळ फेसबुकच्या  माध्यमातून जनजागरण करून संगमेश्वर या रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबे मिळवून देऊन पत्रकार संदेश जिमन यांनी ही गोष्ट दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी स्थानकावरील प्रश्नांसाठी सुद्धा ओंकार लाड या नावाच्या तरुणाने नेहमीच आवाज उठवला आहे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्याने या स्थानकावरील गैरसोयींवर यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी स्थानकावर पुरेशी प्रवासी संख्या असताना सुद्धा पादचारी नाही होता. याकडे ओंकार ने वेळोवेळी X च्या माध्यमातून इथे पादचारी पूल व्हावा अशी मागणी केली होती. त्याचा या प्रयत्नाला अखेर यश आले असून येथे एक पादचारी मंजूर करण्यात आला असून कालच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मूळ गाव वैभववाडी-नापणे असलेला ओंकार सध्या मुंबईमध्ये आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच शिक्षण पूर्ण करता करता तो नामांकित बिग ४ मध्ये नोकरी सुद्धा करत आहे. मुंबईमध्ये सध्या तो आई बाबा समवेत वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे असो व मुंबई लोकल, ज्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या त्या गोष्टी तो X च्या माध्यमातून शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रूळ ओलांडावे लागत आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींचे खूप हाल होतात. पुरेशी प्रवासी संख्या असूनही प्रशासन इथे साधा एक पादचारी पूल का बांधत नाही हा प्रश्न त्याने उठवायला सुरवात केली. येथील आमदार नितेश राणे यांच्या x वरील पोस्ट वर कंमेंट करून किंवा संबंधित यंत्रणेला टॅग करून त्याने जनजागरण केले. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले असून येथे एक पादचारी पूल मंजूर झाला आहे.
वैभववाडी स्थानकावर या पुलाव्यतिरिक्त अजून कित्येक प्रश्न आहेत. या स्थानकावर अजून गाडयांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच येथे PRS तिकीट बुकिंग सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. या गोष्टींसाठी मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवीन असे ओंकार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search