“बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनासाठी बेंगळुरूतून फंडिंग…..” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Mumbai : रत्नागिरीतील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर एक गंभीर आरोप केला आहे. बारसू आंदोलनासाठी बेंगळुरूतून फंडिग झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी पावसाळी अधिवेशनात बारसू आंदोलनाविषयी निवेदन सादर केले. यादरम्यान, त्यांनी बारसू प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी बेंगळुरूतून पैसा मिळाला आहे असा गंभीर आरोप फडणवीस यांनी विधानभवनात केला आहे. बारसू आंदोलनात तेच तेच लोक प्रत्येक आंदोलनात कसे दिसतात? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला.
” ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं…”
बारसू (Barsu)रिफानरीला विरोध म्हणून विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती असेही फडणवीस म्हणाले.
“माझा सवाल आहे की, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात. यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बारसू आंदोलकांवरील लाठीचार्जचा आरोप फेटाळला…
पोलिसांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “बारसू आंदोलनात ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांच्याच गाडीत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आलं. कोर्टात गेल्यानंतर कुठल्याही तक्रारदारानं मारहाण केल्याची आणि चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केलेली नाही. त्यामुळं यावर होणारे आरोप योग्य नाहीत” असेही फडणवीस यांनी सांगितले.

Loading

Facebook Comments Box

“कोकणवासियांनो Hats Off…तुमच्या सहनशक्तीला सलाम” | खड्डेयुक्त मुंबई-गोवा महामार्गासंबधी रील व्हायरल

Mumbai Goa Highway: सर्व कोकणवासीयांना खरोखरच शरम वाटावी, प्रशासनबद्दल चीड निर्माण व्हावी अशी एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही रील मुंबई गोवा महामार्गाच्या दयनीय अवस्थेसंबधी आहे.

“मी फक्त २० किलोमीटर गाडी चालवली तर माझ्या Nexon या दणकट गाडीची खूप वाईट अवस्था झाली. गाडीचा टायर एका खड्ड्यात आपटला, फुटला, रिंग खराब झाली आणि तो टायर वापरण्या योग्य राहिला नाही. कोकण वासियांनो तुमच्या सहन शक्तीला सलाम…हॅट्स ऑफ…” हा व्हिडिओ पोस्ट केला आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका यूट्युबरने.
कोकण वासियांनो या महामार्गाची स्थिती पाहता तुम्ही या राजकारणायांना गेली चार टर्म कसे काय निवडून दिले? का मते देता या लोकांना? असा प्रश्नही या रीलमध्ये विचारण्यात आला आहे.
Reel पाहण्यासाठी लिंक 👇🏻

 

Loading

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटामध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात; २ ठार

Mumbai Goa Highway Accident :मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात काल गुरुवारी  सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक कोसळून भीषण अपघात झाला.

महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले होते. त्यातील एका ट्रकमध्ये तीन लोक अडकले होते. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माशांचे जाळे घेऊन जाणारा एक आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात हा अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने मागून धडक दिल्याने ही दोन्ही वाहने दरीत कोसळली. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस ग्रामस्थ आणि खेड येथील मदत ग्रुपचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा हे रेस्क्यू ऑपरेशन संपले. येथील एका जखमीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. खेडचे पोलीस निरीक्षक भोयर आणि सहाय्यक निरीक्षक चव्हाण हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

Loading

Facebook Comments Box

दोन वंदे भारत एक्सप्रेसना उद्यापासून ठाणे व कल्याण येथे थांबा

मुंबई: मुंबई येथून सुटणाऱ्या सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत गाड्यांना उद्या दिनांक ४ ऑगस्टपासून  कल्याण आणि ठाणे येथे 2 मिनिटे थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

शिर्डी साईनगर एक्सप्रेस सीएसएमटीहून सुटल्यानंतर सकाळी ७.११ वाजता कल्याणला थांबेल. सीएसएमटीला परतताना ही गाडी कल्याणला रात्री ९.४५ वाजता थांबेल.

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून सोलापूरसाठी निघाल्यानंतर दुपारी ४.३३ वाजता ठाणे स्थानकावर थांबेल. दुपारी ४.५३ वाजता कल्याणला पोहोचेल. परतीच्या प्रवासादरम्यान ती ठाणे येथे सकाळी 11.50 वाजता थांबेल.

Loading

Facebook Comments Box

कोरोनाकाळापासून बंद असलेला तुतारी एक्सप्रेसचा नांदगाव रोड थांबा पूर्ववत

Konkan Railway News : नांदगाव रोड प्रवाशांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक ११००३/११००४ दादर – सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्स्प्रेस  नांदगाव रोड स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर खाली दिलेल्या तारखांपासून तात्काळ थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना पूर्व काळात या गाडीला नांदगाव येथे थांबा होता. मात्र कोरोना लॉकडाउन मुळे हा थांबा बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो आजपर्यंत चालू केला नाही होता. प्रवाशांनी वारंवार मागणी केल्याने हा थांबा पुन्हा देण्यात आला आहे.
उद्या दिनांक ४ ऑगस्ट पासून हि गाडी नांदगाव रोड या स्थानकावर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
नांदगाव रोड या स्थानकावर या गाडीची वेळ खालीलप्रमाणे असेल
११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस    –  09:48 / 09:50
११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस    –  19:04 / 19:06

Loading

Facebook Comments Box

तुतारी एक्सप्रेस एलएचबी कोचसहित चालविण्यात यावी – कोंकण विकास समिती

Konkan Railway News :कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन काल दिनांक ०२ ऑगस्ट रोजी कोंकण विकास समितीने रेल्वे राज्य मंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक व विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) यांच्याकडे काही महत्वाच्या मागण्यांसाठी निवेदन लेखी दिले आहे.

यातील एक मागणी म्हणजे ११००३/११००४ तुतारी एक्सप्रेसचे जुनाट डबे बदलून आधुनिक एलएचबी डबे Linke Hofmann Busch (LHB) वापरून ही गाडी चालवणे ही आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरामदायक व्हावा या हेतूने ही मागणी केली गेली आहे. या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार्‍या कोकणकन्या एक्सप्रेस , मांडवी एक्सप्रेस, दिवा- सावंतवाडी तसेच एलटीटी-मडगाव या गाड्या एलएचबी कोच सहित धावत आहेत.

का होत आहे ही मागणी? 

अधिक सुरक्षित: एलएचबी डबे जर्मन तंत्रज्ञानाचे असून ते लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत.दोन ट्रेनची टक्कर जरी झाली किंवा रूळांवरून ट्रेन घसरली तरी या हलक्या डब्यांमुळे कमी जीवितहानी होते.

जलद प्रवास:हे डबे दर ताशी 130 कि.मी. वेगाने धावण्याच्या क्षमतेचे असतात. या कारणाने प्रवास जलद होतो

अधिक प्रवासी क्षमता :एलएचबी डबे पारंपारिक डब्यांपेक्षा 1.7 मीटरने लांब असल्याने त्यात जादा प्रवाशांना बसता येते.

मेन्टेनन्स कमी :रेल्वेच्या पारंपारिक डब्यांची दर 18 महिन्याला मेन्टेनन्स करावे लागते. तर नव्या एलएचबी डब्यांना दोन वर्षांतून एकदा मेन्टेनन्ससाठी कारखान्यात पाठवावे लागते.

आधुनिक तंत्रज्ञान :तसेच हे डबे नव्या थ्री फेज तंत्राचे असल्याने ‘हेड ऑन जनरेशन’साठी (ओएचईच्या वीजेवर डब्यातील वीज उपकरणे चालविणे ) अत्यंत योग्य असतात. आयसीएफचे जुने पारंपारिक कोच टू फेजचे असल्याने त्यात ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र वापरण्यासाठी सर्कीट बदल करावा लागतो. नव्या तंत्रज्ञानाच्या एलएचबी डब्यांसाठी हे ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र लागलीच वापरता येते.

अधिक आरामदायक :दोन्ही प्रकारच्या कोचची तुलना करता एलएचबी अधिक आरामदायक आहेत.

वरील सर्व बाबी लक्षात घेवून आम्ही ही मागणी करत असल्याचे कोंकण विकास समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

या मागणी व्यतिरिक्त २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि ११०९९/१११०० लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना वैभववाडी रोड येथे थांबा देण्याची मागणी एका स्वतंत्र निवेदनात केली गेली आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर व श्री. अक्षय मधुकर महापदी उपस्थित होते.

 

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/wp-1691038912309.pdf”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/wp-1691038868292.pdf”]

 

Loading

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway | जनआक्रोश समितीचा मागण्यांसाठी सरकारला दीड महिन्यांचा अल्टीमेटम

आझाद मैदान येथे काल दिनांक २ऑगष्ट २०२३ रोजी जनआक्रोश समितीने मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामा विरोधात धरणे आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान समितीने प्रशासना समोर आपल्या मागण्या ठेवून त्या मागण्या गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन करू अशा इशारा दिला आहे.

मुबंई | गणेश नवगरे : मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १३ वर्षापासून रखडले आहे.कोकणातील सर्व जनता या महामार्गावरून प्रवास करताना जिव मुठित घेऊन प्रवास करीत आहेतसदर महामार्गावर आजपर्यंत ३००० ते ३५०० कोकणकराना आपला प्राण गमवावा लागला आहे तर दहा हजार पेक्षा जास्त कोकणकर जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्ग ३१ मे २०२३ पर्यन्त एक मार्गिका पूर्ण करण्यात येईल ऐसे आश्वासन सार्वजनिक मंत्री यांच्यावतीने देण्यात आले.परंतु ३१ मे पर्यंत कोकणकरांचा सुखकर प्रवास होईल अशा पद्धतीने खड़्डे देखील भरण्यात आले नाही.सद्यस्थितीत महामार्गाची दयनीय अवस्था असून महामार्ग मृत्युचा सापळा बनत चाललेला आहे.सार्वजनिक मंत्री यांच्याकडून देण्यात आलेल्या नविन तारखेनुसार गणेशोत्सव पूर्वी एक मार्गिका पूर्ण होईल याची शाश्वती दिसत नसल्याने आज आम्ही समस्त कोकणकरांच्या वतीने खालील मागण्यांसाठी आझाद मैदान येथे ऍड.सुभाष सुर्वे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

१)मागील १३ वर्षांपासून रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा व त्वरित महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत.

२)महामार्गांवर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कोकणकरांच्या नातेवाईकांना त्वरित मदत देण्यात यावी.

३) महामार्गाच्या कामात विलंब झाल्याने खर्चात वाढ किती प्रमाणात झाली व विलंब का झाला तसेच विलंब केलेल्या अधिकारी ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची नावे कळावीत व रखडविण्यास कारणीभूत असलेल्या अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्यावर फौजदारी दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे.

४)मुंबई गोवा महामार्गाची श्वेतपत्रीका काढण्यात यावी.

५)महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलनाके चालु करू नयेत.

६)मुंबई गोवा महामार्ग अपघातास कारणीभूत ठरत असल्याने मुंबई पुणे द्रूतगती महामार्गांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल आकारू नये.

७)महामार्गांवर ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावेत.

वरील सर्व मागण्या गणेशोत्सवपूर्वी पूर्ण न झाल्यास समस्त कोकणकरांच्या वतीने पळस्पे ते झाराप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

Loading

Facebook Comments Box

”मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले; मला अपराधीपणा वाटतोय”- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mumbai Goa Highway : ”सिधी-सिंगरौली तसेच मुंबई गोवा महामार्ग रखडल्याने आपणास अपराधीपणा वाटतो, मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल” हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. ते बुधवारी राज्यसभेच्या कामकाजादरम्यान आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.

भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. या प्रश्नावर सभापती जगदीप धनखड यांनीही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. हसत हसत ते म्हणाले की, केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. विशेष गोष्ट म्हणजे नितीन गडकरी यांना फक्त सिधी-सिंगरौली या महामार्गाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी स्वतःहून मुंबई गोवा महामार्गाचा उल्लेख केला आहे. ज्या प्रकारे त्यांनी उत्तर दिले त्यावरून त्यांची हतबलता दिसून आली आहे.

अपराधीपणा वाटतोय  

मध्य प्रदेशचे भाजप खासदार अजय प्रताप सिंह यांच्या प्रश्नावर हसत गडकरी म्हणाले की, हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मलाही अपराधीपणा वाटतो. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल.

 

 

 

Loading

Facebook Comments Box

मालवण | ‘अळंबी’ शोधताना सापडली कातळशिल्पे

सिंधुदुर्ग : इतिहासप्रेमींसाठी एक खुशखबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून आली आहे. मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या आहेत.
साळेल गावचे ग्रामस्थ परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे हे धामापूर सडा परिसरात ‘अळंबी’ काढण्यासाठी फिरत असताना त्यांना ही कातळशिल्प निदर्शनास पडली. ख्रिस्ती धर्मातील ‘क्रॉस’च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास आली आहे. त्याच ठिकाणाहून ५०० मीटरवर आणखीन एक भव्य कातळशिल्प कोरलेले आहे. या कातळ शिल्पांच्या भोवताली दगड ठेवून ग्रामस्थांनी ती तात्पुरत्या स्वरूपात संरक्षित केली आहेत.
मालवण तालुक्यात सर्वाधिक कातळशिल्पे!
बहुतांशी कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना कातळ शिल्पे असे संबोधले जाते. मालवण तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारची कातळशिल्पे सापडू शकतात. मात्र अशा शिल्पांबाबत ग्रामस्थांमध्ये तेवढी जागरूकता व माहिती दिसून येत नाही. मात्र अशा शिल्पांचा शोध घेणे गरजेचे असून इतिहास संशोधकांची यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे.

Loading

Facebook Comments Box

सावधान | विश्रांती घेतलेला पाऊस परतणार; ‘या’ जिल्ह्यांना पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

 

Heavy Rainfall Warning : बांगलादेश किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) निर्माण झाले असून ते संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासांत Gangetic WestBengal ओलांडण्याची शक्यता असल्याने पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या ४ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

आज दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिनांक ०२ ऑगस्ट रोजी या दोन जिल्हय़ाव्यतिरिक्त पुणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

दिनांक ०३ ऑगस्ट रोजी वरील चार जिल्ह्या व्यतिरिक्त ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

दिनांक ०४ ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेला नाही आहे. 

अलर्ट आणि त्यांचे अर्थ 

⊗ ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert

⊗ यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert

⊗ ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert

⊗ रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert

 

 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search