मेमू म्हणजे “मुख्य मार्ग विद्युत बहू एकक”. शहरी व उपनगरी भागांना जोडणाऱ्या सामान्य ईएमयू गाड्यांच्या तुलनेत भारतीय रेल्वेवर, एमईएमयू ही विद्युत बहू एकक (ईएमयू) गाड्या आहेत ज्या भारतात लघु आणि मध्यम-अंतरांच्या मार्गावरचालविल्या जातात. ह्या गाड्या ओव्हरहेड तारांमधून २५ किलोव्होल्ट प्रत्यावर्ती धारा वापरून चालविण्यात येतात.
या गाड्या पूर्व घाट व पश्चिम घाट दरम्यान २०० किमी (१२० मैल) पर्यंत गतीवर धावू शकतात. रेकची जास्तीत जास्त अनुमत गती रुंदमापी रुळांवर १०५ किमी/ता (६५ मैल/तास) आहे. मोटरकोच डीसी कर्षण मोटर वापरतात. २०१७ मध्ये, आयसीएफने १६०० एचपी मेधा डेमू वास्तुकलावर आधारित एलएचबी हायब्रीड एसी-एसी मेमू रेक रवाना केले. हे रेक असंकालिक कर्षण मोटर वापरतात आणि त्यांची कमाल संकल्पित गती ११०किमी / ता आहे. हे निष्कलंक स्टीलचे डब्बे असतात. त्यापैकी दोन दक्षिण मध्य रेल्वेवर कार्यरत आहेत .
इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०-१३० किमी / ता वर धावण्यास सक्षम नवीन मेमू सुरू केले. प्रति युनिट निर्माणाची किंमत २६ कोटी रुपये असून ते २,६१८ प्रवासी वाहवून नेऊ शकतात. या ट्रेनमध्ये तीन फेज कर्षण मोटर आहे आणि २५ किलोवोल्ट करंटवर चालते जी ३५% उर्जा वाचवते. यात जीपीएस- आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि कोचमध्ये घोषणा प्रणाली उपलब्ध आहे. यात डबल लीफ स्लाइडिंग दरवाजे, गँगवे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अॅल्युमिनियम सामान रॅक आहेत.चालकाच्या केबिनमध्ये एसी असून प्रशिक्षकामध्ये आपत्कालीन संप्रेषणाची सुविधा आहे. या गाड्या उत्तर प्रदेशात २००–३०० किमी (१२०–१९० मैल) अंतर असेलेल्या शहरांमध्ये चालण्यासाठी संकल्पित केलेल्या आह. ही सेवा फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होऊ शकेल.
१९९ ० च्या दशकात भारतीय रेल्वेने १० फूट ८ इंच (३,२५० मिमी) रुंदीचे मेमू यान बांधले. १५ जुलै १९९५ रोजी आसनसोल – आद्रा विभाग आणि २२ जुलै १९९५ रोजी खडगपूर – टाटा विभागात यांची सेवा सुरू झाली. १७ ऑक्टोबर १९९५ रोजी रायपूर – दुर्ग – भाटापारा – रायपूर – बिलासपूर मार्गावर मेमू सेवेचे प्रारंभ झाला. २०१७ मध्ये प्रथम २० डब्ब्यांची मेमू सूरत ते विरार दरम्यान धावले. २०१८ मध्ये, इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०–१३० किमी/ता (६८–८१ मैल/तास) गतीवर धावण्यास सक्षम नवीन मेमूची सुरुवात केली
भारतीय रेल्वे हळूहळू सर्व लोहायंत्राने ओढलेल्या मंद आणि वेगवान प्रवासी आणि अंतर शहरी ट्रेनच्या जागी ईएमयू सेवा सुरू करत आहे. श्रेणीसुधारित केलेल्या गाड्यांना पुन्हा मेमू म्हणून चालविल्या केले जाते.
गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने MEMU विशेष रोहा-चिपळूण-रोहा (01157/01158) ह्या गाडीचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या आधी ही गाडी ८ डब्यांची चालणार असे घोषित करण्यात आले होते ती आता १२ डब्यांची केली आहे.
मागच्याच आठवड्यात कोकण रेल्वेने ६१०११ /६१०१२ दिवा-रोहा-दिवा ही गाडीपुढे चिपळूण पर्यंत विस्तारित केली होती. हीच गाडी पुढे रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा ०११५७/०११५८ ह्या नंबरने चालविण्यात येणार आहे.
बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही पण त्याआधी मुंबईतील लोकल ट्रेनचे जे प्रश्न आहेत ते सोडवा. मुंबईची लाईफ लाइन समजली जाणारी मुंबई लोकलट्रेनची अवस्था खूप केविलवाणी आहे त्याकडे आधी लक्ष द्या, तिकडे निधी पुरवा असे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे.
शासनाकडील निधी मुंबई लोकल ट्रेन, प्लॅटफॉर्म, स्टेशने आणि शौचालये सुधारण्यासाठी वापरण्यात यावा अशी मी मागणी करत आहे. सामान्य मुंबईकर तुमच्या कडे बुलेट ट्रेन ची मागणी करत नाही आहे. मग जे आधी मागत आहेत ते आधी जनतेला द्या असे त्या पुढे म्हणाल्या.
मुंबईमधून बर्याच गोष्टी दुसर्या राज्यात नेण्याचा प्रयत्न केला जात आहेत असे त्या म्हणाल्या आणि ह्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे
वसईमार्गे गणेशोत्सवासाठी काही विशेष गाड्या सोडण्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 18 जुलै रोजी चालू होईल. ह्या गाड्यांचा फायदा ठाणे आणि पालघर तालुक्यातील कोकणवासीयांना होईल. मुंबई सेंट्रल वरून वसईमार्गे काही गाड्या सोडण्यात आल्या आहेत. वेस्टर्न लाईनला राहणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी ह्या गाड्यांना बोरिवली येथे थांबा दिला आहे.
1. MUMBAI CENTRAL TO THOKUR
MUMBAI CENTRAL- THOKUR EXPRESS (09001)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 23/08/2022, 30/08/2022, 06/09/2022 रोजी ही गाडी 12.00 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघेल ती ठोकूर, मंगलोरला दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता पोहोचेल.
THOKUR – MUMBAI CENTRAL EXPRESS (09002)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी बुधवारी 24/08/2022, 31/08/2022, 07/09/2022 रोजी ही गाडी 10.45 वाजता ठोकूरवरून,मंगलोर निघेल ती मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी 7.05 वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्णा रोड,कुमता,मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
2. MUMBAI CENTRAL TO MADGAON JN
MUMBAI CENTRAL- MADGAON JN EXPRESS (09003)
हि गाडी आठवड्यातून रोज मंगळवार सोडून दिनांक 24/08/2022 ते 11/09/2022 पर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी 12.00 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघेल ती मडगावला दुसऱ्या दिवशी 4.30 वाजता पोहोचेल.
MADGAON JN – MUMBAI CENTRAL EXPRESS (09004)
हि गाडी आठवड्यातून रोज बुधवार सोडून दिनांक 25/08/2022 ते 12/09/2022 पर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी 09.15 वाजता मडगाववरून निघेल ती मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी 1.00 वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली road,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या स्थानकांवर थांबतील.
3. BANDRA TO KUDAL
BANDRA(T) – KUDAL EXPRESS (09011)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी गुरुवारी 25/08/2022, 01/09/2022, 06/09/2022 रोजी ही गाडी 14.40 वाजता बांद्रा टर्मिनसवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.
KUDAL – BANDRA(T) EXPRESS (09012)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शुक्रवारी 26/08/2022, 02/09/2022, 07/09/2022 रोजी ही गाडी 6:45 वाजता कुडाळवरून निघेल ती बांद्रा टर्मिनसला दुसऱ्यादिवशी 21:30 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती General – 20 + Generator Car-2 Total 22 Coaches.
ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील.
4. UDHNA TO MADGAON JN
UDHNA – MADGAON EXPRESS (09018)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शुक्रवारी 26/08/2022, 02/09/2022, 09/09/2022 रोजी ही गाडी 15:25 वाजता उधनावरून निघेल ती मडगावला दुसऱ्यादिवशी 9:00 ला पोहोचेल.
MADGAON – UDHNA EXPRESS (09017)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शनिवारी 27/08/2022, 03/09/2022, 10/09/2022 रोजी ही गाडी 10:05 वाजता मडगाववरून निघेल ती उधनाला दुसऱ्यादिवशी 5:00 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या नवसारी ,वलसाड, वापी, पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या स्थानकांवर थांबतील.
5. AHMEDABAD TO KUDAL
AHMEDABAD – KUDAL EXPRESS (09412)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 09:30 वाजता अहमदाबादवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.
KUDAL- AHMEDABAD EXPRESS (09411)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 06:45 वाजता कुडाळवरून निघेल ती अहमदाबादला दुसऱ्यादिवशी 3:30 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -2 + Sleeper (SL)-8 + General – 4 + AC (3A)-6 + SLR-2 Total 22Coaches.
ह्या गाड्या सुरत,वापी,पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील.
6. VISHVAMITRI TO KUDAL
VISHVAMITRI – KUDAL EXPRESS (09150)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी सोमवारी 29/08/2022, 05/09/2022,रोजी ही गाडी 10:00 वाजता विश्वामित्रीवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.
KUDAL- VISHVAMITRI EXPRESS (09411)
हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 06:45 वाजता कुडाळवरून निघेल ती विश्वामित्रीला दुसऱ्यादिवशी 1:00 ला पोहोचेल.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)- 12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2 Total 24 Coaches.
ह्या गाड्या भारूच ,सुरत,वापी,पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील..
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर याआधी सोडलेल्या काही विशेष गाड्यांशिवाय अजून काही विशेष गाड्या सोडणार आहेत असे जाहीर केले आहे . नागपूर ते मडगाव ह्या स्टेशन दरम्यान ह्या गाड्या चालविण्यात येतील. ह्या गाडीच्या एकूण 20 फेऱ्या चालविण्यात येतील.
ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 16 जुलै रोजी चालू होईल.
NGP MAO SPECIAL (01139)
हि गाडी 27 जुलै ते 28 सप्टेंबर पर्यंत आठवड्याला 2 दिवस बुधवार आणि शनिवार 27,30 जुलै,3,6,10ऑगस्ट, 14,17,21,24,28 सप्टेंबर ह्या दिवशी
चालविण्यात येणार आहेत.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-11 + General – 4 + AC (3A)-4 + SLR-2 Total 22 Coaches.
ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
NGP MAO SPECIAL (01139)
Station Name
TIME
Day
NAGPUR
15:05
1
WARDHA JN
16:12
1
PULGAON JN
16:33
1
DHAMANGAON
16:50
1
BADNERA JN
18:03
1
AKOLA JN
19:03
1
MALKAPUR
20:25
1
BHUSAVAL JN
21:35
1
NASHIK ROAD
01:00
2
IGATPURI
01:50
2
KALYAN JN
04:35
2
PANVEL
05:40
2
ROHA
06:50
2
MANGAON
07:24
2
VEER
07:38
2
KHED
08:26
2
CHIPLUN
08:48
2
SAVARDA
09:04
2
ARAVALI ROAD
09:18
2
SANGMESHWAR
09:32
2
RATNAGIRI
10:25
2
ADAVALI
10:56
2
VILAVADE
11:12
2
RAJAPUR ROAD
11:36
2
VAIBHAVWADI RD
12:02
2
NANDGAON ROAD
12:20
2
KANKAVALI
12:40
2
SINDHUDURG
13:02
2
KUDAL
13:22
2
SAWANTWADI ROAD
13:52
2
THIVIM
14:42
2
KARMALI
15:32
2
MADGAON
17:30
2
MAO NGP SPECIAL (01140)
हि गाडी 28 जुलै ते 29 सप्टेंबर पर्यंत आठवड्याला 2 दिवस गुरुवार आणि रविवार 28,31 जुलै. 4,7,11ऑगस्ट, 15,18,22,25,29 सप्टेंबर चालविण्यात येणार आहेत.
डब्यांची स्थिती AC (2A) -1 + Sleeper (SL)-11 + General – 4 + AC (3A)-4 + SLR-2 Total 22 Coaches.
हल्लीच घडलेल्या गैरप्रकारांनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी आंबोलीत गर्दीच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी म्हणजे वीकएंडला पोलीस बंदोबस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात काही मद्यधुंध तरुणांनी हुल्लडबाजी करून वाहतुकीस अडथळा आणला होता. तसेच बेळगावच्या एका तरुणाने सावंतवाडी आगाराच्या ST चालकाला गाडीतून ओढून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. हे अनुचित प्रकार टाळण्यासाठी इथला बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.
आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलिसांची बैठक घेण्यात आली होती त्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता, तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने काही निर्णय घेण्यात आले.
मुख्य धबधब्याच्या ठिकाणी गाड्या योग्य नियोजनाअभावी पार्क केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून पार्किंगसंबधी नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. वाहने पार्क करण्यासाठी आंबोली येथील सात पर्यटन स्थळावर पार्किंगसाठी जागा लवकरच निश्चित केली जाईल. त्यानंतर वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सरकार इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या विचारात आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतह्या बद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बैठकीनंतर व्हॅट कपातीबाबत हि घोषणा करण्याची शक्यता आहे.
जर हि कपात झाली तर पेट्रोल आणि डिझेल कमीत कमी 5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साहजिकच सर्व माहिती आपल्याला त्या घोषणेनंतरच समजेल.
राज्यात निर्माण झालेल्या राजकिय परिस्थिती मुळे कोणताही अनुचित प्रकार जिल्हय़ात घडू नये म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आपल्या अधिकारकक्षेत जिल्हय़ात मनाईचे आदेश जाहीर केले आहेत. जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी खालील गोष्टींवर मनाई आणली आहे. ही मनाई २७ जुलै पर्यंत असेल असे त्यांनी जाहीर केले आहे. कलम ३७/१ 1. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुऱ्या, काठ्या, लाठ्या आणि कोणतेही शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू बाळगणे. 2. अंग भाजून टाकणारा किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. 3. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडण्याची साधने किंवा उपकरणे सोबत बाळगणे किंवा तयार करणे. 4. व्यक्तींची प्रतिमा, पुतळे किंवा आकृती यांची प्रदर्शने करणे. (ज्यामुळे समाजाच्या भावना दुखावतील) 5. सार्वजनिक रीतीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाजवणे. 6. सभ्यता व निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे तयार करणे किंवा सोंग आणणे किंवा कोणतेही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. कलम ३७/३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे किंवा सभा घेणे.
हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबधीत उपविभागीय पोलीस अधिकारी याना संबधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना तसेच लग्नसमारंभ किंवा इतर धार्मिक समारंभ तसेच अंतिम विधीसाठी लागू पडणार नाही.
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील.
वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास तो व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
दिवा – रोहा- दिवा ही पॅसेंजर ट्रेन गणेशोत्सव कालावधीत चिपळूणपर्यंत चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने मध्य रेल्वे शी समन्वय साधून घेतला आहे.
सध्या ६१०११ /६१०१२ ही पॅसेंजर गाडी दिवा ते रोहा आणि रोहा ते दिवा अशी चालत आहे. हीच गाडी पुढे रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा ०११५७/०११५८ ह्या नंबरने चालविण्यात येणार आहे.
०११५७ ही गाडी रोह्यातून सकाळी ११.०५ ला सुटेल ती चिपळूणला दुपारी १.२० ला पोहोचेल. ०११५८ ही गाडी ३.४५ ला चिपळूण येथून सुटून १६.१० ला रोह्याला पोहोचेल.
माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड ह्या स्टेशन वर ह्या गाड्या थांबतील.
सदरगाडी १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर पर्यंत चालविण्यात येणार आहे. ह्या गाडीला ८ MEMU (डबे) असतिल.
होय ३५० वर्ष! ज्याने शिवकाळ अनुभवला, ज्याने दस्तुखुद छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास अनुभवला तो इतिहासाची साक्ष देणारा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराच्या परिसरातील व आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ अखंड ३५० वर्षापेक्षा जास्त निधड्या छातीने उभा असणारा अवाढव्य असा हो हो मावळाच म्हणावं लागेल असा वृक्ष म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या काळातील आंब्याचे झाड. याच आंब्याच्या ढोळी मध्ये शिवकालीन शस्त्र सापडली होती. या आंब्याला येणाऱ्या साखरे प्रमाणे गोड अंब्यामुळे पंचक्रोशीत या आंब्याच्या झाडाला साखरगोटी म्हणूनही ओळख होती.
उमरठ येथे येणाऱ्या प्रत्येक नरवीर प्रेमींनी हे आंब्याचे झाड आणि त्याच्या ढोलीत सापडलेली तलवार आणि दांडपट्टा पाहिला असेल.
गेले काही दिवस होणाऱ्या पावसा बरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने आज आज हा आंब्याचा वृक्ष कोलमडून पडला. सुदैवाने जवळपास कोणी नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतू स्मारक परिसराला असणाऱ्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा मावळा हरपल्याची भावना गावकरी व्यक्त करत आहेत…