कुडाळ येथे एसटी बसला अपघात…चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला …

भर उतारावर गाडी, अचानक  ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात येते. डाव्याबाजूला दरी तर उजव्याबाजूला घळण. मोठा अपघात टाळण्यासाठी निर्णय घेण्यासाठी काही क्षणांचाच अवधी. चालकाने या कठीण समयी प्रसंगावधान राखून आपल्या जिवाची पर्वा न करता उजव्या बाजूला  असलेल्या घळणीला गाडी आढळून थांबवली आणि मोठा अपघात टळला! 
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : दि 26 जानेवारी रोजी सकाळी भोगवे वरून कुडाळला जाणाऱ्या एसटी बसला सकाळी 10:40 वाजण्याच्या सुमारास वालावल येथील उतार असलेल्या मार्गावरून जाताना अपघात झाला. एका बाजुला दरी तर दुसऱ्या बाजूला घळण आणि तीव्र उतार असलेल्या या मार्गावर ही बस थांबविणे गरजेचे होते. प्रसंगावधान राखून चालक तुषार गंवडे यांनी एका घळणीला बस आदळली व बस थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात गवंडे यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व जखमींवरमीं वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याबाबत एसटी बसचे वाहक हरीष करलकर यांनी निवती पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. या बसमध्ये ८ प्रवासी प्रवास करत होते.
सदरच्या अपघाताचे वृत्त समजतात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर राणे यांनी भेट दिली. तर पोलीस एस. बी. नाईक अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. 

Loading

Facebook Comments Box

मालवणात पहाटे आगीचा थरार.. २ दुकाने जळून खाक..

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लागत असलेल्या दुकानांपैकी दोन दुकांनाना आज पहाटे आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही पण आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबतची माहिती अशी- धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लगत अनेक दुकाने आहेत. यातील विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरुस्ती व विक्रीचे एक दुकान असून त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना ही आग लागल्याचे दिसून येताच त्यांनी अन्य लोकांशी संपर्क साधत याची माहिती दिली. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंब ही दाखल झाला. यात दुकानातील नव्या व जुन्या अशा एकूण १२ ते १५ मशीन तसेच फर्निचरसह संपूर्ण दुकानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळून खाक झाले. यात मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे हे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. तेही जळून नुकसान झाले.

(Also Read >कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)

दुकान मालक, स्थानिक नागरिक तसेच मंदार केणी, महेश सारंग, राजू बिडये, भाई कासवकर यासह अन्य नागरिक, नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. मात्र दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुकानांना लागूनच अन्य काही दुकाने आहेत. त्यांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गंगाराम कोकरे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील प्रक्रिया महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सुरू होती.

Loading

Facebook Comments Box

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा २ फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी । प्रतिनिधी : तळकोकणातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,महाराष्ट्र व गोवा राज्यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी येथील ३६५ खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार २ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो.यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
होणारे कार्य्रक्रम 
सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद,नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे.
कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.

Loading

Facebook Comments Box

मराठी भाषेवर पुन्हा अन्याय…सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांच्या अनुवाद भाषेत स्थान नाही….

  • देशात ८.३ करोड जनतेची प्रथम भाषा मराठी असूनही तिला स्थान नाही
  • मराठी भाषेपेक्षा कमी बोलल्या जाणाऱ्या गुजराथी आणि ओडिया भाषेला स्थान
दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्रे यापुढे इंग्रजी वगळता भारतातील इतर चार भाषेत उपलब्ध होतील असे  आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जाहीर केले आहे. यासंबंधी त्यांनी मंगळवारी तशाआशयाची माहिती प्रसिद्ध केली होती. या चार भाषेत हिंदी, गुजराथी, उडिया आणि बांगला या भाषेचा समावेश आहे. देशात सर्वच नागरिकांना इंग्रजी भाषा वाचता येत नसल्याने न्यायालयाची निकालपत्रे तळागाळातील नागरिकांना समजावीत यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. 
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खूप कौतुकास्पद असला तरी मराठी भाषेवर अन्याय करणारा आहे. जणगणनेनुसार देशात मराठी भाषेचा हिंदी आणि बंगाली ह्या भाषेनंतर तिसरा क्रमांक लागतो. ८.३ करोड जनतेची प्रथम भाषा मराठी आहे. टक्केवारीत बोलायचे झाल्यास हे प्रमाण देशातील एकूण लोकसंख्येच्या ६.८६% एवढे आहे. त्यामुळे निकालपत्रासाठी मराठी भाषेला स्थान द्यायला हवे होते. ते न देता सातव्या आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या अनुक्रमे गुजराथी(५.५४ करोड भाषिक) आणि उडिया (३.७५ करोड भाषिक) या भाषेंना स्थान देण्यात आलेले आहे. केंद्र असो वा सर्वोच्च न्यायालय  या आधी पण अनेकदा असे मराठी भाषेला डावलण्याचे प्रकार घडले आहेत. 
 
देशातील सर्वात जास्त बोलण्या जाणाऱ्या १० भाषा.
Language Speakers
Hindi 52.83 crore
 Bengali 9.72 crore
Marathi  8.30 crore
Telugu 8.11 crore
Tamil 6.90 crore
Gujarati 5.54 crore
Urdu 5.07 crore
 Kannada 4.37 crore
Odia 3.75 crore
Malayalam 3.48 crore

Source – 2011 Census of India

Loading

Facebook Comments Box

कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…

रायगड : रोजच्या जीवनातील आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी ‘क्यूआर कोड’ चा वापर आता सर्वच ठिकाणी होताना दिसत आहे. रोख रक्कम सोबत बाळगण्याची गरज नाही आणि सुट्ट्या पैशाचे टेन्शन ह्या ‘क्यूआर कोड’ मुळे नाहीसे होताना दिसत आहे. याच ‘क्यूआर कोड’ सुविधेंचा लाभ घेऊन आपल्या नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे याकरिता रायगड तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने एक हायटेक फंडा वापरला आहे. अशी सुविधा देणारी चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचात ठरली आहे.
ग्रामपंचायतीने प्रत्येक घरावर ‘क्यूआर कोड’ चे स्टिकर्स लावले आहेत. प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्याचे ‘क्यूआर कोड’ बनविण्यात आलेले आहेत. हे ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून नागरिकांना आपला कर  भरणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाही. तसेच हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून नागरिकांना आपल्या इतर समस्या सोडवता येतील. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी  ‘क्यूआर कोड’ द्वारे इतर मनोरंजक माहिती दिली जात आहे. भविष्यात हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून इतर सुविधेंचा लाभ पण नागरिकांना घरबसल्या देण्याचा आपला प्रयत्न आहे असे ग्रामपंचायती द्वारे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचातीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे. 

Loading

Facebook Comments Box

राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा! महाराष्ट्रातील ७४ पोलिसांचा मिळणार हा सन्मान.. जाणून घ्या नावे.

   Follow us on        

नवी दिल्ली :केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस पदकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील ७४ जणांना पदक जाहीर झाले. त्यामध्ये उत्कृष्ट सेवेकरिता ४ पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ आणि ३१ जणांना ‘पोलीस शौर्य पदक’पोलीस शौर्य पदक’ यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी  राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. राज्यातील ३१ अधिकारी व शिपायांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांची नावे.

पोलीस शौर्य पदक विजेत्यांची नावे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal for Distinguished Service ) आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (Police Medal for Meritorious Service) जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

आमदार भडकले आणि हातात दांडा घेवून बाहेर पडले.

सिंधुदुर्ग :जिल्ह्यात राजकिय पक्षात होणारे राडे हे काही येथील जनतेला नवीन नाही आहेत. राजकारणातील हे राडे मुख्यतः कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसतात, पण एका भडकलेला आमदार हातात दांडा घेऊन ह्या राड्यात सहभागी होण्यासाठी चालल्याचे दृश्य काल जिल्हय़ातील कणकवली तालुक्यात पाहायला मिळाले.

(Also Read >कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!)

ह्याबाबत वृत्त असे की काल कणकवली तालुक्यातील कनेडी ह्या गावात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुपडलेतना राजकिय राग मनात ठेवून एका कारणाने बाचाबाची झाली होती. त्याचेपडलेत रूपांतर मारहाणीत होऊन त्याला गंभीर स्वरुप आले. ह्या परिसरातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांचात राडा सुरू झाला. त्यानंतर मात्र पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या सर्व प्रकाराने संतापलेले शिवसेना आमदार वैभव नाईक एका हातात दांडा घेऊन ते ह्या राड्यात सामील होणार होते तेवढय़ात त्यांना पोलीसांनी अडवून माघारी पाठवले.

 

 

 

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

रेल्वेस्थानक ते घर प्रवास होणार सुखकर! कोकणातील रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार..

  • कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र राज्यातील 37 स्थानकांचा कायापालट होणार. 
  • रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट.
  • सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.
  • रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे

मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(Also Read>मराठी भाषेवर पुन्हा अन्याय…सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांच्या अनुवाद भाषेत स्थान नाही….)

सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.

कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

(Also Read> कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण

कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

 

Loading

Facebook Comments Box

परमवीरांचा सन्मान! अंदमान – निकोबार येथील बेटांना ‘या’ परमवीरचक्र विजेत्यांची नावे

देशातील बातम्या | आजच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६वी जयंतीनिमित्त  दक्षिण अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यादरम्यान, अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे नामकरण करण्यात आले. या बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवण्यात आली.

(Also Read>कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!)

सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हे बेटे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील. अंदमानच्या या भूमीवर पहिल्यांदाच मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीमधून अपार वेदनांसह ऐकू येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाहीच्या स्तंभासमोरील ‘कर्तव्य पथ’येथील नेताजींचे स्मारक आपणांस आपल्या कर्तव्यांची आठवण करुन देतो. तसेच, वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज २१ बेटांना नावे देण्यात आली, त्यातून अनेक संदेश मिळणार आहेत. हा संदेश ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा असून, आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याचा आहे.”

 

खालील बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत. 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!

मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे.  चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत  किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम  ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता.  कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search