मुंबई :कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. आता मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये आवश्यकते बदल करण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सीट बेल्ट बांधणे टाळून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर १ नोव्हेंबर २०२२ पासीन मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ १९४(ब)(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
मुंबई :यंदा एसटी महामंडळाने दिवाळी सुट्ट्यांमध्ये एसटीच्या जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त १४९४ जादा बसेस सोडणार आहे.
एसटी बसेसच्या या अधिकच्या फेऱ्या २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान म्हणजे ११ दिवस चालवण्यात येणार आहेत. ही माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील सर्व आगारांना जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या विभागातून किती बस?
प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८,मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.
बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबई :तुम्हाला क्रिकेटची आवड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही T20 वर्ल्ड कपचे मॅच थिएटर देखील पाहू शकता. मल्टिप्लेक्स कंपनी INOX ने ICC सोबत वर्ल्डकपसंदर्भात करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतातील सर्व सामने आपल्या आता थिएटरमध्ये दाखवणार आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनलचे सामनेही थिएटरमध्ये दाखवण्यात येण्याची सोय करण्यात आली आहे.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 25 शहरांमध्ये जिथे INOX चे स्क्रीनिंह होतात. त्या ठिकाणी T20 वर्ल्डकप 2022 मध्ये होणाऱ्या भारताच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग करण्यात येईल. अशा परिस्थितीत भारताचे सामने मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असणाऱ्या चाहत्यांसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे.
येत्या रविवारपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 16 टीम या स्पर्धेचा भाग असणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार असून तो पाकिस्तानसोबत आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला या सामन्याची उत्सुकता लागलीये. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
रत्नागिरी:दिवाळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या काही काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या आता 4 अतिरिक्त AC3 कोच सहित चालविण्यात येणार आहे. ह्या आधी ह्या गाड्या आधी 12 डब्यां सहित चालविण्यात येत होत्या त्या आता 16 कोचसहित खालील कालावधीसाठी चालविण्यात येणार आहेत.
Train no. 11099 Ex. Lokmanya Tilak (T) दि
नांक 15/10/2022 ते 29/10/2022 प्रत्येक शनिवारी.
Train no. 11100 Ex. Madgaon Jn.
दिनांक 16/10/2022 ते 30/10/2022 प्रत्येक रविवारी.
Train no 11085 Ex. Lokmanya Tilak (T)
दिनांक 17/10/2022 ते 31/10/2022 प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी.
Train no. 11086 Ex. Madgaon Jn.
दिनांक 18/10/2022 to 01/11/2022 प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी
रत्नागिरी : दिवाळीसाठी सुरत ते करमाळी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडीची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी दि. 25 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही गाडी स्पेशल फेअरसह चालवली जाणार आहे.पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने कोकण रेल्वेने या गाडीचे नियोजन केले आहे.
Train no. 09193 Surat – Karmali Weekly
ही गाडी दि. 25 ऑक्टोबर रोजी सुरत येथून सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटून दुसर्या दिवशी गोव्यात करमाळीला ती दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचेल.
Train no. 09194 Karmali – Surat Weekly
परतीच्या प्रवासात ही गाडी (01994) करमाळीहून दि. 26 रोजी दुपारी 2.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजता ती सुरतला पोहचेल.
मुंबई : देशात 5G सुरुवात होताच सायबर गुन्हेगार कार्यरत झाले आहेत. ५जी वरून मुंबई सायबर पोलिसांनी एक अलर्ट जारी केला आहे. यासंबंधी यात म्हटले की, लोकांनी ५जी नेटवर्क संबंधी काही सूचना पाळणे गरजेच्या आहेत.
सायबर पोलिसांनी जी अधिसूचना जारी केली आहे, त्यात म्हटले की, अनेक सायबर गुन्हेगार आता सक्रीय झाले आहेत. त्यांनी ५जी सेवा मिळवणाऱ्या यूजर्सला सिम कार्ड अपग्रेड करण्यासाठी मेसेज करण्याचे काम सुरू केले आहे. मेसेज करून ते यूजर्सकडे ओटीपीची मागणी सुद्धा करीत आहेत. त्यामुळे अनेक जणांच्या बँक खात्यातून पैसे काढले जाण्याची शक्यता आहे.
फ्रॉड करणाऱ्या यूजर्सला एक लिंक पाठवली जाते. ज्यात सिमला अपग्रेड करण्यासाठी यूजर्सला क्लिक करण्यास सांगितले जाते. एकदा लिंक क्लिक केल्यानंतर हॅकर्स पर्सनल माहिती चोरी करण्यासोबतच बँकिंग डिटेल्सला हॅक केले जाते. नंतर पुन्हा मोबाइलला हॅक केले जाते. अनेक यूजर्सला या प्रकारची लिंक पाठवून त्या क्लिक करण्यास भाग पाडले जाते. लिंकला क्लिक केल्यानंतर हॅकिंगचे बळी व्हावे लागते.
5G सिम फ्रॉड पासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्संनी कंपनीचे कस्टमर केअर वर कॉल करावे. किंवा एअरटेलच्या अॅपमधून ५जी कनेक्टिविटी चेक करण्याची प्रोसेस दिली आहे. ती करावी. असे जर केले तर सायबर फ्रॉड पासून सुरक्षित राहता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने भारतात ५जीची सुरुवात केली आहे. त्यानंतर देशातील अनेक शहरात सायबर क्रिमिन्लस याचा गैरफायदा घेत आहेत.
Risk Alert! Upgradation in tech brings about a new wave of scammers waiting to pounce. The most recent one is fraudsters offering to guide you to convert to 5G. Do not share your personal/banking information or click on any unknown links.#Scam2022#5GScam#CyberSafepic.twitter.com/9S0XphLM9Q
अलिबाग: अलिबाग तालुक्यात एक सामुदायिक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अलिबागमधील चार हजारांहून अधिक नागरिकांना २५ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. नॅसडॅक या अमेरिकन शेअर मार्केटमधील नावाजलेल्या कंपनीचा वापर करून हा हायटेक गंडा घालण्यात आला. सुरुवातीला ५०० रुपयांच्या बदल्यात १,२०० रुपये घेतल्यानंतर लोकांचा विश्वास बसला आणि त्यांनी जास्त गुंतवणूक केली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून या कंपनीने १४ दिवसांत १ लाखांवर २ लाख ४० हजार परतीची योजना काढली. अनेकांनी दागिणे गहाण ठेवून पैसे गुंतवले आणि काही दिवसातच कंपनीने वेब पोर्टल बंद झाले.
फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी अलिबाग पोलिस ठाण्यात येत सामुहीक तक्रार दाखल केली; मात्र, पोलिसांसमोर या हायटेक फसवणुकीचा गुंता सोडविण्याचे मोठे आव्हान आहे. फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेब पोर्टलचा आय पी ऍड्रेसहा कॅलिफोर्नियामधील आहे, तर गुंतवणुकीसाठी जे संपर्क क्रमांक वापरले होते, ते बंद आहे. बहुतांश वेळा व्हॉट्सॲप आणि चॅटिंगद्वारे गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आता कोणीही त्यास प्रतिसाद देत नसल्याने गुंतवणुकदारांना हवालदिल झाले आहेत.
अशाच प्रकारे नॅशडॅक कंपनीच्या नावाचा वापर करून नाशिक, शिक्रापूर, पुणे, डोंबिवली आणि आता अलिबागमध्ये फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फसवणूक झालेल्यांपैकी अनेकांना ही बोगस कंपनी आहे, हे माहिती होते. मात्र हमखास मोबदल्याच्या मोहाने त्यांचा घात केला. अनेकांनी दागिने, उसनवारी आणि इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक काढून या कंपनीत पैसे टाकले. शिवाय मित्र, नातेवाइकांनाही पैसे गुंतवण्यास सांगितले. केवळ तीन महिन्यात २५ कोटी रुपयांचा गंडा या बोगस कंपनीने घातला.
गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यासाठी ५०० जणांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. अलिबाग तालुक्यातील एकट्या कुरूळ गावामध्ये असे चार ग्रुप कार्यरत होते. या गावातील लोकांनी लगतच्या गावातील आपले नातेवाईक, मित्रमंडळींनाही गुंतवणूक करण्यास सांगितले. आपल्यासह तिघांना सहभागी केल्यावर पहिल्या लेवलसाठी १ हजार रुपये, सहा जणांना सहभागी करून घेतल्यानंतर दोन हजार रुपये, मासिक पगार सुरू केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करून घेण्याची चढाओढ पंचक्रोशीत सुरू होती. तीन महिन्यात या स्कीममध्ये अलिबाग तालुक्यात ५ हजारांहून अधिक लोकांनी पैसे गुंतवल्याचे उघड होत आहे.
दोनच दिवसात दुसरा वेब पोर्टल कार्यान्वित फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गुगल पे वरून थेट पैसे ट्रान्स्फर करता यायचे. परंतु त्यानंतर युटीआर पासवर्ड वापरावा लागत असे. यासाठी दररोज संध्याकाळी बोनस जाहीर केला जायचा, व्हॉट्सॲपवरून मॅसेज करून कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली जायची. नॅशडॅक कंपनीच्या नावाने सुरू केलेला वेबपोर्टल बंद केल्यानंतर हीच पद्धत वापरून फसवणूक करण्यासाठी एनवायएससी नावाचा नवा वेबपोर्टल सुरू करण्यात आला आहे. त्याच्या वेबलिंक येथील नागरिकांच्या मोबाईलवर येऊ लागल्या आहेत.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
मुंबई: मुंबईकरांसाठी बेस्टने एक नवीन offer आणली आहे. या ऑफरमध्ये प्रवाशांना कोणत्याही मार्गावर 5 फेर्या फक्त 9 रुपयांमध्ये करता येतील. ही ऑफर 7 दिवसांसाठी वैध असेल. बेस्ट चलो या application द्वारे प्रथमच व्यवहार करणार्या वापरकर्त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दिनांक 12 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असेल.
प्रवाशांनी बसच्या तिकींटां साठी डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही ऑफर आणली गेली आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Google या सर्च इंजिन वर कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल चुकीची माहिती लिहिली गेली होती ही बाब लक्षात घेऊन शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमीं संघटनांनी यावर आक्षेप घेण्यासाठी मोहीम राबवली होती. दोन दिवसात हजारो आक्षेप गुगलकडे नोंदविण्यात आले होते. यानंतर गुगलने या संदर्भातील दुरुस्ती केली आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या समोरील पायरेट्स म्हणजे समुद्री डाकू असा उल्लेख हटविण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे