रत्नागिरी | विजय सावंत : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरील हातिवले येथील टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. सकाळ सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.
या टप्प्यातील जवळपास 98.02 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे असे NHAI म्हणने आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे.या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.
याआधी पण येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली चालू केली होती. मात्र स्थानिकांचा त्याला मोठा विरोध झाला. माजी खासदार नीलेश राणे यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे येथील टोल वसुली बंद करण्यात आली होती.
महामार्गावर अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळे येत आहेत. या ठिकाणावरून गाड्या खूप कमी वेगाने आणि सांभाळून चालवाव्या लागत आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी अनेक बाबीत कमतरता असल्याने अपघात होत आहेत. आमचा टोल वसुली करिता विरोध नाही पण महामार्गाचे काम अपूर्ण असताना आणि फक्त काही भागाचे काम पूर्ण झाले असा दावा करून टोल वसुली करणे पूर्णपणे चुकीचे आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे या महामार्गाला 12 वर्ष रखडवून येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला; त्यात भर म्हणुन या अपुऱ्या महामार्गावर टोल वसुली करून प्रशासन त्यांचा रोष ओढवून घेणार आहे.
मुंबई – आजकाल समाज माध्यमांतून अफवा पसरवणे हे नेहमीचे झाले आहे. काही लोक फक्त मजा किंवा निव्वळ टाईमपास म्हणुन काही पोस्ट बनवून त्या सोशल मीडिया वर पसरवत असतात. या अफवांवर विश्वास ठेवून समाजातील इतर घटकांचे खूप नुकसान होते.
मागे एकदा बारावीची परीक्षा देणारे काही विद्यार्थी एका पेपरला परीक्षा केंद्रात हजेर राहू शकले नाहीत. कारण कोणीतरी परीक्षेचे चुकीचे वेळापत्रक व्हायरल केले होते. त्या वेळापत्रकावर
विश्वास ठेवल्याने त्यांचा पेपर हुकला आणि नुकसान झाले. असाच प्रकार आता मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणार्या T.Y. B.A या परीक्षेच्या बाबतीत घडला आहे. उद्या होणारी परीक्षा पुढच्या कोणत्या तरी तारखेला होणार आहे अशा आशयाचे मेसेज सोशल मीडिया वर पसरविण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या हे लक्षात येताच त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून ते प्रसिद्ध केले आहे.T.Y. B.A (Semester VI) ची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रका प्रमाणेच होणार असून सोशल मीडिया वरील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाने गाडी ड्राईव्ह करताना महामार्गाच्या बाजूला असलेल्या फलकांवर दिलेल्या वेगमर्यादेचे पालन न केल्यास तुम्ही आता तुम्ही सहज पकडले जाणार आहात. कारण या महामार्गावर आता स्पीड गन बसवण्यात येत आहेत.
सध्या खानु मठ दरम्यान येथे स्पीड गन कॅमेरा लावला आहे. या भागात 75 किलोमीटर पेक्षा अधिक वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहन चालकांकडून 2 हजार रुपये दंड आरटीओ कडून वसूल केले जात आहे. महामार्ग जसा जसा पूर्ण होईल तसे अपघातप्रवण क्षेत्रात असे अजुन स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
वेगाने गाड्या चालवून होणारे अपघात टाळण्यासाठी स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येतात. या गन वाहनाची दिशा, वेग, कोणत्या लेनने वाहन मार्गस्थ झाले, कॅमेरा कुठे लावला आहे, तारीख, वेळ आदी सर्व माहिती देतात. त्यामुळे आरटीओ कर्मचार्यांना कारवाई करणे सोपे जाते. दंडाची पध्दतही ऑनलाईन असल्याने तो भरण्याशिवाय गत्यंतर नाही. दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करतात आणि अपघात कमी होतात.
Vision Abroad
1) Train no. 01455 / 01456 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
| Train no. 01455 ⇓ | Day | Station Name | Train no. 01456 ⇑ |
Day |
| 01:10 | 1 | LOKMANYATILAK T | 03:45 | 2 |
| 01:30 | 1 | THANE | 03:05 | 2 |
| 02:20 | 1 | PANVEL | 02:15 | 2 |
| 03:45 | 1 | ROHA | 01:05 | 2 |
| 04:10 | 1 | MANGAON | 23:32 | 1 |
| 05:12 | 1 | KHED | 22:10 | 1 |
| 05:44 | 1 | CHIPLUN | 21:42 | 1 |
| 06:10 | 1 | SAVARDA | 21:12 | 1 |
| 06:40 | 1 | SANGMESHWAR | 20:50 | 1 |
| 07:40 | 1 | RATNAGIRI | 20:05 | 1 |
| 08:22 | 1 | ADAVALI | 19:20 | 1 |
| 09:08 | 1 | RAJAPUR ROAD | 18:46 | 1 |
| 09:22 | 1 | VAIBHAVWADI RD | 18:30 | 1 |
| 10:13 | 1 | KANKAVALI | 18:02 | 1 |
| 10:34 | 1 | SINDHUDURG | 17:44 | 1 |
| 10:46 | 1 | KUDAL | 17:32 | 1 |
| 11:10 | 1 | SAWANTWADI ROAD | 17:10 | 1 |
| 12:10 | 1 | THIVIM | 16:40 | 1 |
| 14:35 | 1 | KARMALI | 16:20 | 1 |
2) Train No. 01049 Pune Jn. – Ernakulam Jn. Superfast & Train No, 01050 Ernakulam Jn. – Pune Jn. Special (Weekly):
Konkan Railway News | मंगळुरू ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अशी वन-वे सुपरफास्ट विशेष गाडी शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी सोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०६००७ मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) वन वे सुपरफास्ट स्पेशल मंगळुरू जंक्शन येथून 08/04/2023, शनिवार रोजी 18:10 वाजता सुटणार असून ती ट लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी 13:15 वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे
सुरतकल, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बैदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, कारवार, काणकोण, मडगाव जंक्शन, करमाळी, थिविम, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल आणि ठाणे
डब्यांची संरचना
ही गाडी एकूण 19 कोचसह धावणार आहे. टू टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 01 कोच, स्लीपर – 06 कोच, जनरल – 09 डबे, SLR – 02. अशा डब्यांच्या रचनेसह धावणार आहे.















