



Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून डोंबिवली स्थानकात उतरता न आल्याने संतापलेल्या एका प्रवाशाने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. इतर प्रवाशांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
बुधवारी सकाळी कल्याणकडून दादरकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून शेख जिया हुसेन (१९) प्रवास करीत होता. डोंबिवली स्थानकात पोहोचण्यापूर्वी आपण जलद लोकलमध्ये असल्याने ती मुंब्रा स्थानकात थांबणार नसल्याचे त्याच्यालक्षात आले. त्यामुळे तो डोंबिवली स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, एका प्रवाशाला धक्का लागून वाद सुरू झाला. त्यातच धक्काबुक्की होऊन हुसेनला काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यावर संतापलेल्या हुसेनने खिशातील चाकू काढत प्रवाशांवर हल्ला केला. यामध्ये अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी जखमी झाले. यानंतर काही प्रवाशांनी हुसेनला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
आजचे पंचांग
- तिथि-अष्टमी – 12:00:33 पर्यंत
- नक्षत्र-अनुराधा – 15:54:34 पर्यंत
- करण-कौलव – 12:00:33 पर्यंत, तैतुल – 24:46:38 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-व्याघात – 11:58:00 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:05
- सूर्यास्त- 18:39
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 26:08:59
- चंद्रास्त- 12:16:59
- ऋतु- वसंत
- अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
- 1804: पहिले सेल्फ-प्रोपेलिंग स्टीम लोकोमोटिव्ह – पहिले वाफेवर चालणारे इंजिन सुरु झाले.
- 1842: जॉन ग्रिनो यांना शिलाई मशीनसाठी पहिले अमेरिकन पेटंट देण्यात आले.
- 1878: कनेक्टिकटमधील न्यू हेवन येथे पहिली टेलिफोन डायरेक्टरी जारी करण्यात आली.
- 1925: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- 1972: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना 20 हे चंद्रावर उतरले.
- 1999: हा दिवस अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जाहीर केला.
- 1788: ‘फ्रान्सिस रोनाल्ड्स’ – ब्रिटीश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलीग्राफ बनवणारे अभियंते यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑगस्ट 1873)
- 1894: ‘डॉ. शांतिस्वरुप भटनागर’ – वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1955)
- 1899: ‘सूर्यकांत त्रिपाठी निराला’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑक्टोबर 1961)
- 1911: ‘भबतोष दत्ता’ – अर्थतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1997)
- 1942: ‘जयश्री गडकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 2008)
- 1829: ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1778)
- 1975: ‘गजानन हरी नेने’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1912)
- 1977: ‘रा. श्री. जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 15 मे 1903)
- 1991: ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 4 जून 1936)
- 1998: ‘ओमप्रकाश बक्षी’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1919)




मुंबई : दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी तसेच दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (उबाठा) , रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर वरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाचे तीन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु आजच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे श्री. संजय जोशी, श्री बाबी देव यांनी दादर वरून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी श्री. मीना यांनी श्री. संजय जोशी आणि श्री. बाबी देव यांनी सुचविलेल्या पर्यायाबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिवा पर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसात करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.
शिष्टमंडळामध्ये खासदार – शिवसेना नेते श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार श्री. विनायक राऊत, श्री अरुणभाई दुधवडकर, आमदार श्री महेश सावंत, श्री.संतोष शिंदे, श्री. बाबी देव, श्री.संजय जोशी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.




Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता
डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, ती साधारणपणे 4 लाख असेल अशी माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. या कपातीमुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.




वैभववाडी: वैभववाडी रेल्वे स्थानक येथे वैभववाडी रेल्वे कर्मचारीवृंद तर्फे काल सालाबादाप्रमाणे सत्यनारायण पूजा आणि शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वात मोठे आकर्षण ठरले ते सत्यनारायण पूजेच्या मखरासाठी केळीच्या खोडा आणि पानांपासून पूजेच्या मखरासाठी बनविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.
सावंतवाडीच्या निरवडे कोनापाल या गावातील आनंद यशवंत मेस्त्री या तरुणाने कल्पकतेने ही प्रतिमा साकारली होती. यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक मखर बनवले आहेत. त्याने श्री देव विठ्ठल, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच ईतर बर्याच कलाकृतींचे मखर बनवले आहेत आणि प्रशंसाही मिळवली आहे. एक छंद म्हणुन त्याने ही कला जोपासली आहे.
या उत्सवा दरम्यान दिवसभरात सत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री ९ वाजता रेंबो फ्रेंड सर्कल, कवठणी प्रस्तुत “गावय” या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी नारायण नाईक यांनी दिली.
आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 10:01:16 पर्यंत
- नक्षत्र-विशाखा – 13:30:55 पर्यंत
- करण-भाव – 10:01:16 पर्यंत, बालव – 23:05:00 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-घ्रुव – 11:32:47 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:06
- सूर्यास्त- 18:39
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 25:12:59
- चंद्रास्त- 11:33:00
- ऋतु- वसंत
- सामाजिक न्याय दिवस
- 1792: अमेरिकेत पोस्टल सर्व्हिस सुरू झाली.
- 1935: कॅरोलिन मिकेलसेन – डॅनिश-नॉर्वेजियन एक्सप्लोरर, अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणारी पहिली महिला बनली.
- 1962: जॉन ग्लेन – अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती फिरणारे पहिले अमेरिकन बनले, त्यांनी चार तास, 55 मिनिटांत तीन कक्षा पूर्ण केल्या.
- 1978: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी पुरस्कार लिओनिड ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
- 1986: मीर अंतराळयान – सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केले.
- 1987: मिझोराम हे भारताचे 23 वे राज्य बनले.
- 2014: तेलंगणा हे भारताचे 29 वे राज्य बनले.
- 1901: ‘मिसर मुहम्मद नागुईब’ – इजिप्त चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 1984)
- 1904: ‘अलेक्सी कोसिजीन’ – रशियाचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 18 डिसेंबर 1980)
- 1923: ‘फोर्ब्स बर्नहॅम’ – गयानीज वकील आणि राजकारणी, गयाना देशाचे 2रे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1985)
- 1951: ‘गॉर्डन ब्राऊन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1962: ‘अतुल चिटणीस’ – भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 2013)
- 1920: ‘कार्ल अल्ब्रेक्ट’ – जर्मन व्यापारी, अल्दी सुपरमार्केट कंपनीचे सह-स्थापना यांचा जन्म. (मृत्यू : 16 जुलै 2014)
- 1950: ‘बॅ. शरदचंद्र बोस’ – स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे बंधू यांचे निधन.(जन्म: 6 सप्टेंबर 1889)
- 1974: ‘के. नारायण काळे’ – नाट्यसमीक्षक यांचे निधन.
- 1997: ‘श्री. ग. माजगावकर’ – पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक यांचे निधन.
- 2001: ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1919)
- 2012: ‘डॉ. रत्नाकर मंचरकर’ – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1943)
- 2015: ‘गोविंद पानसरे’ – भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1933)
- 2023: ‘एस. के. भगवान’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक – यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1933)


CSMT to KHED | Fare for Regular Train | Fare for Special Train |
Sleeper (SL) | ₹ 190 | ₹ 385 |
Three Tier AC (3A)
|
₹ 505 | ₹ 1,050 |
Two Tier AC (2A) | ₹ 710 | ₹ 1,440 |




सिंधुदुर्ग: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री 1 वा.च्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. सुदैवाने रुग्णाला तात्काळ बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला.
गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रुग्णांना अन्य एका रुग्णवाहिकेने उपचारासाठी बांबोळीकडे नेण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका ही दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला -वजराठ येथील एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. मात्र, तो रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर चालत बाहेर आला. नेमकी कशामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतला हे समजू शकलेले नाही.