Konkan Tourism: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर ‘डिजिटल कवच’

   Follow us on        

सिंधुदुर्ग, २ जानेवारी : कोकण किनारपट्टीवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ‘सचेत’ पोर्टलचा वापर करून पर्यटकांच्या मोबाईलवर थेट खबरदारीचे एसएमएस आणि सूचना पाठवल्या जात आहेत.

हा उपक्रम केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला मान्यता देत हे संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली. ३१ डिसेंबर रोजी अनेक पर्यटकांना हे अलर्ट मिळाले, ज्यामुळे ते अधिक सतर्क झाल्याचे दिसून आले.

पर्यटकांना पाठवल्या जाणाऱ्या मुख्य सूचना अशा :

भरती-ओहोटीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय समुद्रात उतरू नये.

स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

नौकाविहार करताना लाईफ जॅकेटचा वापर अनिवार्य करावा.

अतिगर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

आपत्कालीन मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक १०७७ किंवा ११२ वर संपर्क साधावा.

‘सचेत’ पोर्टलचा आतापर्यंत पूर, चक्रीवादळ किंवा वीज कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या पूर्वसूचनांसाठीच वापर होत होता. मात्र, पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा असा वापर करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

देवबाग पोलिस पाटील भानुदास येरागी म्हणाले, “अशा संदेशांमुळे पर्यटकांमध्ये जनजागृती होते. मनोरंजनाच्या नादात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होतं, पण हे अलर्ट जबाबदारीची जाणीव करून देतात.”

वेंगुर्ले नायब तहसीलदार राजन गवस यांनी सांगितले, “हे संदेश स्थानिक प्रशासनासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. पर्यटक आता समुद्रात उतरताना आवश्यक दक्षता घेत आहेत.”

प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे कोकणातील पर्यटनाला सुरक्षिततेची मजबूत साथ मिळाली आहे. पर्यटकांनी या सूचनांचे पालन करून सुरक्षित सुट्टीचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Facebook Comments Box

कासार्डे (सिंधुदुर्ग) येथील कवी ओंकार धुरी यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र (ISO 9001:2015 मानांकन प्राप्त) व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार दिननिमित्त दर्पण रत्न पुरस्कार २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावचे कवी ओंकार धुरी यांना काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दर्पण रत्न पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.

अवघ्या २२ व्या वर्षी कवी ओंकार धुरी यांनी काव्य क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवला असून, लहानपणापासून कविता लेखनाची आवड जोपासत ते सातत्याने लेखन करत आहेत.

मागील वर्षी युवा कला मंच, रायगड आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कासार्डे गावाचे नाव राज्यभर उज्वल केले होते.

त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार २०२६ दि. ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे प्रदान करण्यात येणार आहे.

या सन्मानाबद्दल साहित्य व काव्य क्षेत्रातून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या TOD विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

मुंबई: हिवाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे बोर्डाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) विशेष गाड्यांच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वेने उधना आणि मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे.

​विस्तारित गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​गाडी क्रमांक ०९०५७ उधना – मंगळुरू जंक्शन (UDN–MAJN):

​वार: ही गाडी आठवड्यातून दोनदा (बुधवार आणि रविवार) धावेल.

​वाढवलेला कालावधी: या गाडीचा विस्तार ०४ जानेवारी २०२६ ते २८ जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आला आहे.

​गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन – उधना (MAJN–UDN):

​वार: ही गाडी आठवड्यातून दोनदा (गुरुवार आणि सोमवार) धावेल.

​वाढवलेला कालावधी: या गाडीचा विस्तार ०५ जानेवारी २०२६ ते २९ जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर गाडीचे सविस्तर तपशील तपासून घ्यावेत.

गाडी क्रमांक ०९०५७ उधना – मंगळुरू स्पेशल ट्रेनचे थांबे:

Station Name (Code) Arrival Departure Stop Time Distance Travelled (KM) Loco Reversal
 Gujarat

Day 1

Surat (ST)

Starts

19:40

Starts

0

No

Book Now
Udhna Jn (UDN)

19:55

20:00

5 mins

5

No

Book Now
Valsad (BL)

20:50

20:52

2 mins

69

No

Book Now
Vapi (VAPI)

21:12

21:14

2 mins

93

No

Book Now
 Maharashtra
Palghar (PLG)

22:19

22:21

2 mins

176

No

Book Now
Vasai Road (BSR)

23:10

23:15

5 mins

215

No

Book Now
Bhiwandi Road (BIRD)

23:38

23:40

2 mins

243

No

Book Now

Day 2

Panvel (PNVL)

00:45

00:50

5 mins

283

No

Book Now
Pen (PEN)

01:33

01:35

2 mins

318

No

Book Now
Roha (ROHA)

02:20

02:25

5 mins

360

No

Book Now
Mangaon (MNI)

02:46

02:48

2 mins

402

No

Book Now
Khed (KHED)

03:38

03:40

2 mins

498

No

Book Now
Chiplun (CHI)

03:54

04:04

10 mins

539

No

Book Now
Savarda (SVX)

04:20

04:22

2 mins

565

No

Book Now
Sangmeshwar Road (SGR)

04:42

04:44

2 mins

598

No

Book Now
Ratnagiri (RN)

06:20

06:25

5 mins

645

No

Book Now
Rajapur Road (RAJP)

08:00

08:02

2 mins

734

No

Book Now
Vaibhavwadi Rd (VBW)

08:20

08:22

2 mins

758

No

Book Now
Kankavali (KKW)

09:00

09:02

2 mins

801

No

Book Now
Sindhudurg (SNDD)

09:20

09:22

2 mins

826

No

Book Now
Kudal (KUDL)

09:32

09:34

2 mins

840

No

Book Now
Sawantwadi Road (SWV)

10:10

10:12

2 mins

869

No

Book Now
 Goa
Thivim (THVM)

10:50

10:52

2 mins

915

No

Book Now
Karmali (KRMI)

11:12

11:14

2 mins

939

No

Book Now
Madgaon (Goa) (MAO)

12:20

12:30

10 mins

979

No

Book Now
Cancona (CNO)

13:00

13:02

2 mins

1025

No

Book Now
 Karnataka
Karwar (KAWR)

13:22

13:24

2 mins

1061

No

Book Now
Ankola (ANKL)

13:50

13:52

2 mins

1101

No

Book Now
Gokarna Road (GOK)

14:02

14:04

2 mins

1112

No

Book Now
Kumta (KT)

14:20

14:22

2 mins

1138

No

Book Now
Murdeshwar (MRDW)

15:00

15:02

2 mins

1195

No

Book Now
Bhatkal (BTJL)

15:22

15:24

2 mins

1215

No

Book Now
Byndoor Mookambika Rd (BYNR)

15:42

15:44

2 mins

1237

No

Book Now
Kundapura (KUDA)

16:20

16:22

2 mins

1284

No

Book Now
Udupi (UD)

17:00

17:02

2 mins

1329

No

Book Now
Mulki (MULK)

17:40

17:42

2 mins

1375

No

Book Now
Surathkal (SL)

18:00

18:02

2 mins

1387

No

Book Now
Mangalore Jn (MAJN)

End

00:00

End

1410

No

Book Now
Facebook Comments Box

Konkan Railway: एलटीटी यार्डात दुरुस्तीचे काम; कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथील यार्डमधील पिट लाईन क्रमांक ३ च्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी १ जानेवारी २०२६ पासून ३० दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेने कोकण आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या पनवेल स्थानकावर ‘शॉर्ट टर्मिनेट’ आणि तेथूनच ‘शॉर्ट ओरिजिनेट’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

​या बदलाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​पनवेल स्थानकावर समाप्त होणाऱ्या गाड्या (Short Termination):

​१. गाडी क्रमांक १६३४६ (तिरुवनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस):

३१ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत सुटणारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल स्थानकावर प्रवासाचा शेवट करेल. पनवेल ते एलटीटी दरम्यान ही गाडी रद्द राहील.

​२. गाडी क्रमांक १२६२० (मंगळुरू सेंट्रल – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस):

३१ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या दरम्यान सुटणारी ही गाडीचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त होईल. पनवेल ते एलटीटी दरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

​पनवेल स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या (Short Origination):

​१. गाडी क्रमांक १६३४५ (एलटीटी – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस):

२ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या काळात ही गाडी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. एलटीटी ते पनवेल दरम्यानची सेवा रद्द राहील.

​२. गाडी क्रमांक १२६१९ (एलटीटी – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस):

१ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही गाडी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकावरून सुटेल. एलटीटी ते पनवेल दरम्यानची सेवा रद्द असेल.

​प्रवाशांना विनंती: प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर पोरबंदर व जामनगर एक्सप्रेसचे जंगी स्वागत

ढोल ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करुन एक्स्प्रेस गाड्यांचे स्वागत करण्यात आले.

   Follow us on        

संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या या क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान संगमेश्वर वासीयांना लाभला. दीर्घ काळच्या संघर्षानंतर पोरबंदर एक्सप्रेस व जामनगर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनवर अधिकृत थांबा मिळाल्यानंतर, या गाड्यांचे भव्य व जंगी स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

पहिल्या दिवशी पोरबंदर एक्सप्रेस संगमेश्वर स्टेशनवर दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी जामनगर एक्सप्रेसचेही तितक्याच उत्साहात स्वागत करत संगमेश्वरवासीयांनी आपला आनंद व्यक्त केला.

या ऐतिहासिक यशामागे गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, आंदोलन, उपोषण आणि लोकशक्तीचा मोठा वाटा आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनसाठी लढा देणाऱ्या सर्व कार्यकर्ते, नागरिक, तसेच पत्रकार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रयत्नांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यामुळे आता संगमेश्वर व परिसरातील नागरिकांना थेट गुजरातकडे प्रवास करणे सुलभ झाले असून, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार व भाविक यांना याचा मोठा फायदा होणार आहे. जलद प्रवास शक्य होणार असल्याने आता रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

 

संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर सलग दोन दिवस उत्सवाचे वातावरण असून, हा थांबा म्हणजे संघर्षातून मिळालेला विजय आहे. यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे सदस्य समीर सप्रे, दिपक पवार, जगदिश कदम, गणपत दाभोळकर, रुपेश कदम, अशोक मुंडेकर, जी. झेड. टोपरे, मंगेश बाईत, या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. यातून हे यश साध्य झाले. हा विजय आंदोलन , संघर्ष काळात पाठबळ बनलेल्या तालुक्यातील जनतेचा आहे.अशी भावना ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

Facebook Comments Box

​”Enough is Enough”: 17-Year Wait for Mumbai-Goa Highway Sparks Massive ‘Rasta Roko’

   Follow us on        

SANGAMESHWAR: Frustrated by the nearly two-decade-long delay in the completion of the Mumbai-Goa National Highway (NH-66), the Mumbai-Goa Mahamarg Janakrosh Samiti has called for a massive “Rasta Roko” (road block) protest.

​The “Rasta Roko” is scheduled to take place on Sunday, January 11, 2026, starting at 10:00 AM near the Sangameshwar Depot. Under the slogan “Chala Sangameshwar!” (Let’s go to Sangameshwar), organizers are urging residents of the Konkan region to join in large numbers to demand accountability for the 17-year-old pending project.

​Key Demands of the Protest

​The Janakrosh Samiti has outlined a 9-point charter of demands directed at the government and highway authorities:

​Independent Oversight: Formation of an independent committee for the highway project, including four representatives from the Janakrosh Samiti.

Accountability: Strict action against officials and contractors responsible for delays and substandard work.

​Strict Deadlines: Announcement of a final completion date with mandatory regular progress reports.

​Safety Measures: Immediate installation of signboards, lights, reflectors, and speed breakers in accident-prone “black spots.”

​Bridge Completion: Rapid completion of the Sangameshwar bridge and other unfinished flyovers.

Transparency: Publication of a transparent public report regarding the project’s status.

​Victim Support: Immediate aid for accident victims and fair compensation for the families of those deceased.

​Medical Facilities: Establishment of 24/7 modern trauma care centers along the highway.

​Environmental Restoration: Large-scale reforestation and conservation to replace trees lost during construction.

​The organizers, including Rupesh Darge, Surendra Pawar, Prashil Lad, Sanjay Jangam, and Jitendra Gije, have stated that the protest is a culmination of years of public anger over the dangerous road conditions and the economic toll the delay has taken on the region.

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: १७ वर्षे रखडलेल्या महामार्गासाठी ‘जनआक्रोश’; ११ जानेवारीला संगमेश्वरमध्ये रस्ता रोको आंदोलन

   Follow us on        

संगमेश्वर:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रलंबित कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ आणि समस्त कोकणवासीयांच्या वतीने रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, याच्या निषेधार्थ रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे भव्य रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती आणि समस्त कोकणवासीयांच्या वतीने आयोजित हे आंदोलन सकाळी १०:०० वाजता संगमेश्वर डेपो जवळ पार पडणार आहे.

​प्रमुख मागण्या:

​जनआक्रोश समितीने या आंदोलनाद्वारे प्रशासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत:

१. महामार्गासाठी स्वतंत्र तटस्थ समिती स्थापन करून त्यात समितीचे ४ प्रतिनिधी घ्यावेत.

२. कामातील विलंब आणि हलगर्जीपणासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.

३. महामार्गाच्या उर्वरित कामाची अंतिम मुदत जाहीर करून नियमित प्रगती अहवाल सादर करावा.

४. धोकादायक वळणांवर तात्काळ साईनबोर्ड, लाईट्स आणि रिफ्लेक्टर बसवावेत.

५. संगमेश्वर ब्रिजसह सर्व अपूर्ण पुलांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण करावीत.

६. महामार्गावर २४x७ आधुनिक ट्रामा केअर सेंटरची उभारणी करावी.

७. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना योग्य भरपाई आणि जखमींना तात्काळ मदत मिळावी.

८. प्रकल्पासाठी तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे.

​कोकणवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन:

​”चला संगमेश्वर!” अशी हाक देत समितीने सर्व कोकणवासीयांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महामार्गाच्या दुर्दशेमुळे दररोज होणारे अपघात आणि प्रवासाचा खोळंबा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

Central Railway: आता प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि सुखकर; मध्य रेल्वेच्या ‘या’ ८ गाड्या आधुनिक LHB कोचसहित धावणार

   Follow us on        

मुंबई:रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आपल्या ८ महत्त्वाच्या गाड्यांमधील जुन्या पारंपारिक (Conventional) डब्यांच्या जागी आधुनिक LHB (Linke-Hofmann-Busch) कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२६ पासून हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होतील.

​LHB कोचमुळे काय बदलणार?

​LHB कोच हे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून ते स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. यांचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:

​सुरक्षा: या कोचमध्ये ‘अँटी-क्लायंबिंग’ फिचर असते, ज्यामुळे अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाहीत.

​वेग: हे डबे १६० ते २०० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहेत.

​आराम: डब्यांची लांबी जास्त असल्याने प्रवाशांना अधिक जागा मिळते. तसेच यात उत्तम सस्पेंशन, LED लायटिंग, ५-पिन चार्जिंग सॉकेट्स आणि कार्यक्षम डिस्क ब्रेक्स असतात.

​आणीबाणीची सोय: यात ४ आपत्कालीन खिडक्या आणि ६ तास बॅकअप देणारे आपत्कालीन लाईट युनिट (ELU) असते.

​या गाड्यांमध्ये होणार बदल (वेळापत्रकासह):

१. मुंबई – चेन्नई एक्सप्रेस:

​गाडी क्र. २२१५७ (CSMT-Chennai): १४ जानेवारी २०२६ पासून.

​गाडी क्र. २२१५८ (Chennai-CSMT): १७ जानेवारी २०२६ पासून.

​(एकूण १६ डबे: २ एसी-टायर, ३ एसी-३ टायर, ५ स्लीपर, ४ जनरल, १ गार्ड ब्रेक वॅन, १ जनरेटर वॅन)

​२. पुणे येथून सुटणाऱ्या ४ गाड्या:

​पुणे-वेरावळ एक्सप्रेस (११०८८/८७): पुणे येथून १५ जानेवारी, तर वेरावळ येथून १७ जानेवारी २०२६ पासून.

​पुणे-भगत की कोठी एक्सप्रेस (११०९०/८९): पुणे येथून १८ जानेवारी, तर भगत की कोठी येथून २० जानेवारी २०२६ पासून.

​पुणे-भुज एक्सप्रेस (११०९२/९१): पुणे येथून १९ जानेवारी, तर भुज येथून २१ जानेवारी २०२६ पासून.

​पुणे-अहमदाबाद एक्सप्रेस (२२१८६/८५): पुणे येथून २१ जानेवारी, तर अहमदाबाद येथून २२ जानेवारी २०२६ पासून.

​(एकूण २० डबे: २ एसी-टायर, ४ एसी-३ टायर, ८ स्लीपर, ४ जनरल, १ गार्ड ब्रेक वॅन, १ जनरेटर वॅन)

. कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) येथून सुटणाऱ्या ३ गाड्या:

​कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (११४०४/०३): कोल्हापूर येथून १९ जानेवारी, तर नागपूर येथून २० जानेवारी २०२६ पासून.

​कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१२१४७/४८): कोल्हापूर येथून २० जानेवारी, तर निजामुद्दीन येथून २२ जानेवारी २०२६ पासून.

​कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस (११०५०/४९): कोल्हापूर येथून २४ जानेवारी, तर अहमदाबाद येथून २५ जानेवारी २०२६ पासून.

​(एकूण १८ डबे: २ एसी-टायर, ४ एसी-३ टायर, ६ स्लीपर, ४ जनरल, १ गार्ड ब्रेक वॅन, १ जनरेटर वॅन)

​मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Railway Updates: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ‘या’ ४८ शहरांमधील रेल्वे क्षमता दुप्पट होणार

   Follow us on        

नवी दिल्ली: वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने आगामी ५ वर्षांत देशातील प्रमुख शहरांमधील रेल्वेगाड्या हाताळण्याची क्षमता दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली असून, सन २०३० पर्यंत ही क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​या योजनेचा मुख्य भर गर्दी कमी करणे, नवीन गाड्या सुरू करणे आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारणे यावर असेल.

​पुणे आणि मुंबईसह ४८ शहरांची निवड

​रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी देशातील ४८ प्रमुख शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या महानगरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ मुख्य टर्मिनल्सवर भार न टाकता आजूबाजूच्या उपनगरीय स्थानकांचाही विकास केला जाणार आहे.

​पुणे शहराचे उदाहरण: पुणे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी हडपसर, खडकी आणि आळंदी या स्थानकांचा विकास करून तिथे प्लॅटफॉर्म आणि स्टॅब्लिंग लाईन्सची संख्या वाढवली जाईल.

​क्षमतेत वाढ करण्यासाठी ‘हे’ असतील ४ मुख्य टप्पे:

​१. टर्मिनल विस्तार: विद्यमान टर्मिनल्सवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टॅब्लिंग लाईन्स आणि पिट लाईन्सची निर्मिती करणे.

२. नवीन टर्मिनल्स: शहरी भागाच्या परिसरात नवीन रेल्वे टर्मिनल्स शोधणे आणि विकसित करणे.

३. देखभाल सुविधा: गाड्यांच्या देखभालीसाठी ‘मेगा कोचिंग कॉम्प्लेक्स’ उभारणे.

४. तांत्रिक सुधारणा: सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण, मल्टी-ट्रॅकिंग आणि रेल्वे यार्डांमधील अडथळे दूर करणे.

​तात्काळ आणि दीर्घकालीन नियोजन

​हा प्रकल्प जरी २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असले, तरी प्रवाशांना याचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी कामांची विभागणी ‘तात्काळ’, ‘अल्पकालीन’ आणि ‘दीर्घकालीन’ अशा तीन श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. उपनगरीय (Suburban) आणि लांब पल्ल्याच्या (Non-suburban) अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे.

​”आम्ही प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत. या निर्णयामुळे रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होईल आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.”

— अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

​यादीतील काही प्रमुख शहरे:

​दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे, नागपूर, वाराणसी, कानपूर, जयपूर, लखनौ, पटना आणि गुवाहाटी यांसह एकूण ४८ शहरांचा या विशेष योजनेत समावेश आहे.

​या निर्णयामुळे येत्या काळात रेल्वे प्रवाशांना अधिक गाड्या, कमी प्रतीक्षा यादी आणि स्थानकांवर चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरांची यादी 

​१. दिल्ली (Delhi)

२. मुंबई (Mumbai – CR, WR)

३. कोलकाता (Kolkata – ER, SER, Metro)

४. चेन्नई (Chennai)

५. हैदराबाद (Hyderabad)

६. बेंगळुरू (Bangalore)

७. अमदावाद (Amdavad)

८. पटणा (Patna)

९. लखनौ (Lucknow – NR, NER)

१०. पुणे (Pune)

११. नागपूर (Nagpur – CR, SECR)

१२. वाराणसी (Varanasi – NR, NER)

१३. कानपूर (Kanpur)

१४. गोरखपूर (Gorakhpur)

१५. मथुरा (Mathura)

१६. अयोध्या (Ayodhya)

१७. आग्रा (Agra)

१८. पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन (Pt Deen Dayal Upadhyay Jn)

१९. चंदीगड (Chandigarh)

२०. लुधियाना (Ludhiana)

२१. अमृतसर (Amritsar)

२२. इंदूर (Indore)

२३. भोपाळ (Bhopal)

२४. उज्जैन (Ujjain)

२५. जम्मू (Jammu)

२६. जोधपूर (Jodhpur)

२७. जयपूर (Jaipur)

२८. वडोदरा (Vadodara)

२९. सुरत (Surat)

३०. मडगाव (Madgaon)

३१. कोचीन (Cochin)

३२. पुरी (Puri)

३३. भुवनेश्वर (Bhubaneshwar)

३४. विशाखापट्टणम (Vishakhapatnam)

३५. विजयवाडा (Vijaywada)

३६. तिरुपती (Tirupati)

३७. हरिद्वार (Haridwar)

३८. गुवाहाटी (Guwahati)

३९. भागलपूर (Bhagalpur)

४०. मुझफ्फरपूर (Muzaffarpur)

४१. दरभंगा (Darbhanga)

४२. गया (Gaya)

४३. मैसूर (Mysore)

४४. कोइम्बतूर (Coimbatore)

४५. टाटानगर (Tatanagar)

४६. रांची (Ranchi)

४७. रायपूर (Raipur)

४८. बरेली (Bareilly)

Facebook Comments Box

हिवाळी पर्यटन जीवावर बेतले; गुहागरच्या समुद्रात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू; आई आणि मुलाला वाचविण्यात यश

   Follow us on        

गुहागर: नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या एका मुंबईकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण समुद्रात बुडू लागले. स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकाचे प्राण वाचले असले, तरी कुटुंबप्रमुखाचा मात्र बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

मुंबईतील पवई परिसरात राहणारे अमोल मुथ्या (४२) हे आपल्या कुटुंबासह नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुहागर येथे आले होते. शनिवारी (२७ डिसेंबर) दुपारी १२:३० च्या सुमारास अमोल, त्यांची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे तिघेही किनाऱ्यापासून दूर ओढले गेले आणि बुडू लागले.

जीवरक्षकांचे शर्थीचे प्रयत्न

तिघेजण समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या.. जीवरक्षकांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अमोल यांची पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले. अमोल मुथ्या यांनाही बाहेर काढून त्यांना वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) सारखे प्रथमोपचार देण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

पर्यटकांना खबरदारीचे आवाहन

सध्या वर्षाखेरच्या सुट्ट्यांमुळे कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. समुद्राचा अंदाज न येणे किंवा खोल पाण्यात जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील सूचनांचे पालन करावे आणि समुद्राची भरती-ओहोटी पाहूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search