सावधान! कोकण ‘विकलं’ जात आहे

   Follow us on        

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या तालुक्यातील 50 टक्क्यांहून अधिक जागांचे मालक हे परराज्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतील आहेत. तालुक्यात असणार्‍या मोक्याच्या जागा या आधीच बळकावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दापोलीत स्थानिकांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे.

तालुक्यात 105 ग्रामपंचायती आणि 173 गावे आहेत. या 173 गावांमध्ये अन्य राज्यातील लोकांनी जमिनी खरेदी केल्याचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरे, रो -हाऊसेस, बंगलो, बांधकामाच्या नोंदी दर महिन्याला होताना दिसत आहेत. शेकडो एकर जागा खरेदी केलेले परप्रांतीय मालकांना गाव पातळीवर विरोध होऊ नये म्हणून मंदिर, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी ते देणगी देत असून स्थानिक पुढार्‍यांचे ‘खिसेही गरम’ केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.

तालुक्यातील अनेक जागांचे व्यवहार हे बनवाबनवी करून झाले असल्याचीही ओरड होताना दिसत आहे. स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेवर विकासकांनी रो-हाऊसेस, बंगलो बांधून शेकडो लोकांना त्याची विक्री केली आहे. यातील अनेक ठिकाणी विकसकांना विक्री केलेल्या जागेत जागा मालक मजूर म्हणून राबताना दिसत आहेत.

कोकणातील लोक वडिलोपार्जित जागा विकून स्थानिक लोक मुंबईसारख्या ठिकाणी खोली विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील जागा विकल्याने तालुक्यातील अनेकांचे कायम वास्तव्य हे मुंबईत होताना दिसत आहे. गावाला केवळ सणासुदीला तो येताना दिसत आहे. शासनाकडून मिळणार्‍या धान्यामुळे तालुक्यातील शेतीही ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारे शेती ओसाड ठेऊन करायची काय म्हणून ती विकली जात असून भावी पिढीसाठी चिंतेचे बाब ठरली आहे.

Loading

Facebook Comments Box

मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर नाताळ सुट्ट्यांसाठी विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        
Konkan Railway Updates:ख्रिसमस सुट्टीसाठी गोव्यात आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. नाताळाच्या सुट्टीत कोकण रेल्वेच्या गाड्यांत होणारी  गर्दी  कमी  करण्याच्या हेतूने मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर ३ विशेष  गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – करमाळी – मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक):
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (दैनिक) ही गाडी दिनांक  २०/१२ /२०२४  ते ०५/०१/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटी येथून दररोज रात्री ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी  दुपारी १३.३०  वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्र. ०११५२ करमाळी – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) ही गाडी करमाळी येथून  २०/१२ /२०२४  ते ०५/०१/२०२५ पर्यंत दररोज दुपारी १४.१५ वाजता सुटेल आणि  दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे: ही  गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना:  एकूण 22 कोच: फर्स्ट एसी – ०१ कोच. कंपोझिट (फर्स्ट एसी + २ टियर एसी) – ०१ कोच, २  टियर एसी – ०३ कोच, ३ टियर एसी – ११ कोच, स्लीपर – ०२ कोच, जनरल – ०२ कोच, एसएलआर  – ०२ कोच
२) गाडी क्र. ०१४६३ / ०१४६४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली स्पेशल (साप्ताहिक) ही गाडी  लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवारी म्हणजे १९/१२/२०२४, २६/१२/२०२४, ०२/०१/२०२५ आणि ०९/०१/२०२५ रोजी  १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता कोचुवेलीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४६४ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) ही गाडी  कोचुवेली येथून शनिवारी म्हणजे २१/१२/२०२४, २८/१२/२०२४, ०४/०१/२०२५ आणि ११/०१/२०२० रोजी १६.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५  वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे: ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम रोड बायंडूर (एच), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं. , त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन.  या स्थानकांवर थांबेल
 डब्यांची सरंचना: एकूण २२  एलएचबी कोच = २  टायर एसी – ०२  कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०३ कोच, जनरेटर कार – ०१ , एसएलआर – ०१ कोच
3) ट्रेन क्र. ०१४०७ / ०१४०८ पुणे जं. – करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०१४०७ पुणे जं. – करमाळी विशेष (साप्ताहिक) ही गाडी पुणे जंक्शन येथून बुधवारी दिनांक २५/१२/२०२४, ०१/०१/२०२५ आणि ०८/०१/२०२५ रोजी ०५:१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०:२५ वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४०८ करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) करमाळी येथून बुधवारी दिनांक २५/१२/२०२४, ०१/०१/२०२५ आणि ०८/०१/२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी  १३.०० वाजता पोहोचेल
ही गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबेल.
डब्यांची सरंचना: एकूण १७ कोच = फर्स्ट एसी – ०१ कोच, २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – ०५ कोच, जनरल – ०६ कोच आणि एसएलआर – ०२ कोच
गाडी क्रमांक ०११५२ आणि ०१४०८ या गाड्यांचे आरक्षण दिनांक १४/१२/२०२४ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Loading

Facebook Comments Box

११ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 25:11:42 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 11:48:41 पर्यंत
  • करण-वणिज – 14:29:58 पर्यंत, विष्टि – 25:11:42 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वरियान – 18:47:12 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:04
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र-राशि-मीन – 11:48:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 14:33:00
  • चंद्रास्त- 27:37:00
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १६८७: ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास मध्ये सर्वात आधी महानगरपालिका बनवली होती.
  • १८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
  • १८४५: पहिले आंग्ल-सिख युद्ध झाले होते.
  • १८५८: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि यदुनाथ बोस हे कलकत्ता विश्वविद्यालयामधून पहिले पदवीधर बनले.
  • १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
  • १९३७: इटली ने मित्र राष्ट्र संघ ला सोडले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४६: डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे निर्वाचित अध्यक्ष बनले होते.
  • १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
  • १९४६: स्पेन या देशाला संयुक्त राष्ट्र संघाने निलंबित केले.
  • १९६०: लहान मुलांच्या विकासकामाला लागलेली संस्था युनिसेफ च्या सन्मानासाठी १५ नवीन टपाल तिकिटांची निर्मिती सुरु केली होती.
  • १९६४: संयुक्त राष्ट्र संघाची संस्था युनिसेफ ची स्थापना.
  • १९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
  • १९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
  • १९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
  • २००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
  • २००३: मेरिदा येथे ७३ देशांनी भ्रष्टाचार विरोधी करारावर सह्या केल्या.
  • २००७: उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या मध्ये ५० वर्षानंतर पुन्हा रेल्वे सेवा पुर्वव्रत.
  • २०१४: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या योग दिवसाला संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकृती दिली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१०: फ्रांस चे प्रसिद्ध कवी अल्फ्रेड डोमोसे यांचा जन्म.
  • १८४३: रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू: २७ मे १९१०)
  • १८६७: ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू: २५ मार्च १९४०)
  • १८८२: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)
  • १८९२: अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ – १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ – १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ – १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ – १९६६), पद्मविभूषण (१९७७)
  • १८९९: पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक (मृत्यू: ? ? ????)
  • १९०९: नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ????)
  • १९१५: मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू: १७ जून १९९६)
  • १९२२: मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
  • १९२५: राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (मृत्यू: १ एप्रिल २००६)
  • १९२९: सुभाष गुप्ते – लेगस्पिनर (मृत्यू: ३१ मे २००२)
  • १९३१: भगवान श्री रजनीश (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
  • १९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.
  • १९४२: आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (मृत्यू: २६ मार्च १९९९)
  • १९६९: विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
  • १९८२: ला तमिळ चे प्रसिद्ध लेखक सुब्रह्मण्य भारती यांचा जन्म.
  • २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७८३: रघुनाथराव पेशवा (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)
  • १९३९: उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचे निधन.
  • १९४९: प्रसिद्ध विचारक आणि लेखक कृष्णचंद्र भट्टाचार्य यांचा जन्म.
  • १९८७: गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३)
  • १९९८: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)
  • २००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)
  • २००१: रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९)
  • २००२: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२०)
  • २००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
  • २०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.
  • २०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Sawantwadi Terminus: “आता नाही तर कधीच नाही…..”

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व दीपकभाई केसरकर यांना घेऊन २७ जून २०१५ सावंतवाडी टर्मिनसचा शिलान्यास केला होता. तेव्हा कोकणी जनता आणि मुंबईस्थित चाकरमानी या घटनेने सुखावले होते, मात्र त्यानंतर या टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत पूर्ण झाले नाही आहे. २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ असा नारा त्यांनी दिला होता. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते नुसते आलेच नाही तर पक्षाच्या विक्रमी जागांसह सत्तेवर आले आहेत. त्यामुळे आता तरी ते सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करतील अशी आशा समस्त कोकणकरां कडून करण्यात येत आहे.

आता नाही तर कधीच नाही...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विकासासाठी पोषक राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात केंद्रात आणि राज्यात महायुतीचा दबदबा आहे. जिल्हय़ातील सर्वच आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस आणि ईतर रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी एक सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार नारायण राणे आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगले संबध निर्माण झाले आहेत. आमदार दिपक केसरकर यापुर्वीपासूनच सावंतवाडी टर्मिनस साठी आग्रही आहेत आणि त्यांच्या परीने ते त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सावंतवाडी टर्मिनस साठी लागणार्‍या पाण्यासाठी तिलारी प्रकल्पातून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असल्याचेही मागे सांगितले होते. मात्र त्यासाठी मोठी दिरंगाई होताना दिसत आहे. सध्याची केंद्रीय, राज्यातील आणि जिल्हय़ातील राजकिय परिस्थिती पाहता हे काम पूर्ण करून घेण्यासाठी हीच नामी संधी आहे.

 

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी चा पाठपुरावा 

सावंतवाडी येथे टर्मिनस व्हावे, येथे महत्त्वाच्या गाडय़ांना थांबा मिळावा आणि ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करत आली आहे. विविध माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती केली तर आहे त्याबरोबरच आपला मागण्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी संघटना आग्रही आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येवून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१५ साली त्यांनी सावंतवाडी टर्मिनसचे जे स्वप्न त्यांनी कोकणी जनतेला दाखवले होते ते लवकरच पूर्ण करतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.

 

 

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ६ गाड्यांच्या जनरल डब्यांत तात्पुरत्या स्वरूपात कपात

   Follow us on        

Konkan Railway Updates:कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. तब्बल सहा गाड्यांच्या डब्यांच्या बदल करण्यात येणार असून खासकरून या गाड्यांचे जनरल डबे कमी करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे.

१६३३४ / १६३३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस

सध्याची रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, 3 टियर एसी इकॉनॉमी – ०२ ,स्लीपर – ०७ ,जनरल  – ०४ , पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, ३ टियर एसी इकॉनॉमी – ०३ ,स्लीपर – ०७ ,जनरल  – ०२, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

दिनांक ०२ डिसेंबर २०२४ ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.

१६३१२/ १६३११ कोचुवेली – श्रीगंगानगर -कोचुवेली एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल  -०४, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना – टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०७,जनरल  – ०३, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२

दिनांक ०७ डिसेंबर २०२४  ते २४ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.

२२६३४ / २२६३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल  – ०४, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१

सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल  – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१

दिनांक ०४ डिसेंबर २०२४  ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी  चालविण्यात येणार आहे.

२२६५३ / २२६५४  तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल  -०४, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल  -0२, जनरेटर कार – ०२

दिनांक ०७ डिसेंबर २०२४  ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी  चालविण्यात येणार आहे.

२२६५५ / २२६५६ एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०३, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – २, जनरेटर कार – ०२

दिनांक ११ डिसेंबर २०२४  ते २७  डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी  चालविण्यात येणार आहे.

२२६५९ / २२६६० कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेस

सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२

सुधारित रचना -०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ०२, जनरेटर कार – ०२

दिनांक ०६  डिसेंबर २०२४  ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाला स्थान मिळणार; वाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंट्री बोर्डासमोर सादर केल्याचीही माहिती आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची, तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना संभाव्य मंत्री
१. उदय सामंत
२. तानाजी सावंत
३. शंभूराजे देसाई
४. दादा भुसे
५. गुलाबराव पाटील
६. राजेश क्षीरसागर
७. आशिष जैस्वाल
८. प्रताप सरनाईक
९. संजय शिरसाट
१०. भरत गोगावले
राष्ट्रवादी संभाव्य मंत्री
१. आदिती तटकरे
२. हसन मुश्रीफ
३. छगन भुजबळ
४. धनंजय मुंडे
५. धर्मरावबाबा अत्राम
६. अनिल पाटील
७. दत्ता भरणे

Loading

Facebook Comments Box

१० डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 27:45:08 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 13:31:09 पर्यंत
  • करण-तैतुल – 16:56:36 पर्यंत, गर – 27:45:08 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्यतापता – 22:02:30 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:03
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 13:52:59
  • चंद्रास्त- 26:36:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • अल्फ्रेड नोबेल दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १७९९: ला जगात सर्वात आधी फ्रांसने आजच्या दिवशी मेट्रिक सिस्टम चा उपयोग केला.
  • १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.
  • १८८७: ला आस्ट्रिया, हंगरी, इटली और ब्रिटेन या देशांनी बाल्कन सैन्य करारावर सह्या केल्या.
  • १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
  • १९०२: तस्मानिया मध्ये आजच्या दिवशी महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
  • १९०२: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचा जन्म.
  • १९०३: पियरे क्यूरी और मैरी क्यूरी यांना भौतिक शास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला.
  • १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
  • १९१६: ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • १९४८: मानवी हक्क दिन.
  • १९६२: ला नोबेल पुरस्कार विजेता अल्बर्ट लूथली यांनी दक्षिण आफ्रिकी मध्ये वर्णभेद समाप्त करण्याची अपील केली.
  • १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • १९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.
  • २०००: ला पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना पाकिस्तान मधून १० वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
  • २००२: ला अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी यूनाइटेड एयरलाइंस पूर्णपणे कंगाल घोषित करण्यात आली.
  • २००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
  • २००४: ला अनिल कुंबळे ने कपिल देव ला मागे टाकत कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारे पहिले भारतीय बनले.
  • २००८: प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
  • २०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • २०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७०: सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार (मृत्यू: १९ मे १९५८)
  • १८७८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)
  • १८८०: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)
  • १८९२: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७)
  • १९०८: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तसेच पुरातत्व विज्ञान मध्ये तज्ञ असलेले हसमुख धीरजलाल संकलीया यांचा जन्म.
  • १९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.
  • १९२८: लोक सभेचे सदस्य चंद्रकांत भंडारे यांचा जन्म.
  • १९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.
  • १९६०: भारतीय चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा जन्म.
  • १९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू धवल कुलकर्णी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९६: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर १८३३)
  • १९२०: होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८)
  • १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)
  • १९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
  • १९६४: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
  • १९६३: सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)
  • १९६३: आफ्रिकी देश झांझिबार यांनी आजच्या दिवशी ब्रिटन पासून स्वतंत्र घोषित केले.
  • १९९२: भारताच्या गुजरात मध्ये पहिली होवरक्राफ्ट सेवा सुरु झाली.
  • १९९४: यासिर अराफात, यित्जाक रॉबिन आणि शिमोन पेरेज यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९९५: स्वातंत्र्य सैनिक चौधरी दिगंबर सिंह यांचे निधन.
  • १९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)
  • २००१: अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर १९११)
  • २००३: श्रीकांत ठाकरे – संगीतकार (जन्म: ? ? ????
  • २००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

०९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि- अष्टमी – 08:04:55 पर्यंत, नवमी – 30:03:56 पर्यंत
  • नक्षत्र- पूर्वाभाद्रपद – 14:56:52 पर्यंत
  • करण- भाव – 08:04:55 पर्यंत, बालव – 19:06:47 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- सिद्वि – 25:05:09 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:03
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र राशि- कुंभ – 09:15:24 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:15:00
  • चंद्रास्त- 25:37:00

 

महत्त्वाच्या घटना:
  • १७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला.
  • १७५८: मद्रास मध्ये सुरु झालेल्या तेरा महिन्यांच्या युद्धाला सुरुवात.
  • १८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
  • १८९८: बेलूर मठाची स्थापना झाली.
  • १९००: लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
  • १९२४: हंगेरी आणि हॉलंड या दोन देशांमध्ये व्यापार करार झाला होता.
  • १९४१: चीन ने जर्मनी, इटली, आणि जपान यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
  • १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
  • १९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
  • १९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म
  • १९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
  • १९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
  • १९७५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
  • १९९८: शेन वार्न और मार्क वॉ या दोघांनी १९९४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना एका पाकिस्तान सट्टेबाजा कडून काही रक्कम घेतल्याची कबुली केली.
  • २००२: जॉन स्नो अमेरिकेचे नवीन अर्थमंत्री बनले.
  • २००६: पाकिस्तान ने अणु क्षमता असलेले क्षेपणास्त्र हत्फ़-3 गजनवी चे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • २००७: पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो यांनी पाकिस्तान सरकार सोबत पूर्णप्रकारे त्यांचे संबंध समाप्त केले.
  • २००८: इस्त्रो ने युरोप च्या प्रसिद्ध कंपनी एडीएम एस्ट्रीयस साठी नवीन उपग्रहाचे निर्माण केले होते.
  • २०१३: इंडोनेशिया मेंबिनटारो च्या जवळ एका ट्रेन अपघातात ६३ लोक जखमी झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.
  • १४७८: भारताचे प्रसिद्ध कवी संत सूरदास यांचा जन्म.
  • १६०८: जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)
  • १८२५: भारताचे प्रमुख नायक राव तुला राम यांचा जन्म.
  • १८६८: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)
  • १८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)
  • १८७८: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५०)
  • १८८९: मध्ये आसाम मधील प्रथम असहयोगी चळवळीतील नेते चन्द्रनाथ शर्मा यांचा जन्म.
  • १९१३: पहिली महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा जन्म.
  • १९१८: भारताचे प्रसिद्ध नाटककार कुशवाहा कान्त यांचा जन्म.
  • १९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.
  • १९२२: अमेरिकेचे हास्यकलाकार रेड फॉक्स्स यांचा जन्म.
  • १९२९: प्रसिद्ध भारतीय कवी रघुवीर सहाय यांचा जन्म.
  • १९४६: सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी
  • १९४६: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.
  • १९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७६१: हंबीरराव मोहिते यांच्या पुत्री ताराबाई यांचे निधन.
  • १९७१: भारतीय नौसेना सैनिक महेंद्रनाथ मुल्ला यांचे निधन.
  • १९४२: डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० आक्टोबर १९१०)
  • १९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.
  • १९९७: के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
  • २००७: भारतीय लेखक त्रिलोचन शास्त्री यांचे निधन.
  • २००९: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद हनीफ मोहम्मद खान यांचे निधन.
  • २०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)
  • pacer height=”20px”]

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Sleeper Vande Bharat : पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचा संभाव्य मार्ग जाहीर

   Follow us on        

Sleeper Vande Bharat : चेअर कार वंदे भारत ट्रेन सध्या देशभरात लोकप्रिय होत आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. स्लीपर वंदे भारतच्या मदतीने प्रवाशांना झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. शुक्रवारी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून तो ट्रॅकवर चाचणीसाठी तयार आहे. या ट्रेनची चाचणीही लवकरच सुरू होऊ शकते.

पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोणत्या तारखेपासून धावणार हे रेल्वेने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी पुढील वर्षी जानेवारीत धावणारी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हर्जनमध्ये चालवली जाऊ शकते आणि ही ट्रेन पहिली स्लीपर व्हर्जन ट्रेन असेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्लीपर वंदे भारतबाबत अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे.

यापूर्वी २ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ या चेअर कारबाबत सांगितले होते की, सध्या अशा १३६ गाड्या धावत आहेत. यापैकी १६ वंदे भारत एक्स्प्रेस सेवा तामिळनाडू राज्यातील स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. दिल्ली ते बनारस दरम्यान सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन धावत असून ती ७७१ किमी चे अंतर पार करते. राज्यसभेत अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या नियोजित वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधा आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत.

स्लीपर वंदे भारत ट्रेनचे फीचर्स –

1- ट्रेनमध्ये कवच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

2- ही ट्रेन EN-45545 HL3 अग्निसुरक्षा मानकांनुसार असेल.

3-क्रॅशवर्थी आणि जर्क-फ्री सेमी परमानेंट कपलर आणि अँटी क्लाइंबर.

4- EN मानकांच्या  अनुरूप कारबॉडीचे क्रॅशवर्थी डिजाइन.

5- ऊर्जा दक्षतेसाठी अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम.

6- इमरजन्सी स्थितीत प्रवासी आणि  ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट दरम्यान संवादासाठी आपातकालीन टॉक-बॅक यूनिट.

7- ट्रेनमध्ये सेंट्रली कंट्रोल्ड ऑटोमैटिक प्लग दरवाजे आणि रुंद गँगवे.

8-वरच्या बर्थवर चढण्यासाठी चांगल्या डिजाइनच्या शिड्या.

9- प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसी, सॅलून लायटिंग आदि सुविधा. यासोबतच आरसे व आकर्षक इंटेरिअर या ट्रेनमध्ये असणार आहे.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘या’ गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज

कोकण रेल्वेच्या गाड्यांत जास्त मागणी आणि मर्यादित आसन उपलब्धता यामुळे वर्षभर गर्दी होत आहे. सध्या कोंकण रेल्वे मार्गाचा वापर दर Utilization  Rate 168% आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर ट्रेनची क्षमता वाढवण्याची तातडीची गरज आहे. सध्या कोकणरेल्वे, मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे या विभागातर्फे  कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या  काही गाड्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत नसून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी वाव आहे. कोकण विकास समितीने रेल्वे बोर्ड, विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री आणि  संबधीत आस्थापना आणि लोकप्रतिधींना या गोष्टीसाठी एक इमेलद्वारे मागणी केली आहे. या मागणी मध्ये कोकण रेल्वे मार्गावरील ज्या गाडयांची क्षमता वाढवता येणे शक्य आहे अशा गाड्यांची यादी आणि बदलांच्या शिफारशी देण्यात आल्या आहेत.
या शिफारशींची पूर्तता केल्याने अंदाजे 3,691 आसनांची (दररोज सुमारे 46 डबे) क्षमता वाढेल, ज्यामुळे प्रवाशांची सोय लक्षणीयरीत्या वाढेल आणि या अत्यंत वापरल्या जाणाऱ्या मार्गावरील गर्दी कमी होईल. नवीन रेल्वे सेवेची मागणी पाहता, या वाढीमुळे प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळेल असे कोकण विकास समितीचे  जयवंत दरेकर यांनी या ई-मेल मध्ये नमूद केले  आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search