Konkan Railway: राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावले

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. गाडी क्रमांक 12051/12052 जन्मशताब्दी एक्सप्रेस आणि 16345/16346 नेत्रावती एक्सप्रेस या दोन गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. या मागणीला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन गाडयांना या स्थानकावर थांबा देण्याची मागणी करणारे निवेदन केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना लिहून पाठवले आहे.

मुख्यमंत्री या निवेदनात लिहितात….

विषय: राजापूर रोड रेल्वे स्टेशन, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे गाड्यांना थांबा मंजूर करण्याची विनंती.

प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,

कोकण रेल्वेवरील राजापूर रोड रेल्वे स्टेशन हे कोकणातील नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या भागांच्या जवळ आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक अत्यंत लोकसंख्येच्या क्षेत्राला सेवा देत आहे. हे स्टेशन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, आंबा आणि काजू व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे.

सांगली जिल्ह्यातील आमदार सदाभाऊ खोत यांनी खालील गाड्यांमध्ये गाड्यांना राजापूर येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.

१. १२०५१ /१२०५२ मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

२. १६३४५ /१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस

मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राजापूर रोड रेल्वे स्थानकावरील थांब्याच्या या मागणीवर विचार करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात.

हार्दिक शुभेच्छा,

आपला विनम्र.

(देवेंद्र फडणवीस)

Facebook Comments Box

Dodamarg: दोन कार समोरासमोर धडकल्याने अपघात

   Follow us on        

दोडामार्ग: कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन गाड्या समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात सकाळी १०:०० च्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमीना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळेदोडामार्ग ते तिलारी या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Facebook Comments Box

Sindhudurg: जिल्ह्यात ४३ गावांत दरडी कोसळण्याचा धोका, कोकण रेल्वे, राज्य, राष्ट्रीय महामार्गावर मार्गावरील ही ठिकाणेही धोकादायक

   Follow us on        
सिंधुदुर्ग : आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार एकूण ४३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्ग व राज्य, राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळते, अशी ठिकाणेही प्रशासनाने निश्चित केली आहे.
यात सावंतवाडी तालुक्यातील गाळेल इन्सुली, आंबोली, मळेवाड, वेत्ये, कणकवली तालुक्यात रांजणगाव, खुर्द, कुंभवडे, फोडा, वैभववाडी तालुक्यात नाध वडे, करुळ-भट्टीवाडी, दिंडवणेवाडी-धनगरवाडी, वेंगुर्ले तालुक्यात तुळस काजरमळी, तुळस रेवटीवाडी, तुळस वाघोसेवाडी, वायंगणी डोमवाडी, म्हापण, कोचरा, मोचेमाड घाट, तुळस, रामघाट रोड, बडखोल, निवती मेढा, देवगड तालुक्यातील मोर्वे, नारिग्रे, दहिबाव, पाळेकरवाडी, पोयरे, मुणगे, खुडी, कुवळे, तोरसोळे, सादशी, गढीताम्हाणे, कुडाळ तालुक्यातील वालावल, कवठी, नेरुर कर्याद नारुर, घोटगे, दुर्गानगर, भरणी, मालवण, वरचीवाडी, गावठणवाडी, खालची गावडेवाडी, अशा एकूण ४३ गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानुसार या गावांत दरड कोसळण्याची शक्यता आहे.
राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील दरड प्रवण ठिकाणे 
देवगड उपविभाग-विजयदुर्ग, पडेल जामसंडे, कुणकेश्वर आचरा-मालवण-रेवस रेवंडी रस्ता (प्रमुख राज्यमार्ग) देवगड निपाणी रस्ता राक्षस घाटी (राज्यमार्ग) वैभववाडी उपविभाग-गगनबावडा, मुईबावडा खारेपाटण रस्ता भुईबावडा घाट (राज्यमार्ग) पडेल वाघोटण तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता-करुळ घाट (राष्ट्रीय महामार्ग), कणकवली उपविभाग-देवगड निपाणी रस्ता फोंडाघाट पडेल वाघोटन तळेरे रस्ता (राज्यमार्ग) सावंतवाडी उपविभाग वेंगुर्ले-सावंतवाडी-आंबोली बेळगाव-आंबोली घाट (राष्ट्रीय महामार्ग.)
कोकण रेल्वे मार्गावरील दरडग्रस्त ठिकाणे 
वैभववाडी-लाडवाडी अॅप्रोच कटिंग, गोपालवाडी अॅप्रोच डिप कटिंग, चिंचवली डिप कटिंग, बेर्ले टनेल, वैभववाडी आणि देवगड-नापणे कटिंग, देवगड आणि कणकवली-बेळणा, कणकवली आणि कुडाळ-बोर्डवे कटिंग, सावंतवाडी-नेमळे. सद्यस्थितीत या ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अति पाऊस झाल्यास या ठिकाणी दरड पडण्याचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Facebook Comments Box

२८ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • आजचे पंचांग
  • तिथि- तृतीया – 23:21:15 पर्यंत
  • नक्षत्र- आर्द्रा – 22:40:04 पर्यंत
  • करण- तैतिल – 12:34:50 पर्यंत, गर – 23:21:15 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- शूल – 15:46:49 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:00:32
  • सूर्यास्त- 19:11:09
  • चन्द्र राशि- मिथुन
  • चंद्रोदय- 07:52:59
  • चंद्रास्त- 21:51:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • यु.एन. शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस
  • आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1727 : पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
  • 1848 : विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30 वे राज्य बनले.
  • 1914 : ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात 1992 लोक ठार झाले.
  • 1919 : अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
  • 1953 : एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.
  • 1999 : स्पेस शटल डिस्कव्हरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले.
  • 2007 : जपान देशाच्या महिला रियो मोरी यांनी विश्वसुंदरी चा किताब पटकाविला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1906 : ‘टी. एच. व्हाईट’ – भारतीय-इंग्लिश लेखक यांचा जन्म.
  • 1914 : ‘शेर्पा तेनसिंग नोर्गे’ – एव्हरेस्टवीर यांचा जन्म. (मृत्यू: 9 मे 1986)
  • 1917 : ‘जॉन एफ. केनेडी’ – अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 22 नोव्हेंबर 1963)
  • 1929 : ‘पीटर हिग्ज’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1961 : ‘विजय पाटकर’ – मराठी व हिंदी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1814 : ‘जोसेफिन डी बीअर्नार्नास’ – नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी यांचे निधन.
  • 1829 : ‘सर हंफ्रे डेव्ही’ – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1778)
  • 1892 : ‘बहाउल्ला’ – बहाई पंथाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 12 नोव्हेंबर 1817 – तेहरान, इराण)
  • 1972 : ‘पृथ्वीराज कपूर’ – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1901)
  • 1977 : ‘सुनीतिकुमार चटर्जी’ – भाषाशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1890)
  • 1987 : ‘चौधरी चरणसिंग’ – भारताचे 5 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 23 डिसेंबर 1902)
  • 2007 : ‘स्‍नेहल भाटकर’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 17 जुलै 1919)
  • 2010 : ‘ग. प्र. प्रधान’ – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 26 ऑगस्ट 1922)
  • 2020 : ‘अजित जोगी’ – छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ 

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या गाडीची मुदत दिनांक ०५ जून २०२५ रोजी संपत होती तिला आता २६ जून  २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०२/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २६/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ०९/०६/२०२५ ते २३/०६/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. १२/०६/२०२५ ते २६/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
Facebook Comments Box

कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वे मंत्र्यांशी भेट

   Follow us on        
Konkan Railway:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी काल  केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री.अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ स्टेशन करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत निवेदन दिले.
याचबरोबर त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गोरेगाव स्थानकाचा विकास करण्यात यावा तसेच कोकण रेल्वे बोर्डाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याविषयी चर्चा केली.

खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेली निवेदने

Facebook Comments Box

२८ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि- द्वितीया – 25:57:34 पर्यंत
  • नक्षत्र- मृगशिरा – 24:30:22 पर्यंत
  • करण- बालव – 15:28:14 पर्यंत, कौलव – 25:57:34 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 19:08:31 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय-06:00:41
  • सूर्यास्त-19:10:45
  • चन्द्र राशि- वृषभ – 13:37:54 पर्यंत
  • चंद्रोदय-06:47:59
  • चंद्रास्त-20:48:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • महिला आरोग्यावर आंतरराष्ट्रीय कृती दिन
  • जागतिक भूक दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1490 : जुन्नरचा बहामनी सेनापती मलिक अहमद याने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव केला आणि जुन्नरमध्ये स्वतंत्र सल्तनत घोषित केली.
  • 1907 : पहिली आयल ऑफ मॅन टीटी शर्यत आयोजित केली गेली.
  • 1918 : अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
  • 1937 : नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
  • 1937 : फोक्सवॅगन जर्मन ऑटोमोबाईल उत्पादन कंपनीची स्थापना.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1952 : ग्रीसमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1958 : स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
  • 1964 : पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली.
  • 1998 : पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगई भागात पाच यशस्वी अणुचाचण्या केल्या.
  • 1999 : लिओनार्डो दा विंचीचा द लास्ट सपर इटलीमध्ये चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले
  • 2008 : नेपाळमध्ये राजेशाहीची प्राचीन परंपरा संपुष्टात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1660 : ‘जॉर्ज (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 1727)
  • 1759 : ‘छोटा विल्यम पिट’ – युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • 1883 : ‘विनायक दामोदर सावरकर’ – स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1966)
  • 1903 : ‘शंतनुराव किर्लोस्कर’ – उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 1994)
  • 1907 : ‘दिगंबर विनायक’ तथा ‘नानासाहेब पुरोहित’ – स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 1994)
  • 1908 : ‘इयान फ्लेमिंग’ – दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑगस्ट 1964)
  • 1921 : ‘पं. दत्तात्रय विष्णू’ ऊर्फ ‘बापूराव पलुसकर’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑक्टोबर 1955)
  • 1923 : ‘एन. टी. रामाराव’ – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1996)
  • 1946 : ‘के. सच्चिदानंदन’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1787 : ‘लिओपोल्ड मोत्झार्ट’ – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1719)
  • 1961 : ‘परशुराम कृष्णा गोडे’ – प्राच्यविद्या संशोधक यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1891)
  • 1982 : ‘बळवंत दामोदर’ ऊर्फ ‘कित्तेवाले निजामपूरकर’ – यांचे निधन.
  • 1994 : ‘गणपतराव नलावडे’ – हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर यांचे निधन.
  • 1999 : ‘बी. विट्टालाचारी’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म: 18 जानेवारी 1920)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Loading

Facebook Comments Box

Rajapur: अणूस्कुरा घाटात दरडीचा दगड अचानक रस्त्यावर

   Follow us on        
Rajapur: अणूस्कुरा घाटात सोमवारी एक मध्यम स्वरूपातील दगड रस्त्यावर येऊन पडला होता. स्थानिक ग्रामस्थांनी वाहन चालकांच्या सहकाऱ्याने तो दगड तत्काळ हटविला. मात्र सुदैवाने यादरम्यान तिथून कोणतंही वाहन जात नसल्याने अनर्थ टळला.
अणूस्कुरा घाट वाहतूकीसाठी जरी अनुकूल वाटत असला तरी केव्हा दरड कोसळेल याचा काही नेम नाही, अशी स्थिती असते. गेल्या वर्षी दरड कोसळून मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो वेळीच हटवून घाटमार्गे वाहतूक पूर्ववत सुरु केली होती.
अणूस्कुरा घाट (Anuskura Ghat) हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा एक घाट आहे. हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे. अणुस्कुरा घाट कोकण आणि घाटमाथा यांना जोडतो, कोल्हापूरला जाण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे, त्यामुळे हा घाट कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याने हा मार्ग धोकादायक बनतो.
Facebook Comments Box

२७ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-अमावस्या – 08:34:51 पर्यंत, प्रथम – 29:05:34 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 26:51:54 पर्यंत
  • करण- नागा – 08:34:51 पर्यंत, किन्स्तुघ्ना – 18:48:13 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योगसुकर्मा- 22:53:57 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:09
  • चन्द्र राशि- वृषभ
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 19:40:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक विपणन दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1883 : अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार झाला.
  • 1906 : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
  • 1930 : क्रिस्लर सेंटर, त्यावेळची सर्वात उंच इमारत (319 मीटर – 1046 फूट), न्यूयॉर्कमध्ये उद्घाटन करण्यात आले.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.
  • 1951 : मुंबईत तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
  • 1964 : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
  • 1998 : ग्रँड प्रिन्सेस, जगातील (त्यावेळचे) सर्वात मोठे आणि सर्वात महाग क्रूझ जहाज, त्याच्या पहिल्या प्रवासाला निघाले.
  • 1999 : अमेरिकेचे स्पेस प्रोब डिस्कव्हरी नवीन स्पेस स्टेशनवर प्रक्षेपित झाले.
  • 2016 : बराक ओबामा हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1913 : ‘कृष्णदेव मुळगुंद’ – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 11 मे 2004)
  • 1923 : ‘हेन्‍री किसिंजर’ – अमेरिकेचे 56 वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • 1931 : ‘ओ. एन. व्ही. कुरूप’ – प्रसिद्ध मल्याळी कवी आणि गीतकार यांचा जन्म.
  • 1931 : ‘फिलिप कोटलर’ – आधुनिक मार्केटिंगचे जनक यांचा जन्म.
  • 1938 : ‘डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे’ – कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1954 : ‘हेमंत जोशी’ – हिंदी कवी, पत्रकार आणि पत्रकारितेचे प्राध्यापक.
  • 1957 : ‘नितीन गडकरी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1962 : ‘रवी शास्त्री’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.
  • 1975 : ‘मायकेल हसी’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘महेला जयवर्धने’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1910 : नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म : 11 डिसेंबर 1843)
  • 1919 : भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन. (जन्म : 16 एप्रिल 1848)
  • 1935 : ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्‍नी, यांचे निधन.
  • 1964 : ‘पं. जवाहरलाल नेहरू’ – भारताचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1889)
  • 1986 : ‘अरविंद मंगरुळकर’ – संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक यांचे निधन.
  • 1986 : ‘अजय मुखर्जी’ – भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री निधन. (जन्म : 15 एप्रिल 1901)
  • 1994 : लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ ‘लक्ष्मणशास्त्री जोशी’ – विचारवंत यांचे निधन. (जन्म : 27 जानेवारी 1901)
  • 1998 : मिनोचर रुस्तुम तथा ‘मिनू मसानी’ – अर्थतज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 नोव्हेंबर 1905)
  • 2007 : ‘एड यॉस्ट’ – हॉट एअर बलून चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 30 जून 1919)
  • 2009 : ‘लोकनाथ मिश्रा’ – भारतीय राजकारणी, अरुणाचल प्रदेश आणि आसामचे राज्यपाल यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway Merger: कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाचा अट्टाहास, सामान्य युवकांच्या लढाईला मुख्यमंत्र्यांची साथ..!!

– ‎अवघ्या २० महिन्यात केलेल्या कामांना थेट मुख्यमंत्र्यांकडून पोच.

   Follow us on        

‎सुरुवात ऑगस्ट २०२३, ज्या प्रकारे सावंतवाडी टर्मिनस संदर्भात सावंतवाडीतील काही तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केली होती त्याच वेळी कोकणातील इतर ठिकाणी ही कोकण रेल्वेत असणाऱ्या गैरसुविधांबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती, कारण होते तिकिटांचा काळाबाजार, गाड्यांना होणारा ३ ते ४ तासाचा विलंब आणि गणेशोत्सव काळात उडणारा रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार, कोकणात टर्मिनस नसल्याने बाप्पा जरी कोकणात येत असला तरी गाड्या मात्र उत्तरेत गुजरातला आणि दक्षिणेत मंगलोर पर्यंत सोडल्या जात होत्या आणि आहेत. कोकणी चाकरमानी रेल्वेने आपल्या गावी येताना असंख्य त्रासाला सामोरे जायचा.कोकणी माणसाने या प्रकल्पासाठी आपली जमीन कवडीमोलाने दिली खरी परंतु त्याचा बदलीला मिळाले काय तर फक्त शेळ्या मेंढरा सारखा प्रवास..

‎जसा टर्मिनस संदर्भातील आवाज वाढत गेला तसा टर्मिनस उभारण्याकरिता कोकण रेल्वे कडे निधी नाही ही वास्तविकता समोर आली, फक्त टर्मिनसच नाही तर काही ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म जोडणारे ब्रीज (FOB) नाहीत, तर काही ठिकाणी निवारा शेडच नाही, छोट्या स्थानकांवर तर प्लॅटफॉर्म देखील नाहीत. दरवर्षी रेल्वे करिता हजारो कोटींचा निधी अर्थसंकल्पात जाहीर होत असताना कोकणात ह्या साध्या साध्या परंतु आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे रेल्वे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष कोकणी माणसाला पचनी पडत नव्हते, यावेळी मात्र मुंबईतील व कोकणातील काही युवकांकडून सोशल मीडियावर प्रशासनाला विचारणा करण्यात आली, परंतु याचे खरे कारण काही कळत नव्हते.पुढे माहितीच्या अधिकाराचा वापर करून या युवकांनी याबाबतची पुरेपूर माहिती गोळा केली,व थेट कोकण रेल्वेच्या जन्मापर्यंत येऊन पोचले. तेच म्हणजे “बांधा वापरा आणि हस्तांतरित करा”.

कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या या असुविधांबद्दल एक ठोस कारण निघाले ते म्हणजे कोकण रेल्वे महामंडळ. संपूर्ण देशात असणारी रेल्वे आणि कोकणात असणारी रेल्वे ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत हे प्रथमदर्शनी लक्षात आले,संपूर्ण देशात धावणारी रेल्वे ही भारतीय रेल्वेचा भाग असून कोकणातील रेल्वे ही ४ राज्ये आणि रेल्वे मंत्रालयाने मिळून बनविलेल्या महामंडळाच्या अधिकाराने चालते हे समजले, त्यात अती महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वे महामंडळाला निधीची थेट तरतूद होत नाही हे स्पष्ट झाले.सबब त्याचा परिणाम कोकणातील रेल्वे संदर्भातील विकासकामांवर पडला, त्याच कारणाने सावंतवाडी टर्मिनस तब्बल १० वर्षे अर्धवट स्थितीत रखडले आहे.खरे कारण कळल्यावर हे महामंडळ कोकण विकासाच्या उरावर तर बसले नाही ना असा सवाल कोकणी जनतेला पडू लागला. त्यातच केंद्राने अमृत भारत स्थानक योजना जाहीर केली.परंतु कोकणवासीयांचे दुर्दैव असे की कोकणातील एकाही स्थानकाचा समावेश या योजनेत केला गेला नाही.कारण होते हे महामंडळ, आणि त्याचा कारभार.

‎जेव्हा हे कळून चुकले की महामंडळ हे आपण तोट्यात आहे हे कारण दाखवून आपल्या जबाबदारीला टाळत आहे, या महामंडळावर ६ हजार कोटींचे कर्ज आहे हे समजल्यावर मात्र या युवकांनी अनेक प्रवासी संघटनांना जागे केले, सावंतवाडीतून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर, सागर तळवडेकर, भूषण बांदिवडेकर,मुंबईतून कोकण विकास समितीचे अक्षय महापदी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे राजू कांबळे, महामार्ग जनआक्रोश चे संजय सावंत, कृती समितीचे मनोज सावंत,अखिल कोकणचे तानाजी परब, निसर्गरम्य संगमेश्वर चे संदेश जिमन आदी युवकांनी अनेक संघटनांना एकत्र करून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना केली.

‎सावंतवाडी प्रवासी संघटनेकडून तत्कालीन शिक्षण मंत्री व आमदार श्री दीपक केसरकर यांची २६ डिसेंबर २०२३ रोजी भेट घेण्यात आली, त्याला प्रतिसाद म्हणून लगेच शिक्षणमंत्र्यांनी ही बाब रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेउन कानावर टाकली आणि विलीनीकरणाला वाचा फोडली, त्याच जोडीला तत्कालीन केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री नारायण राणे साहेबांनी देखील ०३ जानेवारी २०२४ रोजी माध्यमांशी बोलताना हे महामंडळ कर्जाच्या खाईत आहे त्यामुळे कोकणातील रेल्वे विकास या महामंडळाकडून होऊ शकत नाही असे स्पष्ट केले, व याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हायला हवे अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर तत्कालीन खासदार श्री विनायक राऊत यांनी २०२४ सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे अशी मागणी संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात केली. हीच ती वेळ जेव्हा कोकणातील तत्कालीन मंत्री, आमदार, खासदारांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. दरम्यान ०९ सप्टेंबर २०२३ व ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईस्थित कोकण विकास समितीचे श्री अक्षय महापदी यांनी विलीनीकरण संदर्भात आवश्यक आणि अभ्यासपूर्ण असे निवेदन तयार करून ते रेल्वेमंत्री, वित्तमंत्री, मुख्यमंत्री आदींना पाठवले होते. २६ जानेवारी २०२४ रोजी सावंतवाडी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकावर हजारो लोकांचा उपस्थितीत परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाला कोकण रेल्वेचे विलिनीकरण व्हावे या मुद्द्यावर रेल्वे एम्प्लॉयीज युनियनच्या श्री उमेश गाळवणकर यांनी पाठिंबा दर्शविला.या आंदोलनाने कोकण रेल्वेचे विलीनीकरण का आवश्यक आहे हे कोकणवासीयांना समजले गेले.

‎यानंतर झालेली लोकसभा निवडणूक, पदवीधर निवडणुकीत देखील या युवकांनी सोशल मिडिया, वृत्तपत्रे, इतर प्रसार माध्यमांचा पुरेपूर वापर करून जनजागृती केली. त्यातच कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे श्री राजू कांबळे यांनी ठाणे येथे कोकण पदवीधर निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोकणासाठी विलीनीकरण का महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. त्यानंतर नवनियुक्त कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री निरंजन डावखरे तसेच खासदार श्री रवींद्र वाईकर यांची अखिल कोकणच्या तानाजी परब यांनी भेट घेऊन विलीनीकरण हा विषय मार्गी लावा असे निवेदन दिले. दरम्यान महामार्ग जन आक्रोशच्या राजाराम कुंडेकर यांनी आमदार श्री फातर्पेकर यांची भेट घेऊन हा विषय त्यांचा समोर मांडला.
‎१२ जुलै २०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मार्फत भव्य मेल मोहीम आयोजित करण्यात आली, त्यात परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस व कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे हे दोन प्रमुख मुद्दे कोकणवासीयांचा मोबाईल मधून सर्व संबंधित मंत्री, खासदार, आमदार व शासकीय विभागांना मेल द्वारे पाठवण्यात आले.या मेल मोहिमेला एकूण ४५०० कोकणवासीयांनी प्रतिसाद दिला. तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला सोशल मिडियाची जोड देऊन अक्षय महापदी, सागर तळवडेकर, व मिहिर मठकर यांनी कोकणवासीयांमध्ये कोकण रेल्वे महामंडळाचे विलिनीकरण का महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.

‎१५ ऑगस्टला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकावर घंटानाद करण्यात आला, त्याआधी १४ तारखेला पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचा जनता दरबारात देखील विलीनीकरणचा मुद्दा उपस्थित केला गेला. दोन्ही वेळी हा विषय नक्कीच कॅबिनेट मध्ये घेतला जाईल असे तत्कालीन पालकमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.पुढे ५ सप्टेंबर २०२४ रोजी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर तत्कालीन शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर यांचा अध्यक्षेखाली प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे अधिकाऱ्यांसोबत टर्मिनस संदर्भात बैठक झाली या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेवर ६ हजार कोटींचे कर्ज आहे, त्यामुळे हे महामंडळ टर्मिनस परिपूर्ण करू शकत नाही असे मंत्री केसरकर यांचा समोर स्पष्ट केले आणि हा विषय महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मधे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. पुन्हा २७ सप्टेंबर २०२४ रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोजित पालकमंत्र्यांचा जनता दरबारात देखील कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले.

‎कोकण रेल्वेचे विलिनीकरण व्हावे ही मागणी ज्या प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत होती त्याच प्रमाणे मुंबईत आणि संपूर्ण कोकणात देखील वाढावी ह्या हेतूने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र या २२ संघटनाच्या शिखर समितीच्या माध्यमातून श्री अक्षय महापदी, श्री राजू कांबळे, श्री सागर तळवडेकर यांचा मेहनतीने १ ऑक्टोंबर २०२४ रोजी मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकारांना आणि कोकणी जनतेला कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत का विलीन व्हावे आणि त्याचे फायदे आणि तोटे समजवण्यात आले.कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, उंच फलाट, शेड, सावंतवाडी टर्मिनस,आवश्यक तेथे पिट लाइन्स आदींसाठी फक्त निधीची आवश्यकता आहे आणि सद्यस्थितीत महामंडळ हे तोट्यात असल्याने हे फक्त अशक्य आहे हे उपस्थितांना समितीच्या वतीने पटवून देण्यात आले.या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र राज्याचात वाट्यातील २२ टक्के (३९६ कोटींची) हिस्सेदारी केंद्राला हस्तांतरित करावायू किंवा महाराष्ट्र हद्दीतील रेल्वेला आवश्यक असणारी कामे आपण करावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य शासनाला करण्यात आली. याला जोड म्हणून १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोलाड ते मडूरे (रत्नागिरी विभाग) हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यासाठी भव्य ईमेल मोहीम राबवण्यात आली.या ईमेल मोहिमेचा प्रभाव एवढा पडला की ०२ डिसेंबर २०२४ रोजी हिवाळी अधिवेशनात खासदार श्री धैर्यशील पाटलांनी हा विषय राज्यसभेत मांडला.तसेच ०४ डिसेंबर रोजी वायव्य मुंबईचे खासदार श्री रवींद्र वाईकरांनी हा विषय लोकसभेत मांडला, याच बरोबर २९ मार्च २०२५ ला ठाण्याचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी देखील लोकसभेत विलीनीकरणाची मागणी केली.

‎८ नोव्हेंबर २०२४ रोजी दादर येथे संगमेश्वरचे संदेश जिमन आणि सावंतवाडीच्या विनोद नाईकांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली, स्थानिक विषयांसोबत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती वजा मागणी करण्यात आली. यानंतर श्री विनोद नाईक यांनी कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेतली, त्याच दिवशी नवनियुक्त पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री नितेश राणे यांची देखील भेट घेण्यात आली.आणि हा विषय त्यांचा देखील कानावर घालण्यात आला.

‎१४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून आपले सरकार या महाराष्ट्र शासनाच्या तक्रार निवारण प्रणाली वर सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेच्या विलिणीकरणासंदर्भात असंख्य तक्रारी दाखल करण्यात आल्या.त्यालाच अनुसरून ११ मार्च २०२५ रोजी विधानपरिषदेचे आमदार श्री प्रवीण दरेकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करावे ही मागणी विधानपरिषदेत केली.त्याला प्रत्युत्तर म्हणून १९ मार्च रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मंजुरी असल्याची घोषणा विधानपरिषदेत केली. मुख्यमंत्री फक्त घोषणा करून थांबले नाहीत तर त्यांनी ११ एप्रिल रोजी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांचा समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत याचा पुनरुच्चार केला. आणि तश्या आशयाचे पत्र पाठवून त्यावर शिक्कामोर्तब देखील केला.

‎जजो पर्यंत कोकण रेल्वेचे विलीनीकरण होत नाही तो पर्यंत कोकणात रेल्वेच्या माध्यमातून विकास होणार नाही, केंद्राचा रेल्वे विषयक योजना याठिकाणी येणार नाहीत, दुपदरीकरण, सावंतवाडी टर्मिनस आदींसारखे महत्त्वाचे विषय मार्गी लागणार नाहीत हे सत्य आहे.आणि हेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरले आणि त्यावर लगेच कार्यवाही देखील केली, यासाठी कोकणवासियांतर्फे मुख्यमंत्र्याचे आभार.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search