आजचे पंचांग
- तिथि-नवमी – 08:19:08 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 23:29:24 पर्यंत
- करण-कौलव – 08:19:08 पर्यंत, तैतुल – 19:59:38 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-आयुष्मान – 16:23:51 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:55
- सूर्यास्त- 18:44
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 13:30:00
- चंद्रास्त- 27:25:00
- ऋतु- वसंत
- आंतरराष्ट्रीय महिला दिन
- 1817 : ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज’ (NYSE) ची स्थापना.
- 1942 : जपानने म्यानमारची राजधानी ‘रंगून’ ताब्यात घेतली.
- 1948 : या दिवशी सर्व संस्थांचा भारतीय जिल्ह्यात समावेश करण्यात आला.
- 1948: एअर इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली.
- 1948 : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
- 1957 : ‘घाना’ देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 1974 : पॅरिस, फ्रान्समध्ये ‘चार्ल्स डी गॉल’ विमानतळ सुरू झाले
- 1979 : फिलिप्स कंपनीने प्रथमच कॉम्पॅक्ट डिस्क सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली.
- 1993: दमानिया एअरवेज या खाजगी विमान कंपनीने आपल्या पहिल्या विमानाचे नाव ‘स्पिरिट ऑफ जेआरडी’ ठेवण्याचा निर्णय घेतला.
- 1998: भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष ‘रमाकांत देसाई’ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- 2009: भारतीय गोल्फपटूने थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले.
- 2016: इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिकमधून संपूर्ण सूर्यग्रहण दृश्यमान आहे.
- 1911: आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
- 1864: ‘हरी नारायण आपटे’ – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार (मृत्यू: 3 मार्च 1919)
- 1879: ‘ऑटो हान’ – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: 28 जुलै 1968)
- 1889: ‘विश्वनाथ दास’ – ओडीसा चे माजी मुख्यमंत्री .
- 1921: ‘अब्दूल हयी’ ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: 25 आक्टोबर 1980)
- 1928: ‘वसंत अनंत कुंभोजकर’ – कथालेखक.
- 1930: ‘चिंतामणी त्र्यंबक खानोलकर’ ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: 26 एप्रिल 1976)
- 1931: ‘मनोहारी सिंग’ – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: 13 जुलै 2010)
- 1953: ‘वसुंधरा राजे सिंधिया’ – राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1954: ‘दिगंबर कामत’ – गोव्याचे माजी मुख्यमंत्री..
- 1963: ‘गुरशरणसिंघ’, – भारतीय क्रिकेट खेळाडू.
- 1969: ‘उपेंद्र लिमये’ -मराठी चित्रपट अभिनेता .
- 1974: ‘फरदीन खान’ – हिन्दी चित्रपट कलाकार
- 1989: ‘हर्मंप्रीत कौर’ – भारतीय महिला क्रिकेटर
- 1886: ‘एडवर्ड कालव्हिन केन्डॉल’ – जीवरसायन शास्रज्ञ .
- 1535: ‘कर्णावती’ – मेवाड ची राणी.
- 1702: ‘विल्यम’ (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: 14 नोव्हेंबर 1650)
- 1942: ‘जोस रॉल कॅपाब्लांका’ – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: 19 नोव्हेंबर 1888)
- 1957: ‘बाळ गंगाधर’ तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त (जन्म: 24 ऑगस्ट 1888)
- 1972: ‘तरुण बोस’ – भारतीय चित्रपट अभिनेता.
- 1988: ‘अमरसिंग चमकिला’ – पंजाबी गायक.
- 2009: गिरधारीलाल भार्गव – लोकसभेचे माजी सदस्य.
- 2015: ‘विनोद मेहता’ – प्रसिद्ध पत्रकार तसेच आउटलुक चे संपादक.
No block ID is set
मंडणगड: शहरातील नागरिक व तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा माकडांचा उपद्रव लक्षात घेऊन वनविभागाच्यावतीने 28 फेब्रुवारीपासून तालुक्यात वनविभागाच्यावतीने माकडे पकडण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 275 माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात कार्यवाही करण्यात आली.
उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनरक्षक प्रियांका लगड, दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान तालुक्यात आठ दिवस राबवण्यात येणार आहे. या अभियानात तालुक्यात माकडांची संख्या अधिक असलेली ठिकाणी शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी माकडांना खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून पिंजऱ्यात पकडण्यात येत आहे. पिंजऱ्यातील माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येते. मंगळवारी शहरातील गांधी चौक येथे पिंजरा लावून 50 माकडे पकडण्यात आली. वनपाल अनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ओमकार तळेकर, अमोल ब्रिहाडे, समाधान गिरी व सहकारी पाटील यांनी ही कार्यवाही यशस्वी केली. यावेळी नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, राहुल कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील सोवेली, वेळास, बाणकोट, वेसवी, उमरोली, शिपोळे गावात अभियान राबवून 275 माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.Fact Check: कोकणातील परुळे गावात सिंहाचा वावर? नेमके सत्य काय? – Kokanai https://t.co/Ac9j6XyUGr#fakenews #lion pic.twitter.com/11WjdCOVlM
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) March 7, 2025
आजचे पंचांग
- तिथि-अष्टमी – 09:21:15 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 23:32:52 पर्यंत
- करण-भाव – 09:21:15 पर्यंत, बालव – 20:46:21 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-प्रीति – 18:14:09 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:55
- सूर्यास्त- 18:44
- चन्द्र-राशि-वृषभ – 11:45:57 पर्यंत
- चंद्रोदय- 12:30:00
- चंद्रास्त- 26:29:00
- ऋतु- वसंत
- 1771 : हैदर आणि मराठे यांच्यात मोती तलावाची लढाई झाली.
- 1876 : “अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल” यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
- 1936 : दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
- 2009 : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
- 2024: स्वीडन अधिकृतपणे नाटोमध्ये सामील झाला आणि त्याचा ३२ वा सदस्य बनला.
- 1508 : “हुमायून” – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: 17 जानेवारी 1556)
- 1765 : “निसेफोरे नाऐप्से” फोटोग्राफी चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: जुलै 1833)
- 1792 : “सर जॉन विल्यम हरर्षेल” ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 11 मे 1871)
- 1849 : “ल्यूथर बरबँक” महान वनस्पतीतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 एप्रिल 1926)
- 1911 : “सच्चिदानंद हिराचंद वात्सायन” ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1987 )
- 1918 : “स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर” मराठी साहित्यिक यांचा जन्म.
- 1955 : चित्रपट अभिनेते “अनुपम खेर” यांचा जन्म.
- 1647: ‘दादोजी कोंडदेव’ – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू यांचे निधन.
- 1922: ‘गणपतराव जोशी’ – रंगभूमी नट यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1867)
- 1952: ‘परमहंस योगानंद’ – तत्वज्ञ यांचे निधन.
- 1961: ‘पंडित गोविंदवल्लभ पंत’ – भारतरत्न यांचे निधन. (जन्म: 10 सप्टेंबर 1887)
- 1974: ‘टी. टी. कृष्णमाचारी’ – माजी अर्थमंत्री यांचे निधन.
- 1993: ‘इर्झा मीर’ – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक यांचे निधन. (जन्म: 26 ऑक्टोबर 1900)
- 2000: ‘प्रा. प्रभाकर तामणे’ – कथालेखक यांचे निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1931)
- 2012: ‘रवि शंकर शर्मा’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 3 मार्च 1926)
- 2015: ‘जी. कार्तिकेयन’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1949)
Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्या प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने होळी सणा दरम्यान म्हणजेच दिनांक 13 मार्च ते 16 मार्च पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर पनवेल – चिपळूण विशेष मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
गाडी क्रमांक 01018 / 01017 चिपळूण – पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष गाडी
चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू विशेष (01018) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान दररोज चिपळूण वरून दुपारी 15:25 वाजता निघेल आणि पनवेल येथे रात्री 20:20 वाजता पोहोचेल.
पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष (01017) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान पनवेल वरून रात्री 21:10 वाजता सुटून चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 02:00 वाजता पोहोचणार आहे.
थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण.
डब्यांची रचना: ८ कार मेमू
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत चर्चा केली. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरावस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना ही पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या.
आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 10:53:28 पर्यंत
- नक्षत्र-रोहिणी – 24:06:29 पर्यंत
- करण-वणिज – 10:53:28 पर्यंत, विष्टि – 22:03:41 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-विश्कुम्भ – 20:28:45 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:56
- सूर्यास्त- 18:44
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 11:33:00
- चंद्रास्त- 25:27:59
- ऋतु- वसंत
- राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस
- 1840: “बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी” हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
- 1869: दिमित्री मेंडेलीव्ह यांनी रशियन केमिकल सोसायटीला पहिली नियतकालिक सारणी (पिरोडीक टेबल) सादर केली.
- 1882: सर्बियन राज्याची पुनर्स्थापना झाली.
- 1940: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी.
- 1953: “जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच” सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
- 1957: “घाना” देशाचा स्वातंत्र्य दिन.
- 1975: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
- 1992: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
- 1998: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
- 1999: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
- 2005: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला
- 1475: “मायकेल अँजलो” – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 1564)
- 1899: ‘“शि. ल. करंदीकर”’ – चरित्रकार आणि संपादक यांचा जन्म.
- 1915: “मोहम्मद बुरहानुद्दीन” – बोहरा धर्मगुरू सैयदना यांचा जन्म.
- 1937: “व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा” – रशियाची पहिली महिला अंतराळातयात्री यांचा जन्म.
- 1957: “अशोक पटेल” – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1965: “देवकी पंडित” – भारतीय शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
- 1947: “मकिंडर हॉलफोर्ड जॉन” – ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी यांचे निधन.
- 1967: “स. गो. बर्वे” – कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
- 1968: “नारायण गोविंद चापेकर” – साहित्यिक यांचे निधन.
- 1973: “पर्ल एस. बक” – नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका यांचे निधन. (जन्म: 26 जून 1892)
- 1981: “गो. रा. परांजपे” – रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य यांचे निधन.
- 1982: “रामभाऊ म्हाळगी” – आदर्श लोकप्रतिनिधी खासदार यांचे निधन.
- 1992: “रणजीत देसाई” – सुप्रसिद्ध मराठी लेखक यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1928)
- 1999: “सतीश वागळे” – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते यांचे निधन.
- 2000: “नारायण काशिनाथ लेले” – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती यांचे निधन.
सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे. याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ने खासदार श्री. राणेंचे आभार मानले आहेत.
या निवेदनात खास. राणे यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कोकण रेल्वेवरील सावंतवाडी स्टेशन टर्मिनसचा विकास करण्याची विनंती केली आहे. सावंतवाडी हे हजारो लोक विशेषतः उत्सवाच्या काळात वापरणारे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडीचा विकास कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी सर्वात उपयुक्त ठरेल. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालून संबंधित संघटनेची विनंती स्वीकारण्याची, ती मान्य करण्याची सूचना द्या अशी मागणी खास. राणेंनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत खास नारायण राणे यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून आभार मानले आहेत.
Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
१)गाडी क्र. ०११०२/०११०१ मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०११०२ मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी मडगाव येथून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
गाडी क्र. ०११०१ पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी पनवेल येथून संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे ६:४५ वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
२)गाडी क्र. ०११०४/०११०३ मडगाव – एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०११०४ मडगाव – एलटीटी साप्ताहिक विशेष ही गाडी रविवार दिनांक १६/०३/२०२५ आणि २३/०३/२०२५ रोजी मडगाव येथून संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे ०६:२५ वाजता एलटीटी मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
गाडी क्र. ०११०३ एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार दिनांक १७/०३/२०२५ आणि २४/०३/२०२५ रोजी एलटीटी येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१











