Category Archives: ज्ञान आणि मनोरंजन

उपग्रह टॅगिंग – ऑलिव्ह रिडले कासवांचे गूढ उलगडणार ?

रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना  उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. 
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण 
 टॅगिंग केलेल्या कासवांपैकी  एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी  दिली आहे.
टॅगिंग चा इतिहास 
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास  माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी  हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location)  माहिती होण्यास मदत होते.   

मालवणात जप्त करण्यात आलेली व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) म्हणजे नक्की काय?

सिंधुदुर्ग: तळाशील मालवण येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवण पोलिसांनी कार्यवाही करून व्हेल मासाउलटी सदृश 27 तुकडे जप्त केले आहेत. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एच व्ही पेडणेकर व सुशांत पवार यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कार्यवाही केली आहे. पंचनामा, जबाब नोंदनों तसेच वन विभागाच्या ताब्यात २७ तुकडे देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मालवण पोलिसांनी सांगितले. सापडलेले तुकडे व्हेल मासा उलटी आहे की नाहीत याचीही तपासणी होणार आहे.

व्हेल माश्याच्या उलटीला एवढे महत्व का?

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.

उलटी कशी बनते

शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते

उलटी कशी ओळखतात?
स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते.

बंदी का?
या उलटीची किंमत जास्त असल्याने लोक व्हेल माशाला पकडून त्याच्या पोटातून त्याची विष्ठा काढण्याचा प्रयत्न करतील अशी सरकारला भीती वाटते आणि त्यामुळे त्या माशाची जात नष्ट होण्याची भीती वाटते.

कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!

मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे.  चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत  किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम  ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता.  कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.

‘वेड’ ने वेड लावले! ११ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई

Marathi Cinema News:बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ हा चित्रपट अकराव्या दिवशीही गर्दी खेचत आहे. अकरा दिवसांत जवळपास ३५.७७  कोटी रुपयांची एकूण कमाई चित्रपटाने केली आहे.
फक्त ११ दिवसांत ३५.७७ कोटी रुपये कमाई  करून असा विक्रम करणारा हा मराठीतील पहिला चित्रपट ठरला आहे. ह्या आधी हा रेकॉर्ड रितेशच्याच ‘लय भारी’ ह्या चित्रपटाच्या नावावर होता.
वेडमध्ये जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.

GRAMPANCHAYAT ELECTION 2022राज्यात ग्रामपंचायत निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ग्रामपंचायतींवर आप आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक जवळ आली कि मतदार राजा होतो. सर्व राजकीय नेते विविध आश्वासने देऊन मतदारांची मते जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त होतात. पण मतदारांनी चुकीचे मतदान करून चुकीचा उमेदवार निवडून दिल्यास त्याचे परिणाम गावाच्या विकासावर होतात. असे होऊ नये ह्याकरिता मतदाराने साक्षर आणि दक्ष असणे जरुरीचे आहे.
त्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य याने एक ग्रामपंचायत निवडूक संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी एक सखोल माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. ह्या पुस्तिकेत ग्रामपंचायत निवडणुकीचे नियम, प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चिती, आरक्षण, मतदार यादी आणि केंद्र, सदस्य आणि सरपंच पदाची पात्रता, चिन्हे वाटप, आचारसंहिता, मतमोजणी, निवडणुकीदरम्यान होणारे गुन्हे आणि शिक्षेची तरतूद इत्यादी सर्व माहिती ह्या पुस्तिकेतून तुम्हाला भेटेल. वाचा आणि  ही पोस्ट शेअर करा.
खालील पुस्तकावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.

 

   Follow us on        

>Click Here to Download… 

६१ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी मालवणमध्ये

सिंधुदुर्ग :६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि प्राथमिक फेरी मामा वरेकर नाट्यगृह, मालवण येथे होणार आहे. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सुरु होणारी हि स्पर्धा २९ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. दरदिवशी संध्याकाळी ७ वाजता एक स्पर्धक संस्था आपले नाटक सादर करणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली फाईल डाउनलोड करा.
६१ व्या प्राथमिक फेरी-सिंधुदुर्ग.pdf
महाराष्ट्र सरकार १९६१ पासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६१ वे वर्ष आहे.

कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल केलेली ती चूक शेवटी Google ने सुधारली….शिवभक्तांच्या मोहिमेला यश

Google या सर्च इंजिन वर कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल चुकीची माहिती लिहिली गेली होती ही बाब लक्षात घेऊन शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमीं संघटनांनी यावर आक्षेप घेण्यासाठी मोहीम राबवली होती. दोन दिवसात हजारो आक्षेप गुगलकडे नोंदविण्यात आले होते. यानंतर गुगलने या संदर्भातील दुरुस्ती केली आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या समोरील पायरेट्स म्हणजे समुद्री डाकू असा उल्लेख हटविण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे

हेही वाचा धक्कादायक: स्वराज्याच्या आरमाराच्या प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती- कान्होजी आंग्रे यांचा ‘समुद्री डाकू’ असा उल्लेख







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

धक्कादायक: स्वराज्याच्या आरमाराच्या प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती- कान्होजी आंग्रे यांचा ‘समुद्री डाकू’ असा उल्लेख

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी  स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती येत असल्याने शिवप्रेमी संतापले आहेत. सर्च इंजिन असलेल्या गुगलवर कान्होजी आंग्रे असं सर्च केल्यावर त्यांचे वर्णन ‘Pirate’ म्हणजे ‘समुद्री डाकू’ असं येत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. कान्होजी आंग्रे यांनी स्वराज्यावर परकीयांनी केलेली आक्रमण परतावून लावलीत. त्यासोबत कित्येक मोहिमा फत्ते केल्या, या मातब्बर स्वराज्यरक्षकाबाबत गुगलवर सर्च केल्यावर चुकीची माहिती आल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणं साहजिकच आहे. 

स्वराज्य उभारणी त्यानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी कित्येकदा आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सरदाराविषयी गुगल ‘पायरेट’ म्हणून दाखवत आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू असून शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.  

GOOGLE मॅनॅजमेन्ट ला त्यांची चूक दाखवून सुधारवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फीडबॅक गेले पाहिजेत. त्यासाठी खालील स्टेप द्वारे तुमचा फीडबॅक पाठवा.

1. गुगल वर ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !

2. नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून ‘send feedback’ क्लिक करा !

3. नवीन window open झाल्यावर तिथे ‘incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा ! लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा !

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

‘सुपर वासुकी’ देशातील सर्वात लांबीची मालगाडी..

देशातील सर्वात लांबीची मालगाडी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असून ती देशातील सर्वात लांबीची मालगाडी मानली जाते. हि मालगाडी छत्तीसगडमधील बिलासपूर सेक्शनमध्ये भिलाई ते कोर्बा ह्या स्टेशन दरम्यान चालवली जाते. ह्या मार्गाची लांबी सुमारे २२४ किलोमीटर आहे.

ह्या मालगाडी ला एकूण २९५ डबे आहेत तर एकूण ६ इंजिन्स जोडली आहेत. ह्या मलगाडीची लांबी सुमारे ३.५ किलोमीटर आहे. हि गाडी सुमारे २७००० टन कोळसा एकावेळी वाहून नेते. ह्या मालगाडीचे नाव ‘सुपर वासुकी’ असे देण्यात आले आहे.

ही मालगाडी सुरू करून आपण वेळ, पैसे आणि मनुष्यबळाची बचत केली आहे असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. एवढ्या लांबीची मालगाडी चालवणे हे एक प्रकारे आव्हान होते. अनेक तांत्रिक बाबी पहाव्या लागल्या आहेत, तसेच सुरक्षिततेच्या बाजूने पण विचार करण्यात आलेला आहे.

संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत ऑस्ट्रेलिया येथील The Australian BHP Iron Ore .हि सर्वात लांब मालगाडी म्हणून नोंद केली गेली आहे. हि मालगाडी ७.३५३ किलोमीटर लांबीची असून त्याला ६८२ डबे आहेत.

विनायक मेटे यांचा ड्रायवर “रोड हिप्नोसिस” चा शिकार…”रोड हिप्नोसिस” पासून होणारे अपघात टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्याच्या ड्रायवरची चौकशी केली असता तो प्रत्येक वेळी वेगळी स्टेटमेंट देत होता. त्यामुळे एका बाजूला संशय घातपाताचा संशय वाढत होता. पण दुसऱ्या बाजूने पाहता तो “रोड हिप्नोसिस” ह्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला बळी पडला हे अधिका अधिक स्पष्ट होत होते.

काय आहे हे “रोड हिप्नोसिस” किंवा रोड संमोहन? निष्णात ड्रायव्हिंग असतानाहि अपघात का होतात? ह्यावर काय उपाय आहेत हे सांगण्याचा आमचा एक हा प्रयत्न. हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून ह्या कारणाने होणारे अपघात टाळून जीव वाचतील.

“रोड हिप्नोसिस” म्हणजे काय?

रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते.

रस्त्यावर वाहन चालवतांना साधारणपणे २.५ तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते.

संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात,पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही,परिणाम ” रोड हिप्नोसिस ” !

हेच तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे…

‘ रोड हिप्नोसिस ‘ असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही.तो कोणत्या वेगाने जात आहे,किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही,किंवा सविस्तर स्पष्टीकरण देवु शकत नाही. सहसा टक्कर १४० किमी पेक्षा जास्त वेगाने असते.

“रोड हिप्नोसिस” कसा टाळता येईल.

रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर २.५ तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी,
थोडी विश्रांती घ्यावी, ५/६ मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.

तसेच वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या १५ मिनिटांतील काहीही आठवत नसेल,
तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सहप्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.

‘ रोड संमोहन ‘ हे सहसा रात्रीच्या वेळी घडते आणि अशावेळी प्रवासी झोपलेले असतांना परिस्थिती खूप गंभीर होते.

डोळे लागले तर अपघात अटळ आहे,पण डोळे उघडे असतांना मेंदू क्रियाशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे…

खूप वेळा पुरेशी झोप झालेली नसेल…आपण खूप थकलेले असु…ड्रायव्हिंग सतत करणं…अश्या वेळी या स्टेजची अनुभूती खूप वेळा मलाही आलेली आहे…

अश्या वेळी थोडावेळ थांबणे…गाडीतच थोडीशी हालचाल करणे…चहा किंवा पाणी पीणे..काहीच नाही तर स्वतःला करकचून चिमटा काढणे….असं केल्याने आपण सावध होऊ शकतो.गाणं ऐकणे किंवा सोबतच्या व्यक्ती सोबत गप्पा मारल्या तरी अशे प्रसंग टाळता येतात.

कधीतरी दिवस भर किंवा रात्रभर आराम न करता एकटाच गाडी चालवताना आपली गाडी चालू असते पुढे जात असते पण रोजचा रस्ता आपण विसरलेलो असतो…

नेमकी वळण, खड्डे , स्पीड ब्रेकर दिसतात पण लक्षात येत नाहीत,अश्या वेळी समजावं कि हि आपल्यासाठी यावेळी धोक्याची सुचना आहे.वरील उपाय करून आपण स्वतःला व आपल्या गाडीला वाचवू शकतो.

परवा अचानक एका emergency कामासाठी दिवसभर विश्रांती न घेता रात्री बारा वाजता झोपून दोन वाजता उठलो व पहाटे तीनला गाडी घराबाहेर काढली व सकाळी अकरा पर्यंत विनाथांबा सतत आठ तास ड्रायव्हिंग केलं.

त्या वेळी जवळपास तिन चार वेळा हा अनुभव आला..
पैकी दोन वेळा दिवसा अनुभव आला.

स्वतःला सावरलं ,रस्त्यावर खुपच तुरळक गाड्या होत्या.
पण अनुभव आला हे नाकारुन चालणार नाही.

आपणही जरा डोक्याला ताण द्या…लक्षात येईल प्रत्येक गाडी चालवणारा या स्टेजमधुन नक्कीच एकदा तरी गेलेला असतो.

फक्त हि स्टेज म्हणजे ” यमाची वेळ ” असते हे आपल्याला माहित नसतं किंवा माहिती असुनही आपण गांभीर्याने घेत नसतो व गाडी पळवतराहतो,मेंदूच्या निष्क्रिय अवस्थेत…आपल्याच बेधुंद अवस्थेत!

परिणामी भयंकर परिस्थितीला सामोर जाण्याची शक्यता कधीही येऊ शकते !

म्हणजे सावध तो सुखी 

डॉ. संजीव लिंगवत, सिंधुदुर्ग.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search