Category Archives: पर्यटन

Sindhudurg Submarine Project: पर्यटकांना जवळून पाहता येणार समुद्री विश्व

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आशादायक असलेल्या पाणबुडी प्रकल्पासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे गेले काही वर्ष रखडलेला वेंगुर्ले निवती समुद्रातील प्रस्ताविक पाणबुडी प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. सन २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले निवती रॉक जवळ समुद्रात पाणबुडी प्रकल्प होणार होता.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता आला असता, समुद्रातील अंतरंगात असलेला खजिना यामुळे न्याहाळत सफर झाली असती. आता केंद्र सरकारने निधी दिला असल्याने पर्यटन प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. साधारण वीस ते पंचवीस व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन समुद्राखालील अंतरंग बसून न्याहाळू शकतात. कोकणात सर्वात जास्त कोरल्स, रंगबिरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग दिसणारे अनोखे विश्व हे फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असून हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निवती समुद्रात होणार आहेमहाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकणातील या प्रकल्पाला ४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारने तशी घोषणाही केली. परंतु पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. समुद्र किनारी पर्यटन स्थळे विकसित झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात, म्हणून पाणबुडी प्रकल्पाला महत्त्व आले आहे.

Loading

Video: गोव्यात लक्झरी पर्यटनासाठी पहिल्यांदाच ‘सुपर यॉट’ ची सेवा सुरु

   Follow us on        
Goa News: आता गोव्यात घेता येणार ‘लक्झरी’ पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते अलीकडेच गोव्यातील पहिल्या सुपर यॉट ‘RA11’ चे उद्घाटन पार पडले. भारताच्या प्रमुख सागरी क्लस्टरचा एक भाग म्हणून विकसित, ‘RA11’ लाँच केल्याने गोवा  राज्य आता लक्झरी आणि नॉटिकल पर्यटन क्षेत्रात उत्तम सेवा पर्यटकांना देईल अशी अपेक्षा आपल्याला आहे असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  केली आहे.
गोवा MSME विजय मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे तयार केलेल्या RA 11 सुपर यॉटचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले, हे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे जहाज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारी यॉट मेक इन इंडिया, मेक इन गोवा या संकल्पनेला मूर्त रूप देत असल्याचे त्यांचे मत आहे.

 

 

Loading

फक्त २९९ रुपयांत संपूर्ण गोवा फिरा…गोव्यात मिळत आहे परवडण्यासारखी डबल डेकर बस सेवा

   Follow us on        
गोव्यात पर्यटनासाठी येण्याच्या विचारात असाल तर आता गोवा कसे फिरावं  ही चिंता कायमची मिटली असं समजा. गोव्यात रेंटल बाईक किंवा गाड्यांची सोय उपलब्ध असली तरीही अनेकवेळा यामुळे बजेट हलण्याची शक्यता असते. इथे बऱ्यापैकी सरकारी आणि खासगी बसेस उपलब्ध असतात तरीही कोणत्यावेळी कोणती बस कुठे जाईल याचा ठाव लागत नाही. अनोखळी जागेत मनसोक्त फिरायचं आणि हिंडायचं असेल तर गोव्यात डबल डेकर बस Goa Sightseeing Bus एक उत्तम सेवा देते महत्वाचं म्हणजे यामुळे कमीतकमी खर्चात तुमचा संपूर्ण गोवा फिरून होईल.
या बससेवेच्या मदतीने केवळ दोन ते तीन तासांत अगदी सहज गोवा फिरून होतो. खर्चाचा अधिक विचार करावा लागत नाही कारण या संपूर्ण प्रवासासाठी फक्त २९९ रुपये आकारले जातात. या बसद्वारे दोन प्रकारच्या सेवा दिल्या जातात, एक निळ्या रंगाची बस असते तर दुसरी लाल. निळ्या बसच्या प्रवासात सर्व समुद्र किनारे पाहायला मिळतात तर लाल रंगाची बस सर्व प्रकारच्या ऐतिहासिक जागांची सफर करवते.
निळ्या बसच्या प्रवासात काय काय बघाल?समुद्रकिनारा 
  • पर्यटन भवन
  • अगुडा किल्ला
  • Sinqeurim किल्ला
  • कांडोलीम समुद्रकिनारा
  • कलंगुट समुद्रकिनारा
  • बागा समुद्रकिनारा
  • अंजुना समुद्रकिनारा
  • व्हागातोर समुद्रकिनारा
  • शापोरा किल्ला
लाल बसच्या प्रवासात काय काय बघाल?
  • पर्यटन भवन
  • दोना पावला
  • गोवा सायन्स सेंटर
  • मिरामर समुद्रकिनारा (Miramar Beach)
  • कला अकादमी
  • पणजी बाजार
  • पणजी जेट्टी
  • दीवजा सर्कल
  • ओल्ड गोवा चर्च
  • मंगेशाचे देऊळ
  • अटल सेतू
या बसची सेवा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु असते. त्यामुळे परिवारासह गोव्याला जायच्या तयारीत असाल तर प्रवासाची चिंता विसरून जा. या बसेस च्या सीट बुकिंग साठी ०७३७९६०८६१ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा,

Loading

पर्यटन: माथेरानच्या राणीची सेवा १ नोव्हेंबर पासुन सुरु होणार

   Follow us on        

Matheran toy train: हिवाळी पर्यटनासाठी माथेरानला जाण्याचा बेत असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथे धावणारी टॉय ट्रेन सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते. या कारणास्तव मिनीट्रेनची ही सेवा बंद करण्यात येते. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी ही मिनीट्रेनची सेवा सुरु होते.का

ही तांत्रिक आडचणींमुळे या वर्षी 1 नोव्हेंबरपासून माथेरानची ही मिनी ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे

 

Loading

पालघर: शिरगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटी रुपये मंजूर

   Follow us on        

पालघर दि. ३० सप्टें. २०२४: पालघर जिल्ह्यातील शिरगाव हा ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. या किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले.

यासाठी सरकारच्या वतीने सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे PWD करण्यात करण्यात येत आहे. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, भानुदास पालवे, कुंदन संख्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे.या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातुन येणाऱ्या शत्रुवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता. या प्राचीन किल्ल्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या किल्ल्यावरती वर्चस्व होते.१८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला मिळविला . हा किल्ला २०० फूट उंच आणि १५० फूट हून अधिक लांबीचा आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्याच्या क्षेत्रात वाढ करत असतांना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे . या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात पाच पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहे .स्वच्छता आणि देखण्या भोवतालचा परिसरामुळे नियमित पर्यटक व्यतिरिक्त इतिहासकारांना हा किल्ला नेहमीच आकर्षित करत आला आहे.सर्वात रोमांचक म्हणजे पाम वृक्षाचे झाड आहे ज्याला सहा ते सात शाखा आहेत . एक दुर्मिळता अशी आहे कि शिरगाव किल्ला तटबंदीचा आहे आणि भिंती चांगल्या स्थितीत आहेत. आता हा किल्ला ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याने त्याचे जतन करण्यात येणार आहे.


Loading

आंबोली: हुल्लडबाजीच्या सर्व मर्यादा पार, जिल्हा परिषद शाळेतच पर्यटकांची मद्य पार्टी

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्‍याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे‌.





आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल‌. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.

Loading

आंबोली: नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई सुरु

16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला.
   Follow us on        
सावंतवाडी: आंबोली धबधबा व घाट परिसरातील  गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी  वन विभागाने आंबोली घाट व धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा  निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कचरा करणे-1000 रु. दंड, वन्यप्राणी माकड यांना खाऊ घालणे/छेडछाड करणे-1000 रु. दंड, मद्यपान करणे/मद्य बाळगणे-1000 रु. दंड, धूम्रपान करणे-500 रु दंड, दुसऱ्यावेळ वरील मनाई कृत्यांची आवृत्ती करणे-वनगुन्हा नोंदविणे अशा तरतुदी आहेत.
या अंतर्गत दिनांक-16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकनारे- 2 व्यक्ती, धूम्रपान करणारे  3 व्यक्ती, मद्यपान करणारे 2 व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- 6 व्यक्ती शा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी (IFS) यांचेकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधतेल टिकविण्यासाठी वरील प्रकारे मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करुन तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास सदरची बाबा आणून द्यावी व कोकणाचे वैभव असलेल्या आपल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करणे कमी आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे

Loading

यंदा आंबोलीत वर्षा पर्यटनास जाण्याचा बेत असेल तर ही बातमी वाचाच; ‘या’ गोष्टी केल्यास होईल कारवाई

   Follow us on        
आंबोली: पाऊस सुरू झाल्यावर वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत पर्यटकांचा ओघ सुरू होतो. मात्र या वर्षी  धबधब्याच्या परिसराची स्वच्छता तसेच शिस्त राखण्यासाठी वन विभागाकडून काही निर्णय घेतले गेले आहेत. येथील शिस्त आणि स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाणार आहे.
अनेक पर्यटक येथील माकडांना खाऊ टाकतात. मात्र त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. माकड किंवा वानरांचे माणसांवर होणारे हल्ले पण वाढताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे या असे खाद्यपदार्थ घातल्याने या प्राण्यांच्या सवयींवर परिणामी पर्यावरणावर सुद्धा परीणाम होतो. त्यामुळे या परिसरात माकडांना खाद्यपदार्थ घालण्यास मनाई केली असून,जर कोणी तसे केलेले आढळल्यास किमान 1000 रुपये एवढा दंड वसूल केला जाणार आहे. त्याविषयी या परिसरात कचरा टाकणाऱ्या बेशिस्त वर्तन करणाऱ्या पर्यटकांस कारवाईला सामोरे जावे लागेल. दिनांक 15 जून पासून ही कारवाई सुरू करण्यात असल्याची महिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वच्छता मोहीम
पावसाळा सुरू झाल्याने आंबोली घाटात लवकरच वर्षा पर्यटन सुरू होणार असल्याने वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सामूहिक स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे १० किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली.

Loading

येथे येतो मालदीवचा फील; कोकणातील पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्याला तुम्ही भेट दिलीत का?

Konkan Tourism: मालदीव, थायलंड सारखे देश तेथील पांढऱ्या आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासांठी प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बजेट मध्ये तोच फील आपल्याच देशात मिळवता येईल अशीही बीचेस आपल्या कोकणात आहेत. त्यात अजूनही कित्येक पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये नसलेले कुडाळ मधील निवती  बीचचा समावेश होतो.
या समुद्रकिनाऱ्यावर बसून निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभताना रोजचे ताण तणाव कुठल्याकुठे विरघळून जातात.  किनाऱ्यावरची नारळी-पोफळी आणि सुपारीची झाडं दौलत मिरवत उभी आहेत.  सूर्योदय आणि सूर्यास्त असे सृष्टीतले दोन्ही उत्कट सोहळे अनुभवण्याची उत्तम ठिकाणं म्हणजे निवती समुद्र किनारा. येथे पांढरी रेती आहे. सुमद्राचा तळही दिसेल, इतकं स्वच्छ आणि निळंशार पाणी असा हा समुद्र किनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आणि खाडीच्या अनोख्या संगमातून तयार झालेलं अद्भूत सौंदर्य म्हणजे निवती समुद्र किनारा.
कसे पोहोचायचे:
निवती हे राज्याच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे आणि राष्ट्रीय महामार्गापासून (NH 66) फक्त 20 किमी अंतरावर आहे. कुडाळ येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वरून उतरणे आवश्यक आहे जिथून निवती अंदाजे 20 किमी आहे. मालवण आणि वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या रस्त्यानेही मालवणहून निवतीला जाता येते.
कोल्हापूर ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
कोल्हापूर-गगनबावडा-कणकवली-कुडाळ-निवती
पुणे ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
पुणे – सातारा – उंब्रज (साताऱ्यापासून 35 किमी) – चिपळूण – कणकवली – कुडाळ – निवती
मुंबई ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
मुंबई-पनवेल-पेण-खेड-चिपळूण-कणकवले-कुडाळ-निवती
Enter map content here..

Loading

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज: प्रागैतिहासिक काळातील रहस्ये उलगडणारी गोव्यातील कातळशिल्पे

   Follow us on        

गोवा पर्यटन :गोवा म्हंटले तर डोळ्यासमोर येतात येथील सागरी किनारे, जुनी मंदिरे आणि देशातील ईतर भागांपेक्षा येथे निर्माण झालेली एक वेगळी संस्कृती. या गोष्टींमुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र याव्यतिरिक्त गोव्यात अजून काही गोष्टी आहेत ज्यामुळे येथील पर्यटनात भर पडत आहे.

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज Usgalimal Rock Engravings म्हणजे गोव्याच्या हिरव्यागार जंगलात एक लपलेले रत्न जणूच जे प्राचीन भूतकाळातील रहस्ये उलगडत आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस मुसळधार पावसाने कुशावती नदीच्या उत्तरेकडील किनारी भागाच्या जमिनीचा वरील स्तर मोकळा होऊन लॅटराइट-स्टोन ग्राउंडच्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या शंभर कातळशिल्पांचा शोध लागला. ही कातळशिल्पे जवळ जवळ 20,000 ते 30,000 जुनी असल्याचे बोलले जाते. या कातळशिल्पांच्या अभ्यासाअंती प्राचीन काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. अशी ही दगडावर कोरलेली रहस्यमय कातळशिल्पे केवळ आपल्या पूर्वजांच्या कलात्मक क्षमतेचाच पुरावा नाही तर त्या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलकही देतात. तुमचा जर गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा बेत असेल तर ही तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात हे स्थळ समाविष्ट करायला विसरू नका.

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज 20,000 वर्षे जुनी आहेत आणि भारतातील सर्वात जुनी रॉक कला आहे, जी प्रागैतिहासिक काळापासून आहे. ते प्राणी, मानव, चिन्हे आणि नमुने दर्शवितात, बहुधा सुरुवातीच्या शिकारी-संकलक समुदायांनी तयार केले होते. ज्याचा उपयोग विधी आणि कथाकथनासाठी केला गेला असण्याची शक्यता आहे. साइटचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखक थेमिस्टोक्ल्स डिसिल्व्हा यांच्या म्हणण्यानुसार, कोरीव काम करण्यासाठी दगडी अवजारांचा वापर करण्यात आला होता. कोरीव काम समुदायासाठी महत्त्वपूर्ण होते, जे त्यांचे जग आणि त्यांच्या सभोवतालचे ज्ञान प्रतिबिंबित करते. दगड आणि खडकांवर अनुभवांची नोंद करण्याची ही प्रथा पूर्व-साक्षर काळात मानवी पूर्वजांमध्ये प्रचलित होती.हे कोरीवकाम ज्यांनी निर्माण केले त्या लोकांच्या सांस्कृतिक पद्धती, श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाबद्दल ते प्रकट करतात. प्रत्येक कोरीवकाम दीर्घकाळ गेलेल्या युगाची झलक देते, जे आम्हाला आमच्या पूर्वजांच्या जीवनावर आणि त्यांच्या नैसर्गिक जगाशी असलेल्या खोल संबंधांवर विचार करण्यास भाग पाडत आहे. डिसिल्व्हा यांनी एका वैज्ञानिक पेपरच्या स्वरूपात केलेल्या दस्तऐवजीकरणानुसार, उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज हे कोरलेल्या प्रतिमांचे वर्गीकरण आहे ज्यात साप, बैल, कुत्रे, शेळ्या, हरीण, मोर, गरुड, मासे आणि पृथ्वी माता यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. मानवी आकृत्या प्रामुख्याने पूर्वेकडे वसलेल्या आहेत. अनेक लहान प्राणी, मुख्यतः कॅप्रिड्स, खडकाळ प्लॅटफॉर्मवर विखुरलेले आहेत.

कशी भेट द्याल? 

पत्ता: 44CM+86P, Rivona VP, Goa 403704

वेळ: 24 तास उघडे

विशेष सुचना:कोरीव कामांची तोडफोड आणि इतर हानीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात नाही. तथापि, त्यांचे अन्वेषण करण्यास उत्सुक असलेले अभ्यागत स्थानिक पुरातत्व अधिकारी किंवा हेरिटेज संस्थांद्वारे मार्गदर्शित टूरची व्यवस्था करू शकतात. हे टूर सामान्यत: अभ्यागतांना विशिष्ट साइटवर घेऊन जातात जेथे ते प्रशिक्षित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खडकातील कोरीवकाम पाहू शकतात जे त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी देतात.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search