Category Archives: महाराष्ट्र

Sindhudurg: शिवापूरच्या कन्येने पटकावले ”चल भावा सिटीत” शोचे विजेतेपद

   Follow us on        

मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
“चल भावा सिटीत” या रिअॅलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या. श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.

New Railway Line: महाराष्ट्रात अजून एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

   Follow us on        
New Railway Line:महाराष्ट्रात अजून एका नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शनिशिंगणापूरला थेट रेल्वे नसल्याने राहुरी-शनिशिंगणापूर या नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देण्यात आली आहे. 22 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शनिशिंगणापूर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. शनि दर्शनासाठी दररोज सुमारे 45 हजार भाविक दर्शनासाठी येतात.
शनिशिंगणापूर राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर, पैस खांब यांसारख्या धार्मिक स्थळांना हा रेल्वे मार्ग सोयीस्कर होणार आहे. त्यातून परिसरात स्थानिक पर्यटनवाढ आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. दररोज चार रेल्वे या मार्गावर धावण्याचे प्रस्तावित असून, त्यातून वर्षाकाठी 18 लाख प्रवासी रेल्वे प्रवास करतील, असा अंदाज रेल्वे मंत्रालयाने वर्तविला आहे.
विकास आणि अध्यात्मिक केंद्र जोडण्यासाठी हा रेल्वेमार्ग एक दिशादर्शक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकल्पाला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे.

महत्वाचे: आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षांच्या संपर्क क्रमांकाची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबईदि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबईजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षमहानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई

आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9321587143,

दूरध्वनी: 022- 220227990022- 22794229022- 22023039,

आपत्कालीन संपर्क – 1070

ई-मेल [email protected]

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-

  • मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२,
  • मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४,
  • ठाणे – ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७,
  • पालघर – ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०,
  • रायगड – ०२१४१-२२२०९७,
  • रत्नागिरी – ०२३५२-२२२२३३ / २२६२४८,
  • सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७,
  • नाशिक – ०२५३-२३१७१५१,
  • अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४,
  • धुळे- ०२५६२-२८८०६६,
  • नंदुरबार – ०२५६४-२१०००६, 
  • जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०, 
  • पुणे – ०२०-२६१२३३७१, 
  • सोलापूर – ०२१७-२७३१०१२,
  • कोल्हापूर – ०२३१-२६५२९५४, 
  • सांगली – ०२३३-२६००५००,
  • सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५,
  • छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७,
  • धाराशिव- ०२४७२-२२७३०१, 
  • हिंगोली – ०२४५६-२२२५६०, 
  • परभणी – ०२४५२-२२६४००,
  • बीड- ०२४४२-२९९२९९,
  • नांदेड – ०२४६२-२३५०७७, 
  • जालना- ०२४८२-२२३१३२,
  • लातूर- ०२३८२-२२०२०४,
  • अमरावती- ०७२१-२६६२०२५,
  • यवतमाळ – ०७२३२-२४०७२०, 
  • वाशिम- ०७२५२-२३४२३८, 
  • अकोला- ०७२४-२४२४४४४,
  • बुलढाणा- ०७२६२-२४२६८३, 
  • नागपूर – ०७१२-२५६२६६८,
  • वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०,
  • चंद्रपूर – ०७१७२- २७२४८०/२५००७७,
  • गोंदिया – ०७१८२- २३०१९६, 
  • भंडारा- ०७१८४- २५१२२२,
  • गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५

 

महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक

  • बृहन्मुंबई – ०२२-२२६९४७२५/२७२२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९,
  • ठाणे – ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५, 
  • नवी मुंबई – ०२२-२७५६७२८१,
  • भिवंडी – ०२५२२-२५००४९/२३२३९८,
  • कल्याण – ०२५१-२२११३७३,
  • मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२,
  • उल्हासनगर – ०२५१-२७२०१४९/२७२०१४३,
  • वसई-विरार – ०२५०-२३३४५४७,
  • पनवेल – ०२२-२७४५८०४०,
  • नाशिक – ०२५३-२५७१८७२/२३१७५०५,
  • मालेगाव – ०२५५४- २३४५६७,
  • अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०,
  •  धुळे- ०२५६२-२८८३२०,
  • जळगाव – ०२५७-२२३७६६६,
  • पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३,
  • पिंपरी-चिंचवड – ०२०-६७३३११११,
  • सोलापूर – ०२१७-२७४०३३५,
  • कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१,
  • सांगली-मिरज-कुपवाड – ०२३३-२९५०१६१,
  • छत्रपती संभाजीनगर – ०२४०-१५५३०४,
  • परभणी – ०२४५२-२२३१०१,
  • नांदेड- ०२४६२-२३४४६१,
  • लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५,
  • अमरावती – ०७२१-२५७६४२६,
  • अकोला – ०७२४-२४३४४६०,
  • नागपूर – ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००,
  • चंद्रपूर – ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७,  ०७१७२-२५९४०६/२५४६१४

 

रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी

  • कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९
  • पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी – ९००४४९९०९९
  • मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०

Cyclone Alert: अरबी समुद्र खवळण्याची शक्यता, 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन!

   Follow us on        
Cyclone Alert: महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात बुधवार, 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
* हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
* स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
* खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
* लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
* सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
* संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
* समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.

Zee Cine Awards 2026: २०२६ चा ‘झी सिने अवॉर्ड’ सोहळा सिंधुदुर्गात होणार

   Follow us on        
Mumbai: सिंधुदुर्ग वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. झी समूहाने ‘झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्गमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणाला एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.
अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या ‘झी सिने अवॉर्ड 2025’ या कार्यक्रमास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुढील वर्षीचा ‘24वा झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्ग येथे घेण्याची अधिकृत घोषणा केली. ही बातमी समजताच कोकणात उत्साहाचं वातावरण पसरलं असून, सर्व स्तरांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
नितेश राणे म्हणाले, ‘हा केवळ एक पुरस्कार सोहळा नसेल, तर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि कोकणातील जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करणारा ऐतिहासिक क्षण असेल. बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार, निर्माता-दिग्दर्शक कोकणात येतील. इथल्या सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेतील. यामुळे कोकणातील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.’
राणेंनी या घोषणेसोबतच एक व्हिडिओदेखील आपल्या सोशल मीडिया एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्य, पारंपरिक लोककला, खाद्यसंस्कृती आणि माणुसकीने नटलेली कोकणची माती या सगळ्याचा स्पर्श या कार्यक्रमात दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘झी सिने अवॉर्ड’सारखा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेला कार्यक्रम कोकणात घेण्याचा निर्णय हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणच्या विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरेल. स्थानिक कलाकारांना या निमित्ताने मोठ्या व्यासपीठावर आपली कला सादर करता येईल आणि कोकणची संस्कृती देशभर पोहोचवता येईल.
सध्या झी समूह आणि राज्य सरकार यांच्यात कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजन सुरू झाले असून, याची अधिकृत माहिती लवकरच दिली जाणार आहे. कोकणातील जनतेसाठी हा निश्चितच गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

MSRTC Recruitments: एसटीमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी; एसटी नोकरभरतीबाबत परिवहन मंत्री काय म्हणालेत?

MSRTC Recruitments: एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली, अशी माहिती परिवहन खात्याकडून दिली गेली.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन. २०२४ पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणिय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या ३०७ व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले. एसटीमध्ये मोठी पदभरती होणार असल्याने तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे. सध्या बेरोजगारी वाढत असल्याने तरुणांमध्ये रोष आहे.
अभियंत्यांची रिक्त पदे भरणार
सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत.

SSC Result 2025: मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; निकाल येथे पाहता येईल?

   Follow us on        

SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे

उद्या दिनांक 13 मे रोजी दुपारी ठीक 1 वाजता खालील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.

mahahsscboard.in

-mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

 

Mansoon 2025: यंदा मान्सून किती तारखेला दाखल होणार? हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

   Follow us on        
Mansoon Update:यंदा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वारे अंदमान व निकोबार बेटावर 13 रोजी, तर देवभूमी केरळात नियोजित वेळेच्या 4 दिवस आधीच म्हणजेच 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचा प्रवास लवकरच सुरू होण्याची चिन्हे असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साधारणपणे मान्सून अंदमानात 18 ते 20 मे दरम्यान, केरळात 1 जूनच्या आसपास, तळकोकणात 7 जूनला, महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत, तर संपूर्ण देशभरात 15 जुलैपर्यंत सक्रिय होत असतो. मात्र, यंदाच्या मान्सूनने लवकरच वर्दी दिल्याचे दिसत आहे. पुढील आठवड्यापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13 मेपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या काही भागात दाखल होण्याची शक्मयता आहे. त्यानंतरच्या तीन ते चार दिवसात तो अंदमान, निकोबार बेटासह अंदमान समुद्राचा परिसर व्यापण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाकरिता स्थिती अनुकूल असल्याने त्याचा पुढचा प्रवास झपाट्याने होण्याची चिन्हे आहेत. 2009 मध्ये मान्सून लवकरच म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. यंदा 27 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर तो लवकरच सक्रिय झाला, तर मागच्या 15 वर्षांतील मान्सूनची हा गतिमान प्रवास असेल. त्यानंतरही मान्सूनची वाटचाल सुरूच राहणार असून, महाराष्ट्रातही तो नियोजित वेळेआधी येण्याची लक्षणे आहेत. तर साधारण 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज आहे.

Mumbai-Goa Bus Accident: मुंबई गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; तीन ते चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

   Follow us on        

Mumbai-Goa Bus Accident : मुंबई-गोवा महामार्गावर काल रात्री एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईहून कोकणच्या दिशेने 35 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस मुंबई-गोवा मार्गावरील कर्नाळा खिंडीत पलटली. या अपघातात तिन ते चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून बहुतेक प्रवासी जखमी झाले आहेत.

हा बस इतका भीषण होता की अपघातानंतर खासगी बस पलटी झाली. दरम्यान रात्री उशीरापर्यंत रस्त्याच्या मधे असलेली बस बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

अपघाताबद्दल माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दल मदतीसाठी दाखल झाले. अपघात झालेल्या बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. रात्री उशीरापर्यंत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू होते. यातील काही प्रवाशांना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

HSC Result 2025: मोठी बातमी! १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर; निकाल येथे पाहता येईल.

   Follow us on        
12th Result date: यंदा १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचा पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (website) निकाल पाहू शकतील. तसेच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका (marksheet) उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इ. १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी मंडळाने काही अधिकृत संकेतस्थळे (official websites) जाहीर केली आहेत. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयवार गुण पाहता येतील. तसेच, निकालाची प्रिंट (print out) काढण्याची सोय देखील उपलब्ध आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल (overall result) कॉलेज लॉगिनमध्ये पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी लिंक :

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search