Category Archives: महाराष्ट्र

Election 2024 Voting Live Updates: राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५% टक्के मतदान; टक्केवारीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत  ३१.५५% मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (३८.४२%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (२६.६१%)झाले आहे.
लातूर – ३२.७१ %
सांगली २९.६५ %
बारामती २७.५५%
हातकणंगले ३६.१७%
कोल्हापूर ३८.४२%
माढा २६.६१%
उस्मानाबाद ३०.५४%
रायगड ३१.३४%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग ३३.९१ %
सातारा ३२.७८ %
सोलापूर २९.३२%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक ३७.९० % एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी २८% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ ३२.८८%
कणकवली ३१.५९%
सावंतवाडी ३६.६५%
राजापूर ३७.०५%
चिपळूण ३७.९०%
रत्नागिरी  २८%
रायगड मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.३४% मतदान झाले आहे. या मतदारसंघात गुहागर येथे सर्वाधिक ३९.००% एवढे मतदान झाले असून पेण मध्ये  सर्वात कमी २२.२०%  एवढे मतदान झाले आहे.
अलिबाग ३२.९०%
दापोली ३६.४५%
गुहागर ३९.००%
महाड ३२.००%
पेण २२.२०%
श्रीवर्धन २६.९४ %
देशात १ वाजेपर्यंत एकूण ३९.९२% एवढे मतदान झाले असून गोवा आणि पश्चिम बंगाल येथे सर्वाधिक सुमारे ४९% मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत सर्वात मागे आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८% टक्के मतदान; कोल्हापूर मतदारसंघात सर्वात जास्त मतदानाची नोंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी  महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत  १८.१८% टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (२३.७७%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान बारामती मतदारसंघात ( १४.६४%)झाले आहे.
लातूर – २०.७४%
सांगली १६.६१%
बारामती १४.६४%
हातकणंगले २०.७४%
कोल्हापूर २३.७७%
माढा १५.११%
उस्मानाबाद १७.०६%
रायगड १७.१८%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग २१.१९%
सातारा १८.९४ %
सोलापूर १५.६९%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 11 वाजेपर्यंत  २१.१९%  मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक २४.१८% एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी १५% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ २१.४०%
कणकवली २२.०९%
सावंतवाडी २१.७४%
राजापूर २३.६३%
चिपळूण २४.१८%
रत्नागिरी  १५.०० %
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

IMD Alert | मतदानाच्या दिवशी हे मतदारसंघ ‘तापणार’, कोणती काळजी घ्याल?

   Follow us on        

मुंबई :उद्या दिनांक ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील भागातील निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खात्याने IMD महाराष्ट्रात ज्या भागात मतदान होणार आहे त्या भागातील हवामान अंदाज जाहीर केले आहेत.

IMD ने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, वाडा, सांगली, सातारा आणि हातकंगाले या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस ही पातळी ओलांडणार आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकण भागात तापमान ३४ ते ३६ डिग्री सेल्सिअस च्या घरात राहणार आहे. कोल्हापूर जिल्हय़ात अधिकतम तापमान ३९ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

कोणती काळजी घ्याल? 

शक्यतो सकाळी मतदानासाठी बाहेर पडावे. मतदान केंद्रावर गर्दी असल्यास उन्हातही मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडताना हातात छत्री घेऊनच बाहेर पडावे. सोबत पाण्याची मोठी बाटली घेऊन निघा. वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. शक्य असेल तर ORS, लिंबू सरबत अशी घरगुती पेय सोबत घेतल्यास फायद्याचं ठरेल. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर हयगय न करता मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्याकडून मदत मिळवा.

 

Loading

HSC & SSC Results | दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखांबाबत मोठी अपडेट

   Follow us on        

HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.

उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.

दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.

Loading

नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला कोकणात निर्माण झाला सर्वात मोठा अडथळा

   Follow us on        
सावंतवाडी: प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील विघ्ने वाढत चालली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला मोठया प्रमाणावर विरोध केला आहे. आता तर तळकोकणातही ज्या पट्ट्यातून हा महामार्ग जात आहे तो पट्टा ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’  क्षेत्र Eco Sensitive Zone जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालायने सरकारला दिले असल्याने या महामार्गासमोरील सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
प्रस्तावित महामार्ग आंबोली, कीतवडे,गेळे,वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उदेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा या गावातून जाणार आहे. मात्र यातील फणसवडे, उडेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी ही गावे या इको सेन्सेटिव्ह झोन ESZ मध्ये येत आहेत. येथे वृक्षतोड करणे आणि महामार्ग बांधकामास मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या वाटेवरील अडचणी वाढल्या आहेत. या महार्गासाठी   या भागातून नेण्यास मंजुरी मिळवणे खूप कठीण होणार आहे.
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या क्षेत्राला ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’  क्षेत्र Eco Sensitive Zone ESZ जाहीर करण्यात  यावे असेच आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा हा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र गेल्या ११ वर्षात या आदेशांचे पालन झाले नसल्याने  केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरल्याचे म्हणत न्यायालयाने ताशेरे ओढले होते.आता मात्र उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने  चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने पुढील दोन महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
सवांवाडी दोडामार्ग कॉरिडॉर दरम्यान २५ गावे येतात. सिंधदुर्गतील केसरी, फणसवडे , उडेली, दाभील- नेवली, सरंबळे, ओटावणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंब्रल, पांतुर्ली, भिके कोनाळ, कळणे, उगडे, पडवे माजगाव ही २५ गावे या कॉरिडॉर मध्ये मोडतात.या मार्गिकेतून अनेक वन्य प्राणी येजा करतात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात जैवविविधता आहे. तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत. मात्र या भागातून असे महामार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन जैवविविधतेची मोठी हानी होऊ शकते. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असल्याने येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद यांनी मत मांडले आहे.

Loading

मुलांनो ही संधी दवडू नका; रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (RPSF) मध्ये 4660 पदांसाठी भरती.

   Follow us on        
रेल्वे भरती :रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (RPSF) ने कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर (SI) या 4660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे..
पदांची संख्या – 
कॉन्स्टेबल: 4208
सब-इन्स्पेक्टर: 452
शैक्षणिक पात्रता – 
कॉन्स्टेबल: 10वी उत्तीर्ण
सब-इन्स्पेक्टर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
वय मर्यादा – 
कॉन्स्टेबल: 18 ते 28 वर्षे – इतर नियमानुसार सूट, सब-इन्स्पेक्टर: 20 ते 28 वर्षे – इतर नियमानुसार सूट
अर्ज शुल्क – 
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस: ₹500 एससी, एसटी, महिला आणि एक्स-सरव्हिसमन: ₹250
अर्ज प्रक्रिया – 
उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावे लागतील. ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी 15 एप्रिल 2024 ते 14 मे 2024
निवड प्रक्रिया – 
अर्जांची निवड शारीरिक चाचणी (PET), शारीरिक मापन चाचणी (PMT) आणि लेखी परीक्षा या आधारे केली जाईल.
शारीरिक चाचणी (PET)
धावणे, लांब, उंच उडी (पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगळ्या निकष)
लेखी परीक्षा
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असेल.
प्रश्न मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील.
अधिकृत संकेतस्थळ: 
जाहिरात:
Apply Link :
15 एप्रिल 2024 (आज) पासून सुरु होईल.
ही बातमी अधिका अधिक शेअर करून आपल्या मराठी मुलांना एक संधी उपलब्ध करून द्या

Loading

देहदान: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवयव दानासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग, १५ एप्रिल :देहदान व अवयवदान यातील मूलभूत फरक समजून घेणं गरजेचं आहे. देहदान नैसर्गिक मृत्यू नंतर करता येते. त्यासाठी मृत्य व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असल्यास संपूर्ण देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरिरशास्त्र विभागाच्या ताब्यात स्वतः नातेवाईक यांनी दान करावा लागतो. त्यापुर्वी दोन्ही डोळ्यांचे नेत्रपटल म्हणजे डोळ्यावरची पारदर्शक काच व त्वचा दान करता येते. पण त्या साठी प्रशिक्षित तज्ञांची टीम घरी किंवा दवाखान्यात नेऊन नेत्र व त्वचादान स्विकारतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या तरी नेत्र व त्वचापेढी नसल्याचे आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती यांना नेत्र व त्वचादाना साठी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठावे लागले . पण वेळेअभावी या गोष्टी अशक्य आहेत. नेत्र व त्वचा शिवाय हाडं, अस्तिमज्जा, हृदयाची झडपा, मज्जा पेशी, रक्तवाहिन्या इतकेच नाही तर शरिराचे हात, पाय व डोक्यावरील केस पण दान करुन सुमारे पन्नास रुग्णांना एक मृत व्यक्ती व्याधी मुक्त करू शकतो.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान स्विकारण्याची सोय करण्यात आलेली असून मृत व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची ईच्छा असल्यास व्यक्तीच्या मृत्यूनंतर देह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरिरशास्त्र विभागात स्विकारण्याची सोय केलेली आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अवयव व देहदान महासंघचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी कळविले आहे.

अलीकडेच त्यांनी सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज जोशी व शरिरशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता थेटे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. मृत्यू समयी एडस्,कोरोना, कर्करोग सारखा महाभयंकर रोग असल्यास किंवा मृत्यू आत्महत्या, विषप्राशन, गळफास घेऊन झाल्यास अश्या व्यक्तींना देहदान, नेत्रदान, त्वचा दान करता येतं नाही. ईश्वराने शरिराचा कोणताही भाग टाकाऊ बनविला नाही, फक्त आपल्या अज्ञानामुळे आपण शरिर जाळुन टाकतो किंवा मातीत मिसळतो, भारतीय समाज सामाजिक, धार्मिक अंधश्रद्धांच्या परंपरागत गैरसमजुतीं मध्ये अडकुन बसलेला असुन काळानुसार यात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. कालानुरूप सती जाणं , स्त्री शिक्षण, बालविवाह सारख्या बाबतीत बदल झाले असून देहदान बाबतीत सुद्धा हे बदल हळूहळू होतील अशी आशाही डॉ. संजीव लिंगवत यांनी व्यक्त केली.

 

Loading

पुणेकरांसाठी खुशखबर! नागपूर – पुणे विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

   Follow us on        

पुणे, दि. ११ एप्रिल: मुलांच्या परीक्षा संपल्या की वेध लागते ते गावी जायचे. शहरातील भयंकर उकाडा सहन करण्यापेक्षा सुट्टी घेऊन ती गावीच खर्च करावी अशी जवळपास सर्वच चाकरमान्यांची इच्छा. यासाठी त्याची तीन चार महिनेच प्लॅनिंग चालू होते. त्यात गावी जाण्यासाठी रेल्वे आरक्षण करणे हे प्राधान्याने येतेच. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नियमित गाड्यांची तिकिटे मिळणे खूपच अवघड होते. अशा वेळी रेल्वेच चाकरमान्यांच्या मदतीला धावून येते. काही विशेष गाड्या सोडून किंवा आहे त्या गाड्यांच्या फेर्‍या वाढवून प्रवाशांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

याचाच एक भाग म्हणुन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एका विशेष गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते पुणे दरम्यान चालविण्यात येणार्‍या 01165/01166 गाडीच्या फेर्‍या वाढविण्यात येणार आहे. सध्या ही गाडी आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येते. मात्र दिनांक 18 एप्रिल ते 14 जून या कालावधीत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण 18 अतिरिक्त फेर्‍या होणार आहेत.

दिनांक 18 एप्रिलपासून नागपूर (01165) येथून दर गुरुवारी तर दिनांक 19 एप्रिल पासून दर शुक्रवारी पुणे(01166) येथून हा अतिरिक्त फेर्‍या सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Loading

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा यांची वर्णी

   Follow us on        
मुंबई : कोकण रेल्वेचे KRCL व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे या पदावरूंन निवृत्त झाल्याने त्या जागी आता संतोष कुमार झा हे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
संतोष कुमार झा यांनी लखनौ विद्यापीठातून (भूविज्ञान) एम.एससी. आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून एमबीए (मार्केटिंग) केले आहे. ऑपरेशन्स, पायाभूत सुविधा नियोजन आणि व्यवसाय विकास क्षेत्रात २८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले झा यांनी भारतीय रेल्वेच्या प्रमुख विभागांचे संचालन केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात तसेच मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
   Follow us on        

Loading

शक्तीपीठ महामार्ग | विघ्ने वाढलीत; महामार्गाच्या विरोधात १ हजार ३११ हरकती दाखल

सांगली : विद्यमान सरकाराच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेवरची विघ्ने संपताना दिसत नाही. या महामार्गा विरोधात सांगली सोलापूर, कोल्हापूर या तीनच जिल्ह्यातून १ हजार ३११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठाला समांतर महामार्ग उपलब्ध असताना पिकाउ जमिनीतून महामार्गाचा प्रकल्प राबविण्यास एकसंघपणे विरोध करण्याचा निर्णय सांगली येथील कवलापूर येथे शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती. सध्या नागपूर रत्नागिरी हा महामार्ग नियोजित प्रकल्पाला समांतर असताना पुन्हा हा नव्याने महामार्ग प्रस्तावित करण्याचे काहीच कारण नाही. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकर्‍यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकर्‍यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील. हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकर्‍यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. असे यावेळी या बैठकीचे निमंत्रक दिगंबर कांबळे म्हणालेत

प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूरमधून २५० अशा १ हजार ३११ हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search