मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.
बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.
Nagpur Goa Shaktipeeth Highway Updates:नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या ८०२ किमीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आले आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभेतील पराभवानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर या प्रकल्पाबाबतन निर्णय घेईल असे ठरविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
“या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. किमान पुढील ३-४ महिने जमीन संपादित करू नयेत असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (ऑक्टोबरमध्ये) नवीन सरकार या प्रकल्पाचे भवितव्य ठरवेल”, असे या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या कामामुळे शेतकरी वर्गासह कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याला विरोध आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रोखणे आवश्यक असून या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १२ जिल्हे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून या १२ जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी असे तब्बल २०० लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहेत.
कोल्हापूर : विद्यमान सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आता तर चक्क सत्तेत रूढ असलेल्या महायुतीतील नेत्यांनी या महामार्गाला विरोध केला असल्याने या प्रकल्प रद्द होण्याच्याच शक्यता वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांनीच विरोध केला आहे. महायुतीचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यापाठोपाठ आता भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनीही सोमवारी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यातील कागलसह सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत बामणी (ता. कागल) येथे घाटके यांनी सोमवारी बैठक घेतली. कागल तालुक्यातील सर्वाधिक ५०० एकर जमीन महामार्ग व अन्य सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या जागेचीही घाटगे यांनी पाहणी केली.
‘शक्तिपीठ’मुळे पराभव?
संजय मंडलिक यांनी आपल्या पराभवामागे शक्तिपीठ महामार्ग हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ यांनीही याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचे म्हटले आहे. हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काहीच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून पुन्हा शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका सरकारला बसू शकतो, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी महायुतीतील नेत्यांकडून होत आहे.
Mansoon Alert: महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सोलापूर पर्यंन्त मान्सून दाखल झाला असल्याने उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कालपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. याचसोबत तळ कोकणात उद्यापर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. कोकणसह संपूर्ण राज्यात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून अरबी समुद्र किनारपट्टी भागात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे.
हवामान खात्याचा अंदाज
उद्या शुक्रवारी आणि शनिवारी हवामान खात्याने राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. काही जिल्हे वगळता रविवारी आणि सोमवारी सुद्धा राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. मात्र सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत या दिवशीं मुसळदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने या दिवशीं या जिल्ह्यांना दक्षतेचा ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.
Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक ०४ जून रोजी हाती येणार आहे. मंगळवारी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.
कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
ओपनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो ?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.
एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?
आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.
सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.
लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.
Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील?
एक्झिट पोल एजन्सी
महायुती
महाविकास आघडी
इतर
ABP News-CVoter
24
23
1
TV9 पोलस्ट्राट
22
25
1
Republic Bharat-Matrize
30-36
13-19
0
Republic PMARQ
29
19
0
News18 exit poll
32-35
13-16
0
School of Politics
31-35
42705
0
TIMES NOW Survey exit polls
26
24
0
News 24 Chanakya exit polls report
33
15
0
Rudra survey
13
34
1
NDTV India – Jan Ki Baat
34-41
42614
0
Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये देशात कुणाला किती जागा मिळतील?
Mansoon Arrivals 2024: प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील नागरिकांचे हाल होत असून, बहुतांश शहरांतील कमाल तापमान चाळीशीपार नोंदवले जात आहे. मात्र हवामान खात्याने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता लवकरच मॉन्सून येणार असून, तळकोकणात म्हणजे तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मॉन्सून लवकर दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा येत आहेत. त्यामुळे मॉन्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ४ जून रोजी मॉन्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज देण्यात आलेला आहे.’रेमल’ या चक्रीवादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मॉन्सूनाला कुठेही अडथळा येणार नाही. मॉन्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारितीने होणार आहे. मॉन्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून (दि.२) अधिक बळकट होतील. परिणामी मॉन्सूनची वेग चांगला राहील, असा अंदाज देण्यात आला आहे. जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल, तो मॉन्सूनचा समजला जाईल. त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान जो पाऊस पडेल, त्यात आजपासून होणाऱ्या पावसाचा समावेश होईल. राज्यात काही भागात मॉन्सून पाेचलेला नसला तरी देखील तो पाऊस मॉन्सूनचा समजला जाईल. सध्या पं. बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर मुंबई पुण्यात ६ जून रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
काही वेळा एखाद्या अनोळखी गावी जायचा योग, स्वतःचे वाहन नसल्यास गाव खेड्याच्या भागात एसटी हे परवडणारे वाहतुकीचे साधन उपलब्ध असते. मात्र कित्येकदा आपल्याला त्या गावात जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक माहिती नसते, त्यामुळे मोठी गैरसोय होते. मात्र आता ही गैरसोय दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणे एसटीचेही वेळापत्रक मोबाइल अँप्लिकेशनद्वारे चेक करता येणार आहे.
पियुष चौधरी यांनी एक मोबाइल अँप्लिकेशन बनवले आहे. या अँप्लिकेशनद्वारे वापरकर्त्यांना एसटी बसेसचे वेळापत्रक पाहता येणार आहे. हे अँप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वर उप्लब्ध करण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत १७२ बस स्थानकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात भविष्यात वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेळापत्रकात बसेसच्या थांब्याचीही माहिती सामील करण्यात येणार आहे.
या अँप्लिकेशन मध्ये बस आगारांचे, मध्यवर्ती कार्यालय, वर्कशॉप, विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेचे संपर्क क्रमांक मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
खालील लिंकवर क्लिक वर करून हे अँप्लिकेशन डाउनलोड करता येईल.
10th Result 2024:दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागच्या या वर्षी या परीक्षेचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. मागच्यावर्षी पेक्षा साधारण 1.98 % ने यामध्ये वाढ झाली असली तरीही या निकालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मातृभाषेच्या विषयातच हजारो विद्यार्थ्यांनी गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्यामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
वाचकांच्या प्रतिक्रिया
“एक काळ होता जेव्हा परकीयांची इंग्रजी भाषा दहावी बारावी परीक्षा पास होण्याकरता सर्वात मोठा अडथळा ठरत होती. आता मात्र चित्र उलट दिसत आहे. मराठी भाषा परकी होत चाललेली दिसत आहे.”
श्री. दिगंबर गणपत राणे, माहीम
“राज्य शिक्षण मंडळाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड का जात आहे याबाबत सविस्तर विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल केला गेला पाहिजे.”
IMD Alert: भारतीय हवामान खात्याने IMD राज्यात पुढील चार/ पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. खास करून दिनांक १२ आणि १३ मे या दोन दिवशी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यातील काही जिल्हे वगळता इतर भागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक १२ मे रोजी नाशिक,अहमदनगर,पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो र्ट देण्यात आला आहे.
दिनांक १३ मे रोजी अहमदनगर,पुणे, औरंगाबाद, जालना,यवतमाळ, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट नसला तरी बहुतेक जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंडयेथे नोकरीच्या संधी....
रत्नागिरी :सहयाद्री टायगर रिझर्व (STR)मधील वाघांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यातील वन विभागाने एक निर्णय घेतला आहे. वन विभाग लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे येथे स्थलांतर करणार आहे. एसटीआरमधील सह्याद्री कोकण वन्यजीव कॉरिडॉर आणि गोवा, कर्नाटकमधील जंगले पुरेशी सुरक्षित आणि मानवी उपद्रवांपासून मुक्त असल्यामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते.
उत्तर पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा(STR)ची स्थापना जानेवारी २०१० मध्ये झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत त्यांची हद्द पसरली. त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. शिकारी आणि बदलत्या अधिवासामुळे या प्रदेशात वाघांची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाली आहे. एसटीआर राखीव अभयारण्य केल्यानंतरही वाघांची संख्या वाढली नाही, कारण प्रजनन करणाऱ्या वाघांनी राखीव भागात वसाहत केली नाही. एसटीआरच्या हद्दीत वाघांच्या उपस्थितीचे फोटो कमी आहेत आणि पद मार्गांच्या पुराव्याने सात ते आठ वाघांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.
वाघांची लोकसंख्या वाढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एसटीआरच्या दक्षिणेकडे असलेल्या जंगलांमधून गोवा आणि कर्नाटकातील वाघांना इथे आणणे आहे. त्यामुळे वन्यजीव कॉरिडॉर मजबूत होऊ शकतो. परंतु वाघांच्या संख्येत वाढ होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. परिणामी, अल्पकालीन परिणामांसाठी वाघांचे स्थलांतर निवडण्यात आले आहे.