Category Archives: महाराष्ट्र

महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाला स्थान मिळणार; वाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंट्री बोर्डासमोर सादर केल्याचीही माहिती आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची, तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना संभाव्य मंत्री
१. उदय सामंत
२. तानाजी सावंत
३. शंभूराजे देसाई
४. दादा भुसे
५. गुलाबराव पाटील
६. राजेश क्षीरसागर
७. आशिष जैस्वाल
८. प्रताप सरनाईक
९. संजय शिरसाट
१०. भरत गोगावले
राष्ट्रवादी संभाव्य मंत्री
१. आदिती तटकरे
२. हसन मुश्रीफ
३. छगन भुजबळ
४. धनंजय मुंडे
५. धर्मरावबाबा अत्राम
६. अनिल पाटील
७. दत्ता भरणे

Sleeper Vande Bharat : पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचा संभाव्य मार्ग जाहीर

   Follow us on        

Sleeper Vande Bharat : चेअर कार वंदे भारत ट्रेन सध्या देशभरात लोकप्रिय होत आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. स्लीपर वंदे भारतच्या मदतीने प्रवाशांना झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. शुक्रवारी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून तो ट्रॅकवर चाचणीसाठी तयार आहे. या ट्रेनची चाचणीही लवकरच सुरू होऊ शकते.

पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोणत्या तारखेपासून धावणार हे रेल्वेने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी पुढील वर्षी जानेवारीत धावणारी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हर्जनमध्ये चालवली जाऊ शकते आणि ही ट्रेन पहिली स्लीपर व्हर्जन ट्रेन असेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्लीपर वंदे भारतबाबत अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे.

यापूर्वी २ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ या चेअर कारबाबत सांगितले होते की, सध्या अशा १३६ गाड्या धावत आहेत. यापैकी १६ वंदे भारत एक्स्प्रेस सेवा तामिळनाडू राज्यातील स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. दिल्ली ते बनारस दरम्यान सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन धावत असून ती ७७१ किमी चे अंतर पार करते. राज्यसभेत अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या नियोजित वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधा आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत.

स्लीपर वंदे भारत ट्रेनचे फीचर्स –

1- ट्रेनमध्ये कवच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

2- ही ट्रेन EN-45545 HL3 अग्निसुरक्षा मानकांनुसार असेल.

3-क्रॅशवर्थी आणि जर्क-फ्री सेमी परमानेंट कपलर आणि अँटी क्लाइंबर.

4- EN मानकांच्या  अनुरूप कारबॉडीचे क्रॅशवर्थी डिजाइन.

5- ऊर्जा दक्षतेसाठी अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम.

6- इमरजन्सी स्थितीत प्रवासी आणि  ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट दरम्यान संवादासाठी आपातकालीन टॉक-बॅक यूनिट.

7- ट्रेनमध्ये सेंट्रली कंट्रोल्ड ऑटोमैटिक प्लग दरवाजे आणि रुंद गँगवे.

8-वरच्या बर्थवर चढण्यासाठी चांगल्या डिजाइनच्या शिड्या.

9- प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसी, सॅलून लायटिंग आदि सुविधा. यासोबतच आरसे व आकर्षक इंटेरिअर या ट्रेनमध्ये असणार आहे.

पवनार – पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरू

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:वर्धा जिल्ह्यापासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला जनता पूर्ण पाठिंबा देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी नंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन सुरू करून पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हा द्रुतगती मार्ग ज्या 12 जिल्ह्यांतून जातो, त्यापैकी केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच विरोध आहे, ज्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल आणि या महामार्गाचे काम लवकरच सुरू केले जाईल असे ते म्हणालेत.

11 जिल्हय़ातून जाणार्‍या सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाला शेतकर्‍यांनी विरोध केला होता. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यामुळे मोठा फटकाही बसला होता. त्यामुळ सावधानता म्हणुन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे भेटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास हालचाली झाल्या आहेत.

शक्तीपीठ एक्स्प्रेसमध्ये 802 किमी लांबीमध्ये 26 इंटरचेंज असतील.

  1.  पवनार-येळा
  2.  कळंब-राळेगाव
  3.  यवतमाळ
  4.  माहूरगड-आर्णी
  5.  पुसद
  6.  उमरखेड
  7.  हिंगोली-नांदेड
  8.  औंढा नागनाथ-बसमत
  9.  परभणी
  10.  गंगाखेड
  11.  परळी वैजनाथ
  12.  अंबेजोगाई-घाटनांदूर
  13.  लातूर
  14.  तुळजापूर-धाराशिव
  15.  बार्शी
  16.  सोलापूर
  17.  पंढरपूर-मंगळवेढा
  18.  सांगोला
  19.  सांगली
  20.  नरसोबाची वाडी
  21.  पट्टण कोडोली
  22.  कोल्हापूर बायपास
  23.  पन्हाळा
  24.  आदमपूर
  25.  गारगोटी
  26. बांदा-पत्रादेवी

‘अटल सेतू’वरील वाहनांच्या संख्येत घट; कारण काय?

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.

मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.

EPFO नवीन योजना; आता ATM मधून काढता येणार PF चे पैसे

EPFO Updates: केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी (EPFO) संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सरकारचा EPFO ​​३.० उपक्रमांतर्गत EPFO ​​सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये योगदान वाढविण्याचा आणि डेबिट कार्डसारखे एटीएम (ATM card) कार्ड जारी करण्याबाबत विचार करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात थेट ‘एटीएम’मधून पैसे काढता येतील. ही योजना मे-जून २०२५ पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.

सध्या EPF सदस्याला पीएफचे पैसे काढण्यासाठी ७ ते १० दिवस वाट पाहावी लागते. हा वेळ पीएफचे सर्व पैसे काढण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे EPFO ​​ला सादर केल्यानंतर लागतो. यात अधिक वेळ वाया जातो.

सध्या पगारदार कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या कमाईच्या १२ टक्के रक्कम त्यांच्या EPF खात्यासाठी योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात ०.५० टक्के योगदानदेखील देतो.

MSRTC: शिवशाही बस बद्दलची ‘ती’ बातमी खोटी; महामंडळाकडून मोठा खुलासा

मुंबई: शिवशाही बसच्या वाढत्या अपघात घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच वाढलेल्या शिवशाही बसच्या अपघातांमुळे शवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, शिवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या अफवांना एसटी महामंडळाने स्पष्ट नकार दिला आहे. एसटी महामंडळाने या चर्चांना मूळ नसल्याचं सांगत प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.एसटी महामंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, शिवशाही बस सेवा प्रवाशांच्या सोईसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवशाही बस या राज्यभर प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून, ती वेळेवर सेवा आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाते.

महामंडळाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. अपघातांमुळे आलेल्या आव्हानांना सामोरं जात असतानाही महामंडळाने बस सेवेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात असून, वाहनांची नियमित तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या अधिकृत ‘एक्स’ माध्यमातून महामंडळाने या बद्दल खुलासा केला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही. असे या पोस्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Mumbai-Goa Highway: मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी बंद

RATNAGIRI: मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी १५ दिवस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.

कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

Maharashtra Assembly Election: सत्तेत येण्याचा दावा करणारी मनसे पुन्हा अपयशी

   Follow us on        

Maharashtra Assembly Election:महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या १.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २.२५ टक्के इतके होते.

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उत्तरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. गेल्या निवडणुकीत एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनाही कल्याण ग्रामीण
मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला.
मनसेच्या मतांचा टक्का घसरला
मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ५.७१ टक्के मते मिळाली होती. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का ३.१५ टक्क्यांवर घसरला. सन २०१९च्या निवडणुकीत हाच टक्का अवघा २.२५ टक्के राहिला. यंदा त्यात आणखी घट झाली असून मनसेचा जनाधार आता अवघ्या १.५५ टक्के इतका तुटपुंजा आहे.

Maharashtra Assembly Election: संख्याबळाअभावी विरोधी पक्षनेता नाही?

   Follow us on        

Maharashtra Assembly Election:विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेते पदच नसणार आहे. या अगोदर लोकसभेत २०१४ आणि २०१९ निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेते पद नव्हते. आता राज्यात हे पद नसणार आहे.

राज्य विधीमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागांच्या दहा टक्के जागा मिळणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात  घेता महाविकास आघाडीतील विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाकडे तेवढे संख्याबळ नाही, काँग्रेसकडे सध्या १९, शिवसेना उबाठाकडे १९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १३ जागा आहेत.

Maharashtra Assembly Election Statistics: पक्षनिहाय मतदान टक्केवारीत चित्र काहीसे वेगळे.

   Follow us on        
यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदविला आहे. एकूण  १३२ जागा जिंकून तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर त्यानंतर जागा जिंकण्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी बाजी  मारली आहे.
मात्र पक्षनिहाय मतदान टक्केवारीत चित्र काहीसे वेगळे आहे.
पक्षनिहाय मतदान टक्केवारीतही  भाजप राज्याच्या मतांच्या २६.७७% मते घेऊन क्रमांक १ वर आहे. तर १२.४२% टक्क्यानिशी दुसऱ्या क्रमांकावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. शिवसेना शिंदे गट एकूण मतांच्या १२.३८% मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकूण मतांच्या १.५५% वाटा भेटला असला तरी तिला त्याचे रूपांतर एकाही विजयी जागेत करता आले नाही.
पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी
क्र. पक्ष टक्केवारी
1 भारतीय जनता पार्टी – भाजपा 26.77%
2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 12.42%
3 शिवसेना 12.38%
4 राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार 11.28%
5 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9.96%
6 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) 9.01%
7 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1.55%
8 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन 0.85%
9 नोटा 0.72%
10 बहुजन समाज पार्टी 0.48%
11 समाजवादी पक्ष – सपा 0.38%
12 भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) 0.34%
13 इतर 13.86%

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search