Category Archives: महाराष्ट्र

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय

मुंबई :राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ह्या वाढीस मान्यता दिली आहे. महामंडळाचे सुमारे ९२ हजार अधिकारी-कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. 

 

ह्या आधी मिळणारा २८ टक्के महागाई भत्ता आता ३४ टक्के दराने मिळणार आहे.सुमारे १५ कोटी रुपयांची मासिक वाढ वेतनखर्चात होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणेच्या प्रस्तावास देखील यावेळी मंजुरी देण्यात आली.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

 

राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान.. राज्य सरकारने घेतला निर्णय


मुंबई :राज्यात विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 60 हजार शिक्षकांना होणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात सांगितल्याप्रमाणे, 20 ते 40 टक्के आणि 40 ते 60 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान याचा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी संगीतले.

अशातच पात्रता पूर्ण न करु शकलेल्या संस्थांना यातून वगळण्यात येईल. त्या शाळांव्यतिरिक्त सर्वच्या सर्व शाळांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जवळपास 1 हजार 160 कोटी रुपयांचे हे पॅकेज शिक्षकांसाठी जाहीर करत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दरम्यान ज्यांनी या अनुदासाठी मागणी केली नव्हती त्यांनाही या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

सौरकृषी वाहिनी योजनेत लागणार्‍या जागेसाठी शेतकर्‍यांना मिळणार हेक्टरी ७५००० रुपये मोबदला…

Agriculture Related News: शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीज मिळावी, या हेतूने प्रारंभ करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने” साठी  लागणार्‍या जागेसाठी शेतकर्‍यांना मोबदला  देण्यात येणार आहे.प्रतिहेक्टर प्रतिवर्ष ₹75,000 इतके हे भाडे असेल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सदर योजना दिनांक १४ जून,२०१७ च्या शासन निर्णयान्वे हि योजना संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे. ह्या योजनेसाठी लागणारी खाजगी जमीन महावितरण/महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपडट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या शासन परिपत्रकात नमूद केलेल्या ६ टक्के दरानुसार परागिणीत केलेला दर किंवा प्रतिवर्ष रु. ७५०००/- प्रति हेक्टर यापैकी जी जास्त रक्कम असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टीचा दर निश्चित करण्यात येणार आहे. तसेच प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (base rate ) प्रत्येक वर्षी ३ टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्यात येणार आहे. 
ह्या योजनेसाठी लागणाऱ्या जागेची निवड महावितरण/महानिर्मिती/महाऊर्जा करेल आणि त्यांचा समावेश निविदा प्रक्रियेत करण्यात येईल. या निविदांमध्ये यशस्वी झालेल्या  जमीनमालकांसोबत महावितरण/महानिर्मिती/महाऊर्जा एक करार करेल. त्या करारानुसार हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत आणि कार्यान्वित झाल्यानंतर करारात ठरलेल्या रक्कमेचे भाडे जमीनमालकाला भेटणार आहे. 
ह्या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ३०% कृषी वाहिन्या ह्या सौर उर्जेवर आणण्याबाबतचे निश्चित केलेले उद्धिष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जमीन उपलब्ध करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी   प्रत्येक जिल्ह्यात समिती गठीत करण्यात आलेली आहे.
 
ज्या जमीनमालकांना आपली जमीन ह्या योजनेसाठी भाडेपट्टीवर द्यायची आहे त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येईल
https://mahadiscom.in/solar-mskvy/

प्लेस्टोर वरून ‘हे’ ॲप चुकूनही डाउनलोड करू नका,होऊ शकते फसवणूक, मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई :आपल्या मोबाईलवर कोणतेही ॲप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. खासकरून विश्वासार्ह स्रोत नसणारी ॲप डाउनलोड करू नयेत असे त्यांनी सांगितले आहे.
हि ॲप डाउनलोड केल्यास आपल्या मोबाईल मधील महत्वाच्या माहितीचा वापर केला जाऊन आपली फसवणूक होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या मोबाईल मधील फोटो एडिट करून त्याद्वारे ब्लॅकमेल केले जाऊ शकते. 
‘इन्स्टंट लोन ॲप’ हे ऍप्लिकेशन डाऊनलोड  केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो, त्यामुळे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये असे  सांगण्यात आलेले आहे. 
त्याचबरोबर इतर ॲप डाऊनलोड करताना स्त्रोताची विश्वासार्हता तपासा आवाहन करण्यात आलेले आहे. 

‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्र राज्याने गमावला? प्रशासनाकडून दिरंगाई.

नागपूर :वेदांता, ‘टाटा-एअरबस’ हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर  आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे.

सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

राज्यातील नोव्हेंबर महिन्यात होणारी पोलीस भरती स्थगित ….

मुंबई: पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्यासाठी नोव्हेंबर मध्ये होणारी भरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे.

हि पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले होते. ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.


सदर भरती प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे अशा आशयाचे एक माहितीपत्रक पोलीस महासंचालकांच्या वतीने काढण्यात आलेले आहे.

 

Related : महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या 

महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या 

मुंबई : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले आहे.
ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले  आहेत.
जिल्ह्यानुसार खालील प्रवर्गात पदे भरण्यात येतील असे जाहीर करण्यात आलेले आहे. 
j

राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र, म्हणाले “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे पत्र आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 
काय लिहिले आहे या पत्रात?
“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.

दिवाळीसाठी MSRTC च्या १४९४ ज्यादा बसेस.. जाणून घ्या कोणत्या विभागात किती बसेस.

मुंबई :यंदा एसटी महामंडळाने दिवाळी सुट्ट्यांमध्ये एसटीच्या जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त १४९४ जादा बसेस सोडणार आहे.

 

एसटी बसेसच्या या अधिकच्या फेऱ्या २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान म्हणजे ११ दिवस चालवण्यात येणार आहेत. ही माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील सर्व आगारांना जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

कोणत्या विभागातून किती बस? 

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८,मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

 

बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

5G सिम फ्रॉड संबंधी मुंबई पोलिसांचा Risk Alert जारी.. फसवणूक होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या..

मुंबई : देशात 5G सुरुवात होताच सायबर गुन्हेगार कार्यरत झाले आहेत. ५जी वरून मुंबई सायबर पोलिसांनी एक अलर्ट जारी केला आहे. यासंबंधी  यात म्हटले की, लोकांनी ५जी नेटवर्क संबंधी काही सूचना पाळणे गरजेच्या आहेत.

सायबर पोलिसांनी जी अधिसूचना जारी केली आहे, त्यात म्हटले की, अनेक सायबर गुन्हेगार आता सक्रीय झाले आहेत. त्यांनी ५जी सेवा मिळवणाऱ्या यूजर्सला सिम कार्ड अपग्रेड करण्यासाठी मेसेज करण्याचे काम सुरू केले आहे. मेसेज करून ते यूजर्सकडे ओटीपीची मागणी सुद्धा करीत आहेत. त्यामुळे अनेक जणांच्या बँक खात्यातून पैसे काढले जाण्याची शक्यता आहे.

फ्रॉड करणाऱ्या यूजर्सला एक लिंक पाठवली जाते. ज्यात सिमला अपग्रेड करण्यासाठी यूजर्सला क्लिक करण्यास सांगितले जाते. एकदा लिंक क्लिक केल्यानंतर हॅकर्स पर्सनल माहिती चोरी करण्यासोबतच बँकिंग डिटेल्सला हॅक केले जाते. नंतर पुन्हा मोबाइलला हॅक केले जाते. अनेक यूजर्सला या प्रकारची लिंक पाठवून त्या क्लिक करण्यास भाग पाडले जाते. लिंकला क्लिक केल्यानंतर हॅकिंगचे बळी व्हावे लागते.

5G सिम फ्रॉड पासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्संनी कंपनीचे कस्टमर केअर वर कॉल करावे. किंवा एअरटेलच्या अॅपमधून ५जी कनेक्टिविटी चेक करण्याची प्रोसेस दिली आहे. ती करावी. असे जर केले तर सायबर फ्रॉड पासून सुरक्षित राहता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने भारतात ५जीची सुरुवात केली आहे. त्यानंतर देशातील अनेक शहरात सायबर क्रिमिन्लस याचा गैरफायदा घेत आहेत.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search