Category Archives: देश

ब्रेकिंग: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा

दिल्ली : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.

अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? 

दरम्यान, रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे. 

 

Loading

अर्थसंकल्पामध्ये रेल्वेकरिता भरीव तरतूद…२०१३-१४ च्या तुलनेत नऊपट अधिक वाटप….

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे करिता भरीव तरतूद केल्याची दिसत आहे. २०१३-१४ च्या तुलनेत रेल्वेला नऊ पट अधिक वाटप देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून देशात १०० नव्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली.

रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी करण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख रुपयांच्या तरतुदीमुळे रेल्वेचे पायाभूत प्रकल्प मार्गी लागतील, असं मत रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री आदित्य वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. वंदे भारत रेल्वेत अमुलाग्र बदल होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Loading

महत्वाचे:आजपासून 4 दिवस बँका बंद राहणार

मुंबई :आजपासून 4 दिवस म्हणजे 28 ते 31 जानेवारीपर्यंत बँका बंद राहतील. बँक कर्मचारी 30 आणि 31 जानेवारीला संपावर (Bank Strike) जाणार आहेत. यापूर्वी 28 जानेवारीला महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहणार होत्या. अशा परिस्थितीत लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मात्र, या काळात इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू राहणार आहे. यामुळे लोक पैशाचे व्यवहार करू शकतील.

दोन दिवस संपावर
संपाबाबत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सांगितले की, 30-31 जानेवारी रोजी युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाचा परिणाम त्यांच्या शाखेतील कामगारांवर होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपात देशभरातील बँक शाखा कर्मचारी सहभागी होणार आहेत. ग्राहकांनी त्यांचे शाखेशी संबंधित काम अगोदरच निकाली काढले तर बरे होईल.

संपूर्ण देशात संप
SBI ने सांगितले की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने कळवले आहे की युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने UFBU शी संबंधित संघटनांना म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA इत्यादींना संपाची नोटीस जारी केली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या
एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या आहेत. बँकिंग वर्किंग कल्चरमध्ये सुधारणा करा, बँकिंग पेन्शन अपडेट करा, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) रद्द करा, पगारात सुधारणा करा आणि सर्व कॅडरमध्ये भरती करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

Loading

परमवीरांचा सन्मान! अंदमान – निकोबार येथील बेटांना ‘या’ परमवीरचक्र विजेत्यांची नावे

देशातील बातम्या | आजच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६वी जयंतीनिमित्त  दक्षिण अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यादरम्यान, अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे नामकरण करण्यात आले. या बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवण्यात आली.

(Also Read>कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!)

सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हे बेटे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील. अंदमानच्या या भूमीवर पहिल्यांदाच मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीमधून अपार वेदनांसह ऐकू येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाहीच्या स्तंभासमोरील ‘कर्तव्य पथ’येथील नेताजींचे स्मारक आपणांस आपल्या कर्तव्यांची आठवण करुन देतो. तसेच, वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज २१ बेटांना नावे देण्यात आली, त्यातून अनेक संदेश मिळणार आहेत. हा संदेश ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा असून, आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याचा आहे.”

 

खालील बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत. 

 

 

 

Loading

निर्दियीपणाचा कळस….भर रस्त्यात टू व्हीलरवरुन फरफटत नेण्याचा प्रकार…

देशातील बातम्या :भर रस्त्यातून टू व्हीलरवरुन एकाला फरफटत नेण्याचा प्रकार बंगलोर मधील मागाडी रोडवर घडला आहे.

नागरिकांच्या मध्यस्थीमुळे हा प्रकार थांबविण्यात आला आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले गेले आहे. तसेच ह्या प्रकारात जखमी झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading

घाबरून जाऊ नका! अशा लाटेंविरुद्ध लढण्याचा आपल्याला ३ वर्षाचा अनुभव… केंदीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली :चीन, आणि इतर देशांमध्ये कोरोनाची वाढत्या पार्श्वभूमीवर. आजच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियायांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यासोबत एक बैठक घेतली आहे.

या बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे.

राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, टेस्टिंग, उपचार आणि ट्रेसिंग यांच्यावर अधिक जोर देण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यातील सर्व नागरीकांनी प्रिकॉशनरी म्हणजेच बूस्टर डोस घ्यावा, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

ह्या बैठकीनंतर केंदीय आरोग्यमंत्र्यांनी एक ट्विट पोस्ट केले आहे. आपण सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्याकडे ३ वर्षाचा अशा लाटे विरुद्ध लढण्याचा अनुभव आहे. केंद सरकारकडून ह्या लढ्याकरिता राज्यांना पूर्ण सहाय्यता केली जाईल. तसेच भविष्यातील परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेतले जातील.

Loading

कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचे भारतात 3 रुग्ण

BF7 Variant Threat :चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे व्हेरियंटचे 3 रुग्ण भारतात आढळल्याची बातमी NDTV वृत्तवाहिनीने PTI वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली.भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल एक बैठक घेतली आणि जगातील अनेक देशांमध्ये सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

   Follow us on        

मांडविया म्हणाले, काही देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पाहाता आज तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोव्हिड अद्याप संपलेला नाही. या संदर्भातील सर्व घटकांना सतर्क राहून लक्ष ठेवण्याचे आदेश मी दिले आहेत. कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही तयार आहोत

Loading

चलनी नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो- अरविंद केजरीवाल यांची मागणी; इंडोनेशियातील चलनी नोटेचे दिले उदाहरण

दिल्ली : चलनी नोटेवर महात्मा गांधींसोबत गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा अशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारला विनंती केली आहे. केजरीवाल यांच्या या मागणीमुळे केजरीवाल यांच्या भूमिकेविषयी चर्चेला उधाण आलेले आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्शवभीमीवर केजरीवाल यांनी हि मागणी केल्याचे बोलले जात आहे .  
आपल्या मागणीचं समर्थन करताना केजरीवाल यांनी इंडोनेशियातल्या चलनी नोटेचे उदाहरण दिलं आहे. इंडोनेशियामध्ये जवळपास 85 टक्के मुस्लिम केवळ दोन टक्के हिंदू पण गणपतीची प्रतिमा नोटेवर- केजरीवाल इंडोनेशियाचे स्वातंत्र्य सेनानी Ki Hajar Dewantara यांच्या फोटो शेजारी हिंदू देवता गणपती चा फोटो आहे. 

Loading

काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा विजय

काँग्रेस अध्यक्ष निवडणूक :काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.9,385 सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी 416 मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना 7897 एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली.

तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम  सीताराम केसरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते.शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खरगे यांचं अभिनंदन केलं आहे.

नाव सन
1 पट्टाभी सीतारामय्या 1948-1949
2 पुरुषोत्तम दास टंडन 1950
3 इंदिरा गांधी 1959, 1966-67, 1978-84
4 नीलम संजीव रेड्डी 1960-1963
5 के कामराज 1964-1967
6 एस सिद्धवनल्ली निजलिंगप्पा 1968-1969
7 जगजीवन राम 1970-1971
8 शंकरदयाल शर्मा 1972-1974
9 देवकांत बरुआ 1975-1977
10 पी.व्ही. नरसिंह राव 1992-96
11 सीताराम केसरी 1996-1998
12 सोनिया गांधी 1998-2017 आणि 2019
13 राहुल गांधी 2017-2019

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या काँग्रेसच्या अध्यक्षांची यादी

Loading

दिलदार मालक… दिवाळी बोनस म्हणुन कर्मचाऱ्यांना चक्क बाइक आणि कार देणार

तामिळनाडू : दिवाळी आली की नोकरदार वर्गाला उत्सुकता असते ती बोनसची. दिवाळीत एक किंवा दीड अतिरिक्त पगार बहुतेक ठिकाणी दिला जातो. पण काही मालक एवढे दिलदार असतात की ते ह्यापुढे जाऊन आपल्या कर्मचार्‍यांना खुश करारात. अशाच एका मालकाने या वर्षाच्या दिवाळीला आपल्या कर्मचार्‍यांना चक्क कार आणि बाईक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडू येथील या जयंती लाल  चयांति  या ज्वेलरी शॉप मालकाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने 20 मोटर बाईक्स आणि 10 कार खरेदी केल्या आहेत. ह्या सर्वाचा खर्च 1 कोटी पेक्षा जास्त होणार आहे.

 

“ह्या सर्व कर्मचार्‍यांनी मला माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेत साथ दिली आहे. ह्या भेटीने त्यांना प्रोत्साहन भेटेल” असे जयंती यांचे म्हणने आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search