Category Archives: सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यात दूध डेअरी आगीत भस्मासात; ३५ लाखांचे नुकसान

कुडाळ:साळगाव- वरची धुरीवाडी येथील अभिषेक सत्यवान धुरी यांच्या मालकीच्या गोपाळ गंगा दूध डेअरीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत आतील मशिनरी व दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्य साहित्य . मिळून सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली. अभिषेक धुरी यांनी तीन वर्षांपूर्वी साळगाव- वरची धुरीवाडी येथे ‘गोपाळ गंगा’ नावाने दूध डेअरी सुरू केली. २४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यातील मशिनरीच्या भागातून धूर येऊन आग लागली असल्याचे तेथीलच संजय धुरी यांनी पाहिले. त्यांनी लागलीच अभिषेक धुरी यांना त्याबाबत कल्पना दिली. त्यानंतर मालक धुरी यांच्यासह संजय धुरी, शशी धुरी, प्रसाद परुळेकर, जेरॉन फर्नांडिस व अन्य ग्रामस्थांनी धाव घेत डेअरीमध्ये असलेल्या पाण्याचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सतत पाण्याचा मारा करून ही आग मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत आतील किमती मशिनरी व साठवून ठेपलेले दुग्धजन्य पदार्थ जळून खाक झाले. यामध्ये सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाल्याचे कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत धुरी यांनी म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी दसरा सण असल्याने डेअरी बंद होती. रात्रीच्या वेळी घटना घडली. शेजारच्या व्यक्तींनी डेअरीला आग लागली असल्याचे सांगितले. या घटनेत २ हजार ७०० किलोचा तुपाचा साठा, मिल्क टेस्टिंग मशीन, मिल्क पॅकिंग मशीन, पॅकेजिंग मटेरिअल, होमोनायझर, मिल्क पाऊच पॅकिंग मशीन, मशीनच्या मोटर्स आदी सुमारे ३५ लाखांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता धुरी यांनी व्यक्त केली. कुडाळचे पोलीस हवालदार सचिन गवस व अमोल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास हवालदार ममता जाधव करीत आहेत.

Loading

बांदा : दसरा सणाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर दिले व्यसनमुक्तीचे संदेश

बांदा : शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे महाराष्ट्र शासनामार्फत बालवयातच देण्यात येत असून विद्यार्थ्यांकरवी अनेक अनेक कुटुंबे व्यसनमुक्तीही बनविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दसरा सणाच्या निमित्ताने बांदा शाळेतील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर ‘व्यसनमुक्त भारत ,सदृढ भारत’ “तंबाखू सोडा, कर्करोग टाळा” “तंबाखूचा घास, जीवनाचा नाश” अशा प्रकारच्या घोषणा लिहून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली.या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र शासनामार्फत तंबाखूमुक्त शाळा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी शाळा महाविद्यालये यामध्ये चालू आहे.या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक शाळा तंबाखू मुक्त शाळा जाहीर झाल्या आहेत .

Loading

मसुरे: विहिरीत पडून १४ रानटी डुकरांचा मृत्यू

मसुरे : कठडा नसलेल्या विहिरीत १४ रानटी डुकरे पडून मृत पावल्याची दुर्दैवी घटना मसुरे तीळ मार्गाचीतड येथे घडली आहे. ही घटना आज सकाळी परिसरात दुर्गंधी परसरल्याने उघडकीस आली. या घटनेबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याच विहिरीत त्या मृत डुकरांचे दफन करण्यात आले.
येथील सुषमा परब आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची कठडा नसलेली विहीर येथे बिनवापरात आहे. या परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने येथील स्थानिकांनी नक्की दुर्गंधी कुठून  येत आहे याची  शोधा शोध सुरु केल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. 

Loading

सावंतवाडी: माडखोल व कारिवडे येथील चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित

सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Loading

पुण्यात गोवन दारूचा मोठा साठा जप्त; आरोपींमध्ये सिंधुदुर्गातील दोघेजण

पुणे: राज्य उत्पादन शुल्क पथक क्रमांक 1 ने आज पुण्यातील कात्रज परिसरात एका लक्झरी बसमधून गोव्याच्या  दारूचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे. या कारवाईत अवैध धंद्यात गुंतलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध धंद्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस.एल. पाटील यांच्या पथकाने जुना पुणे-सातारा रोडवरील कात्रज परिसरात गस्त घालत असताना भारत पेट्रोल पंपासमोर सहा चाकी लक्झरी बस अडवल्या.
तपासणी केल्यावर, त्यांना बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या 180 सील न केलेल्या बाटल्या (15 बॉक्स) सापडल्या, हा ब्रँड महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे परंतु गोव्यात कायदेशीर आहे. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे.
गणेश बाळकृष्ण चव्हाण (वय 50, रा. सिंधुदुर्ग), अक्षय अनंत जाधव (वय 32, रा. नालासोपारा पश्चिम) आणि उमेश सीताराम चव्हाण (वय 37 रा . सिंधुदुर्ग) तिघांनाही ताब्यात घेण्यात आले

Loading

एसटीची मुंबई ते बांदा स्लीपर बससेवा आजपासून सुरु; वेळापत्रक, थांबे आणि तिकीटदर येथे जाणून घ्या.

मुंबई : एसटीची मुंबई ते बांदा अशी नवीन शयनयान बस सेवा आजपासून म्हणजे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे. ही गाडी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मुंबई सेंट्रल या स्थानकावरून सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ती बांदा या ठिकाणी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ती बांदा शहरातून संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून ती मुंबई सेंट्रलला ९ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल 
ही गाडी मुंबई गोवा महामार्गावरून न चालविता पुणे सातारा मार्गे चालविण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील फक्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 
मुंबई ते बांदा या मार्गावरील प्रवासासाठी 1246 रुपये तिकीट दर असणार आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला प्रवाशांसाठी असलेल्या तिकीट सवलती या विना वातानुकूलीत शयनयान बसला देखील लागू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल – बोरीवली – बांदा या मार्गावर ही शयनयान बसस धावणार आहे. त्यानंतर गोव्यातील पणजीपर्यंत या बसेचा विस्तार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पन्नास विना वातानुकूलित शयनयान बसेस ( sleeper coach ) येणार आहेत.
या गाडीचे थांबे
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Bus-Stops.pdf” title=”__ MSRTC __ Bus Stops”]
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Stops2.pdf” title=”__ MSRTC __ Stops2″]

Loading

तळकोकणातील उद्योजकांसाठी महत्वाची बातमी; आडाळी एमआयडीसीमधील १९० भूखंड विक्रीसाठी उपलब्ध. असा करा अर्ज

सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील आणखी १९० भूखंड (एकूण क्षेत्र १२१.१५ हेक्टर) दुसऱ्या टप्प्यात उद्योजकांसाठी खुले झाले आहेत. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आडाळी येथील एमआयडीसी स्थानिक कृती समिती आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संचालित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर डिसेंबर २०२२मध्ये २२० भुखंड पहिल्या टप्प्यात खुले करण्यात आले होते, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली आहे.

लळीत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड खुले व्हावेत, यासाठी आमच्याबरोबरच अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आता यश आले आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठ्यासाठी बंधारा, पाण्याची टाकी, पाईपलाईन आदि सर्व कामे पूर्ण झाली आहेत. भूखंड उद्योजकांना तात्काळ उपलब्ध करावेत, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आडाळीतील ग्रामस्थांनी आडाळी एमआयडीसी स्थानिक कृती समिती स्थापन केली.

तसेच ‘घुंगुरकाठी’ संस्थेने आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती स्थापन केली. समितीच्या पाठपुराव्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होऊन उद्योजकांनी अर्जाची प्रक्रीया पूर्ण केली. तरीही प्रत्यक्षात भूखंडाचे वितरण दीर्घकाळ होत नव्हते. महामंडळाकडुन या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने अलिकडेच समितीमार्फत आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भूखंड वितरणाचे आदेश काढण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात एकुण १२१.१५ हेक्टर क्षेत्र असलेले विविध आकाराचे एकूण १९० भूखंड वितरणासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे भूखंड महामंडळाच्या
धोरणाप्रमाणे सामान्य (खुले), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व राखीवसह आहेत.

या भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असून www.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची मुदत ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५या वेळात फोन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकेल. आडाळी येथे एकुण ७२० एकर क्षेत्रामध्ये हे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या या प्रकल्पाला सप्टेंबर २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी स्थानिकांचे सकारात्मक सहकार्य होते. अवघ्या वर्षभरात ८० टक्केहुन अधिक क्षेत्र स्थानिकांनी महामंडळाकडे हस्तांतरित केले. मात्र आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्राचे तत्कालिन उद्योगमंत्री व सद्याचे केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे दिला आणि त्यांनी अवघ्या सहा महिन्यात तो मार्गी लावला.

आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करुन आवश्यक असलेली जमीन महामंडळाला दिली. जमीन खरेदीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर महामंडळाने निविदा प्रक्रीया करुन पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात केली. सुमारे नऊ वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर या औद्योगिक क्षेत्राच्या पायाभुत सुविधांची कामे आता पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत.

Loading

चाकरमन्यांच्या मदतीसाठी एसटी पुढे सरसावली; सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली येथून मुंबईसाठी विशेष गाड्या

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकडे जणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ पुढे सरसारवले आहे. सिंधुदुर्गातून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 6 बसेस या रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मधून 2, कणकवलीतुन 3, कुडाळमधून 1 अशा सहा गाड्या या 4:30 ला रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
अनेक भाविक गणेशविसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र काल पनवेल नजीक मालगाडीचे डबे घसरून अपघातामुळे कोकणरेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक पूर्ण बिघडले आहे. जे रेल्वे प्रवासी तिकीट कॅन्सल करतील त्यांना रेल्वे स्थानकामध्ये बस उपलब्ध व्हावी यासाठी ही एसटीने सेवा दिली असल्याचे समजत आहे.

Loading

आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Alert :आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या दिनांक 01 ऑक्टोबर रोजी कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.मॉन्सूनची परतीची सीमा कायम असून, दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

आज आणि उद्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर या भागात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर सातारा, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading

Kankavali: टेम्पो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक ठार

कणकवली : तालुक्यातील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड नजीक आज पहाटे एका टेम्पो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात टेम्पो रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

सदरचा टेम्पो फळे घेऊन कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताचे कारण समजले नसले तरी टेम्पो उलटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्या फळ व्यावसायिकाच्या मृत्यूची माहिती कळताच कणकवली शहरातील बहुसंख्य फळ व्यावसायिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search