Category Archives: सिंधुदुर्ग

कुणकेश्वर जत्रेसाठी एसटीच्या १७ फेब्रुवारीला विशेष फेऱ्या

मुंबई :दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर दिनांक १८ फेब्रुवारीला होणाऱ्या प्रसिद्ध जत्रेसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथून संध्याकाळी ६ वाजता एक विशेष बस सुटणार आहे. ही गाईड सायन – पनवेल मार्गे चालवण्यात येणार आहे. तसेच कल्याण-विठ्ठलवाडी येथून त्याच दिवशी ६.३० ला एक गाडी या जत्रेसाठी सोडण्यात येणार आहे.

दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षॉंनी कुणकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.

Loading

वेंगुर्ला येथे साकारलेला कोकणातील पहिला झुलता पूल ठरतो आहे पर्यटकांसाठी आकर्षण….

सिंधुदुर्ग :कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा आणि मांडवी खाडी यांच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच  हे झुलते पूल (Sea Link ) पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटक येथे सेल्फि, फोटोग्राफी आणि प्रि-वेडींग फोटोशूट साठी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.

या पुलामुळे समुद्र किनार्‍यावर जाणे सोपे होणार आहे. याआधी ईथे जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर वळसा घालावा लागत होता. पुलामुळे आता अवघ्या 5 मिनिटांत समुद्रकिनारी जाणे आता शक्य होणार आहे.

तत्कालीन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी केसरकर यांच्या ‘समृद्ध कोकण’ या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याचे काम बरीच वर्षे रखडले होते. त्यावरून अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यावर वारंवार टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्याचे मंत्री शालेय मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणून हा पूल पूर्णत्वास नेला आहे. अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलते पूल असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. वेंगुर्ल्यात आल्यानंतर झुलत्या पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह पर्यटकांना होत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने गतिमान विकास होत असून यात हा पूल मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.

 

(Also Read>आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…)

Loading

आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…

   Follow us on        

सिंधुदुर्ग:  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिरपरिसरात मोबाईल नेटवर्क ची समस्या येत होती. ह्या परिसरात कोणत्याच मोबाइल कंपनीचे नेटवर्क पकडत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. ह्या समस्येवर आता उपाय योजना करण्यात आली आहे.

(Also Read > सिंधुदुर्ग जिल्हा हवाईमार्गाने हैद्राबाद व म्हैसूर शहरांशी जोडला जाणार.. जाणून घ्या वेळापत्रक आणि प्रवासभाडे )

या परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मालवण तालुक्या तील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावक-यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचाही समावेश असतो. पंरतू, आंगणेवाडी परिसरात गेलीअनेक वर्षे मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, त्यांचा हिरेमोड होत असे. त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल जत्रेच्या दरम्यान उपलब्ध राहणार आहेत.

या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

 

Loading

आंबोलीत घातपाताची विचित्र घटना… मृतदेहाची विल्हेवाट लावताना एकाचा मृत्यू

 

सिंधुदुर्ग : एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीत आलेल्या व्यक्तिचा त्या मृतदेहासोबत दरीत पडून मृत्यू झाल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की कराड येथील एका विट व्यावसायिकाने एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला  व्यावसायिकाने एका मित्राच्या मदतीने मारहाण केली. या मारहाणी दरम्यान त्या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो व्यावसायिक आणि त्याचा मित्राने सरळ आंबोली गाठली आणि मृतदेह एका खोल दरीत टाकायचे ठरवले. पण तो मृतदेह दरीत टाकताना त्या व्यावसायिकाचा पाय घसरला आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  व्यावसायिकचा मित्र आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही मृतदेह पण सापडले आहेत. मारहाणी दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमूळे न होता हार्ट अ‍ॅटॅक मुळे झाला असल्याचेही त्याने सांगितले. नेमकी घटना काय आहे ह्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा हवाईमार्गाने हैद्राबाद व म्हैसूर शहरांशी जोडला जाणार.. जाणून घ्या वेळापत्रक आणि प्रवासभाडे

सिंधदुर्ग :दिनांक 1 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग विमानतळावरून पहिल्यांदा राज्याबाहेरील विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे. देशातील दोन महत्त्वाच्या शहरांसोबत सिंधुदुर्ग जोडला जाणार आहे. मुंबई- सिंधुदुर्ग-मुंबई ही सेवा देणार्‍या अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैदराबाद-मैसूर-सिंधुदुर्ग-मैसूर- हैदराबाद या दुसर्‍या विमानसेवेचा प्रारंभ होत आहे. 

सुरवातीला दर बुधवारी  आणि रविवारी अशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा उपलब्ध असेल. या सेवेच्या प्रारंभाने  सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैद्राबाद आणि दक्षिणेस मैसूर या देशातील अत्यंत  महत्वाच्या  शहराशी विमानसेवेने जोडला जाणार आहे .अशी माहिती आयआरबी कंपनीच्या प्रसिद्ध विभागातून देण्यात  आली.

वेळापत्रक

शहर  HYD -SDW SDW – HYD
हैदराबाद 13:40 21:55
म्हैसूर 16:00 19:30
सिंधुदुर्ग 17:30 18:00

 

प्रवास मार्ग  प्रवास भाडे 
सिंधुदुर्ग – हैदराबाद 4,613.00
हैदराबाद – सिंधुदुर्ग 6,158.00

 

प्रवास मार्ग  प्रवास भाडे 
सिंधुदुर्ग – म्हैसूर 2,513.00
म्हैसूर – सिंधुदुर्ग 3,353.00

Note : The information given above is indicative.

कोकणातल्या प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

Loading

सावंतवाडीत सापडलेल्या ‘त्या’ बैलाला प्रतीक्षा आहे मालकाची….

 कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्‍याच क्षणी त्याचा हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : हल्लीच सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे गावात एक बैल सापडला आहे. या बैलाच्या पाठीवर व्यंग असलेला पाचवा पाय असल्यामुळे हा बैल विशेष चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यालगतच्या कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोक देवाचा बैल (पांगुळ बैल) घेऊन कोकणात आपल्या उपजीविकेसाठी येतात अशापैकी कोणाच्या मालकीचा हा बैल असून त्याची मालकाबरोबर ताटातूट झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 
हा बैल कारिवडे येथील ग्रामस्थ संजय जाधव यांच्या घरी बांधून ठेवण्यात आलेला आहे. या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था समाजसेवक आणि माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर तसेच रवी परब व इतर ग्रामस्थांनी केली आहे. बैल सापडल्याची बातमी त्यांनी पत्रकारांना देऊन या बैलाच्या मालकाने संपर्क साधून तो घेऊन जावा असे आवाहन केले होते. पण १० ते १२ दिवस उलटले तरी अजून या बैलाच्या मालकाचा पत्ता लागला नाही आहे. 
सर्वात मोठी समस्या म्हणजे हा बैल येथील ओली चार आणि सुके गवत किंवा पेंड खात नाही. त्याला लागणारा चारा येथील आजूबाजूच्या गावी सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तो मालवण तालुक्यातील धामापूर येथून तो आणावा लागतो. कारिवडे ते धामापूर हे अंतर जवळ जवळ ४० किमी आहे. चारा जास्त दिवस टिकत नसल्याने दर २ दिवसांनी तो आणावा लागतो. दुसरे म्हणजे या बैलाला असे सोडून देऊ शकत नाही कारण त्याची उपासमार होईल. पुढील काही महिने येथील नद्यांचे पाणी पण आटते त्यामुळे पाणीपण त्याला भेटणार नाही. 
कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्‍याच क्षणी हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात. प्राण्यांना भावना असतात हे ऐकण्यात आले होते पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती येथील ग्रामस्थ घेत आहेत. 
 कारिवडे गावचे  मंगेश तळवणेकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी या बैलाला असाच वाऱ्यावर न सोडता त्याची जबाबदारी घेऊन भूतदया आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 
ही बातमी सर्वदूर पोहचवा जेणेकरून मूळ मालकापर्यंत हि बातमी पोहोचेल आणि आणि या बैलाची त्याच्या मालकाशी भेट होईल. जो कोणी मालक असेल त्यांनी ९४२१२६९४४४ या नंबरवर संपर्क साधावा. इथे येऊन ओळख पटल्यानंतरच हा बैल सुपूर्त करण्यात येईल. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च करण्यात येईल असे मंगेश तळवणेकर म्हणाले आहेत. 
   

Loading

मालवणात पहाटे आगीचा थरार.. २ दुकाने जळून खाक..

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लागत असलेल्या दुकानांपैकी दोन दुकांनाना आज पहाटे आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही पण आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबतची माहिती अशी- धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लगत अनेक दुकाने आहेत. यातील विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरुस्ती व विक्रीचे एक दुकान असून त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना ही आग लागल्याचे दिसून येताच त्यांनी अन्य लोकांशी संपर्क साधत याची माहिती दिली. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंब ही दाखल झाला. यात दुकानातील नव्या व जुन्या अशा एकूण १२ ते १५ मशीन तसेच फर्निचरसह संपूर्ण दुकानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळून खाक झाले. यात मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे हे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. तेही जळून नुकसान झाले.

(Also Read >कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)

दुकान मालक, स्थानिक नागरिक तसेच मंदार केणी, महेश सारंग, राजू बिडये, भाई कासवकर यासह अन्य नागरिक, नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. मात्र दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुकानांना लागूनच अन्य काही दुकाने आहेत. त्यांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गंगाराम कोकरे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील प्रक्रिया महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सुरू होती.

Loading

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा २ फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी । प्रतिनिधी : तळकोकणातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,महाराष्ट्र व गोवा राज्यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी येथील ३६५ खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार २ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो.यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
होणारे कार्य्रक्रम 
सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद,नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे.
कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.

Loading

सावंतवाडी येथील मोतीतलावात पुन्हा पाणमांजराचे दर्शन

फोटो – संग्रहित
सिंधुदुर्ग। प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात अचानकपणे पुन्हा पाणमांजरे दाखल झाली आहेत. शनिवारी रात्री ही पाणमांजरे निदर्शनास आली. चार ते पाच पाणमांजरे काही नागरीकांना दिसून आली आहेत. मोती तलावाच्या कठड्याच्या बांधकामांमुळे तलावाचे पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामूळे माशांच्या शोधात ही मांजरे कमी पाण्यात फिरत असावीत असे प्राणी तज्ञांचे मत आहे.
सावंतवाडीतील तलावात पाणमांजरे असावीत कि नसावीत ह्यावर दोन विरुद्ध मतप्रवाह येथील नागरिकांमध्ये आहेत.  पाणमांजर ही प्रजाती पाणी आणि जमिनीवर राहते, ती लाजाळू असून मासे, खेकडे यावर आपली गुजराण करते. त्यामुळे अनेकांनी तलावात सोडण्यात येणारे मत्स्यबीज, मासे खाऊन फस्त करतील अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर प्राणिमित्रांनीही ही निसर्ग साखळी असल्याने ती तोडू नये असंही मत व्यक्त केलं. काही प्राणी मित्रांनी अतिशय चांगले मत नोंदवताना, “शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने पोषक असेल त्यासाठी पाणमांजरांचे संवर्धन करावे, जेणेकरून नामशेष होत चाललेली ही प्रजाती सावंतवाडीतील तलावात दिसत असल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावात स्थिरावलेली पाणमांजरे हा कुतूहलाचा विषय असेल, आणि त्यांना पाहण्या साठी, त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक येथे थांबतील” असेही सांगितले. तर एका प्राणिमित्राने भारतीय उपखंडातील नष्ट होत चाललेल्या पाणमांजरांचे अस्तित्व सावंतवाडी च्या सुप्रसिद्ध मोती तलावात असणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. पाणमांजरे ही पर्यावरण पूरक पर्यटनाची संधी असल्याचंही मत प्राणिमित्रांनी व्यक्त केलं आहे

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा वावर…..

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी रमाईनगर परिसरात काल काळ्या Black Panther वाघाचे दर्शन घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल येथील ग्रामस्थ गुरू परब आपल्या शेतात जात असताना त्यांना हा दुर्मिळ जातीचा काळा वाघ दिसला.

गेल्या वर्षी कुडाळ तालुक्यातील गोवारी ह्या गावात काळ्या वाघाचा सव्वा वर्षाचा बछडा एका विहिरीत सापडला होता. सावंतवाडी तालुक्यात या आधी पण ब्लॅक पँथर दिसून आल्याने ह्या जातीच्या वाघाचे अस्तित्त्व परिसरात निश्चित झाले आहे.

कुडाळ येथील गोवारी गावात सापडलेला काळ्या वाघाचा बछडा

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search