Category Archives: कोकण

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत १२ जानेवारीपासून बदल

   Follow us on        

​ठाणे: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची हक्काची गाडी असलेल्या ‘दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने एक बदल केला आहे. रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या वेळापत्रकानुसार या गाडीची वेळ आता ‘प्रीपोन’ म्हणजेच नियमित वेळेच्या काही मिनिटे आधी करण्यात आली आहे. हे सुधारित बदल १० जानेवारी २०२६ ऐवजी १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.

​नव्या बदलांनुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता दिवा स्थानकावरून पूर्वीच्या वेळेपेक्षा साधारण १० ते १५ मिनिटे लवकर सुटेल. रोहा स्थानकावर ही गाडी सध्या सकाळी ०९:०० वाजता पोहोचत होती, ती आता सकाळी ०८:५० वाजता पोहोचेल आणि ०८:५५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, ही गाडी रोहा स्थानकावर संध्याकाळी ५:२० ऐवजी ५:०५ वाजता पोहोचेल.

Loading

मोठी बातमी! पश्चिम घाट बचाव मोहिमेचे प्रणेते, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन

   Follow us on        

पुणे: भारताच्या पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पश्चिम घाट बचाव मोहिमेचे प्रणेते, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांचे काल रात्री पुणे येथे निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी पर्यावरण संरक्षण, संशोधन आणि लोकचळवळींना दिशा देण्याचे काम केले.

​डॉ. गाडगीळ यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ई. ओ. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण केले होते. परदेशात संधी उपलब्ध असूनही, त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. आधुनिक विज्ञानाची सांगड त्यांनी भारतातील पारंपारिक ज्ञान प्रणालींशी घातली. विशेषतः जैवविविधता संवर्धनासाठी त्यांनी स्थानिक समुदायांच्या सहभागावर नेहमीच भर दिला.

​डॉ. गाडगीळ यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे:

​सायलेंट व्हॅली आंदोलन: ७०-८० च्या दशकात सायलेंट व्हॅली वाचवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​बस्तर वनरक्षण: ८० च्या दशकात बस्तरमधील जंगलांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेले हस्तक्षेप निर्णायक ठरले.

​संस्थात्मक बांधणी: त्यांनी ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ आणि ‘झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थांना नवीन दिशा दिली.

​गाडगीळ समिती अहवाल: २०११ मध्ये त्यांनी सादर केलेला पश्चिम घाट पारिस्थितिकी तज्ज्ञ समितीचा (WGEEP) अहवाल हा पर्यावरण रक्षणातील एक मैलाचा दगड मानला जातो. हा अहवाल अत्यंत लोकशाहीवादी आणि संवेदनशील पद्धतीने तयार करण्यात आला होता.

​डॉ. गाडगीळ हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते, तर ते अनेक विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांसाठी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होते. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, “डॉ. गाडगीळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांची विद्वत्ता अफाट होती, पण त्यासोबतच त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि सहानुभूतीपूर्ण होता.”

​त्यांच्या पत्नी सुलक्षणा गाडगीळ या मान्सून अभ्यासक आहेत, तर त्यांचे वडील धनंजयराव गाडगीळ हे भारताचे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते, ज्यातून त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू समोर आले.

​डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने भारताने एक निष्ठावान शास्त्रज्ञ आणि निसर्गाचा खरा रक्षक गमावला आहे. पर्यावरण संतुलन आणि संरक्षणासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांच्या निधनाने पर्यावरणाप्रती कमालीची तळमळ असलेलं नेतृत्व आपण आज गमावलं आहे. कोकण आणि पश्चिम घाटाच्या संरक्षणाबाबत त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पाठोपाठ कोकण रेल्वेच्या अजून दोन गाड्या कायमस्वरूपी मुंबईच्या बाहेर नेण्याचा डाव

   Follow us on        

मुंबई: मुंबईहून कोकण आणि किनारपट्टी कर्नाटककडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्या पुन्हा एकदा पनवेलला ‘शॉर्ट-टर्मिनेट’ करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशाची गैरसोय होत असून रेल्वेच्या दीर्घकालीन हेतूंवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५/१६३४६) आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६१९/१२६२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहेत.

​​मध्य रेल्वेने ‘एलटीटी’ यार्डातील पिट लाईन क्रमांक ३ च्या देखभालीचे कारण देऊन या गाड्या महिनाभर पनवेलला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण विकास समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे ४० दिवस गाड्या रोखण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रवाशांना हळूहळू पनवेल टर्मिनसची सवय लावून या गाड्या कायमस्वरूपी तिथूनच चालवण्याचा घाट घातला जात असल्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पूर्वी रत्नागिरी-दादर पॅसेंजर कोव्हिडचे कारण देऊन तात्पुरत्या काळासाठी दादर ऐवजी दिवा स्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र कोव्हिड काळानंतर ही ट्रेन कायमची दिवा स्थानकावर हलवण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आता तोच प्रकार आता नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बाबतीत तर होणार नाही ना? अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पनवेलला गाडी थांबल्यामुळे वृद्ध, महिला आणि जड सामान असलेल्या प्रवाशांना लोकलने पुढचा प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. खाजगी वाहनांनी प्रवास करताना वेळ आणि पैसा यांचा मोठा फटका बसत आहे.

​कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक व्यावहारिक पर्याय मांडला आहे:

सध्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा गाड्यांचे रेक एलटीटी स्थानकावर उभे करून ठेवावे लागतात. या दोन्ही गाड्यांच्या रेकचे (Rake Linking) एकत्रीकरण करून त्या ‘प्लॅटफॉर्म-रिटर्न’ पद्धतीने चालवाव्यात. यामुळे गाड्यांना बराच वेळ यार्डात उभं राहण्याची गरज उरणार नाही आणि पिट लाईनवरील ताणही कमी होईल.

​समितीच्या प्रमुख मागण्या:

समितीने रेल्वे प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत.

​१. नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या रेक लिंकिंग प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी.

२. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वेची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा.

३. तात्पुरत्या कामांचे कारण देऊन प्रवाशांच्या हक्काच्या मुंबई जोडणीला कायमस्वरूपी सुरुंग लावू नये.

​याप्रश्नी रेल्वे प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

मुंबई | ५ जानेवारी २०२६:

​कोकण रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि मागणी लक्षात घेता, गाडी क्रमांक २२११५ / २२११६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – करमाळी – लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी आता करमाळीऐवजी मडगाव जंक्शन स्थानकापर्यंत धावेल आणि तेथूनच परतीचा प्रवास सुरू करेल.

आठवड्यातुन एकदा धावणार्‍या या गाडीला आता १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या गाडीचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘NTES’ ॲपचा वापर करावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Konkan Tourism: खुशखबर! चिपी विमानतळावर आता ‘नाईट लँडिंग’ होणार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) या विमानतळाला IFR (Instrument Flight Rules) लायसन्स आणि ऑपरेशन्ससाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे आता चिपी विमानतळावर २४x७ म्हणजेच रात्रंदिवस आणि कोणत्याही हवामानात सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

​पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ

​विमानतळाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत:

​पार्किंग क्षमता दुप्पट: विमानांच्या पार्किंगची क्षमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे विमानतळाची कार्यक्षमता आता दुप्पट झाली आहे.

​प्रवासी संख्येत वाढ: एकट्या डिसेंबर महिन्यात तब्बल ११,००० प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आहे. यामुळे देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत सिंधुदुर्ग विमानतळ मानाने स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

​पर्यटन आणि विकासाला चालना

​लवकरच मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. रात्रंदिवस विमान उतरण्याची सोय झाल्यामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, या भागाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

​राजकीय पाठपुराव्याला यश

​या यशामागे लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे नाईट लँडिंगच्या परवानगीसाठी सतत प्रयत्न केले.​ नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या विद्युत पुरवठ्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण मंत्रालयाशी समन्वय साधून प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी विशेष सहकार्य केले.​ या सर्व प्रयत्नांमुळे चिपी विमानतळ आता खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी सज्ज झाले असून, कोकणवासीयांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

Konkan Railway: रत्नागिरीतील विन्हेरे स्थानकावर ब्लॉक; नेत्रावती एक्सप्रेस उशिराने धावणार

   Follow us on        

रत्नागिरी:कोकण रेल्वेमार्गावरील विन्हेरे स्थानकावर पॉईंट क्र. १२० च्या बदल्याचे तांत्रिक काम (NI Block) हाती घेण्यात येणार आहे. ३ जानेवारी २०२६ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या कामामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, नेत्रावती एक्सप्रेस विलंबाने धावणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी दिली आहे.

​गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल खालीलप्रमाणे:

विन्हेरे स्थानकावरील कामामुळे गाडी क्र. १६३४६ (तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस) खालीलप्रमाणे थांबवून (Regulated) चालवण्यात येईल:

​२ जानेवारी २०२६ रोजी सुटणारी गाडी: रत्नागिरी ते खेड दरम्यान ६० मिनिटे थांबवून चालवण्यात येईल.

​३ जानेवारी २०२६ रोजी सुटणारी गाडी: चिपळूण ते खेड दरम्यान ३० मिनिटे थांबवून चालवण्यात येईल.

​४ जानेवारी २०२६ रोजी सुटणारी गाडी: रत्नागिरी ते खेड दरम्यान ९० मिनिटे थांबवून चालवण्यात येईल.

​प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी. तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

Konkan Tourism: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर ‘डिजिटल कवच’

   Follow us on        

सिंधुदुर्ग, २ जानेवारी : कोकण किनारपट्टीवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ‘सचेत’ पोर्टलचा वापर करून पर्यटकांच्या मोबाईलवर थेट खबरदारीचे एसएमएस आणि सूचना पाठवल्या जात आहेत.

हा उपक्रम केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला मान्यता देत हे संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली. ३१ डिसेंबर रोजी अनेक पर्यटकांना हे अलर्ट मिळाले, ज्यामुळे ते अधिक सतर्क झाल्याचे दिसून आले.

पर्यटकांना पाठवल्या जाणाऱ्या मुख्य सूचना अशा :

भरती-ओहोटीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय समुद्रात उतरू नये.

स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

नौकाविहार करताना लाईफ जॅकेटचा वापर अनिवार्य करावा.

अतिगर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

आपत्कालीन मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक १०७७ किंवा ११२ वर संपर्क साधावा.

‘सचेत’ पोर्टलचा आतापर्यंत पूर, चक्रीवादळ किंवा वीज कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या पूर्वसूचनांसाठीच वापर होत होता. मात्र, पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा असा वापर करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

देवबाग पोलिस पाटील भानुदास येरागी म्हणाले, “अशा संदेशांमुळे पर्यटकांमध्ये जनजागृती होते. मनोरंजनाच्या नादात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होतं, पण हे अलर्ट जबाबदारीची जाणीव करून देतात.”

वेंगुर्ले नायब तहसीलदार राजन गवस यांनी सांगितले, “हे संदेश स्थानिक प्रशासनासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. पर्यटक आता समुद्रात उतरताना आवश्यक दक्षता घेत आहेत.”

प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे कोकणातील पर्यटनाला सुरक्षिततेची मजबूत साथ मिळाली आहे. पर्यटकांनी या सूचनांचे पालन करून सुरक्षित सुट्टीचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कासार्डे (सिंधुदुर्ग) येथील कवी ओंकार धुरी यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र (ISO 9001:2015 मानांकन प्राप्त) व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार दिननिमित्त दर्पण रत्न पुरस्कार २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावचे कवी ओंकार धुरी यांना काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दर्पण रत्न पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.

अवघ्या २२ व्या वर्षी कवी ओंकार धुरी यांनी काव्य क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवला असून, लहानपणापासून कविता लेखनाची आवड जोपासत ते सातत्याने लेखन करत आहेत.

मागील वर्षी युवा कला मंच, रायगड आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कासार्डे गावाचे नाव राज्यभर उज्वल केले होते.

त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार २०२६ दि. ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे प्रदान करण्यात येणार आहे.

या सन्मानाबद्दल साहित्य व काव्य क्षेत्रातून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या TOD विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

मुंबई: हिवाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे बोर्डाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) विशेष गाड्यांच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वेने उधना आणि मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे.

​विस्तारित गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​गाडी क्रमांक ०९०५७ उधना – मंगळुरू जंक्शन (UDN–MAJN):

​वार: ही गाडी आठवड्यातून दोनदा (बुधवार आणि रविवार) धावेल.

​वाढवलेला कालावधी: या गाडीचा विस्तार ०४ जानेवारी २०२६ ते २८ जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आला आहे.

​गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन – उधना (MAJN–UDN):

​वार: ही गाडी आठवड्यातून दोनदा (गुरुवार आणि सोमवार) धावेल.

​वाढवलेला कालावधी: या गाडीचा विस्तार ०५ जानेवारी २०२६ ते २९ जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर गाडीचे सविस्तर तपशील तपासून घ्यावेत.

गाडी क्रमांक ०९०५७ उधना – मंगळुरू स्पेशल ट्रेनचे थांबे:

Station Name (Code) Arrival Departure Stop Time Distance Travelled (KM) Loco Reversal
 Gujarat

Day 1

Surat (ST)

Starts

19:40

Starts

0

No

Book Now
Udhna Jn (UDN)

19:55

20:00

5 mins

5

No

Book Now
Valsad (BL)

20:50

20:52

2 mins

69

No

Book Now
Vapi (VAPI)

21:12

21:14

2 mins

93

No

Book Now
 Maharashtra
Palghar (PLG)

22:19

22:21

2 mins

176

No

Book Now
Vasai Road (BSR)

23:10

23:15

5 mins

215

No

Book Now
Bhiwandi Road (BIRD)

23:38

23:40

2 mins

243

No

Book Now

Day 2

Panvel (PNVL)

00:45

00:50

5 mins

283

No

Book Now
Pen (PEN)

01:33

01:35

2 mins

318

No

Book Now
Roha (ROHA)

02:20

02:25

5 mins

360

No

Book Now
Mangaon (MNI)

02:46

02:48

2 mins

402

No

Book Now
Khed (KHED)

03:38

03:40

2 mins

498

No

Book Now
Chiplun (CHI)

03:54

04:04

10 mins

539

No

Book Now
Savarda (SVX)

04:20

04:22

2 mins

565

No

Book Now
Sangmeshwar Road (SGR)

04:42

04:44

2 mins

598

No

Book Now
Ratnagiri (RN)

06:20

06:25

5 mins

645

No

Book Now
Rajapur Road (RAJP)

08:00

08:02

2 mins

734

No

Book Now
Vaibhavwadi Rd (VBW)

08:20

08:22

2 mins

758

No

Book Now
Kankavali (KKW)

09:00

09:02

2 mins

801

No

Book Now
Sindhudurg (SNDD)

09:20

09:22

2 mins

826

No

Book Now
Kudal (KUDL)

09:32

09:34

2 mins

840

No

Book Now
Sawantwadi Road (SWV)

10:10

10:12

2 mins

869

No

Book Now
 Goa
Thivim (THVM)

10:50

10:52

2 mins

915

No

Book Now
Karmali (KRMI)

11:12

11:14

2 mins

939

No

Book Now
Madgaon (Goa) (MAO)

12:20

12:30

10 mins

979

No

Book Now
Cancona (CNO)

13:00

13:02

2 mins

1025

No

Book Now
 Karnataka
Karwar (KAWR)

13:22

13:24

2 mins

1061

No

Book Now
Ankola (ANKL)

13:50

13:52

2 mins

1101

No

Book Now
Gokarna Road (GOK)

14:02

14:04

2 mins

1112

No

Book Now
Kumta (KT)

14:20

14:22

2 mins

1138

No

Book Now
Murdeshwar (MRDW)

15:00

15:02

2 mins

1195

No

Book Now
Bhatkal (BTJL)

15:22

15:24

2 mins

1215

No

Book Now
Byndoor Mookambika Rd (BYNR)

15:42

15:44

2 mins

1237

No

Book Now
Kundapura (KUDA)

16:20

16:22

2 mins

1284

No

Book Now
Udupi (UD)

17:00

17:02

2 mins

1329

No

Book Now
Mulki (MULK)

17:40

17:42

2 mins

1375

No

Book Now
Surathkal (SL)

18:00

18:02

2 mins

1387

No

Book Now
Mangalore Jn (MAJN)

End

00:00

End

1410

No

Book Now

Konkan Railway: एलटीटी यार्डात दुरुस्तीचे काम; कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथील यार्डमधील पिट लाईन क्रमांक ३ च्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी १ जानेवारी २०२६ पासून ३० दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेने कोकण आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या पनवेल स्थानकावर ‘शॉर्ट टर्मिनेट’ आणि तेथूनच ‘शॉर्ट ओरिजिनेट’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

​या बदलाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​पनवेल स्थानकावर समाप्त होणाऱ्या गाड्या (Short Termination):

​१. गाडी क्रमांक १६३४६ (तिरुवनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस):

३१ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत सुटणारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल स्थानकावर प्रवासाचा शेवट करेल. पनवेल ते एलटीटी दरम्यान ही गाडी रद्द राहील.

​२. गाडी क्रमांक १२६२० (मंगळुरू सेंट्रल – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस):

३१ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या दरम्यान सुटणारी ही गाडीचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त होईल. पनवेल ते एलटीटी दरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

​पनवेल स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या (Short Origination):

​१. गाडी क्रमांक १६३४५ (एलटीटी – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस):

२ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या काळात ही गाडी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. एलटीटी ते पनवेल दरम्यानची सेवा रद्द राहील.

​२. गाडी क्रमांक १२६१९ (एलटीटी – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस):

१ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही गाडी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकावरून सुटेल. एलटीटी ते पनवेल दरम्यानची सेवा रद्द असेल.

​प्रवाशांना विनंती: प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search