Category Archives: कोकण

मागणी पूर्ण! सावंतवाडी–रेल्वे स्थानक–बांदा बससेवा सुरू; बस फेऱ्यांचे वेळापत्रक असे असेल

   Follow us on        

बांदा :सावंतवाडी रेल्वे स्टेशन–निगुडे–सोनूर्ली–बांदा या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेत बससेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

निगुडे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या सेवेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना होणार असून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

नवीन बससेवेअंतर्गत दिवसातून एकूण ११ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार बस धावणार असून सावंतवाडी रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनूर्ली आणि बांदा या प्रमुख ठिकाणी थांबे असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहराशी थेट जोडणी मिळाली आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरू झाल्याने या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन बस फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१) बांदा – सकाळी ७:१५ (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी ८:००

२) सावंतवाडी – सकाळी ९:०० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सकाळी ९:४५

३) बांदा – सकाळी ९:५० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी १०:३५

४) सावंतवाडी – सकाळी ११:३० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १२:१५

५) बांदा – सकाळी ११:३० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १२:१५

६) सावंतवाडी – दुपारी १२:२५ (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १३:१० (१:१०)

७) बांदा – दुपारी १३:२० (१:२०) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १३:४५ (१:४५)

८) सावंतवाडी – दुपारी १४:०० (२:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १४:४५ (२:४५)

९) बांदा – दुपारी १४:५५ (२:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १५:४० (३:४०)

१०) सावंतवाडी – सायं. १७:०० (५:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सायं. १७:४५ (५:४५)

११) बांदा – सायं. १७:५५ (५:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सायं. १८:४० (६:४०)

 

 

 

विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण!

   Follow us on        

मुंबई: मुंबई आणि कोकणाला समुद्रमार्गे जोडणाऱ्या ऐतिहासिक M2M Princess रो-रो फेरीचा परतीचा प्रवास आज (२ मार्च २०२६) यशस्वीरित्या पूर्ण झाला. १ मार्च रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का येथून रवाना झालेली ही आशियातील सर्वात जलद रो-पॅक्स सेवा, विजयदुर्गहून परत येताना संध्याकाळी भाऊचा धक्का येथे सुखरूप पोहोचली.

या सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) दरम्यानचा प्रवास आता फक्त ६-७ तासांत होऊ शकतो, जे रस्त्याने १०-१२ तासांपेक्षा खूप कमी आहे. फेरीमध्ये ६२६ प्रवासी आणि कार, दुचाकी यांसारखी वाहने नेण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे.महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आदरणीय नितेश राणे यांनी या यशस्वी परतीच्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, हा केवळ प्रवास नव्हता तर मुंबई-कोकण नात्याला लाटांवरून नव्याने जोडणारा भावनिक सेतू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड आणि M2M Ferries यांनी हे स्वप्न साकार केले.

रात्रीच्या वेळी भाऊचा धक्का येथे उतरलेले प्रवासी, त्यांच्या सूटकेसेस आणि वाहनांसह दिसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ब्लू इकॉनॉमीला चालना देणारा ठरणार असून, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांसाठी हा उत्तम पर्याय ठरला आहे.

 

 

 

Konkan Railway: तिरुवनंतपुरम – मदार होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 06013 / 06014) अशी ही सेवा राहणार आहे.

गाडी क्र. 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन साप्ताहिक विशेष ४ मार्च २०२६ आणि ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ७:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 06014 मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ७ मार्च २०२६ आणि १४ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री ९:४० वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी रात्री १२:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.

ही विशेष गाडी कोल्लम, कायमकुलम, मावेलिकरा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिशूर, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, कुमटा, करवार, मडगाव, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, चित्तौडगड, भिलवाडा, बिजैनगर आणि अजमेर या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

या गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यात २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर/डी डबे समाविष्ट आहेत.

Konkan Railway Updates 02/03/26: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! होळीसाठी मुंबई – मडगाव मार्गावर धावणार विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई–मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई CSMT – मडगाव – मुंबई CSMT विशेष (द्विसाप्ताहिक)

गाडी क्रमांक ०१०४९ मुंबई CSMT–मडगाव विशेष ही ३ मार्च २०२६ (मंगळवार) आणि ६ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी मुंबई CSMT येथून पहाटे ००:३० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०५० मडगाव–मुंबई CSMT विशेष ही ३ व ६ मार्च रोजी मडगावहून १६:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी या स्थानकांवर थांबा असेल.

या गाडीची रचना एकूण २० डबे असून त्यात ३ टियर एसी (इकॉनॉमी) – १८ डबे आणि जनरेटर कार – २ डबे असतील.


लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष

गाडी क्रमांक ०१०४७ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव विशेष ही ७ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री २२:१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०४८ मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ही ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी १८:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी येथे थांबा असेल.

या गाडीची रचना २२ डबे अशी असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ६, स्लीपर – ९, जनरल – ४, जनरेटर कार – १ आणि एसएलआर – १ डबा असेल.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची ‘लेट लतीफी’ संपेना! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

   Follow us on        

ठाणे: कोकणातील लाडक्या ‘शिमगा’ म्हणजेच होळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदा अत्यंत खडतर ठरला. रविवारी सकाळी मुंबई सीएसएमटी स्थानकातून सुटणारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावल्यामुळे मुंबई, ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली. सकाळी ५:४० वाजता सुटणारी ही गाडी प्रत्यक्षात दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी सुटली.

रेल्वे प्रशासनाकडून गाडी उशिरा असल्याची पूर्वसूचना वेळेवर न मिळाल्याने, अनेक प्रवासी पहाटेच स्थानकावर पोहोचले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, मात्र तिथे स्वच्छतागृहे किंवा विश्रांतीगृहांची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

​या विलंबाबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती वेळेत देण्यात आली नाही. सुरुवातीला गाडी १०:५० ला सुटेल असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात तिला सात तास उशीर झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे हा उशीर झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.

तेजस, जनशताब्दी आणि मांडवी यांसारख्या गाड्यांना होणारा उशीर आता नित्याचीच बाब झाली असून, सण-उत्सवाच्या काळात रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने अक्षरशः ‘शिमगा’ केला. एका दिवसाच्या या खोळंब्याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोकणातील रेल्वे समस्यांकडे राज्य सरकारनेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. अलीकडेच बोट सेवेचा शुभारंभ करताना कोकणाच्या विकासाचा उल्लेख झाला असला, तरी रेल्वे प्रवासातील अडचणींचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला सुधारणा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

कोकण–कोल्हापूर कनेक्टिव्हिटीला बूस्ट! एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन नवे घाट मार्ग प्रस्तावित

   Follow us on        

वारणानगर: कोल्हापूर जिल्हा, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील दळणवळण तसेच पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी तीन नवीन घाट रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. हे नवीन मार्ग कोल्हापूरला थेट कोकणाशी जोडणार असून, यामुळे दोन्ही विभागांच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे.

या संदर्भात आमदार कोरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रस्तावित कामांना लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.

प्रस्तावित नवीन घाट रस्ते खालीलप्रमाणे आहेत:

१. पावनखिंड ते देवडे-भोवडे मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे यांना जोडणारा नवीन घाट मार्ग तयार करणे.

२. अणुस्कुरा ते भांबेड मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा-गावडवाडी (कोल्हापूर जिल्हा हद्द) ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-धनगरवाडी या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाट रस्ता बांधणे.

३. वाशी-पडसाळी ते काजिर्डा मार्ग: पन्हाळा तालुक्यातील वाशी-पडसाळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिर्डा यांना जोडणाऱ्या नवीन घाट रस्त्याचे काम करणे.

या बैठकीप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मान्यवरांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारीदेखील या चर्चेत सहभागी झाले होते.

थोडक्यात सांगायचे तर: या तीनही नवीन घाट रस्त्यांच्या कामांमुळे कोल्हापूर आणि कोकणातील अंतर कमी होणार असून, दुर्गम भागातील दळणवळणाची समस्या सुटण्यास मदत होईल. विशेषतः विशाळगड आणि पावनखिंड परिसरातील ऐतिहासिक पर्यटनाला यामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Video: मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवेचा शुभारंभ! पहिली बोट कोकणच्या दिशेने रवाना

   Follow us on        

मुंबई: मुंबई ते कोकणातील विजयदुर्ग दरम्यान M2M फेरीज ची रो-रो (Ro-Ro) सेवा आज, १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथे सकाळी ८ वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा  उद्घाटन सोहळा पार पडला.

रो-पॅक्स सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्गचा प्रवास रस्त्याने १०-१२ तासांऐवजी केवळ ५ ते ७ तासांत पूर्ण होऊ शकतो. ही सेवा शिमगा (होळी) सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असून, कोकणवासीयांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाली आहे. M2M Princess ही उच्च गतीची फेरी वापरली जात असून, यात प्रवासींसह दुचाकी आणि चारचाकी वाहनेही नेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

उद्घाटन फेरीच्या पहिल्याच दिवशी बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक प्रवासी या नव्या समुद्री मार्गाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. ही सेवा कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही १६ दिवसांच्या पायलट टप्प्यातील सेवा असून, भविष्यात नियमित आणि विस्तारित स्वरूपात चालवली जाणार आहे.

 

 

 

मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ!

   Follow us on        

मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव, दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या सहा विशेष गाड्यांच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ १ मार्च २०२६ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू असेल.

​विशेष म्हणजे, या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

​या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये झाली वाढ:

​नागपूर – मडगाव विशेष (०११३९): ही गाडी आता दर बुधवार आणि शनिवारी धावेल.

​मडगाव – नागपूर विशेष (०११४०): ही गाडी आता दर गुरुवार आणि रविवारी धावेल.

​दादर – गोरखपूर विशेष (०१०२७): ही गाडी आठवड्यातून चार दिवस म्हणजे दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल.

​गोरखपूर – दादर विशेष (०१०२८): ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल.

​दादर – बलिया विशेष (०१०२५): ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल.

​बलिया – दादर विशेष (०१०२६): ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल.

​प्रवाशांसाठी सूचना:

​रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांच्या माहितीसाठी enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES (National Train Enquiry System) अ‍ॅपचा वापर करावा. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्या किंवा इतर सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बेळगाव – सावंतवाडी रेल्वेमार्ग: ५६ वर्षांची ‘प्रतीक्षा’ संपेना!

   Follow us on        

सावंतवाडी: बेळगाव ते सावंतवाडी (चंदगड-आंबोली मार्गे) रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प गेल्या पाच दशकांहून अधिक काळ प्रलंबितच आहे. बेळगाव (कर्नाटक) आणि सावंतवाडी (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) जोडणारा सुमारे ११४.६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेची कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यासाठी महत्वाचा आहे. सध्याच्या लोंडा-मडगाव-परनेम मार्गापेक्षा अंतर सुमारे १६५ किमी कमी करणाऱ्या या प्रकल्पात बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोली आणि सावंतवाडी अशी ९ स्थानके प्रस्तावित आहेत, तर २०१८ बनविण्यात आलेल्या अहवालात या प्रकल्पाचा खर्च १८०५ कोटी रुपये इतकाआहे. हा मार्ग शेती-व्यापार, पर्यटन, भाजीपाला-मासे वाहतूक आणि कोकणातील दरड कोसळण्याच्या वेळी पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

या प्रकल्पाचे पहिले सर्वेक्षण १९७० मध्ये झाले होते. २०१८ मध्ये दुसरे सर्वेक्षण आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार होऊन रेल्वे मंत्रालयाकडे सादर झाला, ज्यात सकारात्मक अहवाल होता. मात्र, कोरोना काळात बेळगावचे माजी खासदार सुरेश आंगडी यांच्या निधनानंतर पाठपुरावा कमी पडला आणि प्रकल्प रेंगाळला. फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या नवीनतम स्थितीनुसार, हा प्रकल्प अद्याप प्रलंबितच आहे; प्रत्यक्ष बांधकाम, जमीन अधिग्रहण किंवा निधीची मोठी मंजुरी झालेली नाही. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये किंवा युनियन बजेट २०२५-२६ मध्ये या प्रकल्पासाठी स्पष्ट तरतूद किंवा प्रगती दाखवली गेली नाही.

बेळगाव जिल्ह्यातील इतर प्रकल्प (जसे बेळगाव-धारवाड) जसे जमीन अधिग्रहण आणि निधीच्या अभावामुळे रखडलेले आहेत, तसाच हाही आहे. जानेवारी २०२५ मध्ये कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी बेळगाव-चंदगड-सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीला भेटून रेल्वे मंत्र्यांना निधी मिळवण्याचे आश्वासन दिले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याशी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची चर्चा झाली आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरला पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्यासह खासदार शाहू महाराज आणि इतर नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत.

तरीही मुख्य अडथळे निधी मंजुरी, दोन्ही राज्यांतील (कर्नाटक-महाराष्ट्र) जमीन अधिग्रहण आणि सातत्यपूर्ण राजकीय पाठपुराव्याचा अभाव यामुळे आहेत. युनियन बजेट किंवा संसदीय सत्रात नवीन चालना मिळेल अशी आशा आहे, पण सध्या तरी हा प्रकल्प “रखडलेला”च आहे. स्थानिक विकास, व्यापार आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू व्हावे अशी मागणी जोर धरत आहे.

प्रवाशांनो इथे लक्ष द्या! दिवा – चिपळूण मेमूची दिनांक ०१ मार्च रोजीची फेरी रद्द | पनवेलहुन कोकणात जाणाऱ्या अजून एका होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

दि. २७ फेब्रुवारी २०२६: कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण – दिवा – चिपळूण मार्गावरील मेमू अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ च्या धावण्याच्या प्रारंभ तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११६० ही चिपळूण येथून पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ०१ मार्च २०२६ पासून धावणार होती; मात्र सुधारित नियोजनानुसार ती आता ०२ मार्च २०२६ ते ०८ मार्च २०२६ या कालावधीत धावेल. त्यानुसार दिवा येथून सुटणारी गाडी क्रमांक ०११५९ च्याही सेवेत तदनुरूप बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित तारखांची नोंद घेऊन आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

होळी २०२६ निमित्त पनवेलहुन कोकणात जाणाऱ्या अजून एका होळी विशेष गाडीची घोषणा

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने Indian Railways प्रशासनामार्फत मडगाव जं.–पनवेल–मडगाव जं. दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 01106 / 01105 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 01106 मडगाव जं.–पनवेल विशेष ही गाडी दि. 04 मार्च 2026 (बुधवार) रोजी मडगाव जंक्शन येथून सायं. 16:30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे 04:00 वाजता पनवेल येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01105 पनवेल–मडगाव जं. विशेष ही गाडी दि. 05 मार्च 2026 (गुरुवार) रोजी पनवेल येथून सकाळी 05:45 वाजता सुटेल व त्याच दिवशी सायं. 18:10 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

थांबे खालीलप्रमाणे असतील :
करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेन.

रचना (Composition) :
एकूण 20 डबे – 18 स्लीपर कोच व 2 एसएलआर डबे.

गाडी क्रमांक 01106 साठी आरक्षण दि. 28/02/2026 पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी व सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवाशांनी Indian Railwaysच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

होळीच्या सणासाठी कोकण व मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search