Category Archives: कोकण

Konkan Railway: गणपती विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर..

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (CR) विशेष शुल्कावर  ‘टीओडी’ (TOD) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, या विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११५३ / ०११५४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ या कालावधीत ही गाडी दररोज धावणार असून याचे तिकीट आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​पुणे – रत्नागिरी(RN):

​गाडी क्रमांक ०१४४५ / ०१४४६: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०१४४७ / ०१४४८: १२/०९/२०२६, १९/०९/२०२६ आणि २६/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (शनिवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११६७ / ०११६८: १२/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १३/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार व सोमवार या वारांमध्ये धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव (MAO):

​गाडी क्रमांक ०११६५ / ०११६६: १५/०९/२०२५ व २२/०९/२०२५ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११८५ / ०११८६: १६/०९/२०२६ व २३/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (बुधवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११०३ / ०११०४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२: ११/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११२९ / ०११३०: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

मुंबई – मंगळुरू एक्सप्रेसचे सावंतवाडी स्थानकावर जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २७ जुलै:

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या बहुप्रतिक्षित मंगळुरू एक्सप्रेसच्या थांब्यामुळे येथील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

​रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. १६ वर्षे या गाडीसाठी प्रयत्न सुरू होते. गेली ४ वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर आज मोठं यश आम्हाला मिळालं आहे. सुपरफास्ट एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाला. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, मंत्री व सर्व जनप्रतिनिधींचे आभार मानतो. तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार लोकनेते मधू दंडवते टर्मिनस असं नाव या स्थानकाला मिळालं आहे. त्यामुळे त्या नावासा शोभेल असं टर्मिनस जनप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून निर्माण व्हावं, अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सावंतवाडीकर उपस्थित होते.

​यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव श्री. मिहीर मठकर, उपाध्यक्ष श्री. सागर तळवडकर, मुंबई विभागाचे श्री. गणेश चमणकर, श्री. मिहीर गावडे, श्री. नंदू तारी, श्री. देवेंद्र मातोंडकर, श्री. सुभाष शिरसाट, ॲड. तेजस परब, श्री. नरसु रेडकर, श्री. शेखर पाडगावकर, सौ. सान्वी तळवडकर, कु. राशी परब, कु. प्रेरणा पोकळे, श्री. बसवराज गुरव, श्री. अश्वैफ गवस, श्री. भावेश भिसे, तसेच सर्व रिक्षाचालक आदी उपस्थित होते.

Lanja: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी

   Follow us on        

लांजा: लांजा शहरातील सार्डळवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

​जखमी बालकेचे नाव स्वभवी समीर तानवडे (वय ४) असून, ती घराच्या अंगणात खेळत असताना आठ ते दहा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर अचानक झडप घातली. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी झाली.

​आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पळवून लावत बालकेची सुटका केली. त्यानंतर तिला प्रथम स्थानिक स्तरावर उपचारासाठी नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​या घटननंतर सार्डळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Konkan Railway: मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई, ठाणे, पनवेल आणि पुण्याहून सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि मडगावसाठी या विशेष गाड्या धावतील.

या विशेष रेल्वे गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि फेऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी

  • गाडी क्र. ०११०३ / ०११०४ सीएसएमटी- सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष (१६ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११०३ (सीएसएमटी ते सावंतवाडी): ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज दुपारी १५:३० वाजता सीएसएमटी वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ०४:०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११०४ (सावंतवाडी ते सीएसएमटी): १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज पहाटे ०४:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १६:४० वाजता सीएसएमटी ला पोहोचेल.
    • डबे: २२ ICF डबे (१२ स्लीपर, ६ सामान्य/अनारक्षित, २ एसी ३-टायर, २ एसएलआरडी).

 

  • गाडी क्र. ०११५१ / ०११५२ सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी दैनिक विशेष (१७ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११५१ (सीएसएमटी ते सावंतवाडी): ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज मध्यरात्री ००:२५ वाजता सीएसएमटी वरून सुटेल आणि दुपारी १४:२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११५२ (सावंतवाडी ते सीएसएमटी): ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रोज दुपारी १५:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:३५ वाजता सीएसएमटी ला पोहोचेल.

२. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी / रत्नागिरी / मडगाव

  • गाडी क्र. ०११७१ / ०११७२ एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी दैनिक विशेष (१७ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११७१: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०८:२० वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २१:०० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११७२: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज रात्री २२:३५ वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११६७ / ०११६८ एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी (आवड्यातून ५ दिवस) (११ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११६७: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान (मंगल, बुध, गुरु, शनि, रवि) रात्री २१:०० वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:०० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११६८: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान (बुध, गुरु, शुक्र, रवि, सोम) दुपारी १५:१५ वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि मध्यरात्री ००:४० वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११२९ / ०११३० एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११२९: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ०८:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २२:१० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३०: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री २३:२० वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११३१ / ०११३२ एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी द्वि-साप्ताहिक (४ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११३१: १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार आणि रविवार) रोजी सकाळी ०८:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि रात्री २२:१० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३२: १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार आणि रविवार) रोजी रात्री २३:२० वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०११६५ / ०११६६ एलटीटी – मडगाव – एलटीटी एसी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११६५: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री ००:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुपारी १४:३० वाजता मडगाव जंक्शन पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११६६: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी दुपारी १६:३० वाजता मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१० वाजता एलटीटी ला पोहोचेल.
    • डबे: २२ LHB ऑल-एसी डबे (१st AC, AC २-टायर, AC ३-टायर).

 

  • गाडी क्र. ०११८५ / ०११८६ एलटीटी – मडगाव – एलटीटी LHB साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११८५: १६ आणि २३ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी रात्री ००:४५ वाजता एलटीटी वरून सुटेल आणि दुपारी १४:३० वाजता मडगाव पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११८६: १६ आणि २३ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी दुपारी १६:३० वाजता मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१० वाजता एलटीटी ला पोहोचेल.

 

३. पुणे ते रत्नागिरी विशेष गाड्या

  • गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे –  रत्नागिरी – पुणे साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०१४४५: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी रात्री ००:२५ वाजता पुण्यावरून सुटेल (कल्याण, पनवेल मार्गे) आणि दुपारी ११:५० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०१४४६: १५ आणि २२ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सायंकाळी १७:५० वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता पुणे जंक्शन पोहोचेल.

 

  • गाडी क्र. ०१४४७ / ०१४४८ पुणे – रत्नागिरी – पुणे साप्ताहिक विशेष (३ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०१४४७: १२, १९ आणि २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी रात्री ००:२५ वाजता पुण्यावरून सुटेल आणि दुपारी ११:५० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
    • गाडी क्र. ०१४४८: १२, १९ आणि २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी सायंकाळी १७:५० वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता पुणे जंक्शन पोहोचेल.

 

४. दिवा येथून सुटणाऱ्या मेमू (MEMU) विशेष गाड्या

  • गाडी क्र. ०११५५ / ०११५६ दिवा – खेड – दिवा मेमू दैनिक विशेष (१६ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११५५: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०७:१५ वाजता दिव्यावरून सुटेल आणि दुपारी १४:३५ वाजता खेड पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११५६: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज दुपारी १६:०० वाजता खेडवरून सुटेल आणि रात्री २२:५० वाजता दिवा जंक्शन पोहोचेल.
    • (टीप: २२ सप्टेंबर २०२६ रोजी मेन्टेनन्समुळे ही सेवा उपलब्ध नसेल).

 

  • गाडी क्र. ०११३३ / ०११३४ दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक विशेष (१५ फेऱ्या):
    • गाडी क्र. ०११३३: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज दुपारी १३:४० वाजता दिव्यावरून सुटेल आणि रात्री २१:३० वाजता चिपळूण पोहोचेल.
    • गाडी क्र. ०११३४: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी ०७:३० वाजता चिपळूणवरून सुटेल आणि दुपारी १३:०० वाजता दिवा जंक्शन पोहोचेल.
    • (टीप: २३ सप्टेंबर रोजी दिव्यावरून आणि २४ सप्टेंबर रोजी चिपळूणवरून मेन्टेनन्समुळे सेवा बंद राहील).

 

या सर्व गाड्या दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, साखळी/आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबतील.

सर्व गाड्या विद्युत इंजिनावर (Electric Locomotives) चालवल्या जाणार असून, प्रवाशांनी आरक्षण आणि तिकिटांसंबंधी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा आयआरसीटीसी (IRCTC) ॲपला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे व मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Sawantwadi: नव्याने मिळालेले थांबे टिकवण्याचे आव्हान

   Follow us on        

सावंतवाडी:

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन व्यावसायिक थांबे मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर प्रसिद्ध झालेल्या या निर्णयानुसार १२१३३/१२१३४ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु जंक्शन एक्सप्रेस, १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/१२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या आता सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. सावंतवाडी परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत हे थांबे देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक आणि कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​रात्रीच्या वेळा आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव ठरणार डोकेदुखी:

आनंदाची बाब ही असली तरी, मंजूर झालेल्या वेळापत्रकाचा बारकाईने अभ्यास केल्यास रात्रीच्या वेळेत थांबणाऱ्या गाड्या प्रवाशांसाठी मोठ्या गैरसोयीच्या ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सावंतवाडी स्थानक तळकोकणातील महत्वाचे स्थानक आहे. येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या (footfall) पण खूप मोठी आहे. अजून गाड्यांना थांबा मिळाल्यास त्यामधे अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या स्थानकाचे ठिकाण रात्रीच्या प्रवासासाठी काहीसे गैरसोयीचे आहे. सावंतवाडी शहर ते रेल्वे स्थानक या दरम्यान सुमारे ८ किलोमीटरचे अंतर आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दररोज सायंकाळी ७ वाजेनंतर ते सकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावर कोणतीही एसटी बस किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसते. यामध्ये विशेषतः १२२०१ एलटीटी – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस (मध्यरात्री ०२:०२ वा.), १२२०२ तिरुवनंतपुरम – एलटीटी गरीब रथ एक्सप्रेस (पहाटे ०३:२८ वा.) आणि १२१३४ मंगळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस (रात्री ११:३० वा.) या गाड्या ऐन मध्यरात्री व पहाटे सावंतवाडीत येतात. सार्वजनिक बस नसल्यामुळे या वेळेत उतरणाऱ्या किंवा ट्रेन पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

रात्रीच्या वेळेत सावंतवाडी स्थानक परिसर आणि शहराकडे जाणाऱ्या निर्जन मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था (RPF आणि स्थानिक पोलीस बंदोबस्त) असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ऐन मध्यरात्री उतरणाऱ्या महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यांमुळे ऐरणीवर आला आहे. याशिवाय, रात्रीच्या वेळी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्याचा गैरफायदा घेऊन काही रिक्षा व्यावसायिक प्रवाशांकडून मनमानी आणि अवाजवी भाडे वसूल करण्याची दाट शक्यता आहे. या कारणाने प्रवासी या गाड्यांतून प्रवास करणे टाळण्याची शक्यता आहे.

​थांबे टिकवून ठेवण्यासाठी तातडीने ‘या’ उपाययोजना करणे आवश्यक:

रेल्वे प्रशासनाने हे थांबे ५ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर दिले असून, या कालावधीत मिळणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरून (Patronage) व उत्पन्नावरून हे थांबे कायम ठेवायचे की रद्द करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या नसल्यास हे थांबे रद्द होण्याची दाट शक्यता आहे. हे थांबे कायम टिकवण्यासाठी आणि प्रवाशांची सोय होण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाने रात्रीच्या गाड्यांच्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी शहरातून स्थानकासाठी विशेष कनेक्टिंग बस फेऱ्या सुरू कराव्यात.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) आणि रिक्षा संघटनांनी रात्रीच्या प्रवासासाठी अधिकृत दरपत्रक जाहीर करून ते स्थानक परिसरात लावावे. तसेच, स्थानक परिसर व मुख्य रस्त्यावर कडक आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पहारा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी), स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रवाशांनी समन्वयाने काम केले तरच हे थांबे कायमस्वरूपी टिकून राहतील.

Konkan Railway: सावंतवाडी स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर

   Follow us on        

Konkan Railway Updates:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Stoppage) व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

​या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळालेल्या गाड्या, त्यांच्या वेळा आणि सुरू होण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

​१. मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (दररोज)

​गाडी क्र. १२१३३ (मुंबई सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शन):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०७:०२ / ०७:०४

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: रात्री २३:३० / २३:३२

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​२. हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – ह. निजामुद्दीन ‘राजधानी’ एक्स्प्रेस (आवड्यातून ३ दिवस)

​गाडी क्र. १२४३२ (ह. निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०६:१८ / ०६:२०

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२४३१ (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते ह. निजामुद्दीन):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: सकाळी ०९:४४ / ०९:४६

​सुरुवात: २८ जुलै २०२६ पासून

​३. लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम नॉर्थ – एलटीटी ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (आवड्यातून २ दिवस)

​गाडी क्र. १२२०१ (लोकमान्य टिळक (ट) ते तिरुवनंतपुरम नॉर्थ):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०२:०२ / ०२:०४

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२२०२ (तिरुवनंतपुरम नॉर्थ ते लोकमान्य टिळक (ट)):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०३:२८ / ०३:३०

​सुरुवात: ३० जुलै २०२६ पासून

प्रवाशांनी या बदलांची आणि सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी (सुनील बी. नारकर) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी.

Konkan Railway: घोलवड-उमरगाव पूलाखाली पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली, पाश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत; कोकण रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

विशेष वृत्त: घोलवड ते उमरगाव रोड दरम्यान असलेल्या पुलावरील (पूल क्र. २०३) पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल (Divert) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

​या बदलांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

​रद्द करण्यात आलेली गाडी:

​गाडी क्र. २०९१० (पोरबंदर – कोच्युवेली एक्सप्रेस): दिनांक २३/०७/२०२६ रोजी सुरू होणारी ही फेरी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

​मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या (Diversion):

​१. गाडी क्र. १२२१८ (चंडीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​२. गाडी क्र. २२९०८ (हापा – मडगाव जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​३. गाडी क्र. १२४८३ (तिरुवनंतपुरम सेंट्रल – अमृतसर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: रोहा – पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – सुरत.

​४. गाडी क्र. २२४७५ (हिसार – कोइम्बतूर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​५. गाडी क्र. १६३३८ (एरनाकुलम जंक्शन – ओखा एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.

​६. गाडी क्र. २२६५५ (एरनाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.

​७. गाडी क्र. १६३३३ (वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस): (दि. २३/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या या नव्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांसाठी ४६.६८ कोटी रुपयांचा निधी; रेल्वेमंत्र्यांची माहिती

   Follow us on        

नवी दिल्ली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवरील प्राथमिक सुविधांच्या विकासाबाबत आणि गाड्यांच्या थांब्याबाबत खासदार नारायण राणे यांनी विचारलेल्या प्रश्नाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तर दिले आहे. या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले आहे की, २०२१-२२ ते २०२६-२७ (३० जून २०२६ पर्यंत) या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांच्या प्रवासी सुविधांसाठी सुमारे ४६.६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत किंवा त्यांची कामे सुरू आहेत.

​प्रमुख स्थानकांवरील विकासकामे

​रेल्वेने वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या मुख्य स्थानकांवर अनेक प्रवासी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

​वैभववाडी रोड: येथे १० मॉड्युलर शेल्टर, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, ४ वॉटर पेडस्टल, फूट ओव्हर ब्रिज (FOB) आणि स्वच्छतागृहांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.

​कणकवली: एसी लाउंज, प्लॅटफॉर्म १ आणि २ चा विस्तार, दिव्यांग-अनुकूल स्वच्छतागृहे, बायो-टॉयलेट आणि टीव्ही आधारित माहिती प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच लिफ्ट, एफओबी रूफ शेल्टर आणि डाऊनवर्ड एस्केलेटर बसवण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

​सिंधुदुर्ग: येथे ५ मॉड्युलर शेल्टर, दिव्यांग-अनुकूल स्वच्छतागृहे आणि टीव्ही आधारित माहिती प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत.

​कुडाळ: फूड कोर्ट, २६ मॉड्युलर शेल्टर, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि बायो-टॉयलेटची कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय लिफ्ट आणि एफओबी रूफ शेल्टरचे काम सुरू करण्यात आले आहे.

​सावंतवाडी: ८ मॉड्युलर शेल्टर, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, फूट ओव्हर ब्रिज, वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल पूर्ण झाले आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्र. ३ वर दुसऱ्या प्रवेशद्वारावरील बुकिंग ऑफिस, वेटिंग हॉल आणि लिफ्टची कामे सुरू आहेत.

​याव्यतिरिक्त, खरेपाटण रोड, अचिरणे, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे यांसारख्या इतर स्थानकांवरही प्रवासी सुविधांची कामे करण्यात आली आहेत.

​तिकीट बुकिंग सुविधा आणि डिजिटल पर्याय

​सिंधुदुर्ग (ओरोस) आणि वैभववाडी रोड या स्थानकांवर सध्या युटीएस-कम-पीआरएस (UTS-cum-PRS) तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​प्रवाशांच्या सोयीसाठी ‘रेलवन ॲप’ (RailOne App) ची सुविधा देण्यात आली आहे, ज्याद्वारे प्रवासी मोबाईलवरच राखीव आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतात.

​एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबे

​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबे देण्यात आले आहेत:

​सिंधुदुर्ग स्थानक: एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (५ नोव्हेंबर २०२५ पासून) आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस (२ नोव्हेंबर २०२५ पासून) थांबत आहेत.

​कणकवली स्थानक: हिसार – कोईम्बतूर एक्सप्रेस (५ नोव्हेंबर २०२५ पासून) आणि गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस (७ नोव्हेंबर २०२५ पासून) थांबत आहेत.

​सावंतवाडी रोड स्थानक: छत्रपती शिवाजी महाराज (T) – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक (T) – तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्सप्रेस या गाड्यांनाही थांबा मंजूर करण्यात आला आहे.

कणकवली:१० रुपयांच्या पर्यटन करावरून पर्यटक आणि स्थानिकांमध्ये राडा

   Follow us on        

कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा येथे पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सावडाव ग्रामपंचायतीकडून धबधब्याकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे दहा रुपये पर्यटन कर घेतला जातो. याच कराच्या वसुलीवरून १० ते १२ पर्यटकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि त्यांना बेदम मारहाण केली.

​मारहाणीचा हा प्रकार पाहून जेव्हा स्थानिक ग्रामस्थ तिथे जमा झाले, तेव्हा पर्यटकांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. जसजसे अधिक ग्रामस्थ तिथे गोळा होऊ लागले, ते पाहून पर्यटकांनी आपल्या वाहनांसह मुंबई-गोवा महामार्गाच्या दिशेने पळ काढला. मात्र, या घटनेत गावकऱ्यांनी एका पर्यटकाला जागीच पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या पर्यटकाला ताब्यात घेतले असून, मारहाण करणाऱ्या सर्व पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पर्यटनाच्या नावाखाली येऊन स्थानिकांवर दादागिरी करणाऱ्या अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सावडाव ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

गणेशोत्सव रेल्वे तिकीट आरक्षण: ऑनलाईन बुकिंग पहिली १० मिनिटे बंद; फायदा कोणाचा?

   Follow us on        

Konkan Railway: रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये  दलालांकडून होणाऱ्या ऑनलाईन घोटाळ्यांबाबत रेल्वे विभागाकडे सातत्याने अनेक तक्रारी दाखल होत होत्या. हे दलाल बेकायदेशीरपणे ऑनलाईन तिकिटे हडप करून प्रवाशांना ती चौपट दराने विकत असल्याचा दाट संशय होता. याच पार्श्वभूमीवर, तिकीट खिडकीवर (Ticket Window) रात्रभर रांगेत उभे राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना प्राधान्याने तिकीट मिळावे, या उद्देशाने आज ऑनलाईन बुकिंग सुरुवातीची पहिली १० मिनिटे जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे रात्रभर रांग लावणाऱ्या अनेक सामान्य प्रवाशांना आज तिकिटे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन तिकिटांची आस धरून बसलेल्या प्रवाशांच्या हाती निराशाच लागली.

​हा उपाय आहे की सामन्यांची डोकेदुखी?

दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने योजलेला हा उपाय कितपत योग्य आहे, यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एजंट स्वतः रांगेत उभे न राहता, भाड्याने आपली माणसे रात्रभर तिकीट खिडकीच्या रांगेत उभी करून तिकिटे मिळवतात. रेल्वेच्या या नव्या प्रकारामुळे दलाल आता ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन रांगेत अधिक माणसे उभी करतील आणि काळाबाजार सुरूच ठेवतील, अशी रास्त भीती व्यक्त होत आहे.

​सर्वच उपनगरीय स्थानकांवर आरक्षित खिडक्या नाही आहेत. नोकरदार वर्ग, महिला आणि सर्वसामान्य लोकांसाठी तिकीट खिडकीवर रात्रभर रांग लावणे शक्य आणि सोयीचे नसते. त्यामुळे या वर्गाला ऑनलाईन तिकीट बुकिंगवरच अवलंबून राहावे लागते. ऑनलाईन तिकीट न मिळाल्यास त्यांना पुन्हा त्याच दलालांच्या दारात जावे लागेल. याचाच फायदा घेत दलाल चौपट दराने तिकिटांची विक्री करतील आणि रात्री रांग लावण्यासाठी भाड्याची माणसे आणखी वाढवतील. त्यामुळे दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने असे उपाय अमलात आणणे हास्यास्पद आहे. अशा सामान्य प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या आणि वरवरच्या उपायांवर अवलंबून न राहता इतर प्रभावी, तांत्रिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच, सामान्य प्रवाशांचा होणारा हा आर्थिक आणि मानसिक छळ त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search