Category Archives: कोकण

Konkan Railway: दसरा- दिवाळी व छठपूजेसाठी प्रवाशांना दिलासा; वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडीचा कालावधी वाढवला

   Follow us on        

वास्को:प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेने वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-दा-गामा एक्स्प्रेस विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी व छठपूजा उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या गाड्यांचा तपशील:

  • गाडी क्रमांक 07311 वास्को-दा-गामा – मुझफ्फरपूर एक्स्प्रेस विशेष

    • धावणार : प्रत्येक सोमवार

    • कालावधी : 08.09.2025 ते 22.12.2025 पर्यंत

  • गाडी क्रमांक 07312 मुझफ्फरपूर – वास्को-दा-गामा एक्स्प्रेस विशेष

    • धावणार : प्रत्येक गुरुवार

    • कालावधी : 11.09.2025 ते 25.12.2025 पर्यंत

सुधारित वेळापत्रक (प्रमुख थांबे):

  • गाडी क्र. 07311 (सोमवार)

    • वास्को द गामा : 14:30

    • मडगाव : 16:00 / 16:20

    • थिवी : 17:10 / 17:12

    • सावंतवाडी रोड : 17:42 / 17:44

    • रत्नागिरी : 20:50 / 20:55

    • चिपळून : 22:38 / 22:40

  • गाडी क्र. 07312 (शनिवार)

    • वास्को द गामा : 14:55

    • मडगाव : 12:30 / 12:50

    • थिवी : 10:30 / 10:32

    • सावंतवाडी रोड : 10:00 / 10:02

    • रत्नागिरी : 06:40 / 06:45

    • चिपळून : 03:26 / 03:28

रोहा ते मुझफ्फरपूर दरम्यानच्या थांब्यांच्या वेळेत कोणताही बदल नाही. प्रवाशांनी नवीन वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाची आखणी करावी, असे कोकण रेल्वेने आवाहन केले आहे.

Konkan Railway: मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका; या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        



मुंबई, दि. १९ ऑगस्ट २०२५ – मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासावर परिणाम झाला आहे. कोकण रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार अनेक गाड्या उशिराने सुटणार असून काही गाड्यांचे गंतव्यस्थानही बदलण्यात आले आहे.

गाड्यांचे वेळापत्रक बदल

गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस ही गाडी दुपारी ३:१० वाजता सुटण्याऐवजी संध्याकाळी ५:०० वाजता सुटेल.

गाडी क्रमांक २२११३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस ही गाडी दुपारी ४:४५ वाजता सुटण्याऐवजी संध्याकाळी ६:०० वाजता सुटेल.


गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस ही गाडी मुंबईपर्यंत न येता पनवेल येथेच थांबवली जाणार आहे.


आरंभ स्थानकात बदल

गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आज मुंबईऐवजी पनवेल स्थानकातून सुटणार आहे.


यामुळे प्रवाशांना गैरसोय होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले असून प्रवाशांनी वेळापत्रकातील बदल लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

खुशखबर! पुणे – सिंधुदुर्ग मार्गावर ‘फ्लाय९१’ कडून गणेशोत्सवासाठी विशेष उड्डाणांची घोषणा

   Follow us on    

 

 

पुणे, १८ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन फ्लाय९१ (FLY91) या विमानसेवेने पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी फ्लाय९१ने विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. २४ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट तसेच ५ व ७ सप्टेंबर २०२५ या दिवशी अतिरिक्त उड्डाणे सुरू राहतील.

या विशेष उड्डाणांची तिकिटे फ्लाय९१च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

यामुळे पुण्यातील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास आणखी सुलभ व सुखकर होणार आहे.

 

 

गणेशोत्सव हा आमच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे. अनेक जण आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करतात. पुणे–सिंधुदुर्ग मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवल्याने प्रवाशांना अधिक सोयी, लवचिकता आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. 

मनोज चाको

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (फ्लाय९१) 

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी प्रवाशांना दिलासा: चिपळूण-पनवेलदरम्यान विशेष मेमू गाड्या धावणार

   Follow us on    

 

 

चिपळूण : गणेशोत्सव २०२५ दरम्यान वाढलेल्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खास निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण–पनवेल–चिपळूण दरम्यान अतिरिक्त अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

गाड्यांचा तपशील :

गाडी क्रमांक ०११६० चिपळूण–पनवेल मेमू विशेष

दिनांक : ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५

प्रस्थान : चिपळूण येथून सकाळी ११:०५ वाजता

आगमन : पनवेल येथे दुपारी ४:१० वाजता

 

गाडी क्रमांक ०११५९ पनवेल–चिपळूण मेमू विशेष

दिनांक : ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५

प्रस्थान : पनवेल येथून संध्याकाळी ४:४० वाजता

आगमन : चिपळूण येथे रात्री ९:५५ वाजता

गाड्यांना अंजनी, खेर्डी, दिवाणखवटी, विंहेरे, करंजडी, वेअर, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, पेण, आपटा अशा महत्वाच्या स्थानकांवर थांबे असतील.

या गाड्यांची रचना ८ मेमू कोचेसची असून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

 

Ganpati Festival 2025: Additional MEMU Specials between Chiplun and Panvel announced

   Follow us on    

 

 

Chiplun: To manage the festive rush of passengers during Ganpati Festival 2025, Central Railway has decided to run additional unreserved MEMU special trains between Chiplun and Panvel.

Train Details as below.

Train No. 01160 Chiplun–Panvel MEMU Special

Dates: 5th, 6th & 7th September 2025

Departure: 11:05 hrs from Chiplun

Arrival: 16:10 hrs at Panvel

 

Train No. 01159 Panvel–Chiplun MEMU Special

Dates: 5th, 6th & 7th September 2025

Departure: 16:40 hrs from Panvel

Arrival: 21:55 hrs at Chiplun

The trains will halt at Anjani, Khed, Diwankhavati, Vinhere, Karanjadi, Veer, Mangaon, Indapur, Kolad, Roha, Nagothane, Pen, Apta and other important stations.

The train will run with 8 MEMU coaches, offering relief to passengers during the festive rush.

For detailed halts & timings, passengers may visit www.enquiry.indianrail.gov.in.

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

   Follow us on    

 

 

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने मुम्बई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाट मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरड हटवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जेसीबी व यंत्रसामग्रीच्या मदतीने रवी इन्फ्रा कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे अडथळे येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, घाट मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

 

 

शिरशिंगे नदीपात्रात आठ फूटांची मगर; खडकांत दुरून लक्षात येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

   Follow us on    

 

 

सावंतवाडी : माडखोल-धवडकी परिसरातील शिरशिंगे नदीपात्रात तब्बल आठ फूट लांबीच्या महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. नदीकाठावर कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांपासून गुरे पाजण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची दखल घेऊन ग्रामपंचायत व वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्या तरी यावेळी दिसलेली मगरीची लांबी आणि आकार मोठा आहे. तसेच मगरीचा रंग आणि नदीपात्रातील खडकांचा रंग समान असल्याने ही मगर जवळ गेल्याशिवाय लक्षात येत नाही.

स्थानिकांनी वनविभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, तसेच गावोगावी जनजागृती करून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करावे, अशी मागणी केली आहे.

 

 

 

सावंतवाडीतील युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ ने गौरव

   Follow us on    

 

 

सावंतवाडी, १५ ऑगस्ट:

सावंतवाडीतील युवकांच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर आणि सचिव मिहिर मठकर यांची ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आली आहे. जनजागृती सेवा संस्था (रजि.) यांच्यातर्फे हा प्रतिष्ठित पुरस्कार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील भवानी सभागृहात आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

संस्थेने जारी केलेल्या निवडपत्रानुसार, सागर तळवडेकर व मिहिर मठकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची स्तुती करताना संस्थेने म्हटले आहे की, “त्यांचे सामाजिक योगदान हे भूषणावह आहे व तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.”

पुरस्कार वितरण समारंभात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात हा पुरस्कार एक मानाचा तुरा ठरणार आहे. या निवडीमुळे सावंतवाडी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल झाले असून, स्थानिक पातळीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर आणि सचिव संचिता भंडारी यांनी श्री. तळवडेकर व श्री. मठकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्सप्रेस’चा डबल धमाका – मोफत विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on    

 

 

कोकणवासीय गणेशभक्तांसाठी यंदाही “मोदी एक्सप्रेस”चा डबल धमाका घेऊन येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सलग १३व्या वर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, २३ आणि २४ ऑगस्ट २०२५ रोजी या विशेष गाड्या धावणार असून प्रवाशांसाठी मोफत भोजनाची सोयही केली जाणार आहे.

ही सेवा खास करून लोकसभा आणि विधानसभेतील प्रचंड प्रतिसादाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. बुकिंगसाठी ठिकाण: भाजप तालुका मंडळ अध्यक्ष, शिवाजी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता दादर स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक १४.

या उपक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री नितेश नारायणराव राणे यांनी केले असून, यामुळे हजारो चाकरमान्यांना सोयीस्कर आणि मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे.

Konkan Railway: राजापूर रोड स्थानकावर नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on    

 

 

राजापूर : कोकण रेल्वे प्रशासनाकडून राजापूरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. १६३४५/१६३४६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसया गाडीला आता राजापूर रोड स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. सुरवातीला हा थांबा प्रायोगिक तत्वावर असणार आहे.

गाडी थांब्याची वेळ
गाडी क्रमांक १६३४५ : लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज संध्याकाळी ७:४० ते ७:४२ राजापूर रोड येथे थांबेल.

गाडी क्रमांक १६३४६ : तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज सकाळी ७:३८ ते ७:४० येथे थांबेल.

अलीकडेच सांगली जिल्ह्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी या स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी केली होती — या मागणीचा पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यावर्षीच्या मे महिन्यात पत्र लिहून कोकण रेल्वेवरील राजापूर रोड स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली होती.

राजापूर रोड स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ते मुख्य संपर्क केंद्र आहे. पूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला येथे थांबा नव्हता, त्यामुळे प्रवाशांना रत्नागिरी किंवा कणकवली स्थानकांचा वापर करावा लागत असे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी अनेक वर्षांपासून या गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती.

नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि केरळची राजधानी तिरुवनंतपुरम यांना जोडणारी लांब पल्ल्याची महत्त्वाची सेवा आहे. दररोज धावणारी ही गाडी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांतून प्रवास करते. ‘नेत्रावती’ नदीवरून या गाडीला नाव देण्यात आले आहे.

या प्रायोगिक थांब्यामुळे कोकणातील विशेषतः राजापूर आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना थेट मुंबई, गोवा, मंगळुरू आणि केरळकडे जाणे सुलभ होईल. तसेच मुंबईहून परतताना प्रवाशांना घरी पोहोचणे सोपे होईल.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search