Category Archives: कोकण

Mumbai Goa Highway: कशेडी घाटातील एक बोगदा वाहतुकीसाठी पुन्हा बंद

   Follow us on        
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यापैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे.
या महामार्गावरील एक बोगदा या आधीच एका वर्षांपूर्वी पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला तरीही माणगाव, इंदापूर, कोलाड या दरम्यान महामार्गावरील अपूर्ण असलेल्या कामामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही वाहतूककोंडी, मोकळी केली होती. पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशा झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय बाधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिस यांनी योग्य नियोजन केले होते.
त्यामुळे या परिसरात कुठेही वाहतूककोंडी झालेली नाही. गौरी- गणपती विसर्जन आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडींचा फारसा फटका बसला नाही. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खवरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे.
कशेडी येथील दुसऱ्या बोगद्यातील कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण २० सप्टेंबरपासून कार्यवाही करण्यात येणार आहे कामे पूर्ण करण्यासाठी पुढील एक ते दीड महिन्यासाठी बंद ठेवण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता  पंकज गोसावी यांनी दिली आहे.

Loading

कोकणासारखे वागून बघावे….

   Follow us on        

कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई वडिलाच्या घरात राहतो, फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.

नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी, मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा भावात कितीही भांडणे असले तरी, या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा तिथला कडक नियम आहे.

असे गणपतीमुळे एकत्र आल्याने, कधी कधी जुने भावांतील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे मनाई असते, नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.

कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, भजने, दशावतार, शक्ती तुरा नाच, नमन भारुड,कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात करतात. आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात.

गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं. पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा गावात, घरा-घरात पहायला मिळते. योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व कोकणाच्या बाहेर प्रेम, माया संपत चालली आहे.

एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. एका आई वडिलाची मुले पण द्वेष, मत्सर वाढत चाललाय. त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे. दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात.

संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी, जमीनीसाठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा जागा मिळणार नाही.

कोकणासारखे वागून बघावे, कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही. तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी. कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास.

साधेपण जपावा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा. गौराई बसवतात तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात, तसे आपल्याच बहिणीला वडे आदी सागोती नाही जमले तर, कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे,

जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल,

ही भोळी अपेक्षा जरी असले तरी, प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावांचे बहिणींचे, भावा भावांचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही.

साभार – माहिती सेवा ग्रुप

Loading

Mumbai Goa Highway: मागील ९ दिवसांत जाणार्‍या-येणार्‍या ७ लाख वाहनांची नोंद

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची नोंद झाली असून मागील ९ दिवसांत सुमारे ७ लाख या मार्गावरून गेल्या आहेत.

महामार्गावरुन गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या व येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेतली गेली होती. या नोंदी नुसार आज पर्यंत नऊ दिवसात अंदाजे सात लाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. बाप्पाच्या विसर्जनानंतर रविवार दुपारी ३ वाजल्या पासून पुन्हा मुंबई, गुजरातच्या दिशेने येणार्‍या या वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने परतीचा प्रवास करत आहेत.

दिवस रात्रभर सुरू असणारा सदरचा प्रवास पहाटे पर्यंत सुरूच होता. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून माणगाव जवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव- कोलाड बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे.

महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणार्‍या अंदाजे ५० हुन अधिक अवजड वाहनांवर रायगड पोलीसांनी कारवाई केली आहे.

Loading

महत्वाचे: कोकण रेल्वेतील विविध पदांच्या भरतीसाठी आजपासून अर्ज स्विकारणी सुरू




KRCL Recruitment:   कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि  एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य 
 या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि  कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
.
अधिक माहितीकरिता खालील जाहिरात वाचावी



Loading

….मग वंदेभारत एक्सप्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन थांबे देण्यास अडचण कोणती?

जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही? असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने विचारला जात आहे. 

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोल्हापूर -पुणे आणि पुणे – हुबळी मार्गावर नवीन वंदे भारत येत्या १६ तारीख पासून सुरू होत आहे, वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही वंदे भारत ट्रेन कोल्हापूरकरांचा दबावानंतर कोल्हापूरकरांना पुण्यासाठी स्वतंत्र वंदे भारत मिळाली.

पुण्याहून कोल्हापूर साठी सुरू झालेली ही वंदे भारत मिरज, सांगली,किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे थांबेल, तसेच हुबळी साठी सुरू झालेली वंदे भारत सातारा,सांगली,मिरज,बेळगाव,धारवाड येथे थांबेल

या दोन्ही वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत आणि या स्थानकातील अंतर आहे अवघे ७ किलोमीटर, तसेच कोल्हापूर वंदे भारत ही कराड आणि किर्लोस्करवाडी येथे देखील थांबेल,कराड ते किर्लोस्करवाडी स्थानकादरम्यान अंतर हे ३५ किलोमीटर आणि किर्लोस्करवाडी ते सांगली हे अंतर ३२.७ किलोमीटर आहे.म्हणजेच एकूण ३२६ किलोमीटरच्या या पूर्ण प्रवासात या गाडीला मध्ये ५ थांबे देण्यात आले.

परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली मडगाव – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे थांबते. या गाडीला सावंतवाडी थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी आणि प्रवासी संघटनांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. तसे बघता कणकवली ते सावंतवाडी रेल्वे स्थानक हे अंतर ४९ किलोमीटर आहे आणि सावंतवाडी ते थिवी (गोवा) हे अंतर ३२.५ किलोमीटर आहे. जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही असा सवाल सावंतवाडी येथील जनता करत आहे. या व्यतिरिक्त मुंबई ते मडगाव या ७६५ किलोमीटर ( कोल्हापूर – पुणे स्थानकाच्या अंतरापेक्षा दुप्पट )अंतरात केवळ ७ थांबे देण्यात आले आहेत.

त्यामुळे प्रत्येक वेळी सावंतवाडी साठी वेगळा न्याय का, सावत्र वागणूक का ? आणि सावंतवाडी हे ऐतिहासिक, पर्यटन शहर असूनही या ठिकाणी वंदे भारत का थांबत नाही असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे सचिव मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.

 

 

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी – दीपक केसरकर

   Follow us on        

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे छत्रपती शिवाजी maharajaaMcaa १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

मंत्री श्री.केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील विनंतीपत्र तसेच ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या शीर्षकाखाली सविस्तर आराखड्यासह प्रस्ताव सादर केला. मालवण येथे भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला. यामुळे याच ठिकाणी पुन्हा नव्याने १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, त्याचबरोबर सध्या ३३ गुंठे जागेवर असलेल्या स्मारकाऐवजी लगतच्या परिसराचा विकास करुन तेथे भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी विनंती श्री.केसरकर यांनी kolaI Aaho.

 

Loading

चाकरमान्यांसाठी खुशखबर! परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ३ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway Updates, दि.१२ सप्टें:  यावर्षी कोकणात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे काही अनारक्षित गाड्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. या गाड्यांमुळे जनरल डब्यांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.  सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

१) गाडी क्र. ०१०६९ / ०१०७० मुंबई सीएसएमटी – खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित):

गाडी क्रमांक ०१०६९ मुंबई सीएसएमटी – खेड स्पेशल (अनारिक्षित) मुंबई सीएसएमटी येथून १२/०९/२०२४ रोजी रात्री २३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:१५ वाजता खेडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०७० खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित) खेड येथून १६/०९/२०२४ रोजी पहाटे  ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 डबे  = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर  – ०२ .

 

२) गाडी क्र. ०१०७४ / ०१०७१  खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष:

गाडी क्रमांक ०१०७४ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १० वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०७१ पनवेल – खेड अनारक्षित विशेष पनवेलहून  १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी सकाळी १ वाजता सुटेल आणि खेडला त्याच दिवशी दुपारी १४.४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 डबे  = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर  – ०२ .

3) ट्रेन क्र. ०१०७२ / ०१०७३ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष :

गाडी क्रमांक ०१०७२ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी दुपारी १५:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.३० वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०७३ पनवेल – खेड अनारक्षित स्पेशल पनवेल येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी रात्री २१:१० वाजता सुटेल आणि  दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:०० वाजता खेडला पोहोचेल.

ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 डबे  = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर  – ०२ .

 

Loading

चाकरमान्यांसाठी खुशखबर! परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        
Konkan Railway Update: कोकणात यावर्षी गणेश चतुर्थीला गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पनवेल ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणार असून तिचा तपशील खालील प्रमाणे.
गाडी क्र. ०१४२८ / ०१४२७ मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्रमांक ०१४२८ दिनांक १५/०९/.२०२४ रोजी मडगाव जंक्शन येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल.ती त्याच दिवशी रात्री २२:१५  वाजता पनवेल येथे पोहचेल.
गाडी क्रमांक ०१४२७ दिनांक १५/०९/.२०२४ रोजी पनवेल जंक्शन येथून रात्री २२.४५ वाजता सुटेल.ती दुसऱ्या दिवशी दिवशी सकाळी  ११.०० वाजता मडगाव  येथे पोहचेल.
या गाडीचे थांबे: गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव येथे थांबेल. रोहा आणि पेण
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ डबे, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Loading

खुशखबर! जनरल तिकिटासोबत स्लीपर डब्यांतून प्रवास करा; चाकरमान्यांसाठी उद्यासाठी रेल्वेची अजून एक विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway Updates: कोकणात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची पहिली पसंदी असलेल्या रेल्वेने यावर्षी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी खूप चांगली दक्षता घेतली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने यावर्षी चांगल्या संख्येत अतिरिक्त गाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या प्रवाशांना आर्कषित तिकिटे भेटली नाहीत अशा प्रवाशांच्या सोयीकरिता अनारक्षित गाड्या चालविण्यात आल्या आहेत. या अनारक्षित गाड्यांत अजून एका गाडीची भर आहे. या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
०११८३ / ०११८४  सिएसएमटी – कुडाळ – सिएसएमटी अनारक्षित विशेष
गाडी क्रमांक ०११८३ विशेष गाडी दिनांक ०६ सप्टेंबर (शुक्रवारी) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून रात्री २२.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११८४ विशेष गाडी दिनांक ०७ सप्टेंबर (शनिवार) रोजी कुडाळ या स्थानकावरून सकाळी  १०.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली,  राजापूर, वैभववाडी,कणकवली आणि सिंधुदुर्ग
डब्यांची संरचना: जनरल – ०२, स्लीपर (अनारक्षित) – १४, एसएलआर – ०२ एकूण १८ डबे
विशेष म्हणजे या गाडीला १४ स्लीपर डबे जोडण्यात येणार असून ते पूर्णपणे अनारक्षित असणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना जनरल च्या तिकिटामध्ये स्लीपर कोच मधून प्रवास करता येणार आहे.

Loading

खुशखबर: गणेशभक्तांचा यावर्षीचाही प्रवास ‘टोल फ्री’ होणार

   Follow us on        

मुंबई, दि.४ सप्टें राज्यातील गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने यावर्षी गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने सर्व गणेश भक्तांना टोल माफ असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बँगलोर महामार्ग, इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोल नाक्यावर गणेश भक्तांना टोल माफी दिली जाणार आहे.

आज राज्य सरकाराच्या वतीने यासंबधी अधिसूचना काढून टोल प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या गणेश भक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेसना टोल नाक्यावर मोफत सोडले जाणार आहे. तसेच फ्री पाससाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search