Category Archives: कोकण

कोकण रेल्वेमध्ये ‘परवानाधारक पोर्टर’ पदांसाठी भरती; ४९ जागांसाठी अर्ज सुरू

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने रत्नागिरी क्षेत्रातील विविध रेल्वे स्थानकांसाठी ‘परवानाधारक पोर्टर’ (Licensed Porter) पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ७ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रकानुसार, प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

​विविध स्थानकांसाठी रिक्त जागा

​या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४९ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ८ जागा रत्नागिरी स्थानकासाठी, तर कणकवलीसाठी ७, कुडाळसाठी ६ आणि चिपळूणसाठी ५ जागा रिक्त आहेत. याशिवाय खेड आणि सावंतवाडी रोड येथे प्रत्येकी ४, तर माणगाव आणि संगमेश्वर रोड येथे प्रत्येकी ३ जागांसाठी भरती केली जाणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकासाठी २ जागा असून वीर, सावर्डा, आरवली रोड, आडवली रोड, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड आणि कणकवलीच्या लगतच्या स्थानकांसाठी प्रत्येकी १ जागेची आवश्यकता आहे.

​जातीनिहाय आरक्षण

​एकूण ४९ जागांचे वर्गीकरण आरक्षणाच्या नियमांनुसार करण्यात आले आहे. यामध्ये सामान्य प्रवर्गासाठी २१, ओबीसीसाठी १३, अनुसूचित जातीसाठी (SC) ७, अनुसूचित जमातीसाठी (ST) ४ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

​या नियुक्तीबाबत रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. परवानाधारक पोर्टर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. तसेच, परिस्थितीनुसार रेल्वे प्रशासन हा परवाना कधीही रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार एर्नाकुलम–अंबाला होळी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण रेल्वेने एर्नाकुलम जंक्शन–अंबाला कॅन्टोनमेंट दरम्यान एकमार्गी विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०६०७४ एर्नाकुलम जंक्शन – अंबाला कॅन्टोनमेंट वन-वे एक्सप्रेस स्पेशल ही गाडी ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी एर्नाकुलम जंक्शन येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता अंबाला कॅन्टोनमेंट येथे पोहोचणार आहे. ही सेवा एकदाच चालवण्यात येणार आहे.

या गाडीची रचना पुढीलप्रमाणे असेल:

१ एसी थ्री टियर डबा

१३ स्लीपर वर्ग डबे

३ जनरल सेकंड क्लास डबे

२ दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल जनरल सेकंड क्लास डबे

 

स्थानके, वेळ व तारीख:

एर्नाकुलम जंक्शन – ०९:५० (११ मार्च)

अलुवा – १०:१२ / १०:१४ (११ मार्च)

त्रिशूर – ११:०७ / ११:१० (११ मार्च)

शोरनूर – १२:०० / १२:०५ (११ मार्च)

तिरूर – १२:४३ / १२:४५ (११ मार्च)

कोझिकोड – १३:२२ / १३:२५ (११ मार्च)

कन्नूर – १४:४२ / १४:४५ (११ मार्च)

कासरगोड – १५:४८ / १५:५० (११ मार्च)

मंगळुरू जंक्शन – १७:०० / १७:१० (११ मार्च)

उडुपी – १९:३० / १९:३२ (११ मार्च)

कुंदापूर – २०:१० / २०:१२ (११ मार्च)

मूकांबिका रोड – बिंदूर – २०:४२ / २०:४४ (११ मार्च)

मुरुडेश्वर – २१:३० / २१:३२ (११ मार्च)

कुमटा – २२:१० / २२:१२ (११ मार्च)

कारवार – २३:१० / २३:१२ (११ मार्च)

१२ मार्च २०२६ (गुरुवार)

मडगाव – ००:१० / ००:२०

थिवीम – ०१:०० / ०१:०२

सावंतवाडी रोड – ०१:४० / ०१:४२

कणकवली – ०२:२० / ०२:२२

राजापूर रोड – ०३:१८ / ०३:२०

रत्नागिरी – ०४:३५ / ०४:४०

संगमेश्वर रोड – ०५:२५ / ०५:२७

चिपळूण – ०६:१० / ०६:१५

खेड – ०६:४० / ०६:४२

माणगाव – ०८:१२ / ०८:१४

रोहा – ०९:०० / ०९:०५

पनवेल – १०:२५ / १०:३५

वसई रोड – १२:३५ / १२:४५

सूरत – १५:२६ / १५:२८

वडोदरा – १७:०४ / १७:१२

कोटा – २३:५१ / २३:५६

१३ मार्च २०२६ (शुक्रवार)

मथुरा – ०४:१५ / ०४:२०

नवी दिल्ली – ०७:३५ / ०७:४५

अंबाला कॅन्टोनमेंट – ११:२५ (पोहोच)

कोकण रेल्वे प्रवासात साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला

   Follow us on        

कणकवली : मुंबईहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे  साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (वय ३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिठबावकर हे पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एलटीटी–मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडकडे निघाले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी सामान आवरत असताना दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण डब्यात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

दरम्यान गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र असा ऐवज आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची घोषणा

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण आणि सर्वांकष विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा, पर्यटन, कृषी आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा सरकारचा मानस आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे. कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने पर्यटन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन (विशेषतः आंबा, काजू, कोकम प्रक्रिया) आणि कौशल्य विकास या क्षेत्रांवर विशेष भर दिला जातो. सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी आणि सुमारे ३०० कोटींच्या निधीसह सुरू झालेल्या या योजनेच्या यशानंतर, आता सरकारने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित केली आहे. या नवीन टप्प्यामुळे कोकणच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक उद्योगांचा विस्तार होऊन पर्यायाने कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त होईल.

Mumbai konkan Ro Ro Service: विजयदुर्ग बंदरात ‘एम-२-एम प्रिन्सेस’ फेरीत ‘विघ्न’!

   Follow us on        

विजयदुर्ग: कोकणातील महत्त्वाच्या मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेत धावणाऱ्या ‘एम-२-एम प्रिन्सेस’ या फेरीबोटला गुरुवारी विजयदुर्ग बंदरात किरकोळ अपघात झाला. बंदरात उभ्या असलेल्या या फेरीबोटला एका टगबोटीची धडक लागल्याने बोटीचे थोडे नुकसान झाले.

ही रो-रो सेवा २ मार्चपासून सुरू झाली असून बुधवारी विजयदुर्ग येथे तिची दुसरी फेरी दाखल झाली होती. गुरुवारी दुपारी ही बोट पुन्हा मुंबईकडे रवाना होणार असतानाच बंदरातील एका टगबोटीने फेरीबोटला धडक दिली. या धडकेत बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले.

प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी मुंबईला जाण्यासाठी एकूण ३० प्रवाशांनी बुकिंग केले होते.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने सर्व प्रवाशांचे तिकीट पैसे तत्काळ परत केले. तसेच बोटीवरील काही कर्मचाऱ्यांना देवगडमार्गे खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईला पाठविण्यात आले. दिवसभर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा तपासणी करून ‘एम-२-एम प्रिन्सेस’ ही फेरीबोट प्रवाशांविना मुंबईकडे रवाना झाली.

या किरकोळ अपघातामुळे नव्याने सुरू झालेल्या या जलवाहतूक सेवेला तात्पुरता खंड पडला असला, तरी प्रवाशांच्या हिताचा विचार करून कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

सर्व बाबी अनुकूल, तरीही विलंब का? २० डब्यांच्या मुंबई–गोवा वंदेभारत एक्सप्रेसची प्रतीक्षा कायम

   Follow us on        

मुंबई: मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२९/२२२३०) या अत्यंत लोकप्रिय गाडीची क्षमता तातडीने वाढवून ती २० डब्यांची करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सर्वाधिक प्रवासी प्रतिसाद मिळणारी ही वंदे भारत सेवा सध्या केवळ ८ डब्यांसह चालवली जात असून, सुरुवातीपासूनच सातत्याने उच्च प्रवासी गर्दी असूनही क्षमतेत वाढ न होणे आश्चर्यकारक आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेतील अनेक वंदे भारत गाड्या ९० टक्क्यांहून अधिक प्रवासी भराव नोंदवताच १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुंबई–मडगाव मार्गालाही त्याच धर्तीवर वाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, नांदेड–मुंबई आणि सोलापूर–मुंबई वंदे भारत गाड्यांची मालकी व देखभाल जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे वर्ग झाल्याने मुंबईतील देखभाल सुविधा व पिट लाईनची क्षमता मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहे. त्यामुळे मुंबई–मडगाव वंदे भारतला कायमस्वरूपी २० डब्यांची रचना देण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उच्च मागणी असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अजूनही कमी क्षमतेची गाडी चालवली जाणे योग्य नसल्याचे सांगत रेल्वे बोर्ड तसेच संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन ही वाढ प्राधान्याने लागू करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी संबधित आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना ईमेल द्वारे केली आहे. कोकणातील प्रवासी या दीर्घकालीन आणि रास्त मागणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथे थांबा देणे गरजेचे

या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एका स्थानकावर, म्हणजे कणकवली येथेच थांबा आहे. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या या जिल्ह्यात अशा प्रीमियम गाड्यांना पुरेसे थांबे न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. तळकोकणातील सावंतवाडी येथे या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी गाडी सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठी सावंतवाडी थांब्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत हा थांबा मिळालेला नाही. ही गाडी २० डब्यांची करून तिला सावंतवाडी येथे थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा: सामान्यांसाठी “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला”!

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई ते विजयदुर्ग अशी ‘M2M’ रो-रो सेवा नुकतीच थाटामाटात सुरू केली. मात्र, या सेवेचे भाडेपत्रक पाहिल्यावर सामान्य कोकणी माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी या प्रवासाची अवस्था झाली असून, या भाडेवाढीमुळे कोकणचा सामान्य चाकरमानी पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणिताचा ‘झोल’: रस्ते प्रवास स्वस्त, जलप्रवास महाग!

कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या भाडेवाढीचे वाभाडे काढताना एक बोलके गणित मांडले आहे. जर एखादा मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या कारने (४ प्रवाशांसह) मुंबईहून कोकणात गेला, तर त्याचे गणित खालीलप्रमाणे बसते:

प्रवास साधन इंधन (Fuel) टोल (Toll) एकूण खर्च
खाजगी कार (रस्त्याने) ₹ ४,५०० (10kmpl) ₹ १,००० ₹ ५,५००/-

म्हणजेच, रस्त्याने जाण्यापेक्षा जलमार्गाने जाण्यासाठी कोकणी माणसाला तब्बल १०,५०० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

“सामान्य माणूस केंद्रस्थानी की फक्त श्रीमंत पर्यटक?”

विजयदुर्गला पोहोचल्यानंतर तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पुन्हा खाजगी वाहन किंवा एसटीचा खर्च वेगळाच. तसेच मुंबईत घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचण्याचा खर्च धरला, तर हे बजेट सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. मंत्र्यांनी हे दर ठरवताना नेमका कोणाचा विचार केला? केवळ आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या पर्यटकांचा की घाम गाळून कोकण जिवंत ठेवणाऱ्या चाकरमान्यांचा?

“कोकणवासीयांची परवड कधी थांबणार? विजयदुर्गला उतरल्यावर पुढे घरापर्यंतचा प्रवास खर्च जोडला तर हे आर्थिक गणित कोलमडते. ही सेवा सामान्यांसाठी नसून केवळ श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी आहे असे वाटते.”सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे.

त्यापेक्षा ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करा

कोकणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सामान्यांना न परवडणारी ‘रो-रो’ सेवा सुरू करण्यापेक्षा, रेल्वे प्रशासनाने ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करणे हाच खरा आणि व्यवहार्य तोडगा ठरेल, असे प्रतिपादन सुरेंद्र नेमळेकर यांनी केले आहे. या प्रस्तावानुसार, ही गाडी रात्री १० वाजता वसईवरून सुटावी, ज्यामुळे नोकरी-धंद्यावरून सुटलेला चाकरमानी सुखाने प्रवास करू शकेल. भिवंडी आणि कोपर रोडसह कोकणातील सर्व प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा दिल्यास ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय होईल. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या २२५ रुपयांत प्रवासी सकाळी सावंतवाडीपर्यंत पोहोचू शकतील आणि तिथून एसटीने आपापल्या घरी जाणे त्यांना अत्यंत स्वस्त पडेल. सकाळी तिथूनच ही गाडी परतीच्या प्रवासाला निघून रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा वसईला पोहोचू शकते. ही साधी पण प्रभावी योजना राबवल्यास कोकणवासीयांची वर्षानुवर्षांची आर्थिक परवड खऱ्या अर्थाने थांबेल.

मागणी पूर्ण! सावंतवाडी–रेल्वे स्थानक–बांदा बससेवा सुरू; बस फेऱ्यांचे वेळापत्रक असे असेल

   Follow us on        

बांदा :सावंतवाडी रेल्वे स्टेशन–निगुडे–सोनूर्ली–बांदा या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेत बससेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

निगुडे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या सेवेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना होणार असून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

नवीन बससेवेअंतर्गत दिवसातून एकूण ११ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार बस धावणार असून सावंतवाडी रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनूर्ली आणि बांदा या प्रमुख ठिकाणी थांबे असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहराशी थेट जोडणी मिळाली आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरू झाल्याने या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन बस फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१) बांदा – सकाळी ७:१५ (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी ८:००

२) सावंतवाडी – सकाळी ९:०० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सकाळी ९:४५

३) बांदा – सकाळी ९:५० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी १०:३५

४) सावंतवाडी – सकाळी ११:३० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १२:१५

५) बांदा – सकाळी ११:३० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १२:१५

६) सावंतवाडी – दुपारी १२:२५ (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १३:१० (१:१०)

७) बांदा – दुपारी १३:२० (१:२०) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १३:४५ (१:४५)

८) सावंतवाडी – दुपारी १४:०० (२:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १४:४५ (२:४५)

९) बांदा – दुपारी १४:५५ (२:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १५:४० (३:४०)

१०) सावंतवाडी – सायं. १७:०० (५:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सायं. १७:४५ (५:४५)

११) बांदा – सायं. १७:५५ (५:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सायं. १८:४० (६:४०)

 

 

 

विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण!

   Follow us on        

मुंबई: मुंबई आणि कोकणाला समुद्रमार्गे जोडणाऱ्या ऐतिहासिक M2M Princess रो-रो फेरीचा परतीचा प्रवास आज (२ मार्च २०२६) यशस्वीरित्या पूर्ण झाला. १ मार्च रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का येथून रवाना झालेली ही आशियातील सर्वात जलद रो-पॅक्स सेवा, विजयदुर्गहून परत येताना संध्याकाळी भाऊचा धक्का येथे सुखरूप पोहोचली.

या सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) दरम्यानचा प्रवास आता फक्त ६-७ तासांत होऊ शकतो, जे रस्त्याने १०-१२ तासांपेक्षा खूप कमी आहे. फेरीमध्ये ६२६ प्रवासी आणि कार, दुचाकी यांसारखी वाहने नेण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे.महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आदरणीय नितेश राणे यांनी या यशस्वी परतीच्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, हा केवळ प्रवास नव्हता तर मुंबई-कोकण नात्याला लाटांवरून नव्याने जोडणारा भावनिक सेतू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड आणि M2M Ferries यांनी हे स्वप्न साकार केले.

रात्रीच्या वेळी भाऊचा धक्का येथे उतरलेले प्रवासी, त्यांच्या सूटकेसेस आणि वाहनांसह दिसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ब्लू इकॉनॉमीला चालना देणारा ठरणार असून, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांसाठी हा उत्तम पर्याय ठरला आहे.

 

 

 

Konkan Railway: तिरुवनंतपुरम – मदार होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 06013 / 06014) अशी ही सेवा राहणार आहे.

गाडी क्र. 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन साप्ताहिक विशेष ४ मार्च २०२६ आणि ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ७:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 06014 मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ७ मार्च २०२६ आणि १४ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री ९:४० वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी रात्री १२:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.

ही विशेष गाडी कोल्लम, कायमकुलम, मावेलिकरा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिशूर, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, कुमटा, करवार, मडगाव, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, चित्तौडगड, भिलवाडा, बिजैनगर आणि अजमेर या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

या गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यात २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर/डी डबे समाविष्ट आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search