Category Archives: कोकण

दादर – रत्नागिरी गाडी बंद करण्यामागे दिलेले रेल्वेचे ‘स्पष्टीकरण’ पूर्णपणे अस्वीकार्य

मुंबई : पुन्हा एकदा मध्य रेल्वे प्रशासनाने ‘स्पष्टीकरण’ देत रत्नागिरी पॅसेंजर गाडीला लोकल विलंबाचे कारण ठरवले आहे. दिवा क्रॉसिंगवर मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे स्पष्टीकरण पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

मध्य रेल्वेचे ‘स्पष्टीकरण’

दादर – रत्नागिरी गाडी बंद करण्यामागे रेल्वेने आपले स्पष्टीकरण दिले आहे. दादर रत्नागिरी ही गाडी कोरोनानंतर सुरू करताना दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट केली गेली होती. याचे मुख्य कारण दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्यावेळेस सुमारे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते. त्यातून लोकल सेवेवर दुष्परिणाम होत होता, असे रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र हे स्पष्टीकरण अस्वीकार्य असून उत्तर भारतात जाणार्‍या गाड्यांना प्राधान्य दिल्यानंतर केलेली सारवासारव असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.

कोरोना पूर्व काळात मागील २० वर्षांपासून ही रत्नागिरी पॅसेंजर गाडी नियमित धावत होती. त्या काळात कधीही लोकल सेवेवर एवढा ‘मोठा’ परिणाम झाला नव्हता. आता अचानक काय बदलला? रेल्वे प्रशासनाला रात्रीच्या अंधारात काय ‘नवीन’ समस्या दिसली?

सर्वात मोठा प्रश्न – दिवा स्टेशनचा!

दिवा स्टेशनवरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांसाठी ट्रॅक क्रमांक ५ आणि ६ पूर्णपणे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी राखीव आहेत. मग लोकल गाड्यांना या रत्नागिरी पॅसेंजरमुळे कशी अडचण येते? एखादी पॅसेंजर गाडी क्रॉसिंगवर थांबली तरी ती ५-६ ट्रॅकवरच राहते ना? लोकलना तर वेगळ्या ट्रॅकवरून मार्ग मिळतो. मग ही ‘मोठी अडचण’ कुठून निर्माण झाली?

कल्याण स्टेशनची सत्यकथा…

कल्याण स्टेशनवर तर रोज दोन्ही बाजूने (मुंबई-कल्याण आणि कल्याण-पुढे) गाड्या एकाच वेळी मर्ज होतात. तेव्हा लोकल गाड्या खोळंबून बाजूला ठेवल्या जातात. तरीही त्या गाड्या चालू राहतात, वेळेवर सुटतात. प्रवासी तक्रार करतात पण रेल्वे प्रशासनाला ते ‘नॉर्मल’ वाटते. मग दिवा स्टेशनवर एका पॅसेंजर गाडीमुळे एवढा गोंधळ का?

पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘समजूत’ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रवासी आता म्हणतात – “२० वर्षे चाललेल्या गाडीला अचानक ‘समस्या’ का? ट्रॅक ५-६ मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना अडथळा कसा? कल्याणात मर्जिंग होऊनही लोकल चालतात, मग दिव्यात काय वेगळे आहे?”

मनसेचा अप्रत्यक्ष पण स्पष्ट संदेश

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने रेल्वे प्रशासनाकडे प्रतिनिधी पाठवून तातडीने गाडी पूर्ववत दादरपर्यंत सुरू करण्याची मागणी केली. रेल्वेने लोकल विलंबाचे कारण सांगत गाडी बंद/मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी मनसे म्हणते – कोकणवासीयांच्या सोयीसाठी ही गाडी आवश्यक आहे, आणि तिच्या जागी उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या प्राधान्य देणे हे मराठी माणसावर अन्याय आहे.

मागील २० वर्षे ही गाडी चालू होती, तेव्हा लोकलना एवढी अडचण नव्हती. आता अचानक “लोकल विलंब” म्हणून तिला लक्ष्य करणे हे रेल्वेचे तर्कशास्त्र मनसेला मान्य नाही. दिवा स्टेशनवर ५-६ ट्रॅक मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना कशी समस्या येते, हाही प्रश्न मनसेने केला आहे.

मनसेने सांगितले की, मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन आणि ट्रेन रोखण्याची कारवाई केली जाईल. हा इशारा रेल्वे आणि केंद्र सरकारला थेट आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकासाठी कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटरची मागणी

   Follow us on        

नवी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ व २ वर कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटर बसविण्याबाबत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) यांना बेलापूर येथे निवेदन सादर करण्यात आले.

“निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” फेसबुक ग्रुपच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, प्रवाशांच्या वाढत्या गैरसोयीचा मुद्दा यामध्ये मांडण्यात आला आहे. संगमेश्वर रोड हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई, गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक अत्यंत उपयुक्त ठरते.

मात्र, या स्थानकावर कोच पोजिशन दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना गाडी येण्यापूर्वी आपल्या आरक्षित डब्याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे गाडी थांबल्यानंतर प्रवाशांची धावपळ होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक वेळा योग्य डब्यापर्यंत वेळेत पोहोचता न आल्याने अपघाताचा धोका देखील निर्माण होत आहे.

इतर अनेक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असून संगमेश्वर रोड स्थानकावरही ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केली.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्यांना उन्हाळी हंगामासाठी मुदतवाढ

   Follow us on        

पनवेल: प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

०९०५७ सुरत–मंगळुरू जंक्शन विशेष (बुधवार, रविवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ दरम्यान धावणार आहे. तसेच ०९०५८ मंगळुरू जंक्शन–सुरत विशेष (गुरुवार, सोमवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते १ जून २०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे.

याशिवाय ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू जंक्शन विशेष (शुक्रवार) २७ मार्च २०२६ ते २९ मे २०२६ दरम्यान धावेल, तर ०९४२३ मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद विशेष (शनिवार) २८ मार्च २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या गाड्यांच्या थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, ०९०५७ या गाडीचे आरक्षण २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले आहे, तर ०९४२४ गाडीचे आरक्षण २६ मार्च २०२६ पासून उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in⁠� या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा RailOne/N TES अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

वैभववाडी – कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार; १०८ किमीच्या प्रकल्पाला गती मिळणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून माहिती समोर.

   Follow us on        

मुंबई, 25 मार्च 2026 : कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी दरम्यान 108 किमी लांबीच्या नव्या रेल्वे मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

डीपीआर तयार झाल्यानंतर आता या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि इतर संबंधित भागधारकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्यानंतर नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आदी संस्थांकडून आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विविध स्तरांवरील मंजुरी आणि मूल्यांकनांवर प्रकल्पाची अंतिम अंमलबजावणी अवलंबून असणार आहे.

सध्या कोल्हापूर स्थानकावरून 30 रेल्वेगाड्या धावतात, ज्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांशी थेट जोडणी उपलब्ध आहे. वंदे भारत, कोयना, महालक्ष्मी, हरिप्रिया आणि दीक्षाभूमी एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्या कोल्हापूरला सेवा देत आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जमीन अधिग्रहण, वनखात्याची मंजुरी, अतिक्रमण हटवणे, भौगोलिक परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि निधीची उपलब्धता हे महत्त्वाचे घटक ठरतात. तसेच मार्गावरील वाहतूक, कनेक्टिव्हिटी, सामाजिक-आर्थिक गरजा आणि राज्य व केंद्र सरकारांकडून होणारी मागणी यावरही प्रकल्पाच्या मंजुरीचा निर्णय घेतला जातो.

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! सुरत–मंगळुरू विशेष गाडीला नवीन वेळापत्रकासह कायमस्वरूपी एक्सप्रेसचा दर्जा

   Follow us on        

Konkan Railway: भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत 09057/09058 सुरत–मंगळुरू विशेष गाडीला आता कायमस्वरूपी “सुरत–मंगळुरू एक्सप्रेस” म्हणून नियमित करण्यास मंजुरी दिली आहे. 20 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, देशभरातील एकूण 10 जोड गाड्यांचे नियमितीकरण करण्यात येत असून त्यात या गाडीचा समावेश आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, 19057 सुरत–मंगळुरू एक्सप्रेस ही गाडी सुरत येथून बुधवारी आणि रविवारी सायंकाळी 7:35 वाजता सुटून मंगळुरू येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:45 वाजता पोहोचेल. तर 19058 मंगळुरू–सुरत एक्सप्रेस ही गाडी मंगळुरूहून गुरुवारी आणि सोमवारी रात्री 10:30 वाजता सुटून सुरत येथे मंगळवारी व शुक्रवारी रात्री 11:45 वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, भाटकल, उडुपी, सुरथकल आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तसेच महाराष्ट्र–कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून नियमित सेवा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

दादर – रत्नागिरी गाडी बंद होऊ देणार नाही; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दादर-रत्नागिरी प्रवासी गाडी बंद होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. केंद्रीय रेल्वेने या गाडीचा दादर स्टेशनवरील प्रस्थान स्लॉट रद्द करून तो दादर-गोरखपूर एक्सप्रेसला कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गाडी आता दिवा स्टेशनवरून सुरू होणार असल्याने कोकणातील दररोजच्या प्रवाशांना, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होणार होती.

या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (एमएनएस) आज, २४ मार्च २०२६ रोजी जोरदार विरोध प्रदर्शन केले. कोकणी माणसांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी १५ दिवसांत गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी बंद होऊ देणार नाही, असे सांगितले.

कोकण रेल्वे मार्गावरील ही प्रवासी गाडी स्थानिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देण्याच्या रेल्वेच्या धोरणामुळे स्थानिक सेवांवर परिणाम होत असल्याबाबत सातत्याने वाद उफाळून येत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली असून, जर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलने तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

”दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह कोविड काळात बंद झालेल्या गाड्या सुरू करा अन्यथा…” मनसेचा रेल्वे प्रशासनाला इशारा

   Follow us on        

मुंबई: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्र. ५०१०३/४) रद्द करून त्याऐवजी दादर-गोरखपूर गाडी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाचा विरोध केला आणि मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

​स्थानिक प्रवाशांच्या अडचणींकडे दुर्लक्ष

​नितीन सरदेसाई यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. कोविड काळात बंद झालेल्या मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस आणि पुणे-भुसावळ पॅसेंजर यांसारख्या अनेक गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अशातच आता दादर-रत्नागिरी ही कोकणवासीयांची हक्काची गाडी रद्द करून त्याऐवजी गोरखपूर गाडी सुरू करणे, हा कोकणवासीयांवर अन्याय आहे.

​प्रमुख मागण्या आणि इशारा:

​दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादर स्थानकावरूनच सोडण्यात यावी.

​कोविड काळात रद्द करण्यात आलेल्या महाराष्ट्रांतर्गत गाड्या पुन्हा त्वरित सुरू कराव्यात.

​स्थानिक प्रवाशांना डावलून परराज्यातील प्रवाशांना झुकते माप देणे रेल्वेने थांबवावे.

​”कोकणवासीयांना आणि महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा दुजाभाव रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. रेल्वेने या निर्णयाची तात्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा सज्जड दम नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.

​या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री (नवी दिल्ली) आणि कोकण रेल्वेचे व्यवस्थापक (बेलापूर) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कोकणवासीय आणि मुंबईकर प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, आता रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकणकरांची गाडी वाचविण्यासाठी मनसे आक्रमक

   Follow us on        

मुंबई : दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन बंद करून त्याच वेळापत्रकात आणि प्लॅटफॉर्मवरून दादर-गोरखपूर एक्सप्रेस गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे.

उद्या, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांसह कोकणवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेने केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा कायमची बंद करून तिच्या जागी उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाणारी एक्सप्रेस सुरू केल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी दादरहून सुटणारी ही पॅसेंजर आता दिवा जंक्शनवरून चालवली जात असल्याने कोकणवासीयांना अतिरिक्त प्रवास आणि असुविधा भोगावी लागत आहेत. हा निर्णय कोकणातील स्थानिकांच्या हक्कांवर हल्ला असल्याचे मत मनसेने व्यक्त केले आहे.

“प्रश्न जिथे जनतेचा मार्ग, तिथे मनसेचा” या घोषणेनुसार मनसे या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत आहे. कोकणातील भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणवासी आणि महाराष्ट्र सैनिकांनी या आंदोलनात सामील होऊन आपली एकजूट दाखवावी, असे मनसेने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधावा.

‘ओंकार’ला महाराष्ट्रातच रोखण्यासाठी गोवा वनविभागाची अनोखी युक्ती

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमाभागात सध्या वन्य हत्तींचा वावर चिंतेचा विषय ठरत असतानाच, गोवा वनविभागाच्या एका धक्कादायक मोहिमेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘ओंकार’ नावाचा वन्य हत्ती गोव्याच्या हद्दीत येऊ नये, यासाठी गोव्याचे वन कर्मचारी चक्क महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन त्याला गुळ, केळी आणि विविध फळे खाऊ घालत असल्याचे समोर आले आहे.

गोव्याने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली असली, तरी यामुळे महाराष्ट्रातील शेती आणि बागायती धोक्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना महाराष्ट्र आणि सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वन्य हत्तीला अशा प्रकारे खाद्य देऊन एकाच भागात रोखून धरले जात असताना स्थानिक वनाधिकाऱ्यांनी याला ‘मूक संमती’ दिल्याचे चित्र दिसत आहे. डोळे उघडे असूनही गांधारीची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र वनविभागाच्या या उदासीनतेमुळे सीमाभागातील नागरिक संतप्त झाले असून, हत्तीच्या या कायमस्वरूपी वास्तव्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

Photo Credit – AI

Konkan Railway: लागून आलेल्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई, दि. २३ मार्च : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वेने मुंबई CSMT आणि मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे क्रमांक ०११२९ मुंबई CSMT–मडगाव विशेष गाडी ३ एप्रिल (शुक्रवार) आणि ५ एप्रिल (रविवार) रोजी मुंबई CSMT येथून रात्री १२:२० वाजता सुटणार असून त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तसेच, रेल्वे क्रमांक ०११३० मडगाव–मुंबई CSMT विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी मडगाव येथून सायं. ४:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कर्णाली या स्थानकांवर थांबणार आहेत.

गाडीची रचना एकूण २२ डब्यांची असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ५, स्लीपर – १०, जनरल – ४ आणि एसएलआर – २ डबे असतील.

या विशेष गाडीचे आरक्षण २४ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रे, इंटरनेट व IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

एप्रिल महिन्यात सुरवातीच्या आठवड्यात हनुमान जन्मोत्सव, गुड फ्रायडे आणि शनिवार – रविवार सुट्ट्या लागून आल्याने प्रवाशांची गर्दी होणे अपेक्षित असल्याने ही गर्दी कमी करण्याच्या हेतूने या गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search