Mumbai Goa Highway Accident: गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेतएर्टिगा आणि बॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगाचालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागलावॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आलेCategory Archives: कोकण
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.
Special Trains: नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी हजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०४०८२/०४०८१ हजरत निजामुद्दीन -तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल:
गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस २८ डिसेंबर २०२४ (शनिवार) रोजी हजरत निजामुद्दीन येथून १९.२० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४०८१ तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रलवरून ३१ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी ०७.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.
डब्यांची रचना: एसी टू टायर कोच -०५ , एसी थ्री टायर कोच- १० , जनरल सेकंड क्लास कोच-०२ , सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन) -०१ आणि लगेज कम ब्रेक व्हॅन- ०१
या गाडीला कोकणात पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी या मोजक्याच स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे.
या गाडीच्या वेळा आणि थांब्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत
या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक २५ डिसेंबर रोजी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.
कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.
या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.
ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.
जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.
पणजी: जैसलमेर येथे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यासाठी ९ हजार ७०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची मागणी नोंदविली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, पश्चिम घाटाचे संवर्धन आणि राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांसाठी त्यांनी सहाय्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासाठी गोवा राज्यातर्फे त्यांनी निवेदन सादर केले आहे.
रेल्वेसाठी ५ हजार कोटींचे साकडे
कोकण रेल्वे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना (मंगळूर ते मुंबई) जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे दुहेरीकरण काही भागांतच पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांचे विशेष साहाय्य मंजूर करावे. जुने गोवे तसेच पेडणे येथे १९९२-१९९७ दरम्यान बांधलेल्या जुन्या बोगद्यांची स्थिती धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सलग संपर्कासाठी नवीन बोगद्यांच्या बांधणीसाठी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे अत्यावश्यक बनले आहे. सध्या वीर ते मडगाव दरम्यान एकपदरी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असूनही गाड्या वाढविणे शक्य होत नाही. याचा परिमाण कोकण आणि गोवा राज्याच्या विकासावर पर्यटनावर होत आहे. या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र अजूनपर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला नेहमीच डावलले गेले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. केंद्राची आणि चार राज्याची भागीदारी असलेल्या कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गोवा राज्याने या आधीच आपली संमत्ती दर्शवली आहे.
सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दिनांक १४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना पत्र मोहीम आदींचा आढावा घेण्यात आला त्याच बरोबर काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित केले गेले. त्यात प्रामुख्याने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला, त्यानंतर सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस साठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी योग्य तो पाठपुरावा करावा त्यासाठी संघटनेकडून त्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्या संदर्भात चर्चा झाली, सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, नागपूर – मडगाव एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आदी गाड्यांना येत्या १५ दिवसात थांबा मिळावा, तसेच आजच्या घडीला कोल्हापूर – संकेश्वर – बेळगाव असा रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू आहे, काही महिन्यात त्या रेल्वे मार्गाचे काम देखील सुरू होईल त्यामुळे सावंतवाडी ते संकेश्र्वर असा रेल्वे मार्ग होण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा जेणे करून कोकणातून बेळगाव आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळेल,
आदी ठराव घेण्यात आले. या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण नाही झाल्या तर २६ जानेवारी २०२५ ला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले. त्याच बरोबर गाडी क्रमांक ०११५१/५२ मुंबई – करमळी विशेष गाडीचा सावंतवाडी थांब्यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री नितेश राणे आणि कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री शैलेश बापट यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात मेल मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव मिहिर मठकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विनोद नाईक, सौ सायली दुभाषी, नंदू तारी,सुभाष शिरसाट , तेजस पोयेकर,स्वप्नील नाईक, रामकृष्ण मुंज, विहंग, भूषण, सागर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी जनता उपस्थित होते.