Category Archives: कोकण

बेळगाव-चंदगड-सावंतवाडी रेल्वेसाठी प्रयत्न करणार: खा. धनंजय महाडिक

   Follow us on        

कोल्हापूर: बेळगाव-चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन. रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खा. धनंजय महाडिक यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

बेळगाव-चंदगड, सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग ११४.६ कि.मी.चा असून जवळपास १८०५ करोडचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल. या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदने दिली आहेत.

खा. महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाके आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०% जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा; नितेश राणे यांचा धक्कादायक खुलासा

   Follow us on        

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकला आहे. महत्वाच्या देवस्थानावर ही दावा केला गेला आहे, असं विधान राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दावा केलेल्या जागांची यादी समोर आली असून देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांचा समावेश या यादीत आहे. १५६ ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केल्याचं समोर येत आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले होते की, या बोर्डानं दावा ठोकल्यावर आपण न्याय देखील मागू शकत नाही. या काद्यात कोर्ट, अधिकाऱ्यांसह सर्व मंडळी ही विशिष्ट समाजाची असणारी आहेत. या कायद्याचा विचार अन् माहिती आपण घेतली पाहिजे व सावध झालं पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव विधेयक पारीत करत आहेत. इस्लामिक राष्ट्रामध्ये असा कोणाही वक्फ बोर्ड नसताना आपल्याच देशात का? हा खरा प्रश्न आहे. हिंदुराष्ट्रात अशा प्रकरचे इस्लामीकरण षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही. देशात आणि राज्यात हिंदूच सरकार आहे. हिंदू नीही धर्माभीमान बाळगून 100% कडवट पणा दाखवून पुढे यावे, असे नितेश राणे म्हणाले होते. तसेच जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकल्याचे विधान त्यांनी आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेत केला होता.

सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये हिंदू धर्म परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी धक्कादायक माहिती समोर आणलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० टक्के जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डने दावा केल्याचा खुलासा केला होता. तसेच त्यात जिल्ह्यातील देवस्थानं असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केल्याची यादी आपल्या हाती लागली आहे. जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर दावा केल्याचं दिसून येत आहे. यात शेतजमिनीवर दावा केल्याचं देखील दिसत आहे.

 

Konkan Coastal Highway: रेवस ते रेड्डी महामार्गाच्या ‘वाटेत’ पहिला अडथळा

   Follow us on        

अलिबाग: प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे.  एमएसआरडी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्या १९८० च्या आराखड्यानुसार मार्गिका द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. मात्र या पौराणिक काळातील द्रोणागिरी पर्वताला पोखरून करंजा-रेवस सागरी सेतूची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यामुळे उरणकर, भाविक तसेच गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नव्याने हा मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन १४ ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. २ हजार ४७८ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे. नियोजित रेड्डी ते रेवस मार्गापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९८० साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती. यावेळी भूसंपादनाची प्रकिया राबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव सत्ताबदल होऊन अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या पुलाचे काम बंद झाले होते.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला आठवडाभर मुदतवाढ

   Follow us on        
कोंकण रेल्वे: कोकण रेल्वे मार्गावर नववर्षासाठी सोडण्यात आलेल्या अहमदाबाद थिवीम गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात आलेली  हि गाडी आता अजून आठवडाभर चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्र. ०९४१२ अहमदाबाद – थिविम द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी दिनांक ०५ जानेवारी २०२५ (रविवार) आणि ०८ जानेवारी २०२५ (बुधवार) तर गाडी क्र. ०९४११ थिविम – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी  दिनांक ०६ जानेवारी २०२५ (सोमवार)आणि ०९ जानेवारी २०२५ (गुरुवार) या दिवशी आपल्या पूर्वनियोजित थांब्यासह आणि  वेळापत्रकासह चालविण्यात येणार आहे.
   Follow us on        

ब्रेकिंग: ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

   Follow us on        
Konkan Railway : आडवली येथे वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. या मार्गावरील दोन्ही  दिशेची  वहतूक बंद झाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली असून अनेक गाड्या दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या आहेत.
मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दीड तासापासुन उभी आहे तर मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे दीड तासांपासून थांबलेली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी दोन तासांपासून रत्नागिरी येथे उभी आहे. तर जनशताब्दी अडीच तासांपासून आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली आहे.
ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम यद्धपातळीवर सुरु असून पुढील दीड ते दोन तासात वाहतूक पुर्वत होईल असे कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.

Konkan Railway: मंगळुरु, जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस ठाणे-दादरपर्यतच धावणार

   Follow us on        
Konkan Railway: मुंबई सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या कामांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांचे थांबे बदलण्यात आले. ३१ जानेवारीपर्यंत मंगळुरु एक्स्प्रेस ठाणे तर जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील १२, १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांना ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत अंतिम थांबा देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण न झाल्याने या गाड्यांचे अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत. रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास ३१ जानेवारीपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत असेल.
गाडी क्र. २२१२० मडगाव जं. मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा प्रवासही ३१ जानेवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आलेला आहे. गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसही ३१ जानेवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

नागपूर – मडगाव एक्सप्रेसचे सावंतवाडीत जोरदार स्वागत

   Follow us on        
सावंतवाडी: नागपूर – मडगाव एक्सप्रेस  या गाडीला मुदतवाढ देताना रेल्वे प्रशासनाने तिला सावंतवाडी येथे थांबा मंजूर केला.  कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या लढ्याला यश मिळताना दिसत असून त्याचाचं एक भाग म्हणून नागपूर – मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला. आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) च्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी स्थानकावर या गाडीचे जोरदार स्वागत केले.
आज ही ट्रेन पहिल्यांदाच सावंतवाडी स्थानकात थांबली, या एक्सप्रेस गाडीचे आज सायंकाळी सावंतवाडी रेल्वे येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने गाडी समोर श्रीफळ फोडून मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. यावेळी मोटरमनसह उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.या ट्रेनला सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे आता सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ले, दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या श्री क्षेत्र शेगावला जाण्यासाठी कोकणवासीयांना या गाडीचा फायदा होणार आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा मंजूर होताचं क्षणी माडखोल येथील रेल्वे प्रेमी प्रितेश भागवत यांनी सावंतवाडी स्थानकातून शेगाव दौऱ्यासाठी ३० तिकीटे बुक करुन या गाड्याच्या सावंतवाडीतील थांब्याबाबत रेल्वेचे आभार मानले.
आज झालेल्या मडगाव-नागपूर एक्सप्रेस च्या स्वागतासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी सागर तळवडेकर, मिहीर मठकर, नंदू तारी, सुभाष शिरसाट, गोविंद परब, मेहुल रेडीज, साहील नाईक, राशी परब, विहांग गोठोस्कर, तेसज पोयेकर, राज पवार, शुभम सावंत, रुपेश रेडीज यांच्यासह सावंतवाडी रिक्षा संघटना पदाधिकारी रेल्वेप्रेमी प्रितेश भागवत, नितेश तेली, नितिन गावडे उपस्थित होते.
सावंतवाडी थांबा मिळण्याबाबत संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार मा. श्री. नारायण राणे, आमदार मा.श्री. दिपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री मा.श्री. सुरेश प्रभू व माजी खासदार श्री. विनायक राउत यांचे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून जाहीर आभार मानण्यात आले.

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; ७ प्रवासी जखमी

   Follow us on        

Mumbai Goa Highway Accident: गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेतएर्टिगा आणि बॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगाचालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागलावॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले

Revas-Reddi Coastal Highway: रेवस रेडी सागरी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होणार – खासदार सुनील तटकरे

   Follow us on        
अलिबाग: कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार्‍या रेवस रेडी सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामात  गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या महामार्गामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होवू शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रिनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुसर्‍या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील 12 बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत.
या 12 विकसीत होणार्‍या बंदरांमध्ये पालघरचे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसीत होईल. हे बंदर जेएनपीटीच्या बरोबरीचे विकसीत होणारे बंदर ठरेल. यामुळे जलवाहतूकीला मोठा वाव मिळणार आहे. याशिवाय पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 48 छोटी बंदरे विकसीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांजवळील 12 शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारचे औद्योगिक प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र यांच्याशी सागरमालातील विविध प्रकल्पांचा समन्वय साधला जाणार असल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल.

सावंतवाडीकरांना रेल्वेकडून नववर्षाची भेट; नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी येथे थांबा मंजूर

   Follow us on        
Konkan Railway:सावंतवाडी पंचक्रोशी प्रवाशांना रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासनाने नागपूर  ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणाऱ्या नागपूर -मडगाव-नागपूर या द्विसाप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देताना सावंतवाडी स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.
गाडी क्रमांक ०११३९/०११४० नागपूर-मडगाव-नागपूर विशेष गाडीची मुदत या महिन्याच्या अखेरीस समाप्त होणार होती. मात्र तिला आता पुढील सूचना येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर- मडगाव या गाडीला दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून तर गाडी क्रमांक ०११४० मडगाव नागपूर या गाडीला दिनांक ०२ जानेवारी २०२५ पासून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे थांबा मंजूर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश. 
सुरवातीला या गाडीला सावंतवाडी सावंतवाडी येथे थांबा देण्यात आला होता. मात्र चांगल्या प्रमाणात प्रवासी संख्या असतानाही या गाडीचा सावंतवाडी येथील थांबा रद्द करण्यात आला होता. त्यावेळेपासून हा थांबा पूर्ववत करण्यात यावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने अनेकदा निवेदने दिली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. संघटने तर्फे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी रेल्वे प्रशासनाचे,  कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट, आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत
या गाडीचे सावंतवाडी स्थानकावरील वेळापत्रक
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search