Kokan Railway Updates:गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवत आहेत. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी पाहता याही गाड्या अपुर्या पडताना दिसत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या डब्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
खालील गाड्यांना यापुर्वी जाहीर केलेल्या डब्यांव्यतिरिक्त प्रत्येकी २ सेकंड स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत.
दिनांक ०३ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ विशेष
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४११ कुडाळ – अहमदाबाद विशेष
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरु जं. विशेष
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरु जं. – अहमदाबाद विशेष
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरु करण्यात आलेली वांद्रे (टी) – मडगाव जं- वांद्रे (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसची नियमित फेरी आजपासून सुरु झाली असून आज सकाळी गाडी क्रमांक 10116 मडगाव जं.-वांद्रे(टी) द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस मोठ्या उत्साहाने मडगाववरुन मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
गोवा सरकारचे कायदा आणि न्यायव्यवस्था, पर्यावरण, बंदरे आणि विधिमंडळ कामकाजाचे कॅप्टन श्री.अलेक्सो ए. सिक्वेरा यांच्या तर्फे या गाडीला हिरवा बावटा दाखविणायत आला. यावेळी मडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिगंबर कामत, नवलीम विधानसभा मतदार संघाचे आमदार उल्हास तुयेकरआदी मान्यवर उपस्थित होते.
Konkan Railway News: मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे दिवाळी विशेष गाड्यांची यादी जाहीर केली आहे. देशाचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला गाडयांना मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासन नियमित गाड्या व्यतिरिक्त काही विशेष गाड्या चालविते. यावर्षीही मध्यरेल्वे प्रशासनने दिवाळीसाठी काही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या दिनांक २५ ओक्टो. ते ०७ नोव्हें. दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या.
1) 01463/01464 एलटीटी-कोचुवेली विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01463 विशेष गाडी दिनांक २४ ऑक्टो. ते १४ नोव्हे. पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून संध्याकाळी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.४५ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 विशेष गाडी दिनांक २६ऑक्टो. ते १६ नोव्हे. पर्यंत दर शनिवारी कोचुवेली या स्थानकावरून संध्याकाळी १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २१.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – ०६, सेकंड स्लीपर – ०८, जनरल – ०३, एसएलआर – ०१, जनरेटर कर – ०१ असे मिळून एकूण २१ LHB डबे.
2) 01175/01176 पुणे – सावंतवाडी – पुणे विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01175 विशेष गाडी दिनांक २२ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर मंगळवारी पुणे या स्थानकावरून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01176 विशेष गाडी दिनांक २२ ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर बुधवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – १५, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे.
3) 01177/01178 पनवेल – सावंतवाडी – पनवेल विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01177 विशेष गाडी दिनांक २२ ऑक्टो. ते १३ नोव्हे. पर्यंत दर बुधवारी पनवेल या स्थानकावरून सकाळी ०९.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.०५ वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01178 विशेष गाडी दिनांक २३ ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर गुरुवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.४०वाजता पनवेल येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – १५, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे.
4) 01179/01180 एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01179 विशेष गाडी दिनांक १८ ऑक्टो. ते ०८ नोव्हे. पर्यंत दर शुक्रवारी एलटीटी, मुंबई या स्थानकावरून सकाळी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01180 विशेष गाडी दिनांक १८ ऑक्टो. ते ०८ नोव्हे. पर्यंत दर शुक्रवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटी, मुंबई येथे पोहोचेल.
Konkan Railway News:रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांचा विचार करायला सुरवात केली असून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर आता जनरल डब्यात करण्याचा सपाटा भारतीय रेल्वेने लावला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अजून जून एका गाडीच्या जनरल डब्यांत वाढ करून डब्यांची संरचना बदलण्यात आली आहे.
१६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, स्लीपर – १२, जनरल – ०२, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०४, स्लीपर – १२, जनरल – ०३, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसीच्या एका कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
Konkan Railway: येत्या आठवड्यात दक्षिण रेल्वे आणि मध्य रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक नसला तरी या या दोन्ही विभागातून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकांवर त्याचा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी – भुसावळ विभागात लूपलाइनच्या विस्ताराचे काम हाती गेले असल्याने खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२७४१ वास्को दा गामा – पाटणा एक्सप्रेस आणि दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०११४० मडगाव जं. – नागपूर विशेष या दोन्ही गाड्यांचा वेग मध्य रेल्वे विभागात १ तास ३० मिनिटे नियमित केला जाणार असल्याने त्या उशिराने धावणार आहेत.
याच बरोबर दक्षिण रेल्वेच्या अंगमली यार्डमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे. या कारणास्तव दक्षिण रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
या कामा दरम्यान कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या खालील तीन गाड्यांचा वेग दक्षिण रेल्वे विभागादरम्यान नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या उशिराने धावणार आहेत.
1)दिनांक ३१ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस २ तास १० मिनिटे.
2)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०९०९ कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेस २ तास २० मिनिटे
3)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) १ तास ५० मिनिटे
Konkan Railway: काल दुपारी बोरिवली स्थानकात शुभारंभ करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेसचे कोकणातील स्थानकांत जंगी स्वागत करण्यात आले. ही गाडी उशिरा सुटल्याने ती कोकणातील स्थानकांवर उशिरा पोहचली असली तरी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजर राहून या गाडीचे स्वागत केले.
वीर स्थानक
वीर स्थानक 1
चिपळूण स्थानक
चिपळूण स्थानक 1चिपळूण स्थानक 2
रत्नागिरी स्थानक
रत्नागिरी स्थानक 1रत्नागिरी स्थानक 2
सावंतवाडी स्थानक
सावंतवाडी स्थानक 1
सावंतवाडी स्थानक 2
वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेस मध्यरात्री अडीच वाजता सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीचे सावंतवाडीत जंगी स्वागत केले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, सल्लागार महेश परुळेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, राज पवार आदी उपस्थित होते.
सावंतवाडी: नुकतेच रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी कायमस्वरुपी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, सिंधुदुर्ग,आणि कणकवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे, मुंबई पासून कोकणापर्यंत सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी या गाडी साठी प्रयत्न केले होते.परंतु सध्या या गाडीचे वेळापत्रक बघता ही गाडी काही अंशी गैरसोयीची असेल असे काही रेल्वे अभ्यासकांना वाटते. त्यामुळे सदर रेल्वेचे वेळापत्रक नियमित वेळापत्रकात (सध्या पावसाळी वेळापत्रक लागू आहे)बदल करावा असे अभ्यासक आणि प्रवासी सांगत आहेत.
ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यासाठी संघटनेने पत्र व्यवहार आणि हजारो मेल प्रशासनाला केलेले होते. संघटनेने ही गाडी बोरिवली – वसई – सावंतवाडी अशी सुरू करावी या साठी प्रयत्न केले होते. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस हे अपूर्ण असल्याकारणाने सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नसल्याने ही गाडी मडगाव पर्यंत धावणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते.आणि अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकात देखील उभी राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी प्रयत्नशील आहे आणि सदरचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे संपर्क प्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली.
ही गाडी सुरू होण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल, खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण साहेब, आमदार सुनील राणे, माजी खासदार श्री विनायक राऊत यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले असून या गाडीचा लाभ वसई, भिवंडी, बोरिवली येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना नक्की होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
मुंबई: वांद्रे – मडगाव दरम्यान धावणाऱ्या नवीन गाडीचा शुभारंभ उद्या दिनांक २९ ऑगस्ट रोजी बोरिवली येथे होणार आहे. त्यासाठी शुभारंभ Inaurgual विशेष गाडीला दुपारी १.२५ वाजता बोरिवली येथे हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. या सोहळ्याला कोकणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर मुंबई भाजप पक्षातर्फे करण्यात आले आहे.
गुरुवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता बोरीवली वरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं ०९१६७ असून त्याचे आरक्षण बुधवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पीआरएस आणि आरक्षण खिडक्यांवर सुरु होणार आहे.
ही गाडी टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०२, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०१, स्लीपर – ०६, जनरल – ०३, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण १५ एलएचबी डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.
शुभारंभ विशेष गाडीचे वेळापत्रक
बोरिवली – १३.२५ (गुरुवार)
वसई – १४.१०
भिवंडी – १५.०५
पनवेल – १६.०७
रोहा – १७.३०
वीर – १८.००
चिपळूण – १९.२५
रत्नागिरी – २१.३५
कणकवली – ००.०१ (शुक्रवार)
सिंधुदुर्ग – ००.२०
सावंतवाडी – ०१.००
थिवी – २.००
करमाळी – २.३०
मडगाव – ०४.००
हीच गाडी वेगळ्या वेळापत्रकावर आणि २० डब्यांच्या संरचनेसह पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार वान्द्रे – मडगाव (गाडी नं १०११५) एक्सप्रेस आणि दर मंगळवार व गुरुवार मडगाव – वान्द्रे एक्सप्रेस (गाडी नं १०११६) एक्सप्रेस अशी चालविण्यात येणार आहे.
Konkan Railway: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नाने चालू होणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचा प्रस्ताव आणि कच्चा आराखडा कोकण रेल्वे तर्फे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पाश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला आज रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे.
ही मजुरी मिळाल्याने आता फक्त कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे.
या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
Train No. 10116 Madgaon – Bandra (T) Express
मडगाव ते बांद्रा दरम्यान धावताना ही गाडी आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर
Train No. 10115 Bandra (T) – Madgaon Express
बांद्रा ते मडगाव दरम्यान धावताना ही गाडी बांद्रा येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे.
या गाडीच्या प्रास्तावित थांब्या व्यतिरिक्त कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे अंतिम थांबे – करमाळी, थिवी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, वीर, रोहा, पनवेल, भिवंडी रोड, वसई रोड आणि बोरिवली
या गाडीला एकूण २० LHB स्वरूपाचे डबे असणार असून त्यात सेकंड स्लीपर ८ डबे, थ्री टायर एसीचे ३ डबे, थ्री टायर एसी इकॉनॉमीचे २ डबे, टू टायर एसीचा १ डबा, जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०१ समावेश आहे.
रत्नागिरी:कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विविध श्रेणीच्या पदांसाठी अधिसूचना क्र. CO/P-R/01/2024 दिनांक 16/08/2024 रोजी जाहीर झालेली झाली आहे. अधिसूचनेनुसार दिनांक 16/09/2024 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/10/2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत आहे. परंतु सदरच्या अधिसूचनेचे अवलोकन करता एकिकडे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊ असे आवाहन केले जाते आणि दुसरीकडे प्रकल्पग्रस्तेतर उमेदवार याना अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. याचाच अर्थ कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नियुक्ती प्रक्रियेसंबंधी प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि कोकण रेल्वे प्रशासनावरचा अविश्वास दृढ झाला आहे अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम, सचीव श्री. अमोल सावंत आणि सहसचीव श्री. प्रभाकर हातणकर यांनी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या सन 1989-90 मध्ये कवडीमोल भावाने म्हणजेच रु. 150/- प्रति गुंठा या भावाने विकत घेतल्या गेल्या आहेत. आता त्या जमिनीची सदर किंमत प्रति गुंठा दहा लाख रुपये आहे. त्या वेळेला तेव्हाचे अर्थमंत्री माननीय मधु दंडवते साहेब व रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांनी जेव्हा कोकण रेल्वे प्रकल्पास मंजूरी देऊन स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळ स्थापन केले तेव्हा ज्या भुमिपुत्रानी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत, त्यांना प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस विनाअट कोकण रेल्वेमध्ये नोकरीत घेतली जाईल अशी घोषणा केली होती व तसे त्यांचे स्वप्नही होते. परंतु आजतागायत तसे झालेले नाही. सदर पॉलिसी 1996 पर्यंत लागू होती. परंतु त्यानंतर आलेले व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी सदर पॉलिसी संबंधित भरती अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहमतीने काढून टाकली. ह्याचाच अर्थ परप्रांतीय अधिकाऱ्यांमुळेच आजतागायत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे हे स्पष्ट होत आहे.
कोकण रेल्वेमध्ये नोकरीसाठी फक्त प्रकल्पग्रस्तांचाच विचार करणेसाठी आम्ही अनेक वर्षांपासून वेळोवेळी पत्रव्यवहार, समक्ष भेटीत कोकण रेल्वे च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी चर्चाही केली आहे. त्याही पेक्षा दिनांक 27/02/2024 रोजी आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणेसाठी संयुक्त बैठक लावणेबाबत कळविले होते. परंतु ह्यावर कोकण रेल्वेकडून कृती समितीकडे कोणताच पत्रव्यवहार वा चर्चा झालेली नाही. ही बाब दुर्देवाची आहे अशी खंत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.
सदर भरती प्रक्रियेसाठी कोकण रेल्वेचे अधिकृत नियुक्ती मंडळ आहे ते संपूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेले आहे. तसेच जमीन घोटाळ्यामध्ये, नोकरभरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाने माखलेले आहे. तरी सदर भरती प्रक्रियेसाठी नेमलेले मंडळ बरखास्त करून नवीन नेमण्यात यावे आणि त्यावर कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा एक सदस्य त्या मंडळावर नेमावा अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करीत आलो आहोत. त्यानंतरच भरती प्रक्रिया राबवावी. सदर भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचाराने झालेली आहे आणि ती पूर्वीच्या भरती मंडळाच्या आपल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. याचे सबळ पुरावे माहितीच्या अधिकाराखाली कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीकडे आहेत. त्याचप्रमाणे हे पुरावे आपल्या मुख्य कार्यालयातील तत्कालिन मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता साहेब तसेच मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर यांचेसमोर सादर केले असता त्यांनी मान्यही केले होते. तसेच सदर भरती प्रक्रियेमध्ये शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले पाहिजे यासंदर्भात कोकणचे जेष्ठ नेते आणि मा. खासदार श्री नारायण राणे साहेब यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तरी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त शेतकरी रेल्वे ट्रॅक वरती आंदोलनात उतरेल व त्याच्या परिणामाला जबाबदार म्हणून व्यवस्थापकीय संचालक या नात्याने आपण असाल. तरी असा प्रकार होऊ नये याची आपण पूर्णतः दखल घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे कृती समितीच्या वतीने कोकण रेल्वे व्यवस्थापनाला लवकरच कळविण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे गाड्या भारताच्या उत्तरेच्या टोकाकडून दक्षिणेकडे धावत आहेत आणि हजारो किलोमिटरचे अंतर कमी झाल्याने अनेक भारतीयांचा वेळ आणि पैसा वाचतो आहे. हे श्रेय नक्कीच कोकण रेल्वेचे उद्गाते कै. मा. मधु दंडवते साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेबांना द्यायला हवे. ह्या महान द्वयींचे एक मोठे स्वप्न होते की कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीनीच्या मालकांना कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे. काही अंशी कोकण रेल्वेने ते पाळले मात्र आज आमचे तिन्ही जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये आपल्याला नोकरी मिळेल ह्या आशेवर जगत आहेत. ही वाट पहाता पहाता त्यांची वयेही उलटून गेली आहेत.
आजवर अनेक प्रकल्पगग्रस्त शिक्षित, उच्चशिक्षित, तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेले असतानाही बऱ्याच जणांना काही ना काही क्षुल्लक कारणाने डावलून अन्य आसामींना नोकरीत सामावून घेतले आहे. ह्याबाबाबत आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी अनेक बाबी पुराव्यानिशी स्पष्ट केलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत, त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना ग्रुप ‘डी’ व तत्सम पदांसाठी परीक्षा न घेता प्रकल्पग्रस्त उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि शारिरिक चाचणी यांचेवर आधारित प्रतिक्षा यादी तयार करून त्याप्रमाणे नोकरीत सामावून घेण्याबाबत आम्ही वारंवार अर्ज विनंत्या तसेच मा. मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी समक्ष चर्चाही केल्या आहेत.
कोकणातील जनसामान्यांमध्ये तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबामध्ये कोकण रेल्वे भरती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
• ज्या भुमिपुत्रांनी कवडीमोल भावाने कोकण रेल्वेसाठी जमीनी दिल्या त्या भुमिपुत्रांना, गोरगरीब प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे मध्ये नोकरी का देऊ शकत नाही. फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच अधिसूचना काढण्यात येत नाही? प्रकल्पग्रस्तांमध्ये पात्र मुले असताना देखील त्यांना क्षुल्लक कारणांनी डावलले जात आहे. प्रकल्पग्रस्त मुलांची पात्र यादी कोकण रेल्वेला देऊन देखील पदभरती किंवा कंत्राटी भरती यात प्रथम प्राधान्य एक ते दोन टक्के आहे.
• कोकण रेल्वे मध्ये निघालेल्या भरती मध्ये प्रथम प्राधान्य हे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देणार असे म्हटले असले तरी प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात नाहीये. त्रयस्थ कंपनीला नोकरभरतीचे कंत्राट देऊन ही प्रक्रिया राबवली जाते. पण प्रत्यकक्षात भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त दिसत नाहीत.
• याही पुढे जाऊन जे कंत्राटदार कोकण रेल्वेने नियुक्त केले आहेत.ते देखील प्रकल्पग्रस्त मुलांना डावलून पर जिल्हयातील मुले भरत आहेत.
कोकण रेल्वेच्या जमीनी कवडीमोलाने अधिग्रहित करुन आज सुमारे 36 वर्षे झाली तरी आज कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतलेले नाही ही शोकांतिका आहे. आम्ही कोकण रेल्वेचे प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये नोकरीत सामावून न घेतल्याने वैफल्यग्रस्त झालो आहोत. कोकण रेल्वेमुळे आज सुमारे 4500 प्रकल्पग्रस्तेतर कर्मचारी व त्यांची कुटुंबे जगतायत परंतु आमचेवर मात्र अन्याय होतोच अशी आम्हा प्रकल्पग्रस्तांची मानसिकता झाली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसमोर नोकऱ्यात सामावून न घेतल्यामुळे असूयेपोटी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या अनेक भुमिपुत्रांकडून होत आहे. त्याचप्रमाणे आम्हा प्रकल्पग्रस्तांनी कोकण रेल्वेला जमिनी दिल्या परंतु आज आमची घरे जमीनदोस्त होऊन बेघर झालो आहोत. बेरोजगारीमुळे त्रस्त झालो आहोत. आम्हा प्रकल्पग्रस्तांना काही क्षुल्लक कारणाने डावलल्याने नियुक्तीअभावी वय वाढत चालले आहे. त्यामुळे नोकरी आवेदनासाठी वयाची मर्यादा 45 वर्षे करणेसाठी आम्ही वारंवार कोकण रेल्वेकडे विनंती करीत आलो आहोत. मात्र कोकण रेल्वे ह्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजूरी आवश्यक असल्याचे कारण सांगून हेतुपुरस्सर नाकारत आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. अशाही प्रतिक्रिया को. रे. प्रकल्पगग्रस्तांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
एकंदीत कोकण रेल्वे भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांकडून कोकण रेल्वेच्या भुमिपुत्रांना दुजाभाव देऊन निव्वळ आपल्याच अधिकारातील उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कृती समितीमार्फत सदरहू अधिसूचना रद्द करुन ती फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच असावी ह्याबाबत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येणार आहेत :
1. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची कोणतीही परीक्षा न घेता ग्रुप डी व ग्रुप सी साठी योग्य असे प्रशिक्षण (ट्रेनिंग) देऊन त्यांना कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून या पदांवरती नियुक्ती करावी.
2. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी ह्यापूर्वी परीक्षा दिल्या होत्या परंतु अनेक उमेदवारांना कागदपत्रांच्या छाननीमध्ये व इतर किरकोळ कारणाने डावलण्यात आलेले आहे, कागदपत्रे मुदतीत सादर करुनही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नव्हते व अनेक उमेदवारांच्या फिजिकल, मेडिकल उत्तीर्ण झालेले आहेत परंतु प्रतिक्षायादीत समाविष्ट आहेत अशा उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी. तसेच अधिसूचना 5/2018 डी ग्रुपसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तीस ते पन्नास सेकंदासाठी अनुत्तीर्ण केलेल्यांना त्वरित घ्यावे. (ह्या संदर्भात कोकण रेल्वे मुख्य कार्यालयात अनेक वेळा चर्चा केलेली आहे).
3. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा वय वर्ष 45 एवढी करण्यात यावी. (अनेक प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी ह्यापूर्वी ग्रुप-डी व ग्रुप-सी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. परंतु कागदपत्र पूर्ततेमध्ये क्षुल्लक कारणावरून सदरहू उमेदवारांना डावलण्यात आले होते. गेल्या पाच वर्षात अशा पदांची भरती न झाल्याने ह्या उमेदवारांची निर्धारित वयोमर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. ह्याचा विचार करुन फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेचा निकष ठेवून तो 45 वर्षे ठेवावा).
4. प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांच्या छाननी करताना 12/2 च्या नोटीसीमागे एक उमेदवार अशी नियुक्ती करण्यात यावी.
5. यापूर्वी कोकण रेल्वे विरुध्द कोर्टामध्ये अनेक उमेदवारांनी केसेस दाखल केल्या होत्या आणि त्या केस निकाली लागून त्यांना भरती करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु त्या उमेदवारांना अद्याप कोकण रेल्वेमध्ये सामावून घेतलेले नाही व बरीच वर्षे केसेस चालू राहिल्यामुळे तसेच अधिसूचना न आल्यामुळे त्यांचे वय वाढले आहे. अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात समितीसमवेत आपली चर्चा व्हावी ही विनंती.
दिनांक 9 मे 2018 रोजी झालेल्या बैठकीत आणि डिसेंबर 2018 मधील कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांच्या संपन्न झालेल1या बैठकीत क्षुल्लक कारणावरून डावलेल्या कृती समीतीच्या नोंदीत उमेदवारांचा आम्ही पुनश्च विचार करू आणि पुढील भरतीत सामावून घेऊ असे तत्कालिन सीएमडी मा. गुप्ता साहेब आणि मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर साहेब यांनी आश्वासन दिले होते. सदर प्रकरणावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदरबाबत आम्ही लेखी पुरावेही सादर केलेले होते व त्यास त्यांनी मान्यताही दिली होती. अशा उमेदवारांची व प्रतिक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेऊन नेमणुक होणेबाबत कृती समितीची आग्रहाची मागणी आहे.
ह्याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकणातील जनतेची व्यथा जाणून घेणारे एकमेव जेष्ठ नेते आणि खासदार मा. ना. नारायण राणे साहेब यांना ह्यामध्ये योग्य तो मार्ग काढून प्रकगल्पग्रस्तांना वरील मागण्या मान्य करणेसाठी मे. कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडे चर्चा करणेसाठी आग्रहाची विनंती करण्यात येणार आहे. याबाबत कृती समितीचे पदाधिकारी गोरगरीब कोकण रेल्वेचे भुमिपुत्र ह्यावेळी आवर्जुन उपस्थित राहून आपल्या व्यथा कथन करणार असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्प्रस्तांच्या व्यथां मांडताना कृती समितीचे वतीने, सन 2027 पर्यंत सुमारे 2500 पदे रिक्त होणार असल्यामुळे कोकण रेल्वे आधी भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण न करता ही पदे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातूनच भरावीत जेणेकरुन ही भरती म्हणजे कोकण रेल्वेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणाऱ्या कै. मा. मधु दंडवते व मा. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांना आदरांजली ठरेल असे वक्तव्य कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे