Konkan Railway News:आंगणेवाडीच्या जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. मध्य रेल्वेने या जत्रेसाठी एक विशेष गाडी ट्रेन व डिमांड (TOD ) तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची सरीवस्तार माहिती खालीलप्रमाणे
गाडी क्रमांक 01043/01044 एलटीटी – करमाळी- एलटीटी विशेष (TOD)
ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक शुक्रवारी दिनांक ०१ मार्च रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी रविवार दिनांक ३ मार्च रोजी करमाळी या स्थानकावरून दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
दिवा दि.२२ फेब्रु | काल बुधवारी दिवा स्थानकावर झालेल्या एका अपघातात कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील सचिन बाळकृष्ण सावंत ( वय ४५ रा. भिरवंडे मुरडयेवाडी ) यांचे मुंबईकडे जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले.
या अपघाताची सविस्तर माहिती अशी की कणकवली येथे स्थायिक असलेले सचिन हे काही कामानिमित्त मुंबई येथे मंगळवारी कोकण कन्या एक्सप्रेसने जाण्यास निघाले. दिवा स्टेशन येथे पोहोचल्यावर कोकण कन्या एक्सप्रेसचा वेग कमी झाला.याचा अंदाज घेऊन सचिन यांनी दिवा स्टेशन येथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. रेल्वेतून उतरताना सचिन हे बाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळाली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने सचिन यांची उपचारांना साथ मिळत नव्हती. अशातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घडलेली घटना हा निव्वळ अपघात असला तरी घटनेमुळे कोकणच्या प्रवाशांची एक जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ती मागणी म्हणजे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा ही होय.
दिवा स्थानकांत सध्या आठ प्लॅटफॉर्म असून, या स्थानकात दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या, दिवा-रोहा मेमू, दिवा-वसई अशा गाड्या चालविण्यात येतात. दिवा स्थानकात जर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना थांबा दिला तर दिवा, डोंबिवली व कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टीटवाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातील चाकरमान्यांचा ठाणे, कुर्ला, दादर, सीएसएमटी टर्मिनसवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला जाईल. परतीच्या प्रवासातही ठाण्याला उतरल्यानंतर पुन्हा सामानासह लोकल पकडणे अडचणीचे ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.
तर हे अपघात टाळता येणे शक्य
वा येथे गाडी आल्यावर ठाण्याच्या दिशेने जाताना रूळ बदलताना गाडीचा वेग कमी होतो. त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे कित्येकदा अपघातही होतात. येथे थांबे दिल्याने असे अपघात टाळता येतील.
पहाटे सुटणार्या आणि उशिरा परतणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा
जनशताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्या मुंबईहुन पहाटे सुटतात आणि परतीच्या प्रवासात उशिराने ठाण्या- मुंबईत येतात. या गाडीला दिवा येथे थांबा दिल्यास या परिसरातील कोकणातील प्रवाशांची खूप मोठी सोय होईल. त्याचप्रमाणे कोकण-कन्या, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या नियमित आणि ईतर काही गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
चिपळूण, दि. १९ फेब्रु.:चिपळूण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्रेत्यांसंबंधीत जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ही गोष्ट लांछनास्पद आहे. मला अनेक प्रवाशांचे फोन आले तेव्हा मी खात्री केल्यानंतर वस्तुस्थिती खरी आहे हे समजले. प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या फेरीवाल्यांना कुणी दिला. या पूर्वी एक फेरीवाला पावाच्या लादीवर पाय ठेवून झोपला होता. तर दुसर्या फेरीवाला फलाटावरील बाकडयावर झोपला असून त्याच्याकडील भजी ट्रेसहीत पडलेली दिसत आहेत. व ती भजी प्रवाशांनी जाब विचारताच पुन्हा ट्रेमध्ये गोळा करून घेताना दिसत आहे. प्रवाशांनी व आरपीएफच्या जवानाने हटकताच ती कचर्याच्या डब्यात टाकली. हा प्रकार करणार्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की अन्य भेसळ अधिकारी तसेच पोलीस झोपा काढत आहेत का? फेरीवाल्यांची सहा महिन्याची मेडिकल टेस्ट करावी लागते, ती झालेली आहे की नाही. ज्या स्टॉलधारकांचे फेरीवाले आहेत त्यांच्या स्टॉलचा परवाना रद्द करण्यात यावा व प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाद्यपदार्थ विकणार्या परप्रांतीयांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ०९:३० वाजेपर्यंत सावर्डा ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12617 Ernakulam – H. Nizamuddin Express
या गाडीचा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. .
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आणि मागणीच्या आधारावर (TRAIN ON DEMAND) या तत्वावर मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दोन विशेष मेमू गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या आठ डब्यांच्या असून पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाच्या असणार आहेत.
१) गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल विशेष अनारक्षित मेमू (TOD)
सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी ही गाडी चिपळूण येथून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल ती पनवेल येथे रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
रत्नागिरी कोकण रेल्वेच्या एका स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा वडापावच्या ट्रे वर पाय ठेवून झोपण्याचा प्रकार ताजा असताना येथे एक असाच किळसवाणा प्रकार दुसर्या एका विक्रेत्याकडून घडला आहे. याबाबतचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
चिपळूण स्थानकावर एका विक्रेत्याच्या हातातून भज्यांच्या ट्रे निसटला आणि सर्व भजी जमिनीवर पडली. त्या विक्रेत्याने सर्व भजी पुन्हा त्या ट्रे मधून भरली आणि विकायला पुन्हा निघाला असे त्या विडिओ मध्ये दिसत आहे. एका प्रवाशाने हा विडिओ चित्रित केला आहे.
या प्रकारांमुळे सामान्य लोकांच्या आरोग्याचे या विक्रेत्यांना काहीच देणेघेणे नाही हे समोर येत आहे. प्रवासात लहान मुले अशा खाद्यपदार्थाचा नेहमीच आग्रह धरतात. मात्र अशा प्रकारांमुळे हे पदार्थ मुलांना द्यावेत की न द्यावेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तो विक्रेता खरोखरच ‘ती’ भजी फेकून देणार होता का?
पडलेली भजी भरून झाल्यावर तो विक्रेता तिथून निघाला; मात्र जागरूक प्रवाशांनी त्याला हटकले आणि ती भजी टाकून देणार आहे की नाही ते विचारले. तेव्हा तो विक्रेता हो बोलून पुढे चालायला लागला. मात्र तेथील प्रवाशांनी आरपीएफ कर्मचाऱ्याच्या मदतीने तिथेच जवळ असलेल्या कचराकुंडीत ती भजी फेकायला लावलीत. जर त्या विक्रेत्याला भजी फेकायचीच होती तर ती त्याने तिथेच बाजूला असलेल्या कचराकुंडीत न फेकता पुढे का घेऊन गेला? हा प्रश्न समोर आला आहे.
प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्याचे कौतुक
आपल्या समोर असा अनुचित प्रकार घडताना गप्प न बसता त्या विक्रेत्याला त्याच ठिकाणी जाब विचारला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडून त्याला ताब्यात घेतले. या सर्व घटनेत जागरूकता दाखवल्याबद्दल त्या प्रवाशांचे आणि आरपीएफ अधिकार्याचे कौतुक होत आहे.
मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे कडून ३१ मार्च पर्यंत २ टप्प्यात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम १२ ते २५ फेब्रुवारी आणि १५ ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी डब्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना धक्काबुक्की प्रवास सहन करावी लागते. परिणामी, याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. धावत्या वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करण्याची सूचना प्रवाशांकडून करण्यात आली. त्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासह आता भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह वाणिज्य अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक आवश्यकतेनुसार आरपीएफ, दक्षता आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचरण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागाला दिलेल्या सूचना
– आरक्षण केंद्रावर दलालाच्या हालचाली रोखण्यासाठी पथके तयार करून, तपासण्या कराव्यात. तसेच आपत्कालीन कोट्याचा गैरवापर होऊ नये, याबाबत सतर्क राहावे.
– कॅटरिंग कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांकडे योग्य शुल्क घेत आहेत आणि त्यांना योग्य पावती दिली जाते, याची तपासणी करावी. तसेच अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेगाड्यांमध्ये बंदी घालावी. खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवर दराचे फलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जाते का, हे तपासावे.
Konkan Railway News:मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कोचिंग यार्डमध्ये पायभूत सुविधा उभारण्यासाठी आजपासून पुढील सात दिवस १८ फेबुवारी २०२४ पर्यत दररोज मध्यरात्रीपासून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे एलटीटी स्थानक येणाऱ्या आणि सुटणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेळात बदल करण्यात आलेला आहे.
या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल आठ गाड्यांच्या वेळापत्रकावर, आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये बदल होणार आहे. या बाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे .
1)Train no. 22116 Karmali – Lokmanya Tilak (T) Express गुरुवार दिनांक 15/02/2024 या दिवशी प्रवास सुरू करणार्या या गाडीचा प्रवास ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. ही गाडी पुढे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणार नाही.
सावंतवाडी, दि. १२ फेब्रु.: कोणताही अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते. त्यानंतर त्या रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र अपघात होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतली तर जीव वाचू शकतात. सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बाजारपेठेत, गाव वस्तीत, शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवून वाहनांच्या वेगावर मर्यादा घालून अपघात टाळले जातात. अशाच तजवीजची गरज सावंतवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर असेलेला रस्त्यावर करण्याची आवश्यक्यता निर्माण झाली आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशदारासमोर हा रस्ता असून सावंतवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनचालक वाहने सुसाट चालवीत असतात. या रस्त्याच्या पलीकडे उपहारगृहे, एटीएम आणि इतर दुकाने आहेत. त्याचप्रमाणे स्थानकावरून बाहेर पडून सावंतवाडी साठी एसटी बस पकडायची असेल तर हा रस्ता ओलांडावा लागतो. कित्येकवेळा बस उभी असताना प्रवासी बस चुकू नये म्हणून घाईघाईने रास्ता ओलांडताना दिसतात. अशा वेळी अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. कित्येकवेळा अपघात होता होता वाचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे दोन ठिकाणी झेब्रा क्रोसिंग मार्किंग पट्टे आखले असले तरीही अपघात टाळण्यासाठी ते अपुरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मोठा अपघात होण्याआधीच दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावे अशी मागणी होत आहे.
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवावेत
गतिरोधक उंच असल्यास त्याठिकाणी दुचाकी वाहनचालक घसरुन पडण्याची शक्यता असते. तेंव्हा हे गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत आडवली ते आचिर्णे विभागादरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रामुख्याने सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस
या गाडीचा दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड- कणकवली विभागादरम्यान ९० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. .
२) गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस
या गाडीचा दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकादरम्यान १० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.