Category Archives: कोकण रेल्वे

आजपासून पुढील चार दिवसांत कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचाच; ‘या’ गाड्यांच्या आरंभ व अंतिम स्थानकांत बदल

Konkan Railway News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनजीकच्या वाडी बंदर यार्डामधील रेल्वे लाईन 3 ते 7 साठी कनेक्टिव्हिटीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दिनांक ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील खालील गाड्यांवर या कामाचा परिणाम होणार आहे. 
१) Train no. 22230 Madgaon Jn. – Mumbai CSMT Vande Bharat Express
दिनांक ०५ ऑक्टोबरला ही गाडी आपला प्रवास दादर या स्थानकावर संपविणार आहे. 
२) Train no. 11004 Sawantwadi Road – Dadar Tutari Express 
दिनांक ०५ आणि ०६ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणाऱ्या या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
३) Train no. 12052 Madgaon Jn. – Mumbai CSMT Janshatabdi Express 
दिनांक ०७ ऑक्टोबरला ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावर संपविणार आहे. 
४) Train no. 11003 Dadar – Sawantwadi Road Tutari Express
दिनांक ०७ आणि  ०८ ऑक्टोबर रोजी ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून ०१:१५ वाजता सुरु करणार आहे. 
५) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn.  Janshatabdi Express 
दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी वरील गाडी पनवेल या स्थानकावरून आपला प्रवास सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुरु जाणार आहे. 

Loading

मालगाडी अपघात | “…. तर कोकणातून परतणाऱ्या प्रवासांचे हाल झाले नसते.”

मालगाडी अपघातानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक चुकीच्या पद्धतीने हाताळली गेल्याचा आरोप.. 

मुंबई :गेल्या आठवड्यात कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचे कारण साफ आणि स्वच्छ होते. पनवेल स्टेशनच्या पुढे दोन फरलांगावरती नवीन पनवेल जुना पनवेलच्या पुलाखाली मालगाडी घसरली पण ही मालगाडी घसरण्याचे कारण आता पुढे येत आहे तेथे असलेल्या नाल्यावर टाकलेले पाच स्लीपर चुकीच्या पद्धतीने टाकले गेले होते त्या स्लीपर च्या वरती अचानक लोड आल्यामुळे रेल्वे रूळ वाकले आणि मालगाडी घसरली असे समजते परंतु त्याच वेळेला कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून जवळपास च्या लाईन वरून कोकण रेल्वेची दुसरी गाडी येत नव्हती अन्यथा हा अपघात भीषण असा झाला असता.

या अपघाताची पार्श्वभूमी अशी आहे अगोदर शनिवारपासून हार्बर लाइन मार्गावरती बेलापूर ते पनवेल मेगाब्लॉक घेण्यात आला होता आणि तो मेगाब्लॉक चालू असताना बेलापूर पासून रेल्वे मार्ग पनवेल पर्यंत बंद करण्यात आला होता. परंतु ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली असती परंतु मालगाडीमुळे ही वाहतूक पुढे होऊ शकणार नव्हती याचे निदान स्पष्ट झाल्यानंतर त्वरित मेगा ब्लॉक रद्द करणे गरजेचे होते व कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या पनवेल पर्यंत आणून तिथे रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावर वळवून पुढे उभ्या करून ठेवता आल्या असत्या, परंतु हे न करता सरळ पुढे गाड्या येऊन देण्याचा मूर्खपणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला यावर कोणाचाच लक्ष जात नाही आहे कसे? पनवेलच्या पुढे रेल्वे घसरली म्हणजे पनवेल पर्यंत गाड्या आरामात येऊ शकत होत्या .पनवेलला एकंदरीत तीन गाड्या येऊन लागू शकत होत्या या तीन गाड्या रिकाम्या करून पुन्हा कुठेतरी पुढे कर्जत उरण मार्गावरती पाठवून येणाऱ्या गाड्यांना पनवेल पर्यंत येऊ द्यायला पाहिजे होते व मेगाब्लॉक रद्द करून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन चार वरून ठाणा गोरेगाव आणि सीएसटी वडाळा अशा लोकल सेवा चालू ठेवल्या पाहिजे होत्या परंतु मेगा ब्लॉक का रद्द केला गेला नाही ?तसेच या गाड्या पनवेल पर्यंत येऊ शकत होत्या पनवेलला त्या गाड्या रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावरती नेऊन कुठेतरी सायडींगला उभ्या करून ठेवल्या पाहिजे होत्या तेवढी जर समय सुचकता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली असती तर किमान गणपतीला गावाला गेलेले सगळे चाकरमानी सुखरुप पणे पनवेल पर्यंत येऊ शकले असते आणि मेगा ब्लॉक रद्द केला असता तर पनवेल पासून पुढे प्रवास करून लोक सुखरूप घरी गेली असती.तीस तीस तास रखडपट्टी झाली नसती 

 त्यात आणखीन एक शहाणपणा केला तो म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस लोढा मिरज मार्गे वळवली त्यामुळे पनवेलच्या पुढे मडगाव पर्यंत ती गाडी कुठेही स्टॉप वर थांबणार नव्हती ती गाडी लोढा मिरज मार्गे मडगाव करून मडगावला गेली मडगावला गेल्यानंतर तिथे नेत्रावती एक्सप्रेस तिथल्या लोकांना पाच मिनिटांसाठी चुकली मडगावच्या अधिकाऱ्यांनी पाच मिनिटं नव्हे तर अर्धा तास तरी नेत्रावती एक्सप्रेस थांबवुन ठेवली असती तर मडगाव पासून ते चिपळूण पर्यंतच्या प्रवाशांना नेत्रावती मध्ये जागा करून घेता आली असती कारण गाडीचा खोळंबा झाल्यामुळे नेत्रावतीचीअनेक तिकिटे रद्द झालेली होती आणि प्रवास फक्त पाच तासाचा होता रेल्वेच्या ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिसपस्तिस तास मनस्ताप प्रवाशांनी का बरं सोसावा? याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे आणि या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

कोकण रेल्वेचे रेल्वे रूळ हार्बर लाइन मार्गावरती आज तीस वर्षे झाली अजून जोडलेले नाहीत ते जर जोडले असते तर गाडी ठाणा हार्बर मार्गे सुद्धा नेता आली असती याबाबतचे पत्र मी दोन ऑगस्ट २३ रोजी पा ठवलेले होते आता तरी गंभीर होऊन कोकण रेल्वे मार्ग हार्बर लाइन ला जोडला जावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोकण रेल्वे वाशी ठाणा मार्गे सीएसटी पर्यंत पोहोचू शकते आपला एक शेअर कोकण रेल्वेचे भविष्य बदलू शकते.

मे महिन्यात गणपती मध्ये वाशी बेलापूर येथून थेट केरळ कन्याकुमारी पर्यंत गाड्या सोडता येतील गणपती मध्ये बेलापूर वाशी येथून थेट गाड्या सावंतवाडी चिपळूण रत्नागिरी ला सोडता येतील

श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर.

मोबाईल क्रमांक -9404135619

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकांच्या तिकीट खिडक्यांचे यूटीएस-कम-पीआरएस खिडक्यांमध्ये रूपांतर करण्याची मागणी

Konkan Railway News: कोकण रेल्वेवरील वीर, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि पेडणे स्थानकांवरील मॅन्युअल कोटा आरक्षण प्रणाली (क्यूआरएस/QRS) बुकिंग काउंटर कोरोनानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना संबंधित स्थानकांवरून आरक्षित तिकिटांचे व्यवहार करता येत नाहीत. काही ठिकाणी पोस्टात आरक्षण केंद्रे आहेत, परंतु ते आरक्षण सुरु होणेच्या वेळेत (सकाळी ८ वाजता) सुरू होत नसल्यामुळे व काही वेळा योग्य इंटरनेट कनेक्शन अभावी बंद असल्यामुळे प्रवाशांना तोही पर्याय उपलब्ध नाही. 

याचाच विचार करून जल फाउंडेशनने वरील स्थानकांतील अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) बुकिंग काउंटरचे यूटीएस-कम-पीआरएस (UTS-cum-PRS) काउंटरमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आज मंगळवार दि. ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात देण्यात आले. याबाबतची माहिती जल फाउंडेशन (कोकण विभाग) चे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दिली आहे.

Loading

“सावंतवाडी टर्मिनस” व्हावे यासाठी कोकणी माणूसच आग्रही नाही?

सागर तळवडेकर |सावंतवाडी :या वर्षीचा गणेशोत्सवात चाकरमानी आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रमाणात रेल्वे प्रवास करत आपल्या गावी पोहोचलो खरे,परंतु चाकरमान्यांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, रेल्वे प्रशासनाला एकेरी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.अनेकांना ४-५ तास स्टेशन वर ताटकळत उभे राहावे लागले, गाडीतील अस्वच्छता, पाण्याची असुविधा, सदोष बोगी संरचना आदी, अनेक छोट्या मोठ्या अडचणी ह्या सर्व चाकरमान्यांना येताना आणि मुंबईला परतताना सहन कराव्या लागल्या, आणि पुन्हा एकदा कोकणात स्वतंत्र असे टर्मिनस व्हावे ही जुनी मागणी डोळ्या समोर आपसूकच आली.
पण दुदैर्व.. “सावंतवाडी टर्मिनस” व्हावे असे कोकणी माणसाला वाटतच नाही असेच दिसते. चाकरमाण्यांपासून मालवणी माणूस देखील याला अनुकूल नाहीच असे दिसते. सावंतवाडीत टर्मिनस व्हावे यासाठी पहिल्यांदा कै. वालावलकर,आणि स्वतः कोकण रेल्वेचे जनक कै. मधु दंडवते यांनी नियोजन केले, त्यांनतर २००६ पासून समाजवादी आमदार कै. जयानंद मठकर, त्यांनतर कै. डी के सावंत यांनी अथक प्रयत्न केले, पत्रव्यवहार केले आणि त्याची पायाभरणी बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा पुढे नेणारे माजी खासदार श्री सुरेश प्रभू यांनी २०१५ ला केली. परंतु हे टर्मिनस आता निधी अभावी रखडणार आहे हे माझ्यासारख्या टर्मिनस प्रेमीला कितपत पचनी पडेल हे सांगता येत नाही. टर्मिनस साठी निधी नाही हे सांगत खासदार महोदयांनी आपले हात वर केलेत असेच काही दिसते आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे बोलणे कितपत योग्य आहे हे येणारी निवडणुकीच ठरवेल.
काही जणांना टर्मिनस म्हणजे काय हे देखील माहित नसेल, त्यांसाठी मी थोडी त्याबद्दल माहिती देतो,रेल्वेचे टर्मिनस ज्या ठिकाणी प्रस्तावीत होते म्हणजेच त्या ठिकाणाहून रेल्वे सुरू करण्याचे / सोडण्याचे नियोजन करण्यात येते, रेल्वे सोडताना तेथे रेल्वे उभी करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, रेल्वे बोगी धुण्याची सोय, पाणी भरण्याची सोय, आदी कामे केली जातात. जेणेकरून भविष्यात या टर्मिनस वरून काही गाड्या ह्या चालवण्यात येतील, त्या गाडीची देखभाल केली जाईल. ही सर्व कामे सध्या गोव्यातील मडगाव येथे केली जातात,परंतु सध्याचा घडीला मडगाव स्टेशन हे गणेशोत्सवातील किंवा इतर मोठ्या सण किंवा उत्सवाला अतिरिक्त भार घेण्यास सक्षम   नाही. त्यामुळे कोकणातील या गर्दीचा भार उचलण्याचे काम सावंतवाडी टर्मिनस ने नक्की केले असते, जेणेकरून स्पेशल गाड्यांचे / दुप्पट दरात तिकिटे काढून प्रवास करणाऱ्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागला नसता. म्हणून मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की टर्मिनस, ते देखील रेल्वेचे टर्मिनस होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर प्रवासादरम्यान असे वाईट अनुभव हे येतच राहतील.
माझ्या मते हा विषय केवळ सावंतवाडी पुरती मर्यादित नसून हा मुंबई आणि कोकण या दोन्ही भागांचा आहे कारण कोकणातील अर्धी मंडळी ही मुंबईला पोटापाण्यासाठी आहे आणि ही मंडळी आपला प्रत्येक सण आपल्या घरी म्हणजेच कोकणात येऊन साजरे करतात त्यामुळे ह्या जिव्हाळ्याचा विषयाला आज आलेल्या खासदारांचा विधानाने कुठेतरी कोकणी माणूस दुखावला असेल असेच दिसते. मी पुन्हा एकदा सांगतो की सावंतवाडी टर्मिनस होणे ही आजची खरी गरज आहे. आपण सर्वांनी यावर विचार करावा ही विनंती

Loading

कोकण रेल्वे मार्गावर नागेरकोइल – पनवेल विशेष गाडी उद्या धावणार

Konkan Railway News: सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील विशेष गाडी या मार्गावर चालविण्यात येणार आहे
Train No. 06071 / 06072 Nagercoil – Panvel – Nagercoil Special (Weekly):
Train No. 06071  Nagercoil – Panvel  Special (Weekly):
ही गाडी उद्या मंगळवार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल.
Train No. 06072  Panvel – Nagercoil Special (Weekly):
ही गाडी बुधवार दिनांक 04 ऑक्टोबर रोजी पनवेल येथून सकाळी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता नागरकोईल येथे पोहोचेल.
पनवेल मडगाव दरम्यान ही विशेष गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच थिवीला थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
 2 Tier AC – 01 Coaches, 3 Tier AC – 05 Coaches,  Sleeper – 11 Coaches, General – 02 Coaches, SLR – 02,  असे मिळून एकूण 21 डबे

Loading

कणकवली: राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत ३ म्हशी ठार

कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती.या घटनेमुळे आधीच विस्कटलेले रेल्वेचे रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशींचे मृतदेह बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक अजूनही विस्कळीत; जनशताब्दी एक्सप्रेस पुणे मिरज मार्गे जाणार तर काही गाड्या रद्द

Konkan Railway News :काल पनवेल स्थानकाजवळ झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे या मार्गावरून जाणार्‍या एक्सप्रेस गाड्यांची वाहतुक विस्कळीत झाली आहे. अजून पर्यंत या मार्गावरील वाहतुक विस्कळित असून ती पूर्वपदावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीन डबे या मार्गावरून बाजूला करण्याचे काम चालू आहे. 

या अपघातामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत तसेच काही गाड्या अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत. 

मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

शनिवारी रात्री सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस आज पहाटे सुटणार होती. मात्र तिला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1) दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 10103 CSMT-madgaon mandvi exp

2) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 01165 LTT mangluru exp, JCO 30/9/23

3) आज दिनांक 01/10/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 01171 CSMT Sawantwadi exp-

 

पुणे मिरज मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या

1) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12133 CSMT Mangluru exp-

2)दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12051 CSMT Madgoan Janashatabdi Exp. 

आरंभ स्थानकावरून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्या. 

काल दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 20111 CSMT Madgaon exp आज सकाळी 11:05 वाजता आपला प्रवास सुरू करेल.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या 

1)दिनांक 01/10/2023 रोजी सुटणारी 01151 CSMT Madgaon exp- पनवेल या स्थानकावरून सुटेल. 

2)दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू केलेली 01172 Sawantwadi CSMT exp ही गाडी आपला पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. 

 

Loading

मुंबईवरून आज सुटणाऱ्या कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस उशिरा सुटणार; मेमू विशेष गाड्या रद्द

Konkan Railway News: पनवेल जवळ कळंबोली येथे मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मागावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही दुर्घटना दुपारी ३ वाजता घडली होती. या दुर्घटनेमुळे अनेक एक्सप्रेस गाड्या रखडल्या आहेत. सध्या या मार्गावरील हे घसरलेले डबे हटवण्याचे काम सुरु आहे. सिंगल रुळावरून धिम्यागतीने गाड्या सोडल्या जात असून वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास अजून काही वेळ लागेल. जवळपास 250 कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत. याचा परिणाम कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव या गाड्यावर सुद्धा झाला असून या गाड्या मुंबईवरून सुमारे ३ ते ४ उशिराने सुटणार आहेत. 
1) २०१११  सीएसएमटी मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस- १/१०/२३ रोजी पहाटे ४.०० वाजता सीएसएमटी वरून पुनर्नियोजित वेळेत सुटेल
2) ११०९९ एलटीटी मडगाव एक्स्प्रेस- एलटीटी वरून १/१०/२३ रोजी पहाटे ४.०० वाजता पुनर्नियोजित वेळेवर निघेल.
याबरोबरच चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आलेल्या मेमू गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे 
१) ०७१०४ मडगाव-पनवेल मेमू- रत्नागिरी-पनवेल दरम्यानची अर्धवट रद्द करण्यात आली आहे, ती फक्त मडगाव-रत्नागिरी विभागात चालेल.
२) ०७१०५  पनवेल-खेड मेमू पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

Loading

पनवेल जवळ मालगाडी रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत

Kokan Railway News:पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी आज दुपारी पनवेल – कळंबोली विभागात  रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. 
आज दुपारी पनवेल-कळंबोली विभागात 15.05 वाजता मालवाहू मालगाडी रुळावरून घसरली आहे.  या गाडीचे 4 वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरल्याने या मार्गावरील खालील गाडयांना रोखून ठेवण्यात आले आहे. 
अ) डाउन गाड्या-
१) १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस- कळंबोली येथे
2) १२६१९ एलटीटी – मंगळुरु एक्स्प्रेस- ठाणे येथे
3) ०९००९  मुंबई सेंट्रल- सावंतवाडी एक्स्प्रेस- तळोजा पंचानंद येथे
ब) अप गाड्या-
1) २०९३१  कोचुवेली- इंदूर एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे
2) १२६१७  एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे

Loading

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या उद्यापासून ६ विशेष गाड्या

Konkan Railway News :गणेशोत्सवासाठी कोकणात गावी गेलेल्या गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी उद्यापासून एकूण 6 विशेष मेमू सेवा चालविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मडगाव ते पनवेल सेवा

1)गाडी क्रमांक 07104 मडगाव – पनवेल ही विशेष गाडी उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मडगाव या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे.

2)परतीच्या प्रवासात ही गाडी सोमवार दिनांक 02 ऑक्टोबर रोजी पनवेल या स्थानकावरून रात्री 21:10 वाजता निघून दुसर्‍या दिवशी सकाळी 09:30 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचणार आहे.

खेड ते पनवेल सेवा

3)गाडी क्रमांक 07106 खेड – पनवेल विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 15:15 वाजता खेड या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)

4)गाडी क्रमांक 07105 पनवेल – खेड विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या दिवशी रात्री 21:10 वाजता पनवेल या स्थानकावरून निघणार असून रात्री 01:10 वाजता खेड या स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)

या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून एकूण 8 कोचसहित चालविण्यात येणार आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search