Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway | “सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण झाले असते तर…….”

   Follow us on        
सिंधुदुर्ग :मागील ९ वर्ष सावंतवाडी टर्मिनसचे काम रखडले आहे. किती जनआंदोलने झालीत तरी रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यात रस दाखवला नाही. टर्मिनस म्हणुन भूमिपूजन झाले असतानाही रेल्वे आपल्या रेकॉर्डमध्ये जाणून बुजून या स्थानकाचे नाव ”सावंतवाडी रोड” असेच दाखवत आले आहे. परवा तर हद्द पार झाली आणि सुशोभीकरणा दरम्यान प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर ”सावंतवाडी रोड” अशा नावाचा फलक लावण्यात आला. हेच जर करायचे होते तर टर्मिनस म्हणुन भूमिपूजन फक्त मते मिळविण्यासाठी केले का? असा संतप्त सवाल कोकणी जनतेकडून विचारला जात आहे.
नियतीला कदाचित हे पटले नसावे म्हणा की अन्य काहीही म्हणा, सावंतवाडी येथे टर्मिनस का असावे हे तिने या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी दाखवले. पेडणे येथील एका बोगद्यातून पाण्याचा मोठा पाझर फुटून तेथील मार्ग बंद झाला आणि कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली. 30 तास झाले तरी हा बोगदा वाहतुकीसाठी चालू झाला नाही. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या. मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानकांवर उभ्या करून ठेवण्यात आल्यात. अनेक गाड्या रद्द झाल्यात, कित्येक प्रवासी अडकून पडलेत यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर… 
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर खूप मोठा फरक पडला असता. परवा दिनांक ०९ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात अडकलेल्या गाड्या निदान सावंतवाडी स्थानकापर्यंत चालविता आल्या असत्या आणि तेथूनच दुसर्‍या दिवशी मुंबईच्या दिशेने पाठवता येवू शकल्या असत्या. टर्मिनसच्या अपुर्‍या कामामुळे फक्त 1/2  गाड्या येथून परस्पर सोडता आल्या असत्या. काल संध्याकाळ पासून संध्याकाळपासून पनवेल ते सावंतवाडी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. अनेक गाड्या सावंतवाडी स्थानकापर्यंत चालवणे शक्य झाले असते आणि प्रवाशांचे हाल वाचवता आले असते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग सुद्धा तितकाच महत्वाचा.. 
सावंतवाडी टर्मिनस प्रमाणेच केंदीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत मंजूर झालेले आणि रखडलेले दुसरे काम म्हणजे कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग. पाश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग सुरेश प्रभू केंदीय रेल्वे मंत्री असताना मंजूर झाला होता. मात्र त्याचीही गत सावंतवाडी टर्मिनसच्या कामासारखी झाली. सुरेश प्रभू यांचा केंदीय रेल्वे मंत्री पदावरून पायउतार होताच हे कामही रखडले. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अर्थसंकल्पात या मार्गासाठी तरतुद केली जात नसल्याने त्याचे काम थांबले आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास आणीबाणीच्या काळात कोकण रेल्वे मार्गाला एक पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग वापरता येवू शकतो.
माजी केंदीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केलेली ही दोन महत्त्वाची कामे रखडली आहेत…या मागे कोणतीही कारणे असूद्यात ..सध्या कोकणातील प्रवाशांना कोणी वाली नाही हे जवळपास अधोरेखित झाले आहे.

KR Updates | कोकणकन्या आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी पर्यंतच, अजून काही गाड्या रद्द, यादी ईथे वाचा

   Follow us on        

Konkan Railway Updates: दिनांक 10.07.2024 मडुरे – पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे येथे बोगद्यामध्ये पाणी भरल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे ह्याआधी काही गाड्या रद्द केल्याचे तसेच काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली आहे.

कोकण रेल्वेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार खालील गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेटेड आणि अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत

गाडी क्र. 12449 मडगाव जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा चंदीगड एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12620 मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12134 मंगळुरु जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 50107 सावंतवाडी टर्मिनस – मडगाव जं. 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि आंशिक रद्द केलेल्या गाड्या. 

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे.

 

Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावर अडकलेल्या गाडय़ा मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

Konkan Railway Updates : आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील अडकलेल्या गाड्या मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

अधिक माहिती खालील प्रमाणे 

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. २२११३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस राजापूर रोड येथून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 19260 भावनगर – कोचुवेली एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र.१२२२३ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम एक्स्प्रेस चिपळूण येथून मागे फिरवून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आला आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 20932 इंदूर जं. – कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास सुरत – जळगाव – बडनेरा जं. – वर्धा जं. – बल्हारशाह – वारंगळ – विजयवाडा जं. – रेनिगुंटा जं. – काटपाडी जं. आणि कोईम्बतूर मार्गे वळविण्यात आला आहे.

Breaking: कोकण रेल्वे ठप्प; अनेक गाड्या रद्द तर लांब पल्ल्याच्या गाडय़ा पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

   Follow us on         Kokan Railway Stopped :काल दिनांक 09/07/2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोकण रेल्वेच्या कारवार विभागातील मडूरे-पेडणे विभागादरम्यानच्या बोगद्यात पाण्याच्या फुटलेल्या मोठ्या पाझरामुळे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल जमा झाला होता. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प झाली होती. रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी कोकण रेल्वेने मोठ्या शर्थीने प्रयत्न करून हा बोगदा वाहतुकीसाठी योग्य केला आणि वाहतुक सुरू केली होती मात्र आज(10/07/2024) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पुन्हा मोठा पाझर फुटला आणि बोगद्यात पुन्हा पाणी जमा झाले असल्याची माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.

अनेक गाड्या रद्द
या घटनेमुळे कोकण रेल्वेने या मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या असून तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविल्या आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु एक्सप्रेसचा ०९/०७/२०२४ रोजी सुरु होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेसचा – दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. ५०१०८ मडगाव जं. – सावंतवाडी दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी – जनशताब्दी एक्स्प्रेसचा १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

खालील गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार आहेत.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. मंगला पनवेल – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव मार्गे चालविण्यात येणार आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १६३३६ नागरकोइल – गांधीधाम एक्स्प्रेसचा शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२२८३ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन शोरानूर जंक्शन मार्गे वळवली जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून 16:55 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

 

More Information Awaited…… 

पेडण्यात रुळांवर पाणी; कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत

Konkan Railway Stopped: तळकोकणात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मालपे (पेडणे) येथील बोगद्यात रूळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे.

पाणी साचल्याने मार्ग पूर्ण झाला असून दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने येणार्‍या गाड्या गोवा राज्यातील स्थानकांवर तर दक्षिणेला जाणार्‍या गाड्या सिंधुदुर्गातील स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. गाड्यांची सद्यस्थिती पाहता (08:00 PM) गोव्याचा दिशेने जाणार्‍या गाड्यांपैकी तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस अजुनहि सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्या नाही आहेत. तर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी याबाबत अजूनही कोणती माहिती आली नसली तरी रेल्वे कर्मचारी त्या बोगद्याकडे पोहोचले असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा फलक; प्रवासी संघटना आक्रमक

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रवेशद्वारावर “सांवतवाडी टर्मिनस” असा बोर्ड न लावता “सावंतवाडी रोड” असा बोर्ड लावल्याने तळकोकणातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदविला आहे. प्रशासनाने त्वरीत हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र मा. सुरेश प्रभू यांचा केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार होताच हे काम रखडले ते आजतायगत पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरम्यान कित्येकदा आवाज उठवला, मात्र त्याच्या हाती पोकळ आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून “टर्मिनस” हा शब्द कायमचा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले होते तेच सरकार आता सत्तेत असताना हा प्रकार होत असल्याने तळकोकणातील प्रवाशांच्या मनात सरकारविषयी आणि  लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण होत आहे.
टर्मिनस समस्त कोकणकरांसाठी फायद्याचे
सावंतवाडी टर्मिनस होणे हे फक्त सावंतवाडी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठीच नाही तर समस्त कोकण प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण हे टर्मिनस झाले तर वसई/बोरिवली  – सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे . त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुरं ढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगल्या प्रमाणात सुखकर झाला असता.
   Follow us on        

Heavy rain in Mumbai: मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकणरेल्वेच्या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
मुंबई: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळांवर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या ४ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. आज सकाळी सीएसएमटी वरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर झाला आहे.
सीएसएमटी वरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे ४ तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे २ ते अडीच तास उशिराने धावत आहे.

अखेर रेल्वेला आपली चूक उमजली, सामान्य वर्गातील प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय

   Follow us on        




Indian Railway News: भारतीय रेल्वे अपग्रेड करण्याच्या आणि उत्त्पन्न वाढविण्याच्या नादात प्रशासनाला सामान्य वर्गातील प्रवाशांचा विसर पडला होता. मात्र उशिरा का होईना सरकारला आपली चूक उमजली आहे. रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नॉन एसी कोच निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी आणि जनरल कोचची कमी असलेली संख्या यामुळे सामान्य वर्गातील प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्या लक्षात घेता  यातील ५३०० कोच जनरल राहणार आहेत, हे विशेष !गेल्या वर्षभरात सर्वच मार्गावर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रेल्वेकडून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमधील जनरल कोचची संख्या कमी केल्याने गरिब वर्गाच्या रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. एसीचे तिकिट काढून प्रवास करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते जनरलच्या तिकिटा घेऊन गाडीत चढतात. जागा मिळेल तेथे बसून, उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे गाड्यात वाद होतात. त्याच्या तक्रारीही होतात अन् अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला जातो. हा सर्व प्रकार प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही मनस्तापाचा विषय ठरला आहे. तो लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नवीन कोच निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. त्यात ५३०० कोच जनरलचे राहणार आहेत. असा आहे कोच निर्मितीचा आराखडा२०२४ -२५ मध्ये अमृत भारत जनरल कोच सह एकूण २६०५ कोच, १४७० स्लीपर आणि नॉन एसी कोच, ३२३ एसएलआर कोच, ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे २०२५-२६ मध्ये अमृत भारत जनरल कोचसह २७१० कोचची निर्मिती केली जाणार असून, १९१० नॉन एसी स्लीपर, ५१४ एसएलआर कोच, उच्च क्षमतेच्या २०० पार्सल व्हॅन आणि ११० पॅन्ट्री कार निर्माण करण्याची योजना रेल्वेने बनविली आहे.




Konkan Railway | लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी वाढीव थांबे देण्यास रेल्वेचा नकार

कोकण रेल्वे सांतरण हॉल्ट ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले असल्याचे उत्तर एका निवेदनाला उत्तर देताना कोकण रेल्वेने सांगितले आहे. 
   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक 01139/40 नागपूर मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला कोकण रेल्वे मार्गावर दिलेल्या थांब्याव्यतिरिक्त अन्य स्थानकांवर थांबे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. ही गाडी कायमस्वरूपी करावी तसेच वाढीव थांबे मिळावेत अशी मागणी कोकण रेल्वेकडे आली होती. मात्र या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
खान्देश, विदर्भ व कोकणाला जोडणाऱ्या या विशेष गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या गाडीला अतिरिक्‍त थांबे देवून ती कायमस्वरूपी करावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगांव यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान, केंदीय रेल्वे मंत्री, कोकण रेल्वे, रेल्वे बोर्ड तसेच संबधित लोकप्रतिनिधींना पोस्टल निवेदनातून केली होती. कोकण रेल्वे मार्गावरील वीर, आडवली, विलवडे, वैभववाडी रोड, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी टर्मिनस येथे थांबेही देण्याची मागणी या निवेदनात केली होती. या निवेदनाचे उत्तर कोकण रेल्वेने दिले असून त्यात या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
कोकण रेल्वे ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. आपण विनंती केलेल्या स्थानकात गरजेप्रमाणे थांबे या आधीच देण्यात आले आहेत. तसेच गणेश चतुर्थी, होळी आणि इतर हंगामात चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडयांना या स्थानकांवर थांबे देत येत असल्याचेही या उत्तरात कोकण रेल्वेने नमूद केले आहे.
सावंतवाडीचा थांबा अजूनही पूर्ववत नाही.
या गाडीला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र या गाडीला प्रवासीसंख्या Footfall जास्त असुनही या गाडीचा थांबा काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही गाडी महत्वाची  मानली जात आहे. कारण विदर्भातील आणि खान्देशातील पर्यटक या गाडीने कोकणात उतरत आहे. सावंतवाडी तालुका येथील लाकडी खेळण्यांसाठी तसेच रेडी, आंबोली या सारख्या पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध मानला जात असताना या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा असणे गरजेचे आहे.

Konkan Railway: सावंतवाडी स्थानकाच्या नामकरणासाठी शासनातर्फे सकारात्मक हालचाली सुरू….

   Follow us on        

मुंबई:कोकणरेल्वेच्या सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण करावे या कोकणकरांच्या मागणीला महाराष्ट्र शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या स्थानकाचे लवकरच नामकरण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

या स्थानकाच्या नामांतराची मागणी झाली तेव्हा एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावरून मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण केल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search