Category Archives: कोकण रेल्वे




Konkan Railway: वीर रेल्वे स्टेशन हे रायगड जिल्हातील मध्यवर्ती ठिकाण असून स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या नजीकचे शहर आहे.तसेच कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी अशा मेमू २ेल्वे चालवण आवश्यक आहे. दिवा ते पनवेल / पेन / रोहा मेमू रेल्वेच्या दिवसातून २० फेऱ्या होत असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे,रायगड जिल्हयातील वीर जवळील महाड हे शिवकालीन ऐतिहासीक वारसा लाभलेले शहर आहे,त्यामुळे वीर रेल्वे स्टेशनला पर्यटणदृष्ट्या खूप महत्व प्राप्त झालेले आहे.तसेच पनवेल ते वीर दरम्याने रेल्वेचा दुहेरी मार्गही आहे.व वीर येथे ४ फलाटही आहेत.मुंबई ते रोहा हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो तर रोहा ते वीर पर्यंतचा रेल्वेमार्ग कोकण रेल्वेच्या अखत्यारित येतो.तरी कृपया मध्य रेल्वेवरील दिवा ते पनवेल / पेन / रोहा आणि पश्चिम रेल्वेवरील वसई ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या सर्व मेमू रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरील वीर स्थानकापर्यंत चालवाव्यात,अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई च्या वतीने मध्य रेल्वेकडे मागणी करण्यात आली आहे.
दिवा ते पनवेल किंवा डहाणू / वसई रोड ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या मेमू रेल्वेला वीर स्टेशनपर्यंत चालवल्यास कोकणातील रायगड जिल्हामध्ये पर्यटणासाठी जाणाऱ्या १) रायगड किल्ला २) महाडचे चवदार तळे ३) चौल येथील गरम पाण्याची कुंडे ४) गांधरपाळे लेणी ५) तलोशीचे रांगूमाता देवस्थान ६) वालनकोंड ७) पाचाड येथील जिजाऊंची समाधी अशा ऐतिहासीक स्थळांना भेट देण्यासाठी वीर हे मध्यवर्ती व जवळचे स्टेशन आहे,तरी मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांनी प्रवाशांच्या मागणीचा सहानुभूतिपुर्वक विचार करावा असे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.
दिवा येथील फेऱ्या वीर स्टेशनपर्यंत चालवाव्यात.
१) दिवा रोहा ( ६१०११ ) ८.४५ am,
२) दिवा पनवेल ( ६१०१७ ) ९.१० am,
३) दिवा पेन ( ६१०२३ ) ९.४० am,
४) दिवा पेन ( ६१०१९ ) ११.२० am,
५) दिवा रोहा ( ६१०१५ ) ६.४५ am,
६) दिवा पेन ( ६१०२५ ) ७.५० am,
७) दिवा रोहा ( ६१०१३ ) ८.०० am
वसई रोड पनवेल मेमू :
८) डहाणू पनवेल ( ६९१६४ ) ५.२५ am,
९) वसई पनवेल ( ६९१६८ ) १२.१० pm,
१०) वसई पनवेल ( ६९१६६ ) ४.४० pm
निवेदनावर अध्यक्ष श्री.शेखर बागवे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सह्या केल्या असून त्याच्या प्रति कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.संतोषकुमार झा,जनरल मॅनेजर : पश्चिम रेल्वे,खासदार श्री.सुनिल तटकरे,खासदार श्री.नारायण राणे व खासदार श्री.हेमंत सावरा यांना पाठवल्या आहेत.




सावंतवाडी, दि. १२ फेब्रु. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लागणार्या पाण्याची व्यवस्था, रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आरा खडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी लागणारा निधी रत्नसिंधू योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सावंतवाडी स्थानकावर लवकरच ठिकाणी रेल हॉटेल्स व रूम उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. सावंतवाडी- मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी दर्जेदार असे रेल हॉटेल व तुतारी रेल्वे रुळाच्या बाजूला नवे प्लॅटफॉर्म आणि छोट्या निवासी रूमची व्यवस्था करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या जागेची पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब , रेल्वेचे जे पी प्रकाश, श्री ए बी फुले, सुरज परब, सुनील परब ,श्री गाड , योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे आदी उपस्थित होते.




Konkan Railway: श्री भराडी देवी आंगणेवाडी जत्रेसाठी जाणार्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः
गाडी क्र. 01134 / 01133 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष:
गाडी क्र. 01134 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून रविवार दिनांक २३/०२/२०२५ रोजी १८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे 06:25 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01133 लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष लोकमान्य टिळक (टी) येथून सोमवार दिनांक 24/02/2025 रोजी सकाळी 08:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19:00 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 एलएचबी कोच : दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 03 कोच, थ्री टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 08 कोच, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
या गाडीचे आरक्षण 09/02/2025 रोजी प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल




सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील तुतारी एक्सप्रेसच्या प्रवाशांची होणारी गैरसोय आता दूर होणार असून तीन नंबर प्लॅटफॉर्मलगत पक्का डांबरी रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून ओव्हरब्रिज ओलांडून तीन नंबर प्लॅटफॉर्मवर येण्याची गैरसोय दूर होणार असून प्रवाशांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात विशेषतः सावंतवाडी ते दादर जाणारी तुतारी एक्सप्रेस ही तीन नंबर प्लॅटफॉर्मवर थांबवली जाते. त्यामुळे या गाडीतून ये जा करणारे प्रवासी व त्यांचे नातेवाईक यांची गैरसोय होत होती. रेल्वे स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरून तीन नंबरवर जाण्यासाठी प्रवाशांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सामानासह ओव्हर ब्रिजवर चढण्याची व उतरण्याची कसरत करावी लागत होती. विशेषतः अंध, अपंग तसेच वृद्ध व महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर काही प्रवासी खाजगी वाहने तसेच रिक्षाच्या माध्यमातून तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या पलीकडे असलेल्या कच्च्या रस्त्यावरुन जीवेघेणा प्रवास करीत त्या ठिकाणी पोहोचत असत त्यामुळे हा रस्ता पक्का व्हावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. मात्र ही जागा रेल्वेच्या ताब्यात असल्याने व कोकण रेल्वे बोर्डाकडून त्यावर खर्च घातला जात नसल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पुढाकार घेऊन सदरचा रस्ता पक्का करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी १७ लाख ७२ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात रस्त्याचा आकार मातीचा भरावा तसेच जीएसबी मटेरियलचा थर त्यानंतर खडीकरण व डांबरीकरण अशा स्वरूपात ही पक्की सडक निर्माण केली जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हा रस्ता करण्याचे काम केले जात आहे. सावंतवाडी येथील गणेश इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. तब्बल ७ मीटर रुंदीचा हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक १८५ ला जोडत असून कोकण रेल्वेच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मला समांतर असा हा रस्ता सावंतवाडी वेंगुर्ला रस्त्यालाही जोडला जाणार आहे. या रस्त्यावर असलेल्या ओहोळावर ३ मीटर लांबी व रुंदीचा बॉक्स सेल बांधण्यात येणार आहे. सद्या या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील भरावाचे तसेच जीएसबी मटेरियल पसरण्याचे काम वेगाने सुरु आहे. लवकरच हा रस्ता पूर्ण होणार असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच मळगाव शिवाजी चौक येथून रेल्वे फाटकातून निरवडेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना देखील फाटक पडल्यावर होणारा विलंब टाळण्यासाठी हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरु शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांमधून या रस्त्याबाबत समाधान व्यक्त होत आहे.




Konkan Railway: या महिन्यात दरम्यान तेजस एक्सप्रेस किंवा जन शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरु असलेल्या प्लॅटफॉर्म अपग्रेडेशनमुळे या दोन्ही गाड्या दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सीएसएमटीऐवजी दादर पर्यंतच धावणार आहेत.
सध्या, तेजस एक्सप्रेस (ट्रेन क्र. 22120) आणि जन शताब्दी एक्सप्रेस (ट्रेन क्र. 12051), ज्या सीएसएमटी येथून प्रवास सुरु करतात आणि संपवतात त्यांचे अंतिम स्थानक काही कालावधीसाठी दादर असणार आहे. हा तात्पुरता बदल 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. त्यानंतर, गाड्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणाहून सुटतील आणि थांबतील. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची. याशिवाय, मुंबईत (Mumbai) येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या अंतिम ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल, जसे की लोकल ट्रेन, टॅक्सी किंवा इतर वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागेल.




Konkan Railway: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रे दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1) गाडी क्र. 01129 / 01130 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) विशेष:
गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शुक्रवार दिनांक 21/02/2025 रोजी 00:55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्र. 01130 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) ही विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून शुक्रवार दिनांक 21/02/2025 रोजी 18:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 06:10 वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 19 एलएचबी कोच : फर्स्ट एसी – 01 कोच, टू टायर एसी – 02 कोच, थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 08 कोच, जनरेटर कार – 02
2) गाडी क्र. 01131 / 01132 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) विशेष:
गाडी क्र. 01131 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शनिवार दिनांक 22/02/2025 रोजी 00:55 वाजता सुटेल आणि गाडी त्याच दिवशी दुपारी 12.00 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्र. 01132 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून शनिवार दिनांक 22/02/2025 रोजी 18:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 06:10 वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 22 एलएचबी कोच : दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 09 कोच, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
गाडी क्रमांक 01130 आणि 01132 या गाड्यांचे आरक्षण दिनांक 09/02/2025 रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.




Mumbai Goa Highway:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता नवीन डेडलाईन मिळाली आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र महामार्गाची सध्याची स्थिती आणि चालू असलेल्या कामाची गती पाहता प्रशासन ही नवीन डेडलाईन पाळण्यास अपयशी ठरणार असल्याचा आरोप मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने केला आहे. एवढ्यावरच न थांबता समितीने या महामार्गावरील प्रत्येक किलोमीटरच्या कामाची सध्याची स्थिती लिखित स्वरूपात सादर केली आहे. समितीने बनविलेल्या यादीनुसार बरेच काम अपूर्ण असून कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
समितीने मांडलेली महामार्गाची सद्यस्तिस्थि
टप्पा-०१ पनवेल ते कास -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे. तर अद्यापही साईट पट्टी, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे, ड्रेनेज लाईन, सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व सदर टप्प्यात ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत. सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही. कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे. महामार्गाला पेव्हर ब्लॉक दिसत आहेत. सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे, जनावरे, वहानांसाठीभुयारी मार्ग, साईटपट्टीचे काम बाकी आहे तर अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही. या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे. याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघात वाढत आहेत. सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखड्यानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत. तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्या ची जमीन नकसान होत आहे.
टप्पा-०३ इंदापूर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे. सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सदर ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता अद्यापही सदर कामाला गती देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडन्यात येणार आहे. आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५ किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तर लोणेरे येथील ब्रिजचे काम अद्यापही बंद आहे.
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळली तर दूसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे. टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिती बिकट आहे, सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे. टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळूण येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम होणे अपेक्षित असताना अद्यापही कामाला सुरुवात नाही. टप्पा-०८ व ०९-आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेले आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिती दर्शवीत आहोत. तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.