Category Archives: कोकण

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस | संभाव्य वेळापत्रक, तिकीट दर आणि थांबे

Vande Bharat Express : चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे जून पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली. या रेल्वेचा शुभारंभ मडगावहून होईल व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील, अशीही माहिती मिळाली आहे.

संभाव्य वेळापत्रक 
या गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी ही गाडी तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाच्या आसपास चालवली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून ५.३० सुटून मडगाव या स्थानकावर दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी १:३० वाजता सुटेल ती मडगाव स्थानकावर रात्री ८:३० वाजता पोहोचेल. 
गाडीचे थांबे
या गाडीला कोणते थांबे असतील याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी रत्नागिरी जिल्ह्यात २ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ थांबा या गाडीला मिळण्याचे संकेत आहेत. ठाणे या स्थानकावर या गाडीला थांबा असेल. पनवेल या स्थानकाचे महत्व पाहता या गाडीला येथेही थांबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनकडून थांब्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. 
तिकीटदर 
वंदे भारत एक्सप्रेस एसी चेअर क्लास आणि एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास या दोन श्रेणीसह चालविण्यात येणार आहे. दोन्ही मिळून एकूण १६ डबे असणार आहेत,त्यात एकूण ११२८ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.  चेअर क्लास या श्रेणीचे मुंबई ते मडगाव तिकीट भाडे सुमारे १५८० असेल तर एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासचा तिकीटदर अंदाजे २८७० रुपये एवढा असेल.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

सावधान | आंबोलीत ‘तो’ टस्कर परत येत आहे….

सिंधुदुर्ग : आंबोलीच्या नागिरकांमध्ये चिंता निर्माण होईल अशी एक बातमी आहे. आंबोली परिसरात गेली काही वर्षे ये-जा करणार्‍या महाकाय टस्करने आपला मोर्चा पुन्हा आंबोलीकडे वळवला आहे. शुकवारी तो आजरा येथे दिसला होता . येत्या 2 ते 4 दिवसांत हा टस्कर आंबोली परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. 
हा टस्कर अचानक रस्त्यावर येत असल्याने काही वेळा येथील वाहन चालकांची भंबेरी उडाली आहे. या टस्कर ने आंबोलीतील लोकवस्तीत शिरून तेथे हैदोस मांडला होता. दिवसा जंगलात राहून तो रात्री लोकवस्तीत धुडगूस घालतो. त्यामुळे त्याच्या येण्याने आंबोलीच्या जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारवाईच्या नावाखाली सिंधुदुर्ग वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूर जिल्हा हद्दीत हुसकावून लावत आहेत. पण तिथे कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी त्याला पुन्हा आंबोली हद्दीत हुसकावतात यामुळे हा टस्कर गेली काही वर्षे सतत आंबोलीसह आजरा परिसरात ये-जा करत असतो.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

अवघ्या एका मिनिटात सर्व गाड्यांच्या सर्व श्रेणींचेआरक्षण फुल्ल कसे? दाल मे जरूर कुछ काला; प्रवाशांचा आरोप…

संग्रहित छायाचित्र
Konkan Railway News | सकाळी ८ वाजता आरक्षण चालू होते आणि ८ वाजून १ मिनिटाला सर्व गाड्यांच्या सर्व श्रेणीची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवते. असा प्रकार मागील २/३ दिवसांपासून गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी आरक्षण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चाकरमान्यांनी अनुभवला आहे. एका मिनिटात सर्वच गाड्यांतील सर्वच वर्गाचे आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ कशी काय होऊ शकते असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात असून दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असा संशय मूळ धरत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशीही मागणी होत आहे. 
याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनसुद्धा कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही असा आरोप येथील प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोंकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. हंगामात ३०० ते ४०० रुपये असलेले तिकीट १००० ते १५०० रुपयांपर्यंत विकून हे दलाल प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने हे महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो.
तिकिटे मिळवण्यासाठी  हे  दलाल गैरमार्गाचा वापर सुद्धा करत आहेत. कधी रेल्वे कर्मचाऱ्यांना हाताशी धरून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वर हॅक करण्याचा प्रकार पण ते अवलंबत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. 
या दलालांमुळे सामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे या दलालांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी टर्मिनस येथे थांबा मिळणे गरजेचे…

सिंधुदुर्ग | शाम जोशी :कोकण रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक सावंतवाडी हा राज्यातील शेवटचा थांबा आहे. या स्थानकास टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हा दर्जा फक्त नावापुरताच दिला की काय असा प्रश्न वारंवार पडत आहे.

कोकणातील ईतर स्थानकांशी तुलना करता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा, सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना येथे क्वचितच थांबा आहे. खूप प्रयत्न करून कसाबसा जनशताब्दी या गाडीला येथे थांबा मिळविण्यात यश आले आहे. एक दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबे देण्यात आले होते. मात्र त्या गाड्यांची या स्थानकावर येण्याची वेळ खूपच गैरसोयीची होती. कमी प्रतिसाद म्हणुन त्या गाड्यांचे येथील थांबे काढून टाकले, मात्र त्याबदल्यात अजून दुसऱ्या कोणत्या गाडीला येथे थांबे दिले गेले नाही आहेत. 

अलीकडेच वंदे भारत या गाडीची चाचणी घेतली असता टर्मिनस असूनही तिला या स्थानकावर थांबविण्यात आले नाही. यावरून या गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्याची आशा कमी झाल्याचे बोलले जात आहे. 

सावंतवाडी रेल्वे स्थानक तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यातील प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतो. त्याचबरोबर आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर आणि ईतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सोयीचे आहे. या स्थानकावर वंदे भारत आणि तेजस या सारख्या गाड्यांना थांबा दिल्यास येथील पर्यटनाचा विकास होईल. मुंबई गोवा महामार्ग येथून फक्त २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे,त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करून देवून रस्ते वाहतुकीची समस्या सुटल्यास त्याचा फायदा येतील नागरिकांना तसेच येथे भेट देणार्‍या पर्यटकांना होणार आहे. 

 

 

Loading

गणेशोत्सव रेल्वे आरक्षण | दलालांची चांदी; सामान्यांची लूट..

Konkan Railway News | यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी रेल्वे आरक्षण चालू झाले आहे. या मार्गावरील नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटात फुल्ल होऊन जवळ जवळ सर्वच गाड्यांच्या सर्वच श्रेणीचे आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे. आज तर १६ सप्टेंबर चे आरक्षण फक्त एक मिनिटात रिग्रेट दाखवत होते,त्यामुळे दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असा संशय मूळ धरत आहे. 
याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनसुद्धा कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही असा आरोप येथील प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोंकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. ३०० ते ४०० रुपये असलेले तिकीट १००० ते १५०० रुपयांपर्यंत विकून हे दलाल प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने हे महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो.
दलाल आरक्षित तिकिटे कशी मिळवतात?
१) काही दलाल तिकीट विंडो समोर रात्रभर आपली माणसे उभी करून हंगामाच्या काळातील गाड्यांची  तिकिटे काढतात.
२) दलाल आता आधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करून गैर मार्गाने ऑनलाईन तिकिटे मिळवतात. यासाठी ते जलदरित्या तिकीट बुकिंगसाठी काही सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक ती माहिती अगोदरच भरून काही क्षणात तिकीट आरक्षित करता येते. 
३) दलाल काही  रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने  काळा बाजार करीत असल्याचा संशय आहे. 
या दलालांमुळे सामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे या दलालांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

Loading

चिपळूण तालुक्यातील कळमुंडीमध्ये  बैलगाडा शर्यतीदरम्यान दुर्घटना; अंगावरुन बैलगाडा गेल्यामुळे चिमुकला गंभीर जखमी

रत्नागिरी | चिपळूण तालुक्यातील कळमुंडीमध्ये  बैलगाडा शर्यतीदरम्यान एक दुर्घटना घडली आहे. कोकणात शर्यतीदरम्यान एक उधळलेला बैल 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेल्याचा प्रकार घडला आहे. चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
चिपळूण तालुक्यातील कळमुंडीमध्ये बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागलं आहे. अंगावरुन बैलगाडा गेल्यामुळे पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. त्याला कराडमधील रुग्णालयात उपाचर सुरु असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जखमी झालेला मुलगा हा चिपळूणमधील कोंढे गावातील रहिवासी आहे. तो बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी आला होता.

Loading

गणेश चतुर्थी २०२३| सीट आरक्षणासाठी रेल्वेचे ‘रिग्रेट’ गाणे

Konkan Railway News |यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेचे आगावू आरक्षण १६ मे पासून चालू झाले आहे. भाविकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरक्षण चालू होताच अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल्ल होत आहे. आज १९ मे रोजी दिनांक १६ सप्टेंबर चे आरक्षण चालू झाले होते. मात्र काही मिनिटांत कन्फर्म तर सोडाच वेटिंग लिस्ट चे तिकीट मिळणे कठीण झाले होते. कारण जवळपास सर्वच गाड्यांचे, सर्व श्रेणीचे आरक्षणाचे स्टेटस ‘Regret’ दाखवत आहे. त्यामुळे अनेकांच्या त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३, रोजी मंगळवारी आहे. यावर्षी अंगारक योग जुळून आला आहे, त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या गावी जाण्याची शक्यता आहे. आज १६ सप्टेंबर, शनिवारचे आरक्षण खुले झाले होते. सहाजिकच आज अपेक्षेप्रमाणे मागील २/३ दिवसांच्या तुलनेत रेल्वे सीट आरक्षणास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे.

[irp posts=”7965″

Loading

साळगाव भांडारसावंतवाडी येथील श्री सावंत कुलस्वामि मंदिर वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन


सिंधुदुर्ग |कुडाळ तालुक्यातील साळगाव भांडारसावंतवाडी येथील श्री सावंत कुलस्वामि मंदिर मध्ये वार्षिक उत्सवाचे आयोजन दि. 20 मे व 21 मे रोजी केले आहे. शनिवार दि. 20 मे 2023 रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्याच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चे आयोजन केले आहे. रात्रौ 8:30 वाजता लहान मुला मुलींचे, महिलांचे नृत्य, गायन, वादन असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.

रविवार दि. 21 मे 2023 रोजी रात्रौ 8:30 वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ चा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सावंत कुलस्वामि मंडळ ( भांडारसावंतवाडी साळगाव ) ने केले आहे.

Loading

NH-66 | परशुराम घाटातील तो अवघड ‘कातळ’ अडथळा अखेर पार

Mumbai Goa Highway News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कठीण कातळभाग लागल्याने या भागातील चौपदरीकरणाच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र आता कठीण कातळाचा बहुतांश भाग फोडण्यात अखेर यश आले आहे. 
खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. या कठीण कातळभागामुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा कातळभाग फोडण्यासाठी सुरुंग लावण्याची परवानगी कंत्राटदार कंपनीने शासनाकडे मागितली होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणाने त्याला परवानगी नाकारली होती.आता कातळ फोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू केली जाणार असे आश्वासन देण्यात आले आहे. 

Loading

रविवारी दक्षिण रेल्वेचा ‘ब्लॉक’; कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांवर परिणाम

Konkan Railway News | दक्षिण रेल्वे काही अभियांत्रिकी कार्यासाठी येत्या रविवारी दिनांक २१/०५/२०२३ रोजी एक ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉक चा परिणाम कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्यांवर होणार आहे. तो पुढील प्रमाणे
पूर्ण रद्द झालेल्या गाड्या 
  • Train no. 12202 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express ही गाडी २१/०५/२०२३ रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. 
  • Train no. 12201 Lokmanya Tilak (T) – Kochuveli Express ही गाडी २२/०५/२०२३ रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. 
अंशतः रद्द झालेल्या गाड्या
  • Train no. 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddinही गाडी २१/०५/२०२३ रोजी थ्रिसूर ते एर्नाकुलम या स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. 
वेळापत्रकात बदल केलेल्या गाड्या
  • Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Express ही गाडी दिनांक २१/०५/२०२३ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल या स्थानकावरून आपल्या नियमित वेळापत्रकाच्या वेळेपेक्षा सुमारे  ३ तास उशिरा दुपारी १२:१५ वाजता सुटेल.
  • Train no. 20909 Kochuveli – Porbandar Express ही गाडी दिनांक २१/०५/२०२३ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल या स्थानकावरून आपल्या नियमित वेळापत्रकाच्या वेळेपेक्षा सुमारे 1 तास ३५ मिनिटे उशिरा दुपारी १२:४५ वाजता सुटेल.
[email-subscribers-form id=”2″]

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search