Category Archives: कोकण

कोकणात ११ पर्यटन स्थळी रोप-वे उभारण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

   Follow us on        
मुंबई : राज्यातील अनेक पर्यटन ठिकाणांना दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आबालवृद्धांना भेट देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून राज्यसरकारने या ठिकाणांवर केंद्र सरकारच्या साथीने राज्यात ४५ रोप-वे उभारण्यास मान्यता दिली आहे. या रोपवे मधील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे उभारण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. यांच्याबरोबरीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेअंतर्गत एकूण ४५ रोप-वेची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली. राज्य सरकारकडून १६, तर ‘एनएचएलएमएल’कडून २९ रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे असतील.
रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून, त्यात ‘एनएचएलएमएल’ला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देणे, ‘एनएचएलएमएल’ला जागा उपलब्ध करून त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे, राज्य सरकारकडून खासगी-सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा-वापरा-हस्तांतरित करा या मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.

प्रगतीपथावरील प्रकल्प

■ हाजीमलंग, कल्याण फनिक्युलर ट्रॉली सार्वजनिक बांधकाम विभाग (पीपीपी)
■ रेणुकामाता मंदिर, माहुरगड, नांदेड सा. बां. विभाग (सीआरआयएफ) प्रगतिपथावर
■ सिंहगड रोप-वे खासगी विकासक
■ जेजुरी रोप-वे – खासगी विकासक

प्रस्तावित प्रकल्प कोकण विभाग

■ रायगड किल्ला सा. बां. विभाग –
■ माथेरान एमएमआरडीए
■ कणकेश्वर, अलिबाग जिल्हा परिषद, रायगड
■ बाणकोट किल्ला, मंडणगड एनएचएलएमएल
■केशवराज (विष्णू) मंदिर, दापोली एनएचएलएमएल
■ महादेवगड पॉइंट, सावंतवाडी एनएचएलएमएल
■ माहुली गड, शहापूर- एनएचएलएमएल
■ सनसेट पॉइंट, जव्हार – एनएचएलएमएल
■ गोवा किल्ला, दापोली – एनएचएलएमएल
■ अलिबाग चौपाटी ते किल्ला नगर परिषद,
■ अलिबाग घारापुरी, एलिफंटा लेणी जिल्हा परिषद रायगड

दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर पर्यंत नेण्यासाठी दिवा – दादर मार्गाची पाहणी करणार – मध्य रेल्वेकडून आश्वासन

   Follow us on        

मुंबई : दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी तसेच दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (उबाठा) , रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर वरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाचे तीन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु आजच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे श्री. संजय जोशी, श्री बाबी देव यांनी दादर वरून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी श्री. मीना यांनी श्री. संजय जोशी आणि श्री. बाबी देव यांनी सुचविलेल्या पर्यायाबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिवा पर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसात करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

शिष्टमंडळामध्ये खासदार – शिवसेना नेते श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार श्री. विनायक राऊत, श्री अरुणभाई दुधवडकर, आमदार श्री महेश सावंत, श्री.संतोष शिंदे, श्री. बाबी देव, श्री.संजय जोशी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी २ विशेष गाड्यांची घोषणा; आरक्षण या तारखेपासून सुरु

   Follow us on        
Konakn Railway:यंदा होळी सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणकरांसाठी  एक खुशखबर आहे. होळी सणा  दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे
१) गाडी क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी- मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी विशेष:
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. विशेष ही गाडी  गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मुंबई सीएसएमटी येथून ००:२०  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. .
गाडी क्र. ०११५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी स्पेशल ही गाडी  गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मडगाव जंक्शन येथून १४:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना: एकूण २४ कोच : फर्स्ट एसी – ०१  कोच, कंपोझिट (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१  कोच, टू टायर एसी – ०२  कोच, थ्री टायर एसी – १० कोच, स्लीपर – ०४  कोच, जनरल – ०४  कोच, एसएलआर ०२
२) गाडी क्र. ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी)  – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी)  विशेष:
गाडी क्र. ०११२९  लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. ही विशेष गाडी गुरुवार दिनांक १३/०३/२०२५ आणि २०/०३/२०२५ रोजी २२:१५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून विशेष सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:45 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्र. ०११३० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष ही गाडी  शुक्रवार दिनांक १४/०३/२०२५ आणि २१/०३/२०२५ रोजी १३:४० वाजता मडगाव जंक्शन येथून  सुटेल आणि  दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ०४:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ .
गाडी क्रमांक ०११५२ आणि ०११३० या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४/०२/२०२५  रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली  आहे.

वैभववाडी: केळीच्या खोडा आणि पानांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

   Follow us on        

वैभववाडी: वैभववाडी रेल्वे स्थानक येथे वैभववाडी रेल्वे कर्मचारीवृंद तर्फे काल सालाबादाप्रमाणे सत्यनारायण पूजा आणि शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वात मोठे आकर्षण ठरले ते सत्यनारायण पूजेच्या मखरासाठी केळीच्या खोडा आणि पानांपासून पूजेच्या मखरासाठी बनविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.

सावंतवाडीच्या निरवडे कोनापाल या गावातील आनंद यशवंत मेस्त्री या तरुणाने कल्पकतेने ही प्रतिमा साकारली होती. यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक मखर बनवले आहेत. त्याने श्री देव विठ्ठल, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच ईतर बर्‍याच कलाकृतींचे मखर बनवले आहेत आणि प्रशंसाही मिळवली आहे. एक छंद म्हणुन त्याने ही कला जोपासली आहे.

या उत्सवा दरम्यान दिवसभरात सत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री ९ वाजता रेंबो फ्रेंड सर्कल, कवठणी प्रस्तुत “गावय” या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी नारायण नाईक यांनी दिली.

 

 

 

“… तर विशेष गाड्यांतून प्रवास करणे परवडेल.” कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली ‘ही’ मागणी…

   Follow us on        
Konkan Railway: हंगामाच्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात काही विशेष गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देते. कोकण रेल्वे मार्गावर गणेश चतुर्थी, होळी, उन्हाळी सुट्टी तसेच ईतर हंगामाच्या कालावधीत विशेष गाड्या चालविण्यात येतात. या गाड्यांचा तिकीटदर नियमित गाड्यांच्या तिकीट दरापेक्षा जास्त असतो. काही स्थानकांदरम्यान हा दर दुपटी पेक्षा जास्त असतो. कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविताना प्रवाशांना परवडेल अशा प्रकारे त्यांचे नियोजन करावे अशी विनंती केली आहे.
विशेष गाड्यांसाठी  २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नुसार या गाडय़ांचे तिकीटदर आकारले जातात.या नियमावली नुसार विशेष गाड्यांना तिकीटदरा व्यतिरिक्त  सेकंड क्लास श्रेणी साठी १०% तर ईतर श्रेणी करिता ३०% अतिरिक्त दर आकारले जातात.
अतिरिक्त तिकीट दर आकारणीची किमान आणि कमाल मर्यादा खालील टेबल नुसार आहे.
तसेच या विशेष गाड्यांच्या  तिकीटदरांसाठी किमान प्रवास अंतर ठरविण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे
या नियमावलीनुसार मुंबई ते माणगाव किंवा खेड प्रवास करणाऱ्या प्रवाशाला स्लीपर श्रेणी च्या डब्यातून प्रवास करण्यासाठी 500 किलोमीटर प्रवासाचे पैसे द्यावे लागत आहेत. कारण नियमावली नुसार स्लीपर श्रेणीच्या तिकीटदरांसाठी  किमान प्रवास अंतर ५०० किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही १०० किलोमीटर प्रवासाचे आरक्षण करायला गेलात तरी तुम्हाला ५०० किलोमीटरप्रमाणे तिकीट दर द्यावाच लागणार आहे. या कारणाने कमी अंतराच्या प्रवासासाठी विशेष गाड्यांचा तिकिटदर दुपटी पेक्षा जास्त वाढतो.
CSMT to KHED Fare for Regular Train Fare for Special Train
Sleeper (SL) ₹ 190 ₹ 385
Three Tier AC (3A)
₹ 505 ₹ 1,050
Two Tier AC (2A) ₹ 710 ₹ 1,440
मात्र सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या साठी किमान अंतर अनुक्रमे 100 आणि 250 एवढे आहे. त्यामुळे कमी अंतरासाठी विशेष गाड्यांचा तिकीटदरांत नियमित गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये मोठा फरक नसतो. त्यामुळे मुंबई ते खेड, चिपळूण, रत्नागिरीसाठी स्लीपर क्लास आणि त्यावरील श्रेणीच्या गाड्या न चालविता सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या श्रेणीचे डबे असलेल्या गाड्या चालविण्यात याव्यात अशी विनंती कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी समितीच्या वतीने ईमेल द्वारे रेल्वे प्रशासनला केले आहे.

मालवणात उद्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ; असा असेल नवीन पुतळा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, माजी मंत्रीआ णि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.

राजकोट किल्ल्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभा करण्यात येत आहे. शिवरायांच्याहा तातील तलवार २३ फुटांची असून चबुतऱ्याची उंची ३ मीटर असेल. पुतळा मजबूत करण्यासाठी ३.७० मीटरचा पाया तयार करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून असून पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची ९३ फुट असेल. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा अन् पायाच्या कामासाठी एम ५० हे हायग्रीड काँक्रीट वापरण्यात येत असून, आयआयटी मुंबईकडून

पुतळ्याचे डिझाईन बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे. ताशी २०० किमी वाऱ्याच्या वेगातही पुतळ्याला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या नोयडा येथील कारखान्यात ब्रान्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात असून राजकोट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचा पाया आणि चबुतरा बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

एलएचबी स्वरुपात धावलेल्या मत्स्यगंधा एक्सप्रेसचे उद्घाटन

   Follow us on        

Konkan Railway : मत्स्यगंधा एक्सप्रेस काल 17 फेब्रुवारी रोजी नव्याने जोडण्यात आलेल्या LHB (लिंक हॉफमन बुश) डब्यांसह पहिल्यांदा चालविण्यात आली. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी LHB डब्यांमध्ये प्रवास करून या नवीन रेकचे उद्घाटन केले.

25 वर्षांपासून सुरू असलेल्या या ट्रेनला आता जुने डबे बदलून नवीन डबे बसवण्यात आले आहेत. अपग्रेड केलेल्या ट्रेनचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी झाले. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी LHB स्वरुपात चालविण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.

“मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील समस्यांवर प्रकाश टाकणारा धीरजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री सोमन्ना यांच्याशी संपर्क साधला आणि विनंती केली. युनियनच्या मान्यतेने, जर्मन मॉडेलवर आधारित सुधारित मत्स्यगंधा ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेनमध्ये आता तात्काळ अपघाताचे संकेत दिले गेले आहेत आणि ते अधिक प्रवासी-अनुकूल आणि कमी गोंगाट करणारे डिझाइन केले आहे. याशिवाय, कोकण रेल्वे स्थानकासाठी 30 ते 40 कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून त्यात सुधारित पार्किंग आणि इतर सुविधांचा समावेश आहे. डिझाईन 1 मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रियेकडे जाईल. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये समाविष्ट करणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार यशपाल सुवर्णा, रेल्वेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Konkan Railway: महाकुंभमेळा विशेष गाडीच्या डब्यांत वाढ

   Follow us on        

Konkan Railway: महाकुंभमेळ्यासाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्र. ०११९२ / ०११९१  उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष या गाडीला स्लीपर श्रेणीचे २ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ होणार आहे. प्रवाशांनी या गाडीला दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात आली आहे.

गाडी क्र. ०११९२ उडुपी – टुंडला जं. महाकुंभ विशेष ही गाडी सोमवार, १७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून  सुटेल आणि टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी १३:००  वाजता  (बुधवार)  पोहोचेल.

गाडी क्र. ०११९१  तुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष गाडी तुंडला जंक्शन येथून  गुरुवार, २०/०२/२०२५ रोजी सकाळी ०९:३० रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १८:१० वाजता (शनिवार) उडुपीला पोहोचेल.

ही गाडी बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वरा, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जंयपुरी, माणिकपूर, मणिकपूर, मणिकपूर प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन या स्थानकांवर थांबेल.

या गाडीच्या डब्यांची सुधारित  रचना : एकूण 22 कोच : दोन टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 12 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.

नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदेभारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा

   Follow us on        
Konkan Railway: नागपूर -सिकंदराबाद  दरम्यान चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक २०१०१ /२०१०२ नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या ही गाडी  वंदे भारत एक्सप्रेसच्या २० डब्यांचा रेकसहित चालविण्यात येत आहे. मात्र त्याप्रमाणात प्रवासी संख्या नसल्याने ही गाडी ८ डब्यांच्या रेकसह चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनांतर्फे  करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे विकास समितीच्या वतीने जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे ई-मेल द्वारे ही मागणी केली आहे. तर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने ‘एक्स’ माध्यमातून ही मागणी नोंदवली आहे.
मुंबई मडगाव दम्यान सुरु करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. देशातील आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेस च्या यादीत या गाडीची गणना होत आहे. या गाडीची आरक्षण स्थिती नेहमीच फुल्ल आणि प्रतीक्षा यादीत असते कारण ही  गाडी ८ रेकसह चालविण्यात येते. या मात्र गाडीची या मार्गावरील लोकप्रियता आणि गरज पाहता ही गाडी जास्त डब्यांसह चालविणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस  १६ किंवा २० रेकसह चालविण्यात यावी अशी  मागणी होत आहे.

Konkan Raiwlay: रेल्वे प्रशासनाचा पुन्हा ‘दुजाभाव’

   Follow us on        
Konkan Railway: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक जात आहेत. भाविकांना या प्रवित्र स्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनाने देशातील सर्व रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सेवा चालविल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरसुद्धा महाकुंभमेळा विशेष २ गाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या गाड्या फक्त गोवा आणि दक्षिणेकडील भाविकांच्या सोयीसाठी  चालविण्यात आल्या असून कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागातील भाविकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करून गोवा राज्यातील भाविकांना महाकुंभमेळ्यात सहभागी व्हावे याकरिता एक विशेष गाडी चालवली आहे. ही गाडी पूर्णपणे गोवा राज्यातील भाविकांसाठी चालविण्यात आली असल्याने इतर भागातील प्रवाशांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. तर  उडुपी-चिकमंगळुरूचे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या मागणीनुसार उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष दुसऱ्या गाडीची  घोषणा झाली. मात्र या गाडीला कोकण रेल्वे मार्गाच्या महाराष्ट्र विभागात थांबे देताना कंजुषी केली आहे. या गाडीला फक्त रत्नागिरी, चिपळूण आणि रोहा येथे थांबा देण्यात आला आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा देण्यात आलेला नाही. देण्यात आलेले थांबे हे पाणी  भरण्यासाठी आणि तांत्रिक थांबे असल्याने ही गाडी सुद्धा कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागासाठी नसल्याचे सिद्ध झाले आहे.

मागणी करूनही गाडी नाही. 

महाकुंभ मेळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालविण्यात यावी आणि तिला कोकण रेल्वे मार्गावरील सर्व महत्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले होते. मात्र त्याची दखल गेली नसल्याने समितीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीलाही केराची टोपली

गोवा सरकारने महाकुंभमेळ्यासाठी सोडलेल्या विशेष गाडीला कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागात थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे पत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी  केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पाठविले होते. मात्र या मागणीची दखल अजूनपर्यंत रेल्वे मंत्र्यांनी घेतली नसल्याचे दिसते. एकीकडे इतर राज्यातील लोकप्रतिनिधींची विशेष गाड्यांची मागणी सहज मान्य होताना या विशेष गाडयांना महाराष्ट्रात  साधे थांबे देण्याच्या साध्या मागणीकडे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न पडताना दिसत आहे.
या सर्व प्रकारामुळे कोकण रेल्वे नक्की कोणासाठी, कोकण रेल्वेवर कोणाचे वर्चस्व हे प्रश्न पडत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search