रत्नागिरी, १४ जुलै, १८:३० | कोकण रेल्वेच्या वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भूस्खलन झाल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे. या व्यत्ययामुळे गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेस रोहा स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी येथे अडकली आहे. मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबविण्यात आली आहे.
हा अडथळा दूर करून लवकरच वाहतूक चालू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ अपेक्षित आहेत.
रत्नागिरी: चिपळूण खेड दापोली भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड येथील जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरले आहे. यंत्रणा अलर्ट झाली असून अनेकजणांना सुरक्षितेसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू असून अनेक सखल भागात पाणी भरण्याचे प्रकार घडले आहेत. सुरक्षिततेसाठी काही जणांना स्थलांतरित करण्यात येत आहे. खेड शहरातील नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आला आहे. चिपळूण शहरालाही पुराची भीती असून वशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे. या सगळ्या वरती चिपळूण व खेड नगरपरिषद प्रशासन लक्ष देऊन असून अलर्ट मोडवर आहे. तर तिकडे गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली आहे, सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकार घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडी येथील काय कुटुंबांना त्यामुळे स्थलांतर करण्यात आल आहे. गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुराच पाणी च पाणी चिपळूण व खेड बाजारपेठेत भरण्याची भीती व्यक्त होत आहे. खेडच्या जगबुडीने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरम्यान धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली रस्ता पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले– फेसबुक वरील रील मोठ्याप्रमाणात व्हायरल –व्हाट्सअँप ग्रुप एका दिवसात फुल्ल
Follow us on
सावंतवाडी:दि. १४ जुलै: कोकण रेल्वे येण्यासाठी कोणताही विरोध न करता आपल्या जमिनी या प्रकल्पाला देणाऱ्या कोकणकरांच्या हाती दोन ते तीन गाड्या सोडल्या तर काही लागले नाही. अनेकवर्षे प्रवासी संघटनेने केलेल्या वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, बोरिवली/सावंतवाडी या मार्गावर गाड्यांच्या केलेल्या मागण्या अपूर्ण आहेत. या गाड्या चालविण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण होणे महत्वाचे आहे. होळी- गणेशचतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र सावंतवाडी टर्मिनस च्या अपूर्ण कामामुळे त्या गाड्या दक्षिणेकडील राज्यात पाठवल्या जातात आणि ज्यांच्यासाठी या गाड्या सोडल्या त्यांनाच रेल्वे आरक्षणापासून वंचित राहावे लागते. चार दिवसांपूर्वी पेडणे येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे कोकणरेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेने मागील ९ वर्षे विनाकारण रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची गरज पुन्हा एकदा जाणवली आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी या संघटनेद्वारे कोकणकर पुन्हा एकदा या प्रश्नावरून आक्रमक झाला. सावंतवाडी टर्मिनस च्या रखडल्या कामाविरोधात आणि अन्य प्रश्नांसाठी संघटनेने “हर घर टर्मिनस” ही मोहीम राबवली असून मागील दोन दिवसांत समस्त कोकणकरांचा या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
हर घर टर्मिनस मेल मोहिम
संघटनेने “हर घर टर्मिनस मेल मोहिम ” राबवली असून समस्त कोकणवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी संवैधानिक हक्कासाठी, भुमीपुत्रांच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तत्काळ विलीनीकरण व्हावे, सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे, फक्त व फक्त कोकणासाठी नवीन गाड्या किंवा वाढीव थांबे मिळावे या आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन, केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवायचे आहेत. सोबत मेलचा मायना दिला आहे तो आपल्या ईमेल ने सन्माननीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभाग व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत हजारोंच्या संख्येने ईमेल सर्व बांधव, भगिनी, कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, समाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरातून सर्वानी वैयक्तिक पाठवायचे आहेत. फक्त एका टिचकीवर किंवा वरील QR Code द्वारे हे निवेदन आपल्या जिमेल मध्ये उघडेल तेथून फक्त आपल्याला सेंड बटन दाबून पाठवायचे आहे असे आवाहन संघटनेद्वारे करण्यात आले आहे.
या मोहिमेत आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले असून या मोहिमेस खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची संघटनेतर्फे श्री. सागर तळवडेकर यांनी दिली आहे.
‘ती’ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल
सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभणीकरणादरम्यान प्रवशेद्वारावर लावण्यात आलेल्या “सावंतवाडी रोड” फलकाच्या निषेधार्थ फलकाच्या समोरच संघटनेतर्फे नाराजीचे फलक लावण्यात आले आहेत. या संबंधित पोस्ट केलेली एक रील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स Views आले तर हजारो कोकणकरांनी तिला लाईक केले आहे. संघटनेतर्फे बनविण्यात आलेल्या व्हाट्सअँपग्रुपला पण खूप मोठा प्रतिसाद लाभत असून फक्त एक दिवसात ग्रुप फुल्ल झाला आहे. तर अन्य ग्रुप ची लिंक या बातमीत खाली दिली आहे.
सिंधुदुर्ग, दि.१३ जुलै: आंबोली घाटातून जाणारा संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता वेगाने होणार आहे. या मार्गाची आंबोली ते सावंतवाडी व तेथून इन्सुली ते बांदा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरिता ४२ कोटी रकमेची निविदाही काढण्यात आली आहे.
आंबोली घटवून येणार हा महामार्ग दुपदरी असून सिमेंट – काँक्रीटचा असणार आहे. तो आंबोली घाटातून पुढे सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. अधिकृत माहितीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,आताच या महामार्गाची हस्तांतरण प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून जाहीर करण्यात आलेला संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की दाणोली, बावळाट येथून जाणार हा गेले अनेक दिवस प्रश्न होता. परंतु या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
हा महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली माडखोल ते सावंतवाडी गवळीतिठा आणि तेथून इन्सुली ते बांदा असा जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणाला वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत संकेश्वर पासून आजरा फाटा येथे पर्यंत हे काम सुरू आहे. आंबोली ते सावंतवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला भाग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भातले पत्र संबंधित विभागाला लवकरच देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
रत्नागिरी, दि. १२ जुलै:भाजपचे खासदार नारायण राणे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारसु रिफायनरी आंदोलकांनी पोलीस महासंचालक ,महाराष्ट्र राज्य यांना एका पत्राद्वारे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवास धोका असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
मंगळवारी (ता. ९) खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘’बारसू रिफायनरी विरोधकांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवू दिले जाणार नाही आणि आले तर बाकीची जबाबदारी आमची, पोलिसांची नाही” , अशी गंभीर धमकी दिली आहे. या धमकीची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे या पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नारायण राणे यांची गुन्हेगारी वृत्तीचा पूर्वइतिहास पाहता रिफायनरीला विरोध करणार्या स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जीवितास धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रिफायनरीला विरोध करणाऱ्या आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असेही या निवेदनात म्हंटले आहे.
सावंतवाडी, दि. ११ जुलै |सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर रेल्वे प्रशासनाने चुकीचा फलक लावल्याने येथील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आपला निषेध विविध मार्गांनी नोंदवायला सुरवात केली आहे. सुशोभीकरण करण्यात आलेल्या सावंतवाडी टर्मिनसच्या त्या चुकीच्या फलका समोरच कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, सावंतवाडी च्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे बॅनर लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सावंतवाडी स्थानकाचे टर्मिनस म्हणुन भूमिपूजन ९ वर्षापूर्वीच झाले होते. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाच्या नावापुढे टर्मिनस लावणे अपेक्षित होते. एकीकडे टर्मिनसचे काम रखडवले जात आहे तर दुसरीकडे स्थानकाच्या नावातून टर्मिनस हा शब्द गायब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानकाच्या सुशोभीकरणादरम्यान नवीन फलकावरही टर्मिनस हा शब्द न आल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Konkan Railway News:पेडणे येथील बोगद्यात साचलेल्या पाण्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आज हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रद्द केलेलया गाड्यांमुळे अनेक प्रवाशांना आपला प्रवास रद्द करावा लागला होता. त्यानं दिलासा म्हणून रेल्वे प्रशासनाने उद्या दिनांक १२ जुलै रोजी कोकण रेल्वे मार्गावर एक वन वे विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्र. ०२४४९ मडगाव जं. – चंदिगड वन वे स्पेशल ही गाडी मडगाव ते चंदीगड दरम्यान धावणार आहे. या गाडीचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः
गाडी क्र. ०२४४९ मडगाव जं. – चंदीगड वन वे स्पेशल :
गाडी क्र. ०२४४९ मडगाव जं. – चंदीगड वन वे स्पेशल मडगाव जंक्शन येथून दिनांक 12/07/2024 शुक्रवार रोजी सकाळी 09:00 वाजता सुटेल, ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 18:25 वाजता चंदीगडला पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, पेरनेम, रत्नागिरी, रोहा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, कोटा जंक्शन, एच. निजामुद्दीन जंक्शन, नवी दिल्ली, पानिपत जंक्शन आणि अंबाला कँट स्टेशनवर थांबेल.
Strict Action on Waiting Passnger:रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरक्षित डब्यात होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास संपूर्णपणे मनाई केली आहे. असे प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर आता दुहेरी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून पुढील स्थानकावर उतरविण्यात येणार आहे.
अशी असेल दंडाची रक्कम
जर कोणी प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन प्रवास करत असेल तर त्याला खालील दंड भरून पुढील स्थानकावर उतरावे लागेल.
एसी कोच दंड – 440 रुपये + पुढील स्थानकापर्यंचे भाडे
स्लीपर कोच दंड – रु 250 + पुढील स्थानकापर्यंचे भाडे
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांच्या आरक्षित डब्यांत होणाऱ्या गर्दीच्या त्रासाबद्दल अनेक तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांवर या डब्यातील गर्दीचे विडिओ व्हायरल होत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन उपाययोजना म्हणून ही कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलेले आहे.
BIG NEWS 🚨 Indian Railways introduces stringent measures to ensure that only passengers with confirmed tickets can travel in sleeper and AC coaches.
If anyone travel with a waiting ticket, he/she will have to get down at the next station with a penalty.
सिंधुदुर्ग :मागील ९ वर्ष सावंतवाडी टर्मिनसचे काम रखडले आहे. किती जनआंदोलने झालीत तरी रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यात रस दाखवला नाही. टर्मिनस म्हणुन भूमिपूजन झाले असतानाही रेल्वे आपल्या रेकॉर्डमध्ये जाणून बुजून या स्थानकाचे नाव ”सावंतवाडी रोड” असेच दाखवत आले आहे. परवा तर हद्द पार झाली आणि सुशोभीकरणा दरम्यान प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर ”सावंतवाडी रोड” अशा नावाचा फलक लावण्यात आला. हेच जर करायचे होते तर टर्मिनस म्हणुन भूमिपूजन फक्त मते मिळविण्यासाठी केले का? असा संतप्त सवाल कोकणी जनतेकडून विचारला जात आहे.
नियतीला कदाचित हे पटले नसावे म्हणा की अन्य काहीही म्हणा, सावंतवाडी येथे टर्मिनस का असावे हे तिने या घटनेच्या दुसर्याच दिवशी दाखवले. पेडणे येथील एका बोगद्यातून पाण्याचा मोठा पाझर फुटून तेथील मार्ग बंद झाला आणि कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली. 30 तास झाले तरी हा बोगदा वाहतुकीसाठी चालू झाला नाही. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या. मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानकांवर उभ्या करून ठेवण्यात आल्यात. अनेक गाड्या रद्द झाल्यात, कित्येक प्रवासी अडकून पडलेत यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर…
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर खूप मोठा फरक पडला असता. परवा दिनांक ०९ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात अडकलेल्या गाड्या निदान सावंतवाडी स्थानकापर्यंत चालविता आल्या असत्या आणि तेथूनच दुसर्या दिवशी मुंबईच्या दिशेने पाठवता येवू शकल्या असत्या. टर्मिनसच्या अपुर्या कामामुळे फक्त 1/2 गाड्या येथून परस्पर सोडता आल्या असत्या. काल संध्याकाळ पासून संध्याकाळपासून पनवेल ते सावंतवाडी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. अनेक गाड्या सावंतवाडी स्थानकापर्यंत चालवणे शक्य झाले असते आणि प्रवाशांचे हाल वाचवता आले असते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग सुद्धा तितकाच महत्वाचा..
सावंतवाडी टर्मिनस प्रमाणेच केंदीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत मंजूर झालेले आणि रखडलेले दुसरे काम म्हणजे कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग. पाश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग सुरेश प्रभू केंदीय रेल्वे मंत्री असताना मंजूर झाला होता. मात्र त्याचीही गत सावंतवाडी टर्मिनसच्या कामासारखी झाली. सुरेश प्रभू यांचा केंदीय रेल्वे मंत्री पदावरून पायउतार होताच हे कामही रखडले. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अर्थसंकल्पात या मार्गासाठी तरतुद केली जात नसल्याने त्याचे काम थांबले आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास आणीबाणीच्या काळात कोकण रेल्वे मार्गाला एक पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग वापरता येवू शकतो.
माजी केंदीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केलेली ही दोन महत्त्वाची कामे रखडली आहेत…या मागे कोणतीही कारणे असूद्यात ..सध्या कोकणातील प्रवाशांना कोणी वाली नाही हे जवळपास अधोरेखित झाले आहे.
Mumbai-Goa highway Block: कोकणकरांसाठी एक मह्त्वाची बातमी आहे. आजपासून मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवसांचा (११ जुलै-१३ जुलै) ब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक सकाळी ६-८ वा. आणि दुपारी २-४ वा. अशा दोन टप्प्यात असणार आहे. वाहतूक विभाग अप्पर महासंचालकांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लावली जाणार आहे. याच कामाचा भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या पुलाच्या कामादरम्यान वाहतूक बंद ठेवणे गरजेचे असल्याने मुंबई – गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांचे ब्लॉक घेण्यात आला आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे.
– वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड मार्गे किंवा पाली-रवाळजे- निजामपुर-माणगांव मार्गे.
– खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे.
गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड- वाकण फाटा मार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण- पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गे
महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक तीन दिवसांत अवघ्या चार तासांसाठी असेल. इतर वेळेत मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी.