Category Archives: कोकण

Konkan Railway Merger: “कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे; मात्र ‘कोकण रेल्वे’ हे नाव…..” मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र

   Follow us on        
Konkan Railway Merger:कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अलीकडेच संमती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळविण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी हे विलीनीकरण करताना ‘कोकण रेल्वे’ चे स्वत्रंत अस्तित्व टिकवण्यासाठी विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे अशी विनंती केली आहे.
या  पत्राचा मजकूर  खालीलप्रमाणे 
प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना १९९० मध्ये पश्चिम घाटाच्या आव्हानात्मक भूभागावर रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील रोहा ते केरळमधील मंगलोर पर्यंत पसरलेल्या प्रदेशात रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण आणि बांधकाम आणि रेल्वे सेवांचे संचालन करण्याची जबाबदारी या कॉर्पोरेशनवर सोपवण्यात आली होती. सुरुवातीला, त्याच्या भागधारक रचनेत भारत सरकार (५१%), महाराष्ट्र (२२%), कर्नाटक (१५%), गोवा आणि केरळ (प्रत्येकी ६%) राज्यांचा समावेश होता. नंतर ९ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याच्या भांडवल रचनेची पुनर्रचना करण्यात आली. महामंडळाने महाराष्ट्रातील रोहा आणि केरळमधील मंगलोर दरम्यान रेल्वे मार्गाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले. सध्या ते या मार्गावर विशेष रेल्वे सेवा चालवत आहे, तर इतर विभागीय रेल्वे सेवा देखील या मार्गाचा फायदा घेत आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवा मिळत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतांमुळे, महामंडळ त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यास किंवा वाढत्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर भागधारक राज्यांनी देखील या विलीनीकरणासाठी त्यांची संमती दिली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळवताना मला आनंद होत आहे, ज्यासाठी महाराष्ट्राला ३९६.५४२४ कोटी रुपये परतफेड करावी लागेल, जे पूर्वी राज्याच्या या प्रकल्पामधील वाटा म्हणून महामंडळाला पाठवले गेले होते. याव्यतिरिक्त, विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे, कारण त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रादेशिक वारशाची दखल घेतली जाईल.
वर उल्लेख केल्याप्रमाणे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो.

Ratnagiri: कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग; मुंबईतील ‘सीलिंक’ च्या धर्तीवर केबल स्टे ब्रिजही उभारला जाणार

   Follow us on        
रत्नागिरी:कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रांताना जोडण्यासाठी केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. या ब्रिजमुळं सातारा आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. तसंच, या ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यूविंग गॅलरीदेखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळं सह्याद्रीतील कोयनेचे बॅकवॉटर आणि सनराइज व सनसेटही पर्यटकांना पाहता येणार आहे.
या नवीन मार्गामुळं कोयना खोऱ्यातील दुर्गम भागांना जोडणारा आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडेल गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच घाटमार्ग असून या पुलामुळं रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर सुमारे 50 किमीने कमी होणार आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे या पुलावरुन सातारा व महाबळेश्वर असा प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील सीलिंकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकाराचा ब्रिज होणार आहे. हा ब्रिज 540 मीटर लांब आणि 14 मीटर रुंदीचा पूल असणार आहे. मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. त्यामुळं आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाटमार्गाऐवजी नवा मार्ग प्रवाशांना खुला होईल. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गाने नव्या ब्रिजवरुन पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा असा प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे. त्यामुळं तापोळा ते सातारा हे अंतर 10 ते 15 किमीने कमी होईल.

Konkan Railway: मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळित

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर वेरवली स्थानका नजीक दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या वेळेस कोणतीही गाडी या ठिकाणावरून जात नव्हती त्यामुळे धोका टळला आहे.

ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतुक ठप्प झाल्याने अनेक गाड्या रखडल्या होत्या . मात्र आताच आलेल्या माहितीनुसार दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन्ही बाजूने वाहतुक सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाडीच्या नेहमीच्या ‘लेटमार्क’ मुळे प्रवासी नाराज

   Follow us on        
Konkan Railway: एलटीटी – मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी ११०९९/ १११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यरात्री १२:४५ वाजता एलटीटी येथून सुटणारी मडगाव एक्सप्रेस मुळातच दोन तास उशिराने सुटते. त्यानंतर पुढे ढकलत ढकलत चालते. परिणामी दररोज चार ते पाच तास विलंबाने धावते. गावी जायची ओढ असल्यामुळे कोकणी माणूस निमूटपणे हा त्रास सहन करत आहे. या गाडीच्या नेहमीच्या लेटमार्क मुळे ८/१० तासांचा प्रवास १४ ते १६ तासांवर जातो. ही गाडी नेहमीच उशिराने चालवली जात असल्याने या गाडीची विश्वासहर्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काहीच पर्याय नसल्याने कोकणकरांना या गाडीने प्रवास करावा लागत आहे.
या गाडीच्या लेटमार्कबद्दल अनेक चाकरमान्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण फारसे गांभीयनि घेतले जात नाही. कोकणवासीयांना होणाऱ्या या त्रासाबद्दल सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील राजकीय नेत्यांनीच नाही तर मुंबईत विविध पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनीही कोकण रेल्वेसह मध्य रेल्वे प्रशासनाचे कोकणवासीयांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.  हे असे सुरू राहिले तर मग मात्र कोकणी माणूस रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची चिन्हे आहेत.
मुंबई LTT मडगाव (अप आणि डाऊन) रेल्वेगाडी गेले आठवडाभर 5 ते 10 तास उशिराने धावत आहे. Where is my train app वर गेल्या 8 दिवसांचे वेळापत्रक आपण तपासून पाहू शकता. प्रवाशांना याचे मेसेज गाडी सुटायच्या वेळेवर येतात. त्यामुळे लोक सामान, बोजा आणि परिवारासोबत प्लॅटफॉर्मवर पोहोचलेले असतात व रात्रंदिवस ताटकळत गाडीची वाट पाहत राहतात. याठिकाणी प्रवाशांच्या वेळेचे मोल शून्य गृहीत धरले जातेय. रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करणारे रेल्वे प्रशासन मात्र स्वतःच्या चुकीवर प्रायश्चित्त घ्यायला किंवा शिक्षा भोगायला तयार आहे का? कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही माध्यमांवर याविषयी बातमी नाही, याचेही मोठे आश्चर्य वाटते. या विलंबाचे कारण काय? यार्गावरील अन्य गाड्या मात्र थोड्या विलंबाने का होईना धावत आहेत.  याकरिता कोकणवासीयांसाठी सावंतवाडी टर्मिनस होणे फार गरजेचे आहे. कोकणी माणूस संयमी, समजूतदार व सहनशील असल्याने त्याचा हा छळ होत असेल तर जनआंदोलन उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.
– गणेश चमणकर, वेंगुर्ले   
मध्य रेल्वेची कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात बेभरवशाची १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आज (१८ मे, २०२५) मडगावहून तब्बल ९ तास ५६ मिनिटे उशिराने सुटली. मध्य रेल्वेने आता या गाडीला स्वतंत्र रेक उपलब्ध करावा. अन्यथा ही गाडी वेळेत चालणे शक्य नाही.
– अक्षय महापदी, कळवा  
मध्य आणि कोकण रेल्वे ११०९९/१११०० ही सेवा गेली दोन वर्षे नीट चालवत नाही. त्यांनी ही गाडी पश्चिम रेल्वेला चालविण्यास द्यावी १०११५/१०११६ व ११०९९/१११०० या दोन्ही गाड्या एकत्र करून एक नियमित गाडी संध्याकाळी ६ तें १० या वेळेत वांद्रे किंवा नवीन होणाऱ्या जोगेश्वरी टर्मिनस येथून सोडण्याबाबत विचार व्हावा.
– केशव नाईक, सावंतवाडी 

Kudal: डंपरची एसटी बसला जोरदार धडक बसून अपघात

   Follow us on        
चौके: कुडाळ येथून मालवणच्या दिशेने दुपारी 12.30 वाजता सुटणारी कुडाळ मालवण एसटी बस आणि चौके वरून धामापूरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्यात चौके नारायण वाडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी समोरासमोर जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक व प्रवासी सुदैवाने बचावले मात्र एसटी बसच्या चालकाच्या बाजूने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
मालवण डेपोची एसटी बस (MH-14 BT-3063) मंगळवारी दुपारी कुडाळ वरून मालवणच्या दिशेला येत असताना चौके नारायण वाडी येथे एसटी बस आणि चौके वरून धमापुरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर (MH-07- AJ-2810) यांच्यामध्ये एसटी चालकाच्या बाजूने जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. बसमधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या.. मात्र झालेल्या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. बसचालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवण एसटी आगारात दिली असून एसटी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Khed: इर्टिगा कार जगबुडी नदीपात्रात कोसळली, पाच जणांचा मृत्यू

देवरुख येथे अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबियांवरच काळाने झडप घातली.

   Follow us on        

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात इर्टिगा कार कोसळून पाच जणांचा दुःखद अंत झाला. सोमवारी पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.

चालकासह अन्य एक सुदैवाने बचावला आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (सर्व रा. मिरा रोड-मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णतः चुराडा होऊन प्रवासी आतमध्येच अडकले होते.

Malvan: ८३ फूट उंच, 23 फूट लांबीची तलवार! राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

   Follow us on        
मालवणः जगभरातील शिवप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा ८३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (११ मे) करण्यात आले. तब्बल ८३ फूट उंच असलेल्या या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे राज्यातील अनेक मंत्री तसंच शिवभक्त उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत नव्यानं पुतळा उभारला आहे.
नवीन पुतळा ८३ फूट उंच आहे. शिवरायांच्या हातातील तलवार २३ फूट लांब आहे. या पुतळ्याचे वजन ८५ टन असून, तलवारीचे वजन २.३ टन आहे. हवामानाचा अंदाज घेत हा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. राज्यातील आणि विशेषतः कोकणातील शिवप्रेमींसाठी हा क्षण अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

Konkan Railway: महत्वाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या ‘या’ स्थानकावरील वेळांत बदल

   Follow us on        
Konkan Railway: कोकणरेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतेक गाड्यांचा कोकण रेल्वेच्या गाड्यांसाठी महत्वाचे स्थानक असलेल्या पनवेल स्थानकावरील आगमन आणि  निर्गमन वेळेत बदल करण्यात आले आहेत. मुंबई विभागात वेळेवर धावण्यासाठी आणि रेल्वेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वेने खालील गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि वसईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या

गाडी क्र. विद्यमान सुधारित या तारखेपासून
12450 चंदीगड – मडगाव जं. एक्सप्रेस 00:40 / 00:45 00:32 / 00:35 12.05.2025
11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस 01:10 / 01:15 01:02 / 01:05 11.05.2025
11099 लोकमान्य टिळक (T)- मडगाव जं. एक्सप्रेस 01:50 / 01:55 01:42 / 01:45 16.05.2025
22115 लोकमान्य टिळक (टी) – करमाळी एक्सप्रेस 01:52 / 01:55 01:42 / 01:45 15.05.2025
12978 अजमेर – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस 05:35 / 05:40 05:22 / 05:25 16.05.2025
22229 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेस 06:30 / 06:32 06:25 / 06:27 12.05.2025
12218 चंदीगड – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 07:35 / 07:40 07:27 / 07:30 14.05.2025
22660 योगनगरी ऋषिकेश – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 07:35 / 07:40 07:27 / 07:30 12.05.2025
12484 अमृतसर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 07:35 / 07:40 07:27 / 07:30 11.05.2025
10115 वांद्रे (टी)- मडगाव जं. एक्सप्रेस 09:55 / 09:57 09:42 / 09:45 14.05.2025
19578 जामनगर – तिरुनेलवेली एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 16.05.2025
20910 पोरबंदर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 15.05.2025
20932 इंदूर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 13.05.2025
22908 हापा – मडगाव जं. एक्सप्रेस 11:25 / 11:30 11:17 / 11:20 14.05.2025
12284 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्सप्रेस 15:30 / 15:35 15:22 / 15:25 17.05.2025
16311 श्रीगंगानगर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 15:30 / 15:35 15:22 / 15:25 13.05.2025
22475 हिसार – कोईम्बतूर एक्सप्रेस 15:30 / 15:35 15:22 / 15:25 14.05.2025
12619 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंडा एक्सप्रेस 16:22 / 16:25 16:12 / 16:15 11.05.2025
20924 गांधीधाम – तिरुनेलवेली एक्सप्रेस 16:55 / 17:00 16:47 / 16:50 12.05.2025
22634 H. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस 16:55 / 17:00 16:47 / 16:50 16.05.2025
12432 एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस 23:05 / 23:10 22:57 / 23:00 11.05.2025
22414 H. निजामुद्दीन – मडगाव जं. राजधानी एक्सप्रेस 23:05 / 23:10 22:57 / 23:00 16.05.2025
16333 वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 15.05.2025
16335 गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 16.05.2025
16337 ओखा – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 12.05.2025
19260 भावनगर – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 00:00 / 00:05 23:52 / 23:55 13.05.2025
22654 H. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम उत्तर एक्सप्रेस 00:26 / 00:31 00:17 / 00:20 12.05.2025
22656 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस 00:26 / 00:31 00:17 / 00:20 16.05.2025

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या

गाडी क्र. विद्यमान सुधारित या तारखेपासून
22114 तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 02:15 / 02:20 02:02 / 02:05 13.05.2025
22653 तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 02:50 / 02:55 02:37 / 02:40 16.05.2025
22655 एर्नाकुलम जंक्शन – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 02:50 / 02:55 02:37 / 02:40 14.05.2025
12134 मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस 03:07 / 03:10 02:47 / 02:50 11.05.2025
20112 मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस 03:55 / 04:00 03:42 / 03:45 11.05.2025
11004 सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस 04:45 / 04:50 04:27 / 04:30 11.05.2025
12620 मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) मत्स्यगंधा एक्सप्रेस 05:01 / 05:05 04:47 / 04:50 11.05.2025
12741 वास्को दा गामा – पाटणा एक्सप्रेस 06:20 / 06:25 06:07 / 06:10 14.05.2025
12202 तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 10:05 / 10:10 09:42 / 09:45 11.05.2025
12217 तिरुवनंतपुरम उत्तर – चंदीगड एक्सप्रेस 10:55 / 11:00 10:32 / 10:35 12.05.2025
12483 तिरुवनंतपुरम उत्तर – अमृतसर एक्सप्रेस 10:55 / 11:00 10:32 / 10:35 14.05.2025
22659 तिरुवनंतपुरम उत्तर – योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस 10:55 / 11:00 10:32 / 10:35 16.05.2025
12617 एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस 12:35 / 12:40 12:27 / 12:30 11.05.2025
19577 तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 12.05.2025
20909 तिरुवनंतपुरम उत्तर – पोरबंदर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 11.05.2025
20931 तिरुवनंतपुरम उत्तर – इंदूर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 16.05.2025
22476 कोईम्बतूर – हिसार एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 17.05.2025
22630 तिरुनेलवेली – दादर एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 14.05.2025
20923 तिरुनेलवेली – गांधीधाम एक्सप्रेस 13:20 / 13:25 13:12 / 13:15 15.05.2025
12224 एर्नाकुलम जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 17:20 / 17:22 17:02 / 17:05 11.05.2025
12431 तिरुवनंतपुरम सेंट्रल- एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 18:00 / 18:05 17:52 / 17:55 13.05.2025
22413 मडगाव जं. – एच. निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 18:00 / 18:05 17:52 / 17:55 11.05.2025
22633 तिरुवनंतपुरम सेंट्रल- एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 18:00 / 18:05 17:52 / 17:55 14.05.2025
10104 मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस 19:10 / 19:15 18:57 / 19:00 11.05.2025
10106 सावंतवाडी रोड – दिवा जंक्शन एक्सप्रेस 19:20 / 19:23 18:47 / 18:50 11.05.2025
12449 मडगाव जं. – चंदीगड एक्सप्रेस 19:45 / 19:48 19:37 / 19:40 13.05.2025
12977 एर्नाकुलम जं. – अजमेर एक्सप्रेस 19:45 / 19:48 19:37 / 19:40 11.05.2025
22907 मडगाव जं. – हापा एक्सप्रेस 19:45 / 19:48 19:37 / 19:40 16.05.2025
10116 मडगाव जं. – वांद्रे (टी) एक्सप्रेस 20:10 / 20:12 19:57 / 20:00 13.05.2025
22230 मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस 21:00 / 21:02 20:47 / 20:50 13.05.2025
16312 तिरुवनंतपुरम उत्तर – श्रीगंगानगर एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 17.05.2025
16334 तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 12.05.2025
16336 नगरकोइल – गांधीधाम एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 13.05.2025
16338 एर्नाकुलम जं. – ओखा एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 14.05.2025
19259 तिरुवनंतपुरम उत्तर – भावनगर एक्सप्रेस 21:15 / 21:20 21:02 / 21:05 15.05.2025
12283 एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन एक्सप्रेस 21:45 / 21:50 21:37 / 21:40 13.05.2025
11100 मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस 21:45 / 21:47 21:37 / 21:40 12.05.2025

 

 

Mumbai-Goa Bus Accident: मुंबई गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; तीन ते चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

   Follow us on        

Mumbai-Goa Bus Accident : मुंबई-गोवा महामार्गावर काल रात्री एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईहून कोकणच्या दिशेने 35 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस मुंबई-गोवा मार्गावरील कर्नाळा खिंडीत पलटली. या अपघातात तिन ते चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून बहुतेक प्रवासी जखमी झाले आहेत.

हा बस इतका भीषण होता की अपघातानंतर खासगी बस पलटी झाली. दरम्यान रात्री उशीरापर्यंत रस्त्याच्या मधे असलेली बस बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

अपघाताबद्दल माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दल मदतीसाठी दाखल झाले. अपघात झालेल्या बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. रात्री उशीरापर्यंत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू होते. यातील काही प्रवाशांना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्यासारखे- दीपक केसरकर

   Follow us on        
शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्यासारखे असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना  व्यक्त केले.
ते म्हणालेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६० टक्क्यांहून अधिक जंगले जपली आहेत. आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही ही जंगले राखली म्हणून आमचा विकास थांबवायचा का? लोकांनी उपाशी मरायचे का? शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणे हा कोणता न्याय आहे? ते पुढे म्हणाले, नागपूरमध्ये वाघ दिसतात, तर आमच्या जंगलात काळा बिबट्या पाहायला मिळतो. येथे समुद्रही आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नागपूरहून सुरू होणारा महामार्ग वाढवण बंदराला जोडला जातो, तसाच शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा. रेडी बंदरातून आयात-निर्यात सुरू झाल्यास नागपूरची संत्री परदेशात जाईल आणि सिंधुदुर्गचा आंबा दिल्ली-नागपूरला पोहोचेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढेल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search