

![]()


![]()
Heavy Rainfall Warning : बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) निर्माण झाले असून ते संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासांत Gangetic WestBengal ओलांडण्याची शक्यता असल्याने पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या ४ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
आज दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक ०२ ऑगस्ट रोजी या दोन जिल्हय़ाव्यतिरिक्त पुणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक ०३ ऑगस्ट रोजी वरील चार जिल्ह्या व्यतिरिक्त ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.
दिनांक ०४ ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेला नाही आहे.
1 Aug: बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression).संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता
नंतर,पुढील २४ तासांत Gangetic WestBengalओलांडण्याची शक्यता
पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
IMD pic.twitter.com/NNYa9YFtJK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2023
अलर्ट आणि त्यांचे अर्थ
⊗ ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert
⊗ यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert
⊗ ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert
⊗ रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert
![]()

सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३०७ एसटी बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकातून या गाड्या सुटणार आहेत. या बसेसचे आरक्षण कुठूनही करता येणार आहे. तसेच एमएसआटीसी रिझर्व्हेशन ॲप या ॲपच्या माध्यमातूनही हे आरक्षण करता येते. सध्या आरक्षण सुरू असून ज्येष्ठ नागरीक तसेच महिला व मुलींसाठी सवलतीच्या दरात प्रवास सुविधा उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पाटील म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त रा.प. महामंडळाने आगावू आरक्षण व्यवस्था उपलब्ध केली असून त्याचा लाभ चाकरमान्यांनी घ्यावा. गतवर्षी सिंधुदुर्ग विभागातून २६६ बसेस मुंबई व पुणेसाठी परतीच्या प्रवासाकरीता उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. रा.प. महामंडळाचे आरक्षण ६० दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार परतीच्या प्रवासासाठी मुंबईकरीता १५३ व पुणेसाठी १५४ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दि. २३ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. याशिवाय प्रत्येक दिवशी मुंबई व पुणेला नियमित धावणाऱ्या १३ बसेसही उपलब्ध आहेत..
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने गणेशोत्सवानिमित येणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीची चोख व्यवस्था केली आहे. मुंबई पुणेहून कोकणात सुमारे ५५०० गाड्या येणार आहेत. तर सिंधुदुर्गमधून परतीच्या प्रवासासाठी ३०७ बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेससाठीचे आरक्षणही सुरू झाले आहे. जिल्यातील १८ बस स्थानकमधून या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठीच्या बसेस मुख्य स्थानकांवरून सोडण्यात येत होत्या. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील १८ बसस्टँडवरून या बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील या विविध स्टॅडवरून मुंबई, बोरिवली, भांडूप, ठाणे, कुर्ता ने नगर, निगडी, पुणे, चिंचवड, घाटकोपर, कल्याण, पनवेल अशा ४० मार्गांवर या ३०७ बसेस सोडण्यात येणार आहेत. सन २०१९ मध्ये १५३, सन २०२१ मध्ये २२५ तर सन २०२२ मध्ये २६६ बसेस परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, सिंधुदुर्ग विभागाला १५ ऑगस्टपूर्वी १४ नॉन एसी स्लीपर कोच बसेस कायमस्वरूपी उपलब्ध होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
![]()

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा, यासह अन्य विषयांवर या वेळी आमदार शेखर निकम यांनी ना. रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी अजितदादा पवार राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांच्या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
![]()

![]()

Express Missed to Passengers : तुमच्या कडे एका गाडीचे आरक्षित तिकीट आहे. गाडी पकडण्यासाठी अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही स्थानकावर पोहोचता आणि तुम्हाला समजते की तुमची गाडी दीड तास अगोदर निघून गेली. किती मनस्ताप होईल तुमचा? असाच मनस्ताप गुरुवारी मनमाड स्थानकावर 45 प्रवाशांना सहन करावा लागला. कारण त्यांची गाडी त्यांना न घेता दीड तास अगोदरच स्थानकावरून रवाना झाली होती.
वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) वास्को येथून हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. दरम्यान या गाडीची मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी 10.30 ही आहे. मात्र, गुरुवारी ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी 9.30 वाजता आली व पाच मिनीटे थांबून पूढे मार्गस्थ झाली.
रेल्वे गाडी नियोजीत वेळेच्या दीड तास आधीच मार्गस्थ झाल्याने या गाडीच्या प्रवासाचे आरक्षण करणारे 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
झालेला प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देवून गोवा एक्सप्रेसचे आरक्षण केलेल्या 45 हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. यावेळी गोवा एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. गीतांजली एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले.
दरडी कोसळत असल्याने मार्गात बदल
सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील हुबळी भागातीलल रेल्वे मार्गावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या नियमीत मार्गाने न जाता रत्नागिरी-रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आल्यामुळे गोवा एक्सप्रेस दीड तास आधीच मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली.
“गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेआधीच पोचल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मार्ग बदलण्यात आल्याने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दीड तास आधीच पोचली. ही रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल” अशी माहिती शिवराज मानसपुरे एका वृत्तवाहिनीला दिली.
![]()

चिपळूण | मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर येत आहे. महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रूंदावल्या आहेत. विशेष म्हणजे हे काँक्रीट नुकतेच घातले होते. यावरून या महामार्गावरील काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समोर आले आहे
परशूराम घाट वाहतुकीसाठी खूपच धोकादायक बनत चालला आहे. रस्त्यांना पडलेल्या भेगा वाढताना दिसत आहेत. घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत.एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू असून, वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
![]()

मुंबई | गणेश नवघरे : मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची फक्त आश्वासने भेटत असून त्याची पूर्तता केली जात नसल्याने जनआक्रोश समितीने सरकारला धारेवर धरण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

खरडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. दररोज किमान 1 किलोमीटर रस्त्याचे काम अपेक्षित असताना गेल्या 4 महिन्यात 14 किलोमीटर रस्त्याचे काम सुद्धा झालेले नाही आहे. गणेशचतुर्थी दीड महिन्यावर आली आहे पण रस्ता वाहतुकीसाठी योग्य झाला नाही आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही या कारणाने हे धरणे आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त कोकणवासीयांनी यात प्रत्यक्ष हजर राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जनआक्रोश समिती तर्फे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आहे.
![]()
Konkan Railway News – प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत .
कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हरियाणा राज्यातील हिसार जंक्शन ते तामिळनाडूमधील कोयमतुर दरम्यान धावणाऱ्या 22475/ 22476 या गाडीला सप्टेंबर पहिल्या महिन्याभरासाठी वातानुकलीत टू टायर श्रेणीचे दोन अतिरिक्त कोच जोडले जाणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 21 होणार आहे.
या संदर्भात रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हिसार जंक्शन ते कोईमतुर या मार्गावर धावताना गाडी क्रमांक 22475 ला 02 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 तर कोईमतुर ते हिसार जंक्शन या मार्गावर धावताना गाडी क्रमांक 22476 ला 5 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2023 या कालावधीत गाडीला वाढीव दोन डबे जोडले जातील
![]()
रत्नागिरी:हवामान विभागाने उद्या दिनांक 28 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत) विद्यालयांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिला आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात उद्या शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 28 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
![]()
Content Protected! Please Share it instead.