Kokan Railway News :कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिलेत. दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच चालविण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
कर्नाटकच्या किनारपट्टीवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसल्याचे कटील यांनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळुरु आणि गोवा दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग देशाच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण आहे. हा प्रदेश निसर्गसौंदर्य, समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखला जातो. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर या भागात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही कटील यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळुरू रेल्वे क्षेत्राचा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर रेल्वे विभागाच्या प्रशासकीय आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्रात समावेश करण्याची विनंती खासदार कटील यांनी वैष्णव याना केली होती. मंगळुरू रेल्वे क्षेत्राला दक्षिण रेल्वेने सावत्र वागणूक दिल्याने त्याचा पुरेसा विकास झालेला नाही, असेही कटील म्हणाले.
ही वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा विस्तार होणार आहे. तसेच ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. यापूर्वी मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात आली आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील ठोकूर या स्थानकावर मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर ते गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
मुंबई :चार महिने अगोदर कसेबसे आरक्षित तिकीट मिळवायचे, नाही मिळाल्यास दुप्पट तिप्पट भावाने दलालांकडून तिकीट विकत घ्यायचे आणि शेवटी रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे गाडी चुकणाऱ्या प्रवाशांनी आपल्या त्रासाबद्दल नेमकी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न विचारण्याची वेळ या दोन दिवसांत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर यायला लागलीआहे.
रेल्वेच्या अशाच भोंगळ कारभारामुळे काल ४ ते ५ प्रवांशांची गाडी चुकल्याचा प्रकार घडला आहे. विनोद सुरेशराव मोरे यांच्याकडे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस-ट्रेन क्रमांक १०१०५ या गाडीची कन्फर्म तिकिटे होती. त्या गाडीवरील ट्रेन क्रमांक ठराविक बोगिंवर चुकीचा टाकला आहे. या चुकीमुळे त्यांच्यासहीत सुमारे ४ ते ५ कन्फर्म तिकीट असलेल्या कुटुंबीयांची ही ट्रेन काल १६ तारखेला चुकली.
दिवा – सावंतवाडी गाडीचा गाडीवरील १०१०५ क्रमांक नमूद करून ही चूक सुधारावी. सोबत काल रेल्वे कडूनही या गाडीबाबत ठराविक कालांतराने उद्घोषणा करून प्रवाशांना सूचित करणे गरजेचे होते ते मी अर्धा तिथे उपस्थित असूनही झालेले नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.
रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे अतिरिक्त गाड्या चालवत आहे. मात्र यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. महत्वाच्या स्थानकावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची उद्घोषणा Announcement योग्य प्रकारे केली जात नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाच्या स्थानकावर प्रवासी मदत कक्षाची उभारणी करणे आवश्यक होते. मात्र तशी काहीच सोय न केल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.
Konkan Railway: पनवेल रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक आहे. कोकणात जाणार्या पाश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या येथूनच कोकणात जातात. मात्र या रेल्वे स्थानकाच्या भोंगळ कारभारामुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पनवेल रेल्वे स्थानक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास सहन कराव्या लागलेल्या नरेश नाईक यांनी काल रेल्वे च्या तक्रार निवारण पोर्टल वर एक तक्रार केली आहे.
नरेश नाईक यांच्याकडे मुंबई सेंट्रल येथून सुटणार्या विशेष गाडीचे आरक्षण होते. ही गाडी पकडण्यासाठी ते काल दुपारी 3 वाजता पनवेल स्थानकावर आले होते. गाडी वेळेवर पनवेल स्थानकावर आली मात्र गाडीच्या डब्यांचा क्रम बदललेला होता. पनवेल स्थानक प्रशासनाने याबाबत कोणतीच घोषणा announcement केली नाही. त्यामुळे सगळ्याच प्रवाशांचा गोंधळ उडाला. एवढेच नाही तर अवघ्या तीन मिनिटांत ही गाडी निघाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना या गाडीत चढायला भेटले नाही. अनेक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होते. नरेश नाईक यांच्या पत्नी सुद्धा प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडण्यासाठी धावत होत्या. प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने सुदैवाने गाडीतील प्रवाशांनी चैन आणि खेचली आणि गाडी थांबवली गेली.
हा अनुभव नरेश नाईक आणि इतर प्रवाशांसाठी खूपच भयानक ठरला. गाडी पकडल्यावर सुद्धा प्रवाशांना आपआपली सीट गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
पनवेल स्थानकावर अनेक सुविधांची वानवा आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्या 5,6 आणि 7 नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येतात. मात्र येथील इंडिकेटर्स योग्य माहिती पुरविण्यात येत नसल्याने त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. कालच्या घटनेमुळे अपघात होऊन जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
Kokan Railway News : गणेशोत्सवासाठी दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत महिन्याभरासाठी बदल केला आहे. या गाडीला दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. या बदलामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या 14 वरुन 12 होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार
1)गाडी क्रमांक 50108 मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.
2)गाडी क्रमांक 10105 दिवा – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी – मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.
कोकण विकास समितीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला किमान एक एसी डबा जोडण्यात यावा यासाठी कोकण रेल्वेकडे मागणी केली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे.
Konkan Railway News :गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे; चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडून प्रवाशांची सोय केली आहे. तरीही या फेर्या अपुऱ्या पडताना दिसत आहेत. या कारणास्तव या मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या काही विशेष गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित चालविण्यात येणार आहेत.
1)01155/01156 दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी – एकूण 36 फेऱ्या (अप आणि डाऊन)
ही गाडी एकूण 8 डब्यांसह चालविण्यात येणार होती तिचे 4 डबे वाढविले असून ही गाडी आता 12 डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.
2) 01165/01166 मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्या (अप आणि डाऊन)
ही गाडी एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.
3) 01167/01168 एलटीटी – कुडाळ विशेष सेवा – एकूण 24 फेर्या (अप आणि डाऊन)
ही गाडी सुद्धा एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.
या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीत आरक्षण असणार्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
कोकण विकास समितीच्या मागणीला यश
दिवा-चिपळूण, दिवा-रत्नागिरी या मेमू गाड्यांच्या डब्यांची संख्या 16 करावी अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली होती. त्यांची मागणी अंशतः का होईना, ती मान्य करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे.
मुंबई : कोकण रेल्वेसंबंधी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या विविध मागण्यांसाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करायला सुरवात केली आहे.
पश्चिम रेल्वेवरील गेल्या दशकभरपेक्षा जास्त काळ चर्चेत असलेल्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी तसेच इतर काही मागण्यांसाठी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची शनिवार दि. ९ सप्टेंबर, २०२३ सकाळी १० वाजता कांदिवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रेल्वे बोर्डाला या मागण्यांसाठी निवेदने सादर केली आहेत. खालील तीन निवेदने खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आली आहेत.
१) कोकण रेल्वेचे मध्यरेल्वेत विलीनीकरण करणे
२) दिवा सावंतवाडी एक्सप्रेस गाडीचे थांबे पूर्ववत करणे
३) पश्चिम रेल्वे मार्गावररून कोकणात जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देणे.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी मडगाव ते कुमठा दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे मडगाव पर्यंत धावणाऱ्या गाड्यांपैकी एका गणपती स्पेशल गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
खालील गाडी या दिवशी उशिराने धावणार आहे.
Train no. 09057 Udhna – Mangaluru Jn. Special दिनांक 13 सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते मडगाव दरम्यान १०५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना याची नोंद घेण्याची विनंती केली असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई :पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल/वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी/मडगावसाठी थेट गाडी सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या व गेला दशकभरपेक्षा जास्त काळ चर्चेत असलेल्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची आज शनिवार दि. ९ सप्टेंबर, २०२३ सकाळी १० वाजता कांदिवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
यावेळी सर्वप्रथम शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खेड स्थानकात मंगला एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस थांबवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानले.
नायगाव जुचंद्र जोड मार्गिकेला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असली तरी कालबद्ध कार्यक्रम देऊन सदर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन पूर्ण करून त्यानंतर साधारण एका वर्षाच्या कालावधीत हे काम करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनातील संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याची विनंती शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना केली . तसेच, काम पूर्ण होण्याची वाट न पाहता तत्पूर्वीच लवकरात लवकर मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनसयेथून सावंतवाडीला जाणारी नियमित गाडी सुरु करणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्याचबरोबर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण, दादर चिपळूण रेल्वे, रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दादरवरून चालवणे, दिवा रत्नागिरी मेमू केवळ गणपती सणापुरती न चालवता कायमस्वरुपी करणे, अनेक थांबे कमी करून दिवा सावंतवाडी पॅसेंजरची एक्सप्रेस केल्यानंतरही प्रवास वेळेत काहीही फरक पडलेला नसल्यामुळे दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देणे, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस, गांधीधाम नागकोईल एक्सप्रेस व मारुसागर एक्सप्रेस गाड्यांना वैभववाडी स्थानकात थांबा देण्यासंबंधीची निवेदने खासदारांना यावेळी देण्यात आली .
खासदार गोपाळ शेट्टी यांनी या विषयात लक्ष घालून कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी कोंकण विकास समितीचे संस्थापक – अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर, जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव, रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय मधुकर महापदी, ॲड. श्री. प्रथमेश रावराणे, श्री. रविंद्र वसंतराव मोरे, श्री. विनोद भगवंत भोसले, ॲड. श्री. चंद्रकांत सकपाळ, श्री. वसंत रामचंद्र मोरे, श्री. सचिन काते, श्री. रविंद्र मोरे, श्री. निवृत्ती निकम इ. उपस्थित होते.