Category Archives: कोकण रेल्वे

.
Konkan Railway News :मुंबई कन्याकुमारी नव्या गाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रावर अन्यायाची रेल्वेची परंपरा कायम, महाराष्ट्रीय प्रवाशांच्या जखमेवर मीठ
गेली अनेक वर्षे कोकणवासी रेल्वेकडे मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी, वसई सावंतवाडी, कल्याण सावंतवाडी गाड्यांची मागणी करत आहे. परंतु रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी मुंबईतील क्षमता, कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग, मार्गाचा १४०% वापर, डब्यांची उपलब्धता किंवा रेल्वे बोर्ड अशी एक ना अनेक कारणं देऊन नकारच देत असते. मुंबई विभागात नवीन गाडी सुरु करण्यासाठी क्षमताच नसल्यामुळे मुंबईहून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीसाठी नवीन गाडी सुरु करता येणार नाही असे उत्तर मध्य रेल्वेने कोंकण विकास समितीला हल्लीच दिले होते. परंतु त्याच मुंबई विभागाकडे कन्याकुमारी गाडी सुरु करण्याची क्षमता आहे हे विशेष.
(Also Read>आजपासून ऑगस्टपर्यंत पर्ससीन मासेमारी राहणार बंद…मच्छीमारांच्या चिंतेत वाढ)
कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र राज्य शासन २२%, कर्नाटक राज्य शासन १५% तर गोवा आणि केरळ राज्य शासन प्रत्येकी ६% इतका आर्थिक सहभाग आहे. परंतु गाडीचे दक्षिणेकडील शेवटचे स्थानक विचारात घेतल्यास महाराष्ट्राला ३, गोवा, कर्नाटक आणि केरळला प्रत्येकी ५ ते ६ आणि तामिळनाडूला १ इतक्या सरासरी प्रतिदिन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. यातून महाराष्ट्रातील प्रवासी कसे प्रवास करत असतील आणि कोकण रेल्वेच्या निमित्ताने महाराष्ट्राला काय मिळाले याची कल्पना येते.
सावंतवाडीच्या पुढे गोव्याला जाणाऱ्या नियमित किंवा विशेष गाड्या महाड, लांजा तालुक्यात न थांबता तर मडगावच्या पुढे जाणाऱ्या गाड्या माणगाव, महाड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, वैभववाडी तालुक्यांना वगळून पुढे जातात. मंगळुरूच्या पुढे जाताना तर प्रत्येक जिल्ह्यात एकच थांबा मिळतो. एक एक टप्पा सोडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी महाराष्ट्रातील थांब्यांचा बळी दिला जातो. सध्या चालणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव, मंगळुरु विशेष गाड्यांचे थांबे बघितल्यास त्याचीच प्रचिती येते.
नवीन गाड्या मिळणे दूरच आहेत त्या गाड्यांना महाराष्ट्रात वाढीव थांबे मिळणेही कठीणच आहे. प्रवाशांनी आंदोलन केल्याशिवाय कोणताही वाढीव थांबा मिळालेला नाही. सध्या जनशताब्दी, मंगला, लोकमान्य टिळक करमळी, कोचुवेली एक्सप्रेसला खेड, नेत्रावती, मत्स्यगंधाला संगमेश्वर, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला वैभववाडी, तेजस एक्सप्रेसला कणकवली, मुंबई मंगळुरु आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांब्यांची प्रतीक्षा आहे. त्यासाठीही मागणी, निवेदन, आंदोलनाचं सत्र सुरूच आहे.
(Also Read :पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)
महाराष्ट्रात गाड्यांची कमतरता असतानाही त्यावर कहर म्हणून गोव्यातून सुटून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना कोकण रेल्वेने रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडे केवळ १८-२०% आरक्षण कोटा दिलेला आहे. उर्वरित ८०% जागा रत्नागिरीच्या दक्षिणेकडच्या स्थानकांनाच उपलब्ध होतात. हे वाटपही समान ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरेशा गाड्या नाहीतच परंतु ज्या आहेत त्यात आरक्षण कोटाही देणार नाही अशी रेल्वेची भूमिका आहे.
कोरोना संकटाचा फायदा घेऊन रेल्वेने शून्य आधारित वेळापत्रक लागू करताना पॅसेंजर गाड्यांचे थांबे कमी करून एक्सप्रेसमध्ये रूपांतर केले. वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने रत्नागिरी दादर पॅसेंजरची वाट दिव्यापर्यंतच अडवली खरी परंतु त्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय ठरेल. सप्टेंबर २०२१ पासून ५०१०३ दिवा रत्नागिरी पॅसेंजर तर जानेवारी २०२२ पासून ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजर वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलेल्या नाहीत. मध्य रेल्वेवर ५-१० थांबे कमी करूनही रत्नागिरी दिवा आणि सावंतवाडी दिवा गाड्यांच्या प्रवास वेळेत अपेक्षित घट झालेली नाही. रत्नागिरी दादरची रत्नागिरी दिवा केल्यावर त्याच वेळेत दादरवरून बलिया/गोरखपूर गाडी सुरू झालेली आहे. यावरून रत्नागिरी दादर दिव्याला का ठेवली याची कल्पना येते.
इतके गंभीर प्रश्न असतानाही आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी चालवण्यात येत आहे. तिला सुपरफास्ट म्हटले आहे परंतु थांबे पाहिल्यास ती केवळ कोकण रेल्वेवरच सुपरफास्ट असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील दोन थांब्यांमधील सरासरी अंतर ५५ किलोमीटर तर कोकण रेल्वेच्या बाहेर सरासरी ४० किलोमीटरवर थांबे आहेत. रोहा ते चिपळूण १२८ किलोमीटर आणि रत्नागिरी ते कणकवली १११ किलोमीटरमध्ये एकही थांबा नाही. खेडसारख्या महत्वाच्या स्थानकावर सध्या धावणाऱ्या गाड्यांना थांबे देण्याची मागणी असताना या नव्या गाडीलाही खेड येथे थांबा दिलेला नाही. रविवारी रत्नागिरी किंवा चिपळूणमधून मुंबईकडे जाणाऱ्या नवीन गाडीची नितांत गरज असताना त्याच दिवशी ही कन्याकुमारी गाडी परत येणार आहे. म्हणजे पुन्हा स्थानिक प्रवाशांच्या पदरी निराशाच आहे कारण गाडी असली तरी तिला पुरेसा कोटा मिळणार नाही, तिला महाराष्ट्रात मोजके तीन चार थांबे आहेत आणि इतक्या लांबून येणाऱ्या गाडीत चढायला मिळणे अशक्यप्राय गोष्ट असेल.
पूर्वी मुंबई कन्याकुमारी दरम्यान चालणारी जयंती जनता एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान प्रवासी नसल्याचे कारण देऊन पुण्याला शॉर्ट टर्मिनेट केली गेली आणि आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी देण्यात येत आहे. मग आधी सुरु असलेली गाडी पुण्याला नेलीच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यातून नेमकं काय साध्य झालं? त्याहीपेक्षा महाराष्ट्रात गाड्या सुरु करताना क्षमता नाही परंतु इतर राज्यात गाड्या सहज सुरु होऊ शकतात हा महाराष्ट्रातील नागरिकांना डिवचण्याचा प्रकार आहे.
तरी, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने इतर राज्यातील प्रवाशांची सोय करण्याआधी स्वतःच्या हद्दीतील विभागातील प्रवाशांचा उद्रेक होण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कारण, ते तुमचंच उत्तरदायित्व आहे. महाराष्ट्रातील स्थानिक प्रवासी आपल्या मागण्या घेऊन दक्षिण रेल्वेकडे जाऊ शकत नाहीत. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात असूनही आम्हाला किमान सोयींसाठी संघर्ष करावा लागतो हे आमचं दुर्दैव. आता महाराष्ट्रातील नागरिकांनीच एकत्र येऊन याचा विरोध करावा.
अक्षय मधुकर महापदी
Konkan Railway News : कोकणमधील गजानन महाराजांच्या भक्तांना एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष गाडीला आता शेगाव ह्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. . कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मागणी या थांब्यामुळे पूर्ण झाली आहे.
01139/01140 हे नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोकण पट्ट्यातून शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेऊन रेल्वेने नागपूर -मडगाव विशेष एक्सप्रेसला दिनांक 4 जानेवारी 2023 पासून थांबा मंजूर केला आहे.
(हेही वाचा>वर्षाच्या सुरवातीला कोकणरेल्वे मार्गावर सहा विशेष फेऱ्या…)
गाडी क्रमांक 01140 ह्या गाडीची वेळ कुडाळ स्थानकावर रात्री 10:10 आहे ती दुसर्या दिवशी दुपारी 3:35 वाजता शेगावला पोहोचते आणि पुढे नागपूरला जाते.
गाडी क्रमांक 01139 ह्या गाडीची वेळ शेगाव स्थानकावर संध्याकाळी 07:23 आहे ती दुसर्या दिवशी दुपारी 12:36 वाजता कुडाळ स्थानकावर पोहोचते आणि पुढे मडगावला जाते.
ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात आलेली होती आणि दोन वेळा वाढिव कालावधी पण देण्यात आला होता. आता ह्या गाडीचा कालावधी फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या ही गाडी कायमस्वरूपी करावी अशी मागणी होत आहे.
(हेही वाचा>नागपूर-मडगाव गाडीच्या वाढिव फेर्यांचे आरक्षण उद्यापासून…. …)




Konkan Railway News : नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्यात आणि कोकणात गेलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासासाठी कोंकणरेल्वेने या मार्गावर अजून सहा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या सहा फेऱ्या पुढीलप्रमाणे असतील.
Train no. 01461 / 01462 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01461 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 05/01/2023 रोजी गुरुवारी ही गाडी मुंबई सीएसएमटी ह्या स्थानकावरुन दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01462 कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 07/01/2023 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन दुपारी 14:15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 21:50 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे कोकणातील थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगांव.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 09 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 02 असे मिळून एकूण 19 डबे
(हेही वाचा>कोकणातील भाविकांना खुशखबर…शेगावला जाण्यासाठी रेल्वेचा नवा पर्याय…)
Train no. 01463 / 01464 – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – कन्याकुमारी – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01463 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 12/01/2023 आणि 19/01/2023 रोजी गुरुवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ह्या स्थानकावरुन दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01464 कन्याकुमारी – लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 14/01/2023 आणि 21/01/2023 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन दुपारी14.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 21.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे कोकणातील थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगांव.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०3 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे
Konkan Railway News: प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ह्या गाडीचे आरक्षण उद्यापासुन म्हणजे 27/12/2022 पासून सुरू होत आहे.
ह्या गाडीच्या वेळापत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीही बदल न करता ही गाडी ह्या अतिरिक्त कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे..
01139 Nagpur – Madgaon Jn ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:45 वाजता पोहोचेल. ही गाडी 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत धावेल.
(Also Read > नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण… संगमेश्वरवासियांचा इशारा)
01140 Madgaon Jn – Nagpur – मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल. ही गाडी 26 फेब्रुवारी पर्यंत धावणार आहे.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
ह्या गाडीला 2 Tier AC – 01, 3 Tier AC – 04, Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ह्या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनानेतर्फे करण्यात आले आहे.

Vision Abroad

रत्नागिरी: नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळावा यासाठी तीन वर्षापासून पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही जाग येत नसलेल्या रेल्वे प्रशासनाविरोधात २६ जानेवारी २०२३ म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून निसर्गरम्य चिपळूण-संगेमश्वर ग्रुप तसेच संगमेश्वरवासियांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
(Also Read>उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस सेवा… जाणून घ्या आपल्या स्थानकापर्यंतचे प्रवासभाडे)
संगमेश्वर रोड स्थानकातून रेल्वेला दर महिन्याला चांगला महसूल मिळत असतानाही कोकण रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव का केला जातो, असा प्रश्न संगमेश्वरमधील जनता विचारत आहे. कोकणवासियांचे मुंबईत मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यात संगमेश्वर तालुक्यात १९६ गावातील चाकरमानी कामधंद्यानिमित्त कोकण ते मुंबई असा नेहमी प्रवास करत असतात. संगमेश्वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या थांबाव्यात यासाठी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक ग्रुपवर वारंवार रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहे. त्यास स्थानिकांचीही मोठी साथ लाभली आहे. जनतेच्या या मागणीकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देवून जनतेवर होणारा अन्याय दूर करेल असे वाटले होते. असे आंदोलनाची हाक दिलेल्या संदेश जिमन यांनी म्हटले आहे.
(Also Read>कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे)

Vision Abroad





Konkan Railway News : ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी कोंकणरेल्वेने या मार्गावर अजून काही अतिरिक्त गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01461 / 01462 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01461 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 22/12/2022 रोजी गुरुवारी ही गाडी मुंबई सीएसएमटी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01462 कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 24/12/2022 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 14.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.00 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे कोकणातील थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगांव.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 02 असे मिळून एकूण 20 डबे
वेळापत्रक
S.N. | Station Name | 01461(DN) | 01462(UP) |
1 | C SHIVAJI MAH T | 15:30 | 23:00 |
2 | DADAR | 15:45 | 22:33 |
3 | THANE | 16:08 | 21:22 |
4 | PANVEL | 16:55 | 20:25 |
5 | ROHA | 18:15 | 19:15 |
6 | CHIPLUN | 20:12 | 14:52 |
7 | RATNAGIRI | 21:55 | 13:05 |
8 | KANKAVALI | 23:32 | 10:48 |
9 | SINDHUDURG | 23:52 | 10:34 |
10 | SAWANTWADI ROAD | 00:22 | 10:12 |
11 | MADGAON | 02:10 | 09:00 |
12 | KARWAR | 03:12 | 07:52 |
13 | UDUPI | 06:02 | 05:44 |
14 | MANGALURU JN | 08:10 | 04:20 |
15 | KASARAGOD | 08:50 | 03:07 |
16 | KANNUR | 10:00 | 02:03 |
17 | THALASSERY | 10:20 | 01:35 |
18 | KOZHIKKODE | 11:20 | 00:40 |
19 | TIRUR | 12:00 | 00:12 |
20 | SHORANUR JN | 13:05 | 23:25 |
21 | THRISUR | 13:43 | 22:20 |
22 | ERNAKULAM JN | 15:00 | 20:45 |
23 | KOTTAYAM | 16:25 | 19:05 |
24 | TIRUVALLA | 16:55 | 18:16 |
25 | CHENGANNUR | 17:06 | 18:06 |
26 | KAYANKULAM JN | 17:30 | 17:45 |
27 | KOLLAM JN | 18:15 | 17:10 |
28 | TRIVANDRUM CNTL | 20:45 | 16:05 |
29 | KULITTHURAI | 21:30 | 15:15 |
30 | NAGERCOIL JN | 22:20 | 14:45 |
31 | KANYAKUMARI | 23:20 | 14:15 |
(Also Read : नाताळासाठी गोवा आणि कोकणात जाणार्या पर्यटकांसाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या..)