Category Archives: देश
LPG Cylinder Price Cut: वाढत्या महागाईच्या या दिवसांमध्ये केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय तेल उत्पादन कंपन्यांनी घेतला आहे. 1 जून 2024 पासून देशभरात एलपीजी सिलेंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
IOCL च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशभरात 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरातील एलपीजीचे दर कमी करण्यात आले असून, मुंबईपासून दिल्ली आणि चेन्नईपर्यंत आता नवे दर लागू करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच हा निकाल लागण्याआधी सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली. नव्या बदलांनुसार आता 19 किलो वजनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरमध्ये मुंबईत 69.50 रुपये, चेन्नईत 70.50, कोलकाता येथे 72 रुपये आणि दिल्लीमध्ये 69.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर
जून महिन्यात केंद्राच्या वतीनं सलग तिसऱ्यांदा एलपीजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अशीच दिलासादायक बातमी समोर आली होती. ज्यानंतर लागोपाठ दोन महिन्यांमध्ये एलपीजी आणखी स्वस्त झाल्यामुळं अनेकांसाठीच हा मोठा दिलासा ठरला.
नव्या निर्णयानुसार आता दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 1745.50 रुपयांवरून 1676 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, मुंबईमध्ये हे दर 1698.50 रुपयांवरून 1629 रुपयांवर आले आहेत. कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे 1787 आणि 1840 .50 असे सिलेंडरचे नवे दर लागू आहेत.
केंद्राच्या वतीनं निवडणूक निकालांआधी घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे असंच म्हणावं लागेल. दरम्यान व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झाले असले तरीही घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे असल्याचं सांगितलं जात आहे. सध्याच्या घडीला देशात घरगुती वापरातील 14.2 किलो वजनी सिलेंडरचे दर दिल्लीत 803 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, चेन्नईत 818.50 रुपये आणि कोलकाता येथे 829 रुपये इतके आहेत. उज्ज्वला लाभार्थींना या दरांमध्ये किमान 200 रुपयांची सवलत मिळतेय.
CBSE Board 12th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने यंदाच्या वर्षातील इयत्ता आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये बारावीच्या परीक्षेत एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या परीक्षेत सुमारे 17 लाख विद्यार्थी बसले होते.या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 91% मुलीं या परीक्षेत पास झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 85.12% एवढा लागला आहे.
या लिंकवर पाहा तुमचा निकाल
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.
- लातूर 55.38 %
- सांगली 52.56 %
- बारामती 47.84%
- हातकणंगले 62.18%
- कोल्हापूर 63.71%
- माढा 50%
- उस्मानाबाद 58.24%
- रायगड 50.31%
- रत्नागिरी – सिंधुदुर्ग 53.75 %
- सातारा 56.38 %
- सोलापूर 49.17%
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.
- कुडाळ 59.09%
- कणकवली 55.14%
- सावंतवाडी 60.30%
- राजापूर 47.31%
- चिपळूण 52.62%
- रत्नागिरी 49.83%
रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये सर्वात कमी 45.60% एवढे मतदान झाले आहे.
- अलिबाग 52.33%
- दापोली 59.12%
- गुहागर 53.77%
- महाड 45.60%
- पेण 51%
- श्रीवर्धन 49.48 %
देशात आज निवडणूकीच्या तिसर्या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.
टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे.
Ad -
Covishield Vaccine Side Effects:कोरोना महामारीपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना लस देण्यात आली. दरम्यान यावेळी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लस लोकांना देण्यात आली होती. आपल्या भारतात अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली होती. देशभरातील अनेकांनी ही लस घेतली. साथीच्या आजारानंतर जवळपास 4 वर्षांनी AstraZeneca ने आता कबूल केलंय की, या लसीचे लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.
कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका
एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. कंपनीने असंही सांगितलंय की, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल आणि सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही.
ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याचं दिसून आलं. इतर अनेक कुटुंबांनीही लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात तक्रारी केल्या आहेत.
यूके उच्च न्यायालयात उत्तर देताना, कंपनीने मान्य केलंय की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कबुली देऊनही कंपनी लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध करत आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
AstraZeneca-Oxford ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव यूकेमध्ये दिली जात नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केल्यास कंपनीला मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पहावं लागणार आहे.
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.”
ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात?
- बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
- मावळ – संजोग वाघेरे-पाटील
- सांगली -चंद्रहार पाटील
- हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
- छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
- धाराशिव – ओमराजे निंबाळकर
- शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
- नाशिक – राजाभाई वाजे
- रायगड – अनंत गीते
- सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
- ठाणे – राजन विचारे
- मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
- मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
- मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
- परभणी – संजय जाधव
- मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
Breaking | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर pic.twitter.com/uuOxNcN5qs
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) March 27, 2024
Loksabha Election Updates:देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली आहे. एकूण ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. या सात टप्प्यांमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?👇◾️
◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे
पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे.
सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी होणार आहे.
सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. तर ०४ जूनला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की १.८२ कोटी तरुण मतदार मतदान करणार आहेत. 18 ते 29 वयोगटातील 21.5 लाख मतदार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी यंदा देशात ९७ कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. यासाठी ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. यासाठी देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकज मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारत पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित










