Category Archives: महाराष्ट्र

महत्त्वाचे: माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; नियमांतही बदल

   Follow us on        

मुंबई:राज्यातल्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे.

या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली होती त्यामध्ये आता काहीसा बदल केला गेला आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत.

नव्या नियमा नुसार कोणात्या महिला पात्र? 

आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.  त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. जा महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्यांदा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात आता बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पर्यंता आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवी तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे. जमिनीबाबतची अट आता वगळण्यात आली आहे. या योजनेत पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
सदर योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होता. आता हा कालावधी 2 महिने केला असून दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे निवेदन.. 👇🏻

Loading

Central Railway: मध्य रेल्वेची वेटिंग लिस्ट प्रवाशांना ‘नो एन्ट्री’

आरक्षित डब्यांतील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचं मोठं पाऊल. 

   Follow us on        

Waiting list passenger not allowed: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील Waiting List तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीत होत आहे. गर्दीमुळे तिकीटधारक प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करता येत नाही. डब्यात प्रवेश केल्यानंतर आरक्षित आसनापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. प्रतीक्षायादीतील प्रवाशांमुळे होणार्‍या गर्दीच्या सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या व्हिडीओंची व्हिडीओची गंभीर दखल रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.

तिकीट खिडक्यांवर काढलेले तिकीट रद्द प्रवाशांना रद्द करावे लागणार. 

ऑनलाईन प्रतीक्षायादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो. तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेले तिकीट प्रवाशांना रद्द करावे लागणार आहे. रेल्वेगाडीचा चार्ट साधारण चारतास आधी तयार होतो. त्याचवेळी तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती प्रवाशांना समजते. गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी प्रतीक्षायादीतील तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्याचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. गाडी गेल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

प्रतीक्षायादीतील तिकीट असलेले प्रवासी आरक्षित डब्यांतून प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना पुढील स्टेशन आल्यावर त्या डब्यातून उतरविण्यात येत आहे. .‘गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक २८२ प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.(११०६१) जयानगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ३१ मेल-एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे १,६०० प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिसूचना GR प्रसिद्ध केली नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुंबई उपनगरीय स्थानकावर याबाबत अनॉसमेंट होत आहे.

वाचकांचा प्रतिसाद

अशी कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कित्येकदा आरक्षित तिकीट भेटत नसल्याने नाईलाजाने वेटिंग तिकीट काढून प्रवास करावा लागतो. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने त्या त्या गाडीच्या वेटिंग तिकिटांच्या संख्येवर मर्यादा घातल्या पाहिजेत.-प्राजक्ता परब, भांडुप

जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल. आपल्याकडे जनरल डब्यांची खूपच खराब आहे. डब्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट प्रवासी या डब्यांतून प्रवास करतात. हा त्रास काही प्रमाणात वाचविण्यासाठी प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटांवरुन प्रवास करतात. आता सुद्धा पर्याय नाहीसा झाल्याने प्रवाशांकडे जनरल कोचमधून प्रवास करण्याचा पर्याय राहिल्याने जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल.-राजेश धुरी, विरार 

 

 

Loading

मालवण: बांदिवडे त्रिंबक रस्त्याची अवस्था झाली दयनीय

   Follow us on        

मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.

बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.

Loading

मोठी बातमी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून स्थगिती

Nagpur Goa Shaktipeeth Highway Updates:नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या ८०२ किमीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आले आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभेतील पराभवानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर या प्रकल्पाबाबतन निर्णय घेईल असे ठरविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
“या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. किमान पुढील ३-४ महिने जमीन संपादित करू नयेत असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (ऑक्टोबरमध्ये) नवीन सरकार या प्रकल्पाचे भवितव्य ठरवेल”, असे या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या कामामुळे शेतकरी वर्गासह कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याला विरोध आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रोखणे आवश्यक असून या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १२ जिल्हे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून या १२ जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी असे तब्बल २०० लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहेत.

Loading

आता महायुतीतील नेत्यांचाच नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध

   Follow us on        
कोल्हापूर : विद्यमान सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आता तर चक्क सत्तेत रूढ असलेल्या महायुतीतील नेत्यांनी या महामार्गाला विरोध केला असल्याने या प्रकल्प रद्द होण्याच्याच शक्यता वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांनीच विरोध केला आहे. महायुतीचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यापाठोपाठ आता भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनीही सोमवारी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यातील कागलसह सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत बामणी (ता. कागल) येथे घाटके यांनी सोमवारी बैठक घेतली. कागल तालुक्यातील सर्वाधिक ५०० एकर जमीन महामार्ग व अन्य सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या जागेचीही घाटगे यांनी पाहणी केली.
‘शक्तिपीठ’मुळे पराभव? 
संजय मंडलिक यांनी आपल्या पराभवामागे शक्तिपीठ महामार्ग हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ यांनीही याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचे म्हटले आहे. हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काहीच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून पुन्हा शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका सरकारला बसू शकतो, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी महायुतीतील नेत्यांकडून होत आहे.

Loading

पुढील चार दिवसांत राज्यात मान्सून ‘कोसळणार’…. ‘या’ जिह्यांना हवामान खात्याचा दक्षतेचा इशारा

   Follow us on        
Mansoon Alert: महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सोलापूर पर्यंन्त मान्सून दाखल झाला असल्याने उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कालपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. याचसोबत तळ कोकणात उद्यापर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. कोकणसह संपूर्ण राज्यात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून अरबी समुद्र किनारपट्टी भागात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे. 



हवामान खात्याचा अंदाज
उद्या शुक्रवारी आणि शनिवारी हवामान खात्याने राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. काही जिल्हे वगळता रविवारी आणि सोमवारी सुद्धा राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. मात्र सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत या दिवशीं मुसळदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने या दिवशीं या जिल्ह्यांना दक्षतेचा ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.    

Loading

Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील? इथे वाचा

   Follow us on        
Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक ०४ जून रोजी हाती येणार आहे.  मंगळवारी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो. 



कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
ओपनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो ?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.
एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?
आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.
सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.



लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.
Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील? 
एक्झिट पोल एजन्सी महायुती महाविकास आघडी इतर 
ABP News-CVoter  24  23  1
TV9 पोलस्ट्राट  22  25  1
Republic Bharat-Matrize  30-36 13-19 0
Republic PMARQ  29 19 0
News18 exit poll 32-35 13-16 0
School of Politics 31-35 42705 0
TIMES NOW Survey exit polls 26 24 0
News 24 Chanakya exit polls report 33 15 0
Rudra survey 13 34 1
NDTV India – Jan Ki Baat 34-41 42614 0

Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये देशात कुणाला किती जागा मिळतील? 

Alliance / Party NDA INDIA OTHERS
ABP-C Voter 353-383 152-182 04 -12
India Today- Axis My India 361-401 131-166 08-20
News 18 355-370 125-140 42-52
TV9-Polstrat 353-368 118-133 43-38
Today’s Chanakya 385-415 96-118 27-45
NDTV-Poll Of Polls 358 148 37
Republic-PMARQ 359 154 30
News Nation 342-378 153-169 21-23
India NewsDynamics 371 125 47



Loading

दिलासादायक बातमी! मंगळवारपर्यंत मान्सूनची राज्यात हजेरी

   Follow us on        
Mansoon Arrivals 2024: प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील नागरिकांचे हाल होत असून, बहुतांश शहरांतील कमाल तापमान चाळीशीपार नोंदवले जात आहे. मात्र हवामान खात्याने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता लवकरच मॉन्सून येणार असून, तळकोकणात म्हणजे तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.





यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मॉन्सून लवकर दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा येत आहेत. त्यामुळे मॉन्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ४ जून रोजी मॉन्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज देण्यात आलेला आहे.’रेमल’ या चक्रीवादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मॉन्सूनाला कुठेही अडथळा येणार नाही. मॉन्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारितीने होणार आहे. मॉन्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून (दि.२) अधिक बळकट होतील. परिणामी मॉन्सूनची वेग चांगला राहील, असा अंदाज देण्यात आला आहे. जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल, तो मॉन्सूनचा समजला जाईल. त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान जो पाऊस पडेल, त्यात आजपासून होणाऱ्या पावसाचा समावेश होईल. राज्यात काही भागात मॉन्सून पाेचलेला नसला तरी देखील तो पाऊस मॉन्सूनचा समजला जाईल. सध्या पं. बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर मुंबई पुण्यात ६ जून रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Loading

एसटीचे वेळापत्रक आता मोबाईलवर पाहता येणे शक्य; नवीन अँप्लिकेशन तयार

   Follow us on        

काही वेळा  एखाद्या अनोळखी गावी जायचा योग, स्वतःचे वाहन नसल्यास गाव खेड्याच्या भागात एसटी हे परवडणारे वाहतुकीचे साधन उपलब्ध असते. मात्र कित्येकदा आपल्याला त्या गावात जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक माहिती नसते, त्यामुळे मोठी गैरसोय होते. मात्र आता ही गैरसोय दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणे एसटीचेही वेळापत्रक मोबाइल अँप्लिकेशनद्वारे चेक करता येणार आहे.

पियुष चौधरी यांनी एक मोबाइल अँप्लिकेशन बनवले आहे. या अँप्लिकेशनद्वारे वापरकर्त्यांना एसटी बसेसचे वेळापत्रक पाहता येणार आहे. हे अँप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वर उप्लब्ध करण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत १७२ बस स्थानकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात भविष्यात वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेळापत्रकात बसेसच्या थांब्याचीही माहिती सामील करण्यात येणार आहे.



या अँप्लिकेशन मध्ये बस आगारांचे, मध्यवर्ती कार्यालय, वर्कशॉप, विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेचे संपर्क क्रमांक मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

खालील लिंकवर क्लिक वर करून हे अँप्लिकेशन डाउनलोड करता येईल.

ST Bus Time Table Maharashtra – Apps on Google Play



Loading

10th Result 2024: मराठी भाषा ‘नापास’ होत आहे

   Follow us on        
10th Result 2024: दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागच्या या वर्षी या परीक्षेचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. मागच्यावर्षी पेक्षा साधारण 1.98 % ने यामध्ये वाढ झाली असली तरीही या निकालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मातृभाषेच्या विषयातच  हजारो विद्यार्थ्यांनी  गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्यामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
वाचकांच्या प्रतिक्रिया 
“एक काळ होता जेव्हा परकीयांची इंग्रजी भाषा दहावी बारावी परीक्षा पास होण्याकरता सर्वात मोठा अडथळा ठरत होती. आता मात्र चित्र उलट दिसत आहे. मराठी भाषा परकी होत चाललेली दिसत आहे.”
श्री. दिगंबर गणपत राणे, माहीम 
“राज्य शिक्षण मंडळाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड का जात आहे याबाबत सविस्तर विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल केला गेला पाहिजे.”
सौ. आश्विनी रा. गवस, विरार

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search