Author Archives: Kokanai Digital

२० जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-नवमी – 09:52:15 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 21:45:51 पर्यंत
  • करण-गर – 09:52:15 पर्यंत, वणिज – 20:39:44 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शोभन – 23:46:15 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:01:27
  • सूर्यास्त- 19:18:17
  • चन्द्र-राशि-मीन – 21:45:51 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:57:59
  • चंद्रास्त- 14:03:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक निर्वासित दिन
  • जागतिक उत्पादकता दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1837 : इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया विराजमान झाल्या.
  • 1840 : सॅम्युअल मोर्स यांना टेलीग्राफचे पेटंट मिळाले.
  • 1863 : वेस्ट व्हर्जिनिया हे अमेरिकेचे 35 वे राज्य बनले.
  • 1877 : अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडात जगातील पहिली व्यावसायिक टेलिफोन सेवा सुरू केली.
  • 1887 : व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव C.S.T.), मुंबई येथील देशातील सर्वात व्यस्त स्थानक उघडले.
  • 1899 : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना केंब्रिज युनिव्हर्सिटी ट्रायपॉसच्या गणित विषयात प्रथम श्रेणीत प्रथम येऊन वरिष्ठ रँग्लर ही पदवी प्रदान करण्यात आली.
  • 1921 :  भारतातील चेन्नई शहरातील ‘बकिंगहॅम’ आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
  • 1921 : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना.
  • 1960 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
  • 1990 : इराणमध्ये 7.4 मेगावॅट क्षमतेच्या भूकंपात 50,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 150,000 लोक जखमी झाले.
  • 1997 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याजवळ राज्यातील मुलींसाठी पहिली सैनिकी शाळा सुरू केली.
  • 2001 : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
  • 2014 : प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1869 : ‘लक्ष्मणराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1956)
  • 1915 : ‘टेरेन्स यंग’ – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 सप्टेंबर 1994)
  • 1920 : ‘मनमोहन अधिकारी’ – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते यांचा जन्म. (मृत्यू: 26 एप्रिल 1999)
  • 1939 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 एप्रिल 1998)
  • 1946 : ‘जनाना गुस्माव’ – पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1948 : ‘लुडविग स्कॉटी’ – नौरूचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1952 : ‘विक्रम सेठ’ – भारतीय लेखक आणि कवी यांचा जन्म.
  • 1954 : ‘अ‍ॅलन लॅम्ब’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1958 : ‘द्रौपदी मुर्मू’ – भारताच्या राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1972 : ‘पारस म्हांब्रे’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1976 : ‘देविका पळशीकर’ – प्रसिद्ध भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1668 : ‘हेन्‍रिच रॉथ’ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1620)
  • 1837 : ‘विल्यम (चौथा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1765)
  • 1917 : ‘जेम्समेसन क्राफ्ट्स’ – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1997 : ‘भाऊसाहेब पाटणकर’ उर्फ ‘जिंदादिल’ – मराठीतले शायर यांचे निधन.
  • 1997 : ‘बासू भट्टाचार्य’ – राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2008 : ‘चंद्रकांत गोखले’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1921)
  • 2013 : ‘डिकी रुतनागुर’ – भारतीय पत्रकार यांचे निधन. (जन्म: 26 फेब्रुवारी 1931)
  • 1987 : ‘डॉ. सलीम अली’ – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1896)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: महत्वाची बातमी! गणेशचतुर्थीसाठीचे रेल्वे आरक्षण उद्यापासून सुरु

   Follow us on        

Konkan Railway: पावसाळा सुरू होताच कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध सुरू होतात. यासाठी चाकरमानी गणेशोत्सवास गावी जाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. यामध्ये महत्वाचे नियोजन असते ते गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बसचे आरक्षण करणे. यासाठी रेल्वे प्रशासन दोन महिने आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करते.

गणेशोत्सवाला चाकरमानी किमान आठ दिवस अगोदर गावी जातात. या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी आहे. यावर्षी गणपतीसाठी गावी जाणारे चाकरमानी 19 ऑगस्ट पासून सुरूवात करतील. म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी दोन महिने अगोदर म्हणजेच 20 जून रोजी आपल्या इच्छीत गाडीचे आरक्षण घेणे आवश्यक आहे.

खरेतर गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासन नियमीत गाड्यांबरोबरच शेकडो विशेष गाडया कोकण रेल्वे मार्गावर सोडते. मात्र, या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या एक-दोन मिनिटातचं संपूर्ण गाडीचे आरक्षण फूल्ल होते. कधीकधी तर तिकीट खिडकीवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रवाशालाही संबधित गाडीचे कर्फम तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनची ही समस्या आहे.दुसरीकडे खासगी तिकीट एजंटकडे याच गाड्यांची तिकीटे सहज उपलब्ध होतात. मात्र, त्यासाठी मूळ तिकीटाच्या दामदुप्पट दर आकारला जातो. तासनतास् रांगेत राहूनही जे तिकीट प्रवाश्याला मिळत नाही ते एजंटला सहज कसे मिळते? यामागचे गौडबंगाल काय? प्रवाशांची खुलेआम लूट करणारा हा गोरख धंदा कुणाचा? रेल्वे प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही कसे? अवघ्या एका मिनिटात संपूर्ण रेल्वेची हजारो तिकीट कशी आरक्षित होतात? लोकप्रतिनिधी याबाबत आवाज का उठवत नाहीत? याबाबत रेल्वे प्रशासन कधी खुलासा का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न कोकणवासींय रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. मात्र याचे योग्य उत्तर कुणीच देत नसल्याने कोकणवासींय प्रवाशांच्या नशिबी गुराढोरा प्रमाणे रेल्वे डब्यात कोंबून घेत प्रवास करण्याची परवड कायम आहे.

 

आजरा ते बांदा अंतर येणार २० मिनिटांवर! आंबोलीजवळ बनणार देशातील सर्वात लांब बोगदा

   Follow us on        

Shakteepith Expressway: राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंबधी काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. आजरा ते बांदा हे अंतर जलद गतीने पार करण्यासाठी या महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली २ बोगदे मोठे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर हा कदाचित देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.

आंबोली घाटातून आजरा ते बांदा प्रवास करण्यासाठी सुमारे १.५ तास लागतात. डीपीआरनुसार, आजरा ते बांदा या पॅकेजच्या संपूर्ण ३९ किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी लागणारा प्रवास वेळ फक्त २० मिनिटे असणार आहे. तर या टप्प्यात वेगमर्यादा १२० किमी प्रतितास असणार आहे.

नागपूर आणि गोवा यांना जोडणारा हा नवीन द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळेल. या मोठ्या प्रकल्पाची अंदाजीत किंमत ८६,००० कोटी रुपये आहे. हा द्रुतगती मार्ग १२ जिल्ह्यांना जोडून प्रादेशिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ पत्रादेवी येथे संपेल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.

१९ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-अष्टमी – 11:58:23 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 23:17:49 पर्यंत
  • करण-कौलव – 11:58:23 पर्यंत, तैतुल – 22:58:34 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सौभाग्य – 26:45:29 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:01:15
  • सूर्यास्त- 19:18:04
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 25:18:00
  • चंद्रास्त- 13:05:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
  • जागतिक सिकलसेल दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1676 : शिवाजी महाराजांनी पश्चात्तापी सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध केले आणि त्यांना हिंदू धर्मात पुनर्स्थापित केले.
  • 1862 : अमेरिकेने गुलामगिरीवर बंदी घातली.
  • 1865 : गॅल्व्हेस्टन, यूएसए येथे गुलामांची मुक्तता. हा दिवस यापुढे जूनीटींथ म्हणून साजरा केला जातो.
  • 1912 : अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस सुरू करण्यात आला.
  • 1949 : शार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
  • 1961 : कुवेतला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1966 : शिवसेना राजकीय पक्षाची स्थापना.
  • 1977 : ट्रान्स-अलास्कन पाइपलाइनने आर्क्टिक प्रदेशातून तेलाची वाहतूक सुरू केली.
  • 1978 : गारफिल्ड या कार्टून पात्राने वृत्तपत्रात पदार्पण केले.
  • 1981 : भारताच्या ‘ऍपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • 1989 : ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे 19 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
  • 1999 : कोलकाता ते ढाका मैत्रेयी एक्सप्रेस बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1595 : ‘गुरु हर गोविंद’ – सहावे सिख गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 3 मार्च 1644)
  • 1623 : ‘ब्लेस पास्कल’ – फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1662)
  • 1764 : ‘जोसेगेर्व्हासियो आर्तिगास’ – उरुग्वेचे राष्ट्रपिता यांचा जन्म.
  • 1877 : ‘पांडुरंग चिमणाजी पाटील’ – पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य यांचा जन्म.
  • 1941 : ‘वाक्लाव क्लाउस’ – चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1945 : ‘ऑँगसान सू की’ – म्यानमारची राजकारणी यांचा जन्म.
  • 1947 : ‘सलमान रश्दी’ – ब्रिटिश लेखक यांचा जन्म.
  • 1962 : ‘आशिष विद्यार्थी’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1970 : ‘राहुल गांधी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1976 : ‘डेनिस क्रॉवले’ – फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1985 : ‘काजल अगरवाल’ –  भारतीय सिने-अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1747 : ‘नादिर शहा’ – पर्शियाचा सम्राट यांचे निधन. (जन्म: 22 ऑक्टोबर 1698)
  • 1932 : ‘रेव्ह. जस्टिन एडवर्ड’ – मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक यांचे निधन.
  • 1949 : ‘सैयद जफरुल हसन’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1885)
  • 1956 : ‘थॉमस वॉटसन’ – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. चे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 17 फेब्रुवारी 1874)
  • 1993 : ‘विल्यम गोल्डिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 19 सप्टेंबर 1911)
  • 1996 : ‘कमलाबाई पाध्ये’ – समाजसेविका यांचे निधन.
  • 1998 : ‘रमेशमंत्री’ – प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1925)
  • 2000 : ‘माणिक मुदलियार’ तथा ‘माणिक कदम’ – मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.
  • 2008 : ‘बरुण सेनगुप्ता’ – बंगाली पत्रकार यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1934)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: “….तर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य”

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत सुपरफास्ट एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. मात्र हे डबे अपुरे पडत आहेत. त्यात पावसाळ्यात या गाडीच्या फेऱ्यांत कपात केली जात असल्याने प्रचंड मागणी असूनही या गाडीची सेवा अपुरी पडत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा निर्णय अलिकडेच रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या डब्यांची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत पिट लाईन आणि देखभाल स्लॉट उपलब्ध झाला आहे. या पिट लाईन आणि देखभाल स्लॉटचा वापर मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेस साठी वापरल्यास ती १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ९५ टक्के आसन क्षमतेची प्रभावी अंमलबजावणी राखली आहे. यामुळे सध्या धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी आसनांअभावी गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आर्जवही करण्यात आले आहे.

 

१८ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-सप्तमी – 13:37:40 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 24:23:52 पर्यंत
  • करण-भाव – 13:37:40 पर्यंत, बालव – 24:51:27 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 07:39:46 पर्यंत, आयुष्मान – 29:23:43 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:01:05
  • सूर्यास्त- 19:17:48
  • चन्द्र-राशि-कुंभ – 18:36:08 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:40:00
  • चंद्रास्त- 12:09:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • द्वेषयुक्त भाषणाचा प्रतिकार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
  • आंतरराष्ट्रीय सहल दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1776 : महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची प्रसिद्ध लढाई झाली.
  • 1815 : वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव.
  • 1830 : फ्रान्सने अल्जेरिया ताब्यात घेतला.
  • 1908 : फिलीपिन्स विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1930 : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
  • 1946 : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
  • 1956 : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
  • 1981 : प्राण्यांमध्ये पाय आणि तोंडाच्या आजाराविरूद्ध पहिली अनुवांशिक लस विकसित करण्यात आली.
  • 1983 : अंतराळवीर सॅली राइड अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला बनली.
  • 1987 : एम. एस. स्वामीनाथन यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार मिळाला.
  • 2009 : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर एक विशेष उपग्रह पाठवला.
  • 2017 : किदम्बी श्रीकांत भारतीय बॅडमिंटनपटूला  इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद – इंडोनेशिया सुपर सीरिज प्रिमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले, असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1887 : ‘डॉ.अनुग्रह नारायण सिन्हा’ – थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचा जन्मदिन.
  • 1899 : ‘शंकर त्रिंबक’ तथा ‘दादा धर्माधिकारी’ – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 1 डिसेंबर 1985)
  • 1911 : ‘कमला सोहोनी’ – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1997)
  • 1931 : ‘के. एस. सुदर्शन’ – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5 वे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 15 सप्टेंबर 2012)
  • 1931 : ‘फर्नांडो हेन्रिक कार्डोसो’ – ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसचं, ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1942 : ‘थाबो म्बेकी’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1942 : ‘पॉल मॅकार्टनी’ – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य यांचा जन्म.
  • 1987 : ‘मोईन अली’ – इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1858 : झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: 19 नोव्हेंबर 1828)
  • 1901 : ‘रामचंद्र भिकाजी गुंजीकर’ – मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1843)
  • 1902 : ‘सॅम्युअल बटलर’ – इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1835)
  • 1936 : ‘मॅक्झिम गॉर्की’ रशियन लेखक यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1868)
  • 1958 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1900)
  • 1962 : जे. आर. तथा ‘नानासाहेब घारपुरे’ – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य यांचे निधन.
  • 1974 : ‘सेठ गोविंद दास’ – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1896)
  • 1999 : ‘श्रीपाद रामकृष्ण काळे’ – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार यांचे निधन.
  • 2003: ‘जानकीदास’ – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते यांचे निधन.
  • 2005 : ‘मुश्ताक अली’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1914)
  • 2009 : ‘उस्ताद अली अकबर खाँ’ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1922)
  • 2020 : ‘लच्छमानसिंग लेहल’  – परम विशिष्ठ सेवा वीर चक्र, मेजर-जनरल, यांचे निधन. (जन्म: 9 जुलै 1923)
  • 2021 : मिल्खा सिंग – पद्मश्री, द फ्लाइंग शीख, धावपटू, यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1935)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Goa:टेकऑफ होताच विमानाचा तोल गेला! प्रवाशांचा आक्रोश; पायलटच्या प्रसंगावधानामुळे धोका टळला

   Follow us on        

मोपा : अहमदाबाद विमानतळाजवळ  झालेल्या विमान दुर्घटनेतून देश सावरत असताना गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. 172 प्रवाशांना घेऊन गोवा विमानतळावरुन उड्डाण घेताच  इंडिगोच्या विमानाचा तोल जाऊन, विमान खाली येऊ लागलं. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित केलं.

गोव्यातील मोपा विमानतळावरून इंडिगो कंपनीचे ६ई – ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतलं. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमिनीच्या दिशेने येऊ लागलं होतं. विमान कोसळणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. अचानक विमानाचा तोल गेल्यामुळे एकच खळबळ उडाली. या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित करत सुरक्षितपणे लखनऊच्या अमौसी विमानतळावर सुरक्षितपणे विमान लँड केलं.

या घटनेनंतर इंडिगोचा वैमानिक अधिकारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसंच विमानात देखील नेमका काय बिघाड झाला होता का? किंवा झालेला प्रकार का घडला? याचे कारण शोधण्याची मागणी केली आहे. अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विमानांची सुरक्षा आणि देखभाल याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर आता गोव्यात घडलेल्या या घटनेमुळे १७२ प्रवासी चांगलेच घाबरले होते.

Mumbai Goa Highway: सावधान! कळंबणीमध्ये रस्ता खचल्याने धोकादायक स्थितीत

   Follow us on    

 

 

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये रस्ता खचला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे तडे गेलेले आहेत. तर खबरदारी म्हणून स्थानिकांनी या महामार्गावर झाडाच्या फांद्या देखील टाकल्या आहेत. या खचलेल्या रस्त्यावरूनच वाहनांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अतिशय धोकादायक असा हा मार्ग सध्या बनलेला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथे रस्ता खचल्याची घटना घडली आहे. वाळंजगाडी येथील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठे तडे गेले असून रस्ता खचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून रस्ता तात्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिकांनी खबरदारी म्हणून महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असली तरी काल रात्रीपासून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

१७ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-षष्ठी – 14:49:33 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 25:02:43 पर्यंत
  • करण-वणिज – 14:49:33 पर्यंत, विष्टि – 26:17:01 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 09:33:41 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:00:54
  • सूर्यास्त- 19:17:34
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 24:03:59
  • चंद्रास्त- 11:13:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस
  • जागतिक टेसेलेशन दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1632 : मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज यांचा मृत्यू. शाहजहानने तिच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहाल बांधला.
  • 1885 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क हार्बरमध्ये दाखल झाला.
  • 1929 : सोव्हिएत युनियनने चीनसोबतचे राजनैतिक संबंध संपवले.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरुवात केली.
  • 1944 : आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि प्रजासत्ताक बनले.
  • 1961 : भारतात निर्मित स्वदेशी एच.एफ-24 सुपर सोनिक लढाऊ विमानाणे भरारी घेतली.
  • 1967 : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
  • 1970 : शिकागो येथे पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
  • 1991 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
  • 2006 : कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1239 : ‘एडवर्ड (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1307)
  • 1704 : ‘जॉन के’ – फ्लाइंग शटल चे शोधक यांचा जन्म.
  • 1867 : ‘जॉनरॉबर्ट ग्रेग’ – लघुलेखन पद्धतीचा शोधक यांचा जन्म.
  • 1898 : ‘कार्ल हेर्मान’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1903 : ‘बाबूराव विजापुरे’ – संगीतशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 7 डिसेंबर 1982)
  • 1903 : ‘रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड’ – चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 10 जानेवारी 1977)
  • 1920 : ‘फ्रांस्वा जेकब’ नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1973 : ‘लिएंडर पेस’ – भारतीय टेनिसपटू यांचा जन्म.
  • 1980 : ‘वीनस विलियम्स’ – महान अमेरिकन टेनिसपटू यांचा जन्मदिन.
  • 1981 : ‘शेन वॉटसन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1981 : ‘अमृता राव’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1631 : ‘मुमताज महल’ – शाहजहानची पत्नी यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1593)
  • 1297 : ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: 29 जानेवारी 1274)
  • 1674 : ‘राजमाता जिजाबाई’ – यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1598)
  • 1893 : ‘लॉर्ड विल्यम बेंटिंक’ – भारताचे 14 वे राज्यपाल जनरल यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 1774)
  • 1895 : ‘गोपाल गणेश आगरकर’ – थोर समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1856)
  • 1928 : ‘गोपबंधूदास’ – ओरिसातील समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1877)
  • 1965 : ‘मोतीलाल राजवंश’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)
  • 1983 : ‘शरद पिळगावकर’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचे निधन.
  • 1996 : ‘बाळासाहेब देवरस’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1915)
  • 2004 : ‘इंदुमती पारीख’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Important Notice: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना.

   Follow us on        

Konkan Railway: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू केले जाणार आहे.

प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट NTES म्हणजेच enquiry.indianrail.gov.in किंवा ऑल इंडिया रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर ट्रेनच्या वेळा तपासाव्यात.

कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते आणि तुमच्या सहकार्याबद्दल आणि समजुतीबद्दल धन्यवाद.

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (KRCL)

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search