Author Archives: Kokanai Digital

६ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 10:53:28 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 24:06:29 पर्यंत
  • करण-वणिज – 10:53:28 पर्यंत, विष्टि – 22:03:41 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 20:28:45 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:56
  • सूर्यास्त- 18:44
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 11:33:00
  • चंद्रास्त- 25:27:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1840: “बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी” हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
  • 1869: दिमित्री मेंडेलीव्ह यांनी रशियन केमिकल सोसायटीला पहिली नियतकालिक सारणी (पिरोडीक टेबल) सादर केली.
  • 1882: सर्बियन राज्याची पुनर्स्थापना झाली.
  • 1940: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी.
  • 1953: “जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच” सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
  • 1957: “घाना” देशाचा स्वातंत्र्य दिन.
  • 1975: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
  • 1992: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
  • 1998: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
  • 1999: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
  • 2005: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1475: “मायकेल अँजलो” – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 1564)
  • 1899: ‘“शि. ल. करंदीकर”’ – चरित्रकार आणि संपादक यांचा जन्म.
  • 1915: “मोहम्मद बुरहानुद्दीन” – बोहरा  धर्मगुरू सैयदना यांचा जन्म.
  • 1937: “व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा” – रशियाची पहिली महिला अंतराळातयात्री यांचा जन्म.
  • 1957: “अशोक पटेल” – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1965: “देवकी पंडित” – भारतीय शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1947: “मकिंडर हॉलफोर्ड जॉन” – ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी यांचे निधन.
  • 1967: “स. गो. बर्वे” – कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
  • 1968: “नारायण गोविंद चापेकर”  – साहित्यिक यांचे निधन.
  • 1973: “पर्ल एस. बक”  – नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका यांचे निधन. (जन्म: 26 जून 1892)
  • 1981: “गो. रा. परांजपे” – रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य यांचे निधन.
  • 1982: “रामभाऊ म्हाळगी” – आदर्श लोकप्रतिनिधी खासदार यांचे निधन.
  • 1992: “रणजीत देसाई” – सुप्रसिद्ध मराठी लेखक यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1928)
  • 1999: “सतीश वागळे” – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते यांचे निधन.
  • 2000: “नारायण काशिनाथ लेले” – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा- खा. नारायण राणे

   Follow us on        

सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे. याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ने खासदार श्री. राणेंचे आभार मानले आहेत.

या निवेदनात खास. राणे यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कोकण रेल्वेवरील सावंतवाडी स्टेशन टर्मिनसचा विकास करण्याची विनंती केली आहे. सावंतवाडी हे हजारो लोक विशेषतः उत्सवाच्या काळात वापरणारे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडीचा विकास कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी सर्वात उपयुक्त ठरेल. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालून संबंधित संघटनेची विनंती स्वीकारण्याची, ती मान्य करण्याची सूचना द्या अशी मागणी खास. राणेंनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत खास नारायण राणे यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून आभार मानले आहेत.

Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे होळीसाठी अजून दोन गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan  Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,

१)गाडी क्र. ०११०२/०११०१ मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष 

गाडी क्र. ०११०२ मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी मडगाव येथून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्र. ०११०१ पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी पनवेल येथून संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ६:४५ वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१

२)गाडी क्र. ०११०४/०११०३ मडगाव – एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष

गाडी क्र. ०११०४ मडगाव – एलटीटी साप्ताहिक विशेष ही गाडी रविवार दिनांक १६/०३/२०२५ आणि २३/०३/२०२५ रोजी मडगाव येथून संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ०६:२५ वाजता एलटीटी मुंबई या स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्र. ०११०३ एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार दिनांक १७/०३/२०२५ आणि २४/०३/२०२५ रोजी एलटीटी येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१

 

 

 

 

 

 

 

होळीसाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाण्याचा बेत आहे? मग ही बातमी वाचाच…

   Follow us on        
Mumbai Goa Highway: कोकणातील दुसरा मोठा सण म्हणून ओळखला जाणारा शिमगोत्सवास अगदी काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. पुढील आठवडय़ात मुंबई पुण्याहून चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघतील. कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गचा पर्याय निवडणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी सध्या या महामार्गाची परिस्थिती कशी आहे याबाबत अभ्यास करून मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार बहुतेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

समितीचा अहवाल काय सांगतो ?

मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १७ वर्षांपासून रखडलेले असून सद्याची कामाची परिस्थिती अत्यंत बिकट असून धीमी गतीने काम चालु आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत राज्य सरकार कडून वाढवून मागण्यात आली होती व आता डिसेंबर  २०२५ कामाची डेडलाईन देण्यात आलेली आहे. परंतु सद्यस्थितीत कामाची प्रगती पाहता दिलेल्या तारखेला देखील महामार्ग होणार नाही हे आमचे मागील ०६ वर्षाचे अनुभव आहेत व जनआक्रोश समितीने २० फेब्रुवारी २०२५,२२ व २३ मार्च २०२५ आणि ०१ व ०२ मार्च २०२५ रोजी केलेल्या पाहणीनुसार अधोरेखिल केले आहे. कारण २०१९ साली मा.श्री.चंद्रकांत पाटील साहेब यानी महामार्गाची डेडलाईन दिलेली होती,यानंतर मा.श्री.अशोक चव्हाण साहेब यानी २०२० पर्यंत काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते यानंतर मा.श्री.रविंद्र चव्हाण साहेब यानी ०४ वेळा डेडलाईन दिली व आता नव्याने दिलेली डेडलाइन सुद्द्धा एक आश्वासन आहे हे महामार्गाची परिस्थिती पाहता लक्षात येत आहे व आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
टप्पा-०१ पनवेल ते कासु -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती.  सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे.तर अद्यापही साईट पट्टी,दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे,ड्रेनेज लाईन,सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व  सदर टप्प्यात  ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत.सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु  अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.
टप्पा-०२ कासु ते इंदापुर -४२ किमी ते ८४ किमी  (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत  काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती.सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे.अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही.कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे.महामार्गाला पेव्हर ब्लॉकदिसत आहेत.सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे,जनावरे,वहानांसाठीभुयारी मार्ग,साईटपट्टीचे काम बाकी आहे तर  अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही.या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे.याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहेत.सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखडयानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत.तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्यांची जमीन नुकसान होत आहे.
टप्पा-०३ इंदापुर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे  अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे.सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत कोकणकर संभ्रमात आहेत. सदर  ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत असून याबाबत काय नियोजन आहे याची माहिती मिळावी.आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५  किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार अवजड वाहतूक ईतर मार्गाने वळविणे व माणगाव बायपास आहे त्या स्थितीत वापरण्यास देणे अशी मागणी होत आहे.
लोणेरे येथील ब्रिजचे काम एप्रिल-मे पर्यंत पूर्ण करण्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे परंतु ०२ महिन्यात कशा पद्धतीने काम पूर्ण करण्यात येणार आहे याचा आराखडा मिळावा जेणेकरून त्यानुसार काम चालु आहे का याची पाहणी कोकणकरांच्या वतीने जनआक्रोश समितीकडून करण्यात येईल.
टप्पा-०४-वडपाले ते भोगाव(११० किमी ते १४९ किमी)
सदर टप्प्यात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आलेली आहेत.महाड मधील टोल जवळील आंबेतकडे जाणाऱ्या अंडरपास धोकादायक आहे.याठिकाणी सर्व्हिस रोडचे तीन मार्ग खुले असून एक मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. सदर ठिकाणी फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचा अडथळा असल्याचे स्थानिकांकडून कळाले. परंतु शासनाच्या अंतर्गत वादामुळे अनेक अपघात सदर ठिकाणी घडत आहेत. महाडकडे वाहनांना जायचं झाल्यास उलट बाजूने महामार्गांवर प्रवेश करावा लागत आहे.
प्रत्येक गावाजवळ अंडरपास देणे अपेक्षित होते कारण महामार्गाच्या अलीकडे गाव तर पलीकडे शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय, शेती असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग ओलांडताना अनेक अपघात घडत आहेत यामध्ये चांभारखिंड येथे अंडरपास तर पोलादपूर येथे स्कायवॉल्क असणे गरजेचं आहे.
टप्पा-०५ – भोगाव १४९ किमी ते कशेडी १६१ किमी –
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळाली व सदर परिस्थिती अद्यापही तशीच आहे.तर दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर  २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे.
टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी-  
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिति बिकट आहे,सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे.सदर ठिकाणी ०२ मार्च २०२५ रोजी पाहणी करण्यात आली असता अद्यापही बरेचसे काम बाकी आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा आराखडा मिळावा व या पावसाळ्यात नेहमीप्रमाणे संरक्षण भिंत कोसळणार नाही यासाठी कोणते नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहेत याबाबत आवगद करावे.
टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी  ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळून येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम चालु आहे.महामार्गावर एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना अद्यापही सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. सूचना फलक नसल्याने व पूर्वसूचना न देता अचानक कुठेतरी कामाला सुरुवात केल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
टप्पा-०८ व ०९ -आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेला आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिति दर्शवीत आहोत.तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
लांजा-
लांजा शहरांत उड्डाणपुलाचे काम चालु असून अंदाजित ०३ ते ३.५ किमी लांबीचे हे उड्डाणपुल आहे. सदर उड्डाणपुलामुळे शहराचे दोन भाग होत आहेत. यामुळे सदर उड्डाणपुलाचे काम ४५० मी ते ५०० मिटरने वाढविल्यास प्रशासकीय कार्यालय,शाळा यांना एकत्रित जोडले जाईल. तसेच या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालु असून दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड किमान प्रवासासाठी डांबरी असावेत जेणेकरून प्रवासाला अडथळे निर्माण होणार नाहीत परंतु मातीचा रोड असल्याने धुळीचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे. यावर पाणि मारणे हे उपाय नसून सदर सर्व्हिस रोड किमान डांबरी करावेत.
देवधे-
देवधे येथे देखील गाव अलीकडे तर शाळा,शेती पलीकडे असल्याने सदर ठिकाणी देखील अंडरबायपास असणे आवश्यक आहे. तसेच ईतर गावातून महामार्गाला जोडलेल्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने जलद गतीने महामार्गांवर वाहनांचा प्रवेश होतो परिणामी अपघात घडू शकतात सदर ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम चालु असून ०५-०६ फुटाचे खड्डे मारले असून सुरक्षेच्यादृष्टीने काहीही काळजी घेण्यात आलेली नाही. रात्री अपरात्री सदर ठिकाणी अपघात घडू शकतो.
चरवेली –
सदर गावाला अंडरपासची आवश्यकता आहे. सदर ठिकाणी काम पूर्ण झालेला असून महामार्ग लगत अंडरपास किंवा बॅरिकेट नसल्याने गुरे रस्त्यावर येत असतात यामूळे सतत अपघात घडत आहेत. १५ दिवसापूर्वीच वाहनाच्या धडकेत ०२ बैल अपघातात मृत्युमुखी पडले तर वाहन चालकाचा अतिशय नुकसान झाला आहे. बस स्टॉप,शेती यांसारख्या कामासाठी महामार्ग ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
पाली –
पाली येथील उड्डाणपुलाचे फक्त खांब उभे करण्यात आलेले आहेत. सदर ठिकाणी ०१ व ०२ मार्च रोजी पाहणी केली असता ०१ JCB व ०४ कामगार काम करताना दिसत आहेत. जर काम अशाच पद्धतीने चालु राहिल्यास सदर उड्डाणपुल पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती नाही.हे काम कशा पद्धतीने व किती महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा आराखडा मिळावा.
हातखांबा-
हातखांबा येथे देखील उड्डाणपुलाच्या कामाची गती अतिशय धिमी आहे. ठेकेदाराला मनुष्यबळ व यंत्रणा वाढविणे अपेक्षित आहे. हातखांबा येथील गुरववाडी येथे महामार्ग हा ०६ फूट उंच असून गुरववाडी गावातील जोडणारा रस्ता ०६ फूट खोल असल्याने या महामार्गांवर प्रवेश करणे कठीण आहे यासाठी सदर उतार किमान ५०० मिटर पासून केल्यास गावातील रस्ता व महामार्ग समान अंतरावर येतील.याठिकाणी ठळक दिशादर्शक फलक नसल्याने मुंबईतून येणारा पर्यटक गोवा येथे जाण्याच्या बदल्यात थेट कोल्हापूर येथे पोहचेल कारण सर्वच ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.
निवळी-
निवळी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची अशीच परिस्थिती आहे. सदर उड्डाणपुल बाजारपेठेत उतरत असताना खांब असणे अपेक्षित असताना भराव टाकल्याने महामार्गावर बाजारपेठेत दूतर्फा परिस्थिती निर्माण होत आहे.सदर उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण करण्यात येईल याबाबतचा आराखडा मिळावा.
बावनदी उड्डाणपुल –
सदर कामाला गती दिसत असून अशाच पद्धतीने काम चालु राहिल्यास लवकरच पूर्ण होऊ शकतो. स्थानिक व सदर ठिकाणी काम करीत असलेल्या कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते मे पर्यंत काम पूर्ण होण्याचा कालावधी सांगण्यात येत आहेत.या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा आराखडा व दिवसाला प्रत्यक्षात होत असलेला काम याबाबतचा (DPR – DAILY PROGRESS REPORT) मिळावा.
वांद्री अंडरपास-
वांद्री येथे अंडरपासच्या कामाला ०८ दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी दिनांक- ०२ मार्च रोजी पाहणी केली असता हे काम यावर्षी पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. अद्यापही अंडरपास व महामार्गाचे काम बरेचसे बाकी आहे.यामुळेच यंत्रणा वाढवून कामाला गती देण्यात यावी.
संगमेश्वर उड्डाणपुल-
सदर उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालु असून ०४ कामगार काम करीत आहेत.सदर ठिकाणी स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर दररोज अशाच पद्धतीने काम चालु आहे असे सांगण्यात आले.
संगमेश्वर येथे अगदी सकाळपासून ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. सावित्री नदीवरील पुल जर ०६ महिन्यात पूर्ण होऊ शकतो तर संगमेश्वर मधील उड्डाणपुलाचे काम का होऊ शकत नाही असा प्रश्न स्थानिकांचा आहे. तरी या ठिकाणी यंत्रणा वाढवून या ०३ महिन्यात काम पूर्ण करण्यात यावा किंवा किमान ०१ बाजू चालु करण्यात यावी.
आरवली-
आरवली येथे सर्व्हिस रोडचे काम चालु असून ०५-०६ फूट खोल ड्रेनेज लाईन खोदकाम करण्यात आलेले आहे. परंतु याठिकाणी सुरक्षा वाऱ्यावर असून आतापर्यंत ०३ अपघात झाले आहेत.
वर दर्शविल्याप्रमाणे महामार्गाची स्थिती असून सुरक्षा,दिशादर्शक फलक यांची कमतरता आहे.तसेच वरील टप्प्यात चाललेल्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव,कामाचा कालावधी , सुरक्षा अधिकारी संपर्क व ठेकेदार यांचा संपर्क असावा हि आपणास विनंती.

५ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 12:53:49 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 25:09:09 पर्यंत
  • करण-तैतुल – 12:53:49 पर्यंत, गर – 23:50:18 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 23:06:43 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:57
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-मेष – 08:13:48 पर्यंत
  • चंद्रोदय- 10:39:59
  • चंद्रास्त- 24:23:59
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • 1851: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ची स्थापना झाली.
  • 1931: दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
  • 1933: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
  • 1966: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
  • 1982: सोव्हिएत प्रोब व्हेनेरा 14 शुक्रावर उतरले.
  • 1997: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
  • 1998: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
  • 2000: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
  • 2007: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1512: ‘गेर्हाट मार्केटर’- नकाशाकार आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1594)
  • 1898: ‘चाऊ एन लाय’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1976)
  • 1908: ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील व हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जून 1990)
  • 1910: ‘श्रीपाद वामन काळे’ – संपादक यांचा जन्म.
  • 1913: ‘गंगुबाई हनगळ’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 21 जुलै 2009)
  • 1916: ‘बिजू पटनायक’- ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 1997)
  • 1959: ‘शिवराज सिंह चौहान’ – मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1974: ‘हितेन तेजवानी’- अभिनेता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1827: ‘अलासांड्रो व्होल्टा’ – इटालीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म: 18 फेब्रुवारी 1745)
  • 1914: ‘शांताराम अनंत देसाई’ – नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक यांचे निधन.
  • 1953: ‘जोसेफ स्टॅलिन’ – सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 18 डिसेंबर 1878)
  • 1968: ‘नारायण गोविंद चाफेकर’ – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार यांचे निधन
  • 1985: ‘पु. ग. सहस्रबुद्धे’ – महाराष्ट्र संस्कृतीकार  यांचे निधन
  • 1985: ‘देविदास दत्तात्रय वाडेकर’- कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक  यांचे निधन
  • 1995: ‘जलाल आगा’- हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन
  • 2013: ‘ह्युगो चावेझ’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 28 जुलै 1954)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Ration Card E-KYC: रेशन कार्ड धारकांसाठी EKYC करण्याची ऑनलाइन सुविधा सुरू…

   Follow us on        

Ration Card E-KYC: शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते. मात्र, या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा, यासाठी आता e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. तुमचे e-KYC पूर्ण झाले नसेल, तर लवकरच ते पूर्ण करा; अन्यथा तुमच्या शिधापत्रिकेवरील लाभ बंद होण्याचा धोका आहे.

ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला रास्त भाव दुकानात जायची गरज नाही. EKYC ॲप मधून लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे EKYC करू शकतो.

मुख्य वैशिष्ट्ये

▪️घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा

▪️फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी

▪️रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो

▪️आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक

 

ॲप लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth

1)राज्य : महाराष्ट्र निवडा- आधार क्रमांक : टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून कॅप्चा कोडची नोंद करा.

2) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)- स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा.

3) सत्यापन पूर्ण- यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल- याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये “E-KYC Status” तपासा- जर “E-KYC Status – Y” दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

EKYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे.

Konkan Railway: आरक्षणाची झंझट नाही! होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘अनारक्षित विशेष’ गाड्या

   Follow us on        

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या दादर ते रत्नागिरी आठवड्यातुन तीन दिवस धावणार आहेत. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे.

गाडी क्रमांक ०११३१/०११३२ दादर-रत्नागिरी दादर त्रि-साप्ताहिक विशेष 

गाडी क्रमांक ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.

या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

डब्यांची संरचना: जनरल – १४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण १६ आयसिएफ कोच

 

४ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 15:19:04 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 26:38:26 पर्यंत
  • करण-बालव – 15:19:04 पर्यंत, कौलव – 26:03:36 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-इंद्रा – 26:06:11 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय – 06:58
  • सूर्यास्त – 18:43
  • चन्द्र राशि-मेष
  • चंद्रोदय-09:52:59
  • चंद्रास्त-23:18:5 9
  • ऋतु-वसंत

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय सुरक्षा दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1791: व्हर्मोंट अमेरिकेचे 14 वे राज्य बनले.
  • 1837: शिकागो शहराची स्थापना झाली.
  • 1861: अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले.
  • 1882: ब्रिटनमधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडनमध्ये सुरू झाली.
  • 1936: हिंडेनबर्गरने पहिले उड्डाण केले.
  • 1951: पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन नवी दिल्लीत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले.
  • 1961: 1946 मध्ये इंग्लंडमध्ये बांधलेले आय. एन. एस. विक्रांत हे विमानवाहू जहाज भारतीय नौदलात दाखल झाले.
  • 1994: स्पेस शटल प्रोग्राम: एसटीएस-62 वर स्पेस शटल कोलंबिया लाँच करण्यात आले.
  • 1996: चित्रकार रवी परांजपे यांना राष्ट्रीय पुरस्कार असलेल्या कॅग हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1868: ‘हरीश्चंद सखाराम भाटवडेकर’ – चलत चित्रपटाचे प्रवर्तक यांचा जन्म.
  • 1893: ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1985)
  • 1906: ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1994)
  • 1922: ‘विना पाठक’ – गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 2002)
  • 1926: ‘रिचर्ड डेवोस’ – अॅमवे चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1973: ‘चंद्र शेखर येलेती’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1980: ‘रोहन बोपन्ना’ – भारतीय टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1986: ‘माईक क्रीगेर’ – इंस्ताग्राम चे सहसंस्थापक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1852: ‘निकोलय गोगोल’ – रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार यांचे निधन.
  • 1915: ‘विल्यम विल्लेत्त’ – ब्रिटिश समर टाईम चे निर्माता यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1856)
  • 1925: ‘ज्योतीन्द्रनाथ टागोर’ – रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 4 मे 1849 – कोलकाता, पश्चिम बंगाल)
  • 1941: ‘ताचियामा मिनीमोन’ – जपानी 22वे योकोझुना सुमो पैलवान यांचे निधन (जन्म: 15 ऑगस्ट 1877)
  • 1948: ‘बाळकृष्ण शिवारम मुंजे’ – भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1872)
  • 1952: ‘सर चार्ल्स शेरिंग्टन’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1857 – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
  • 1976: ‘वॉल्टर शॉटकी’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 जुलै 1886)
  • 1985: ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन(जन्म: 4 मार्च 1893)
  • 1985: ‘डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे’ – साहित्यिक यांचे निधन.
  • 1992: ‘शांताबाई परुळेकर’ – सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका यांचे निधन.
  • 1995: ‘इफ्तिखार’ – चरित्र अभिनेता यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1920)
  • 1996: ‘आत्माराम सावंत’ – नाटककार आणि पत्रकार यांचे निधन.
  • 1997: ‘रॉबर्ट इह. डिक’ – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1999: ‘विठ्ठल गोविंद गाडगीळ’ – भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी यांचे निधन.
  • 2000: ‘गीता मुखर्जी’ – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1924)
  • 2007: ‘सुनील कुमार महातो’ – भारतीय संसद सदस्य यांचे निधन.
  • 2011: ‘अर्जुनसिंग’ – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, 3 वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1930)
  • 2020: ‘जेवियर पेरेझ डी क्युलर’ – पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव यांचे निधन(जन्म: 19 जानेवारी 1920)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू.

   Follow us on        

Konkan Railway: जलद, आरामदायी आणि अनेक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारने देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान या गाड्या सुरू केल्या असून काही अपवाद वगळता सर्व गाड्या यशस्वी ठरल्या आहेत. मुंबई मडगाव मार्गावर सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेसची या यशस्वी गाडय़ांमध्ये गणना होत आहे. या गाडीचा मंगळुरू पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता होताना दिसत आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे.

मुंबई ते मंगळुरू अशी अखंड वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्यातून होत आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/30) हीच गाडी पुढे मंगळुरू पर्यंत विस्तारित करावी. ही गाडी विस्तारित केल्यास तिला सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे धावण्यासाठी जो अतिरिक्त रेक लागेल तो गाडी क्रमांक 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल ही गाडी बंद करून तिचा रेक वापरण्यात यावा. असे केल्याने अतिरिक्त रेक न वापरता आहे त्या गाड्यांमध्ये हा बदल करून कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई साठी जलद प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमांतून ही मागणी जोर लावून धरल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांचा विरोध.

सध्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. मुंबई कर्नाटक दरम्यान गरज पडल्यास नवीन गाडी मागावी. –अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती

आम्ही तुम्हाला कर्नाटकसाठी नवीन रेकची मागणी करण्याची विनंती करतो. सध्याची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आधीच १०० टक्के पूर्ण क्षमतेने धावत आहे, नवीन ट्रेन सुरू झाल्यास महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील प्रवाशांना अधिक फायदा होईल. सध्या आम्ही या विस्ताराच्या विरोधात आहोत. –रोहा रेल्वे प्रवासी समिती

मुंबई गोवा वंदे भारत मंगळुरूपर्यंत नेण्याची मागणी कर्नाटकातून होत आहे. तेथील खासदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. आपण जोरदार विरोध करणे आवश्यक आहे. अन्यथा कोकणकन्याचा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेल्या १२१३३/१२१३४ मुंबई कारवार एक्सप्रेसप्रमाणे आपल्याला वंदे भारतलाही मुकावे लागेल. मंगळुरूच्या नवीन गाडीला विरोध नाही. परंतु आपली गाडी पुढे वाढवून नाही, तर स्वतंत्र गाडी सुरू व्हावी. तसेच, त्या गाडीला सर्व स्थानाकांना समान कोटा मिळावा व महाराष्ट्रात पुरेसे थांबे मिळावेत.-श्री. अक्षय म्हापदी, रेल्वे अभ्यासक

Loading

३ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 18:04:34 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 28:30:29 पर्यंत
  • करण-वणिज – 07:33:08 पर्यंत, विष्टि – 18:04:34 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 08:56:41 पर्यंत, ब्रह्म – 29:24:11 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:58
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 09:09:00
  • चंद्रास्त- 22:15:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक वन्यजीव दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1845: फ्लोरिडा हे अमेरिकेचे 27 वे राज्य बनले.
  • 1865: हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
  • 1885: अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी (AT&T) ची स्थापना झाली.
  • 1923: टाईम मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1938: सौदी अरेबियामध्ये तेलाचा शोध लागला.
  • 1966: डॉ. धनंजय राव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू बनले.
  • 1969: अपोलो कार्यक्रम: चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी नासाने अपोलो-9 लाँच केले.
  • 2003: महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेल्या शरच्चंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
  • 2005: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर विमानातून ६७ तासांत जगाची एकट्याने, इंधन न भरता केलेली प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 2015: 20 डिसेंबर 2013 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1839: ‘जमशेदजी टाटा’ – टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 19 मे 1904)
  • 1845: ‘जॉर्ज कँटर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1918)
  • 1847: ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ – टेलिफोनचा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑगस्ट 1922)
  • 1920: ‘मुकुंद शंकरराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर मासिकाचे संपादक यांचा जन्म.
  • 1923: ‘प्रा. सदाशिव नथोबा आठवले’ – इतिहासकार आणि ललित लेखक यांचा जन्म.
  • 1926: ‘रवि शंकर शर्मा’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 मार्च 2012)
  • 1928: ‘पुरुषोत्तम पाटील’ – कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1948: ‘स्टीव्ह विल्हाइट’ – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 14 मार्च 2022)
  • 1967: ‘शंकर महादेवन’ – गायक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1977: ‘अभिजित कुंटे’ – भारताचा चौथा ग्रँडमास्टर यांचा जन्म.
  • 1987:’ श्रद्धा कपूर’ – भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1700: ‘छत्रपती राजाराम महाराज’ – मराठा साम्राज्याचे 3रे छत्रपती यांचे निधन (जन्म: 24 फेब्रुवारी 1670)
  • 1703: ‘रॉबर्ट हूक’ – इंग्लिश वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1635)
  • 1707: ‘औरंगजेब’ – सहावा मोघल सम्राट यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1618)
  • 1919: ‘हरी नारायण आपटे’ – कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1864)
  • 1924: ‘वूड्रो विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे 28वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1965: ‘अमीरबाई कर्नाटकी’ – पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचे निधन.
  • 1967: ‘स. गो. बर्वे’ – माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
  • 1982: ‘रघुपती सहाय’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1896)
  • 1995: ‘पं. निखील घोष’ – तबलावादक यांचे निधन.
  • 2000: ‘रंजना देशमुख’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search