Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway News : स्लीपर डब्यांना मोठी मागणी असूनही या डब्यांचे रूपांतर replacement एसी कोच मध्ये करत असल्याचा आरोप रेल्वे प्रशासनवर होत असताना सामान्य प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 16336 /16335 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस या गाडीच्या स्लीपर कोच मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही गाडी सध्या एकूण 11 स्लीपर कोचसहित धावत आहे त्यामध्ये एका स्लीपर कोचची वाढ करून 12 एवढी करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 16336 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी दिनांक 19 मार्च 2024 तर गाडी क्रमांक 16335 गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस दिनांक 22 मार्च 2024 रोजीपासून या बदलासह चालविण्यात येणार आहे.
ही गाडी कोकणात वसई, भिवंडी, पनवेल , माणगाव, चिपळूण, रत्नागिरी या स्थानकावर थांबे घेते.
पणजी : गोव्यात एका जुन्या वास्तूतील एका तिजोरीत चक्क ५ हजार दुर्मिळ नाण्यांचा खजिना सापडला असल्याची बातमी समोर आली आहे. पणजी येथील लेखा संचालनालयाच्या वास्तूत हा खजिना सापडला आहे. किंग व्हिक्टोरिया आणि किंग विल्यम यांची चित्रे असलेल्या ३३ दुर्मिळ नोटांसह मौल्यवान दागदागिनेही त्यात आढळून आले आहेत.
जुन्या सचिवालयामागील ‘फझेंडा’ इमारतीत (Fazenda building) पूर्वी लेखा संचालनालयाचे कार्यालय होते. याच ठिकाणी एका तिजोरीत दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या होता. १९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर १९९२ साली ही तिजोरी उघडण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ती उघडण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या तिजोरीत १०० किलोपेक्षा अधिक वजनाची एकूण ५ हजार दुर्मिळ नाणी सापडली असून ही नाणी वेगवेगळ्या कालखंडातील आहे. याशिवाय ३३ दुर्मिळ नोटा आणि २.२३४ किलो सोन्याच्या वस्तू व एका पिशवीत मौल्यवान अलंकार सापडले आहेत. याशिवाय जुन्या काळात घरांत वापरले जाणारे साहित्यही सापडले आहे. यात आरतीचे ताट, पणत्या अशा अतिशय जुन्या पूजा साहित्याचाही त्यात समावेश आहे. हे साहित्य सर्व लोकांना पाहण्यासाठी गोव्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
तिजोरीत सापडल्या ‘या’ दुर्मिळ वस्तू
* ५,००० दुर्मिळ नाणी
* ३०७ तांब्याची नाणी (३.१०५ किलो)
* अरेबिक कलाकुसर असलेली ८१४ नाणी (४.७ किलो)
* १,७४६ अरेबिक नाणी (२० किलो)
* ७८७ तांब्याची नाणी (१५ किलो)
* १,०२६ तांब्याची नाणी (३८ किलो)
* १,६९५ नाणी (२२ किलो)
* क्वीन व्हिक्टोरिया आणि किंग विल्यम यांची छाप असलेली ३२० दुर्मिळ नाणी (३.४७७ किलो)
* दुर्मिळ चलनी नोटा ( ३३ नग)
* सोन्याचे तुकडे (२.२३४ किलो)
* दुर्मिळ सुवर्णालंकार (कांकण, पेंडेन्ट, सोनसाखळी, कर्णफुले, लॉकेट, ब्रेसलेटचे इत्यादींचे गाठोडे)
* घरातील दुर्मिळ भांडी आणि इतर वस्तू
Video | रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी; रेल्वे प्रशासन दुर्घटनेच्या प्रतीक्षेत? – Kokanai
सविस्तर वृत्त 👇🏻https://t.co/P9Sf89obRY#konkanrailway #vaibhavwadi pic.twitter.com/J3YLkPLgj6
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) March 17, 2024





सिंधुदुर्ग :दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे . दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे.
दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.
तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.
Nagpur Goa Expressway: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गावर हरकती नोंदविण्यासाठी शासनातर्फे २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत या महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे दिनांक ७ मार्च ते २८ मार्च अशी असणार आहे. या हरकती त्या त्या तालुक्यातील भूसंपादन प्रांताधिकाऱ्यांकडे या मुदतीत दाखल करता येतील.
राज्यातील सर्वात मोठा महामार्ग ठरणाऱ्या या महामार्गास काही जिल्ह्यातून विरोध व्हायला सुरु झाला आहे. मुख्यत्वेकरून सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. या महामार्गाने सध्या कसल्या जाणाऱ्या जमिनी जातील आणि येथील शेतकरी भूमिहीन होईल. त्याचप्रमाणे या महामार्गामुळे येथे पुराचा धोका निर्माण होईल असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. हा महामार्ग होऊ नये किंवा आपल्या भागातून जाऊ नये अशा मागण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे शासनास हा महामार्ग पूर्णत्वास नेण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.