Author Archives: Kokanai Digital

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा यांची वर्णी

   Follow us on        
मुंबई : कोकण रेल्वेचे KRCL व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे या पदावरूंन निवृत्त झाल्याने त्या जागी आता संतोष कुमार झा हे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
संतोष कुमार झा यांनी लखनौ विद्यापीठातून (भूविज्ञान) एम.एससी. आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून एमबीए (मार्केटिंग) केले आहे. ऑपरेशन्स, पायाभूत सुविधा नियोजन आणि व्यवसाय विकास क्षेत्रात २८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले झा यांनी भारतीय रेल्वेच्या प्रमुख विभागांचे संचालन केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात तसेच मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
   Follow us on        

Loading

शक्तीपीठ महामार्ग | विघ्ने वाढलीत; महामार्गाच्या विरोधात १ हजार ३११ हरकती दाखल

सांगली : विद्यमान सरकाराच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेवरची विघ्ने संपताना दिसत नाही. या महामार्गा विरोधात सांगली सोलापूर, कोल्हापूर या तीनच जिल्ह्यातून १ हजार ३११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठाला समांतर महामार्ग उपलब्ध असताना पिकाउ जमिनीतून महामार्गाचा प्रकल्प राबविण्यास एकसंघपणे विरोध करण्याचा निर्णय सांगली येथील कवलापूर येथे शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती. सध्या नागपूर रत्नागिरी हा महामार्ग नियोजित प्रकल्पाला समांतर असताना पुन्हा हा नव्याने महामार्ग प्रस्तावित करण्याचे काहीच कारण नाही. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकर्‍यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकर्‍यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील. हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकर्‍यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. असे यावेळी या बैठकीचे निमंत्रक दिगंबर कांबळे म्हणालेत

प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूरमधून २५० अशा १ हजार ३११ हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

 

 

 

Loading

खुशखबर! रंगपंचमी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अजून एक विशेष गाडी; एकूण ४ फेऱ्या

   Follow us on        
Konkan Railway News कोकणात होळीसाठी जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.  होळी सणासाठी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी विशेष प्रवासी भाड्यावर  चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीच्या जात येत एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. 09057/09058 उधना जं. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष :
गाडी क्र. 09057 उधना जं. – मंगळुरू जं.  ही गाडी उधना जंक्शन येथून रविवार दिनांक  31/03/2024 आणि बुधवार दिनांक  03/04/2024  रोजी रात्री 08 वाजता सुटून मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 09058 मंगलोर जं. – उधना जं. ही गाडी सोमवार दिनांक 01/04/2024आणि गुरुवार दिनांक 04/04/2024 रोजी रात्री  मंगलोर जं. वरून रात्री 10 वाजता ट्रेन सुटेल ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल.
थांबे: 
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन.
डब्यांची रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 कोच , SLR – 02.

Loading

Save Konkan | भूमिपुत्र जागा होतोय……

दापोली, दि. २९: कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्यामुळे परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  गावागावातील जमिनीची खरेदी परप्रांतीय तसेच बाहेरील मंडळींनी केलेली आहे.परप्रांतीय मंडळींनी कोकणातील जमिनीची किंमत आणि महत्व ओळखल्याने ते दलालांच्या माध्यमातून जमिनी खरेदी करत आहेत.आपल्या वडीलोपार्जित जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात असल्याची जाणीव आता कोकणी माणसाला झाली  आहे. गेल्याच महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांनी गैरव्यवहारातून केलेल्या जमीन खरेदीविरोधात आवाज उठवला होता. अशीच सुरवात आता  रत्नागिरी तालुक्यातील दापोलीतील छोट्याशा ओळगावातून झाली आहे.
ओळगावातील एक जमिनी बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकरी एकवटले आणि त्यांनी यापुढे गावातील जमिन परप्रांतीयांना तसेच गावाबाहेरील व्यक्तीला विकायची नाही असा कठोर निर्णय घेतला. त्या आशयाचे गावकऱ्यांनी फलकही गावात लावले आहेत.त्या फलकावर ठळक अक्षरात असे लिहिण्यात आले आहे की “ओळगाव मधील जमीन बाहेरील व्यक्तीला खरेदी करण्यास सक्त मनाई आहे”. हे फलक गावकऱ्यांनीच गावात लावले असल्याने कोकणाला जमिनीचे महत्व कळले असून गावकरी जागे झाल्याची चर्चा रंगली आहे.ओळगावातील ग्रामस्थ मंडळाने एकत्र येत हा कठोर निर्णय घेतला आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी बाहेरील मढळी विकत घेतात आणि जागेला कुंपण घालतात अशावेळी अन्य गावकऱ्यांचा रस्ता बंद होतो.अशाप्रकारच्या अनेक घटना घडून गावचे गावपण निघून जाऊन सामाजिक संतुलनही बिघडते.अनेकवेळा दलालांच्या अमिषाला बळी पडून गावकरी जमीन कवडीमोलाने विकतात आणि फसतात.अशा घटना घडू नयेत म्हणून गावकरी एकवटले आहेत.

Loading

Konkan Railway | रंगपंचमी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित मेमूच्या ४ विशेष फेऱ्या

Konkan Railway: कोकणातील होळी सण पाच ते नऊ दिवसांपर्यंत साजरा होतो. अनेक ठिकाणी उद्या शनिवारी रंगपंचमी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष अनारक्षित मेमू चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल ते चिपळूण /रत्नागिरी या दरम्यान जाता येता या गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत
१) गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष चिपळूण येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी १५:२५ वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी २०:५० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे येथे थांबेल.
२) गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष पनवेल येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी २१:०० वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी ०४:३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
गाडी सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे-वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
वरील अनारक्षित स्पेशलची रचना: एकूण ८ मेमू डबे.
वरील ट्रेनच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसची तिकिटे मिळता मिळेनात; डबे वाढविण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.

या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.

अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.

Loading

Loksabha Election 2024: शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शिंदेंकडून जाहीर

Loksabha Election 2024:लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. 22 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना 12 ते 13 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. अशातच पहिल्या यादीत शिंदे गटाने केवळ आठच उमेदवार जाहीर केले आहे.

जाहीर केलेले उमेदवार

मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे

कोल्हापूर – संजय मंडलिक

शिर्डी – सदाशिव लोखंडे

बुलढाणा – प्रतापराव जाधव

हिंगोली – हेमंत पाटील

रामटेक – राजू पारवे

हातकणंगले – धैर्यशील माने

मावळ – श्रीरंग आप्पा बारणे

हे आठ उमेदवार शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.

 

Loading

Railway PRS system | प्रवासी आरक्षण प्रणाली पाच तासांसाठी बंद

PRS Downtime : रेल्वेच्या संकेतस्थळावरून आज रेल्वे प्रवासासाठी तिकिट आरक्षित करण्याचा तुमचा बेत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (Railway PRS system) पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे आता आपल्या टिकिट सिस्टिम आणि ट्रेन क्रमांक अपग्रेड करण्यासाठी तांत्रिक बदल करणार आहे. त्यासाठी तिकिट आरक्षण यंत्रणा आज रात्री ठीक ११:४५ ते उद्या पहाटे ०४:४५ वाजेपर्यंत बंद असणार आहे. या मध्य रेल्वे, पाश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि पाश्चि मध्य रेल्वेचे प्रवासी तिकीट आरक्षण, टिकिट रद्द करणे, रेल्वेबाबतची चौकशी आदी सेवाही बंद असणार आहे.  मध्य रेल्वे प्रशासनाने या बाबतची माहिती ट्विटर X वर पोस्ट केली आहे.

 

 

Loading

ठाणे रेल्वे स्थानक फलाट रुंदीकरण: मांडवी एक्सप्रेसच्या फलाट क्रमांकामध्ये बदल

   Follow us on        

ठाणे, दि. २८: ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट रुंदीकरणाच्या कामामुळे येथून जाणार्‍या काही गाड्यांचे सध्या असलेले फलाट Platform बदलण्यात आले आहेत. फलाट क्रमांक पाचवर येणार्‍या गाड्या सात नंबर फलाटावर वळविण्यात आल्या आहेत.

या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस (10103)ठाणे स्थानकातून आज दिनांक 28 मार्च 2024 पासून 06 एप्रिल 2024 पर्यत फलाट क्रमांक(05) पाच ऐवजी सात (07)वरून सोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघ (रजि.) तर्फे देण्यात आली आहे. ठाण्यातील प्रवाशांनी या बदलाची दखल घेऊन आपला त्रास टाळावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

Loading

Sindhudurg | ‘डोंगराळ’ च्या सवलतींमुळे जिल्ह्यातील शाळा वाचतील

   Follow us on        
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात येतो. शाळांच्या सुधारित संचमान्यतेत हा उल्लेख चुकून राहिला होता. या संदर्भात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सुधारित संच मान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भागाची सवलत मिळेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले.
सध्या शाळांच्या सुधारित सुधारित संच मान्यतेमुळे सिंधुदुर्गातील शाळा अडचणीत येणार असल्याची भीती शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत. या संदर्भात केसरकर यांना विचारले असता, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग आहे. दुर्गम भागातील शाळांना वीसच काय, त्याखालील पटसंख्या भरणे मुश्कील आहे. मान्यतेत या जिल्ह्याला पूर्वी सवलत देण्यात आली होती. डोंगराळ भागाचा उल्लेख सुधारित संचमान्यतेत करण्यात आला नव्हता. ती सुधारणा आता करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांबाबतही अशी सुधारणा करण्यात येणार आहे. या शाळांनाही पटसंख्येचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांनाही पूर्वीची सवलत राहणार आहे. सध्याच्या शाळांचे मुख्याध्यापकपद सुधारित संचमान्यतेमुळे निष्कासित होणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search