Author Archives: Kokanai Digital

Konkan railway | मत्स्यगंधा एक्सप्रेस दोन दिवस अतिरिक्त कोचसहित धावणार

Revised News
Konkan Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून मत्स्यगंधा एक्स्प्रेसला या आठवड्यातील दोन दिवस अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, 
12620  Mangaluru Central – Lokmanya Tilak (T) Matsyagandha Express
या गाडीला दि. ०८ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबरच्या फेरीसाठी  थ्री टायर एसी कोच जोडण्यात येणार आहे. 
तर परतीच्या प्रवासात
12619 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central Matsyagandha Express 
या गाडीला दि. ०९ सप्टेंबर आणि  १६ सप्टेंबरच्या फेरीसाठी एक थ्री टायर एसी कोच जोडण्यात येणार आहे.
प्रवाशांनी याची नोंद घेऊन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून साहित्य वाटपासाठी २५० भजनी मंडळाची निवड…. यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेची काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढण्यात आली. या सोडतीत तालुक्यातील गावांचे गट पाडून प्रत्येक गटातून चार मंडळाची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले होते. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने विभागवार लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली गेली.या लकी ड्रॉ पद्धतीत निवडलेल्या २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.

 

 

 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारच्या रत्नागिरी आणि खेडसाठीच्या आरक्षण कोट्यात दुपटीने वाढ

कोंकण विकास समितीच्या मागणीला यश
अक्षय महापदी | मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने दि. २८ जून, २०२३ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरु केली. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबे दिले गेले. कोकण रेल्वेने २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव, थिवी आणि कणकवलीसाठी एसी चेअर कार साधारण ३५० व एक्सिक्युटीव्ह क्लास ३० अशा एकूण ३८० जागा तर रत्नागिरी आणि खेडसाठी एसी चेअर कार २२ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा केवळ २६ जागांचा आरक्षण कोटा निश्चित केला केला होता. यामुळे रत्नागिरी व खेड या दोन्ही स्थानकातून वंदे भारतला अपेक्षित उत्पन्न मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता.
ही तफावत लक्षात घेता कोंकण विकास समितीने पहिल्या दिवसापासून मुंबईकडे येणाऱ्या २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा वाढवण्याची मागणी लावून धरली होती. ऑगस्ट महिन्यात यासाठी पुन्हा पाठपुरावा केला होता.
याचीच दखल घेऊन कोकण रेल्वेने १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीपासून आरक्षण कोटा वाढवलेला आहे. त्यानुसार, दि. ३ जानेवारी, २०२४ पासून २२२३० मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे. त्यामुळे जानेवारीपासून रत्नागिरी व खेडसाठी एसी चेअर कार ४४ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा एकूण ४८ जागांचा आरक्षण कोटा उपलब्ध असेल. रत्नागिरी व खेडमधील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा कोंकण असे आवाहन  विकास समितीने केले आहे. 
अक्षय मधुकर महापदी
सदस्य, कोंकण विकास समिती
  

Loading

नागपूर ते मुंबई प्रवास अवघ्या साडेतीन तासांत शक्य

मुंबई: मुंबई आणि नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झालाय अशी सूत्रांची माहिती आहे.

प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असणार आहे. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 766 किमी लांबीचा हा मार्ग असून प्रत्येक किलोमीटरचा खर्च 232 कोटी रूपये असेल. 

एकूण 13 स्टेशनं या मार्गावर असतील. नागपूर, वर्धा, खापरी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, करंजा लाड, मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर अशी स्टेशनं असणार आहेत.

 

Loading

Ratnagiri: बस वाहतूकदारांकडून चाकरमान्यांची होणारी लूट थांबणार; मुंबई-पुण्यासाठी खाजगी बस वाहतुकीचे दरपत्रक जाहीर

रत्नागिरी: हंगामात खाजगी बस वाहतूकदारनकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. मुंबई-पुण्यासाठीच्या खाजगी बसेसचे दरपत्रक ठरवून देण्यात आले असुन बस वाहतूकदारांना या दरांच्या  ५०% जास्त भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. या दरांपेक्षा जर कोणी बस व्यावसायिक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने मुंबई,ठाणे आणि पुण्यासाठीच्या बसेसच्या भाड्याचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहे. या दरापेक्षा अधिक दर एखादा वाहतूकदार आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर  नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. तक्रार नोंदविताना वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/rto.pdf”]

Loading

सावंतवाडी: मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांसाठी मोफत ‘चहापान’

सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान असलेल्या  झाराप  येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातून येणार्‍या गणेशभक्त व वाहन चालकांकरता मोफत चहा, पाणी व बिस्कीट स्टॉलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज दिली. 

गणेशभक्तांसाठी हा स्टॉल गणपतीपर्यंत चालू राहणार आहे. आज या स्टॉलची पाहणी करून, उपस्थितांकडून स्टॉलच्या व्यवस्थेची माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री रविन्द्र चव्हाण हे आज मुंबई गोवा पाहणी दौर्‍यावर होते. मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. यामुळेच लवकरच ही सिंगल लेन कोकणवासीयांच्या सेवेत खुली होईल. यामुळेच जो प्रवास करायला पूर्वी १२ तास लागत होते, ते अंतर आता जवळपास ८ तासातच गाठता येईल. असं असलं तरीही कोकणवासीयांनी या रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. ओव्हरटेकिंग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असलेले इतर प्रकार करू नयेत असे त्यांनी कोकणवासीयांना आवाहन केले आहे. 

 

 

 

Loading

कुडाळ: उद्याच्या दहीहंडी उत्सवास सिनेकलाकारांची हजेरी

कुडाळ :भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच “मेरी माती मेरा देश” या संकल्पनेअंतर्गत  यंदा कुडाळ येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या उत्सवास सिनेअभिनेत्री  प्राजक्ता माळी, मानसी नाईक, अभिनेता भाऊ कदम, देवदत्त नागे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बॉलीवूड गायक सचिन गुप्ता यांचा लाईव्ह शो या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. आतापर्यंत २६ पथकांनी नोंदणी केली असून त्यात  मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथील पथकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळाला ५,५५,५५५ या रकमेचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे कुडाळ भाजपचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले आहे. 
ज्या मंडळांना या उत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी नाव नोंदणी साठी रुपेश कानडे यांच्याशी 7020363896 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

Loading

Megablock on Konkan Railway: उद्याची जनशताब्दी एक्सप्रेस उशिराने धावणार

Konkan Railway News :  कोकण रेल्वे मार्गावर उद्या गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ७:३० ते १०:३० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 01139 Nagpur – Madgaon Jn. Special 
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान १०० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान सुमारे ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३)Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान सुमारे ४० मिनिटे  उशिराने धावणार आहे.

Loading

Mumbai Goa Highway | गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतुक पोलिसांची विशेष बैठक

नवी मुंबई : गणेशोत्सव काळात कोंकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून चाकरमाने कोकणात मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात या बैठकीत आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे 

तसेच राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

Loading

रत्नागिरी : प्रशासनाकडून रिक्षा प्रवास वाहतुकीचे दरपत्रक जाहीर; ‘या’ दरांपेक्षा अधिक दर आकारला गेल्यास…..

रत्नागिरी: हंगामात खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षांचे दरपत्रक ठरवून दिले असून ते प्रसिद्ध केले आहे. या दरांपेक्षा जर कोणी रिक्षाचालक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने रिक्षाचे मिटरने आणि शेअर-ए-रिक्षा तत्त्वावर चालविण्यात येणार्‍या रिक्षांचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहेत. या दरापेक्षा अधिक दर एखादा रिक्षाचालक आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search