नाशिक : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. या बसने पेट घेतल्यामुळे एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडलीये. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहेय
मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या 12 जणांमध्ये एका चिमुरड्याचाही समावेश आहे.
अग्निशमक दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि बस जळून खाक झाली. बसमध्ये आणखी काही प्रवाशी असण्याची भीती आहे.
मुंबई :राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. हाच परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
8/10, 1 am night: Mod to intense spells will continue at most places over Mumbai Thane NM, Palghar & parts of N Raigad for next 3,4 hrs as seen from latest radar observation. It been raining since morning and many places, it has already crossed over 100 mm rainfall till now. TC pic.twitter.com/OzJoj7F7Xb
Indian Railways : भारतीय रेल्वेने देशभरातील 130 मेल-एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट ( superfast train) दर्जा देऊन सर्व श्रेणीच्या भाड्यात वाढ केली आहे. कोंकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणारी कोंकणकन्या एक्सप्रेस चा समावेश सुपरफास्ट एक्सप्रेस च्या दर्जात केल्याने त्याचेही प्रवासी भाडे वाढणार आहे. नवीन भाडेवाडीनुसार एसी-1 आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या गाड्यांच्या प्रवाशी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
किती भाडेवाढ झाली ?
एसी-1 साठी 75 रुपये,
एसी-2, 3 चेअर कारमध्ये 45 रुपये
स्लीपर क्लासमध्ये 30 रुपये भाडे
आता पीएनआर (सहा प्रवाशांसाठी) रेल्वे तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना एसी-1 मध्ये 450 रुपये, एसी-2 मध्ये 270 रुपये, 3 आणि स्लीपर कोचमध्ये (sleeper coach) 180 रुपये अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.
रेल्वे नियमांनुसार तशी ५६ किलोमीटर पेक्षा जास्त वेग असलेल्या गाडयांना सुपरफास्ट एक्सप्रेस चा दर्जा दिला जातो.
मुंबई :भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपमुळे आतापर्यंत गांबिया नावाच्या देशात 66 कोवळ्या जिवांच्या मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या या कफ सिरप बद्दल पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय.
या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सिरपचं वितरण गांबियासोबत इतरही अनेक देशात झालेलं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण चार सिरप बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.
कोणती आहेत ही सिरप
प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.
संशयास्पद चार सिरपमुळे पोटदुखी, उलट्या होणं, लघवीला न होणं, डोकेदुखी, कीडनीचे विकार बळावणं, अशी लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे या सर्व उत्पादनांची तातडीने सखोल चौकशी आणि तपास केला जाईल. तोपर्यंत हे सर्व कफ सिरप असुरक्षित मानले जातील, असं WHO ने म्हटलं आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
महाराष्ट्र : गोव्यातून विनापरवाना दारु आणली तर त्यावर गंभीर कारवाई होणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितलं आहे. एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल, असं देसाई म्हणाले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी, असंही देसाई यावेळी म्हणाले.
शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यामध्ये खूप स्वस्तात दारु मिळते. दरामध्ये असलेल्या फरकामुळं मोठ्या प्रमाणात गोव्यातून इतर राज्यात तस्करी होत असते.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Vande Mataram News : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून राज्यभरात ‘हॅलो नव्हे – वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ केला जाईल . यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्” नी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आला असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार असे म्हणाले.
आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. हा शब्द म्हणजे फक्त पाश्चात्यांचे अनुकरण आहे. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साहाय्याने हे अभियान यशस्वी करू असा निर्धार केला आहे असे ते पुढे म्हणाले.
ठाणे :मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कळवा ह्या दोन स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. दोन्ही जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल्स खूप धीम्या गतीने चालविण्यात येत आहेत. सर्व गाड्या सुमारे एक ते दीड तास उशिराने चालत आहेत. लोकल्स च्या एका मागोमाग रांगा लागल्या आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
आज सध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळात वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेकडून वाहतुक सूरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर वाहतुक पूर्वपदावर आणली जाईल अशी संबधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरमहा ३ लाख रुपये पर्यंत कमावण्यासाठी मराठी तरुण-तरुणींना पुढे येण्याचे आवाहन..
मुंबई : ‘व्हिजन ॲब्रॉड’च्या माध्यमातून मर्यादित वयोगटातील मराठी युवक-युवतींना कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशात परमनंट रेसि. व्हिसा व कोणत्याही फिल्डमध्ये दरमहा २ ते ३ लाख रुपये पर्यंत जॉब उपलब्ध आहेत. यासंबंधीची सर्व माहिती विनामूल्य देण्यासाठी मराठी माणसांनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक मार्गदर्शन व मदत करण्यात येत आहे.
भारतातील मराठी युवक-युवतींना व्हिजन ॲब्रॉड ने प्रगतीचे व्यासपीठ परदेशात निर्माण करून दिले आहे. यामध्ये भारतीय मुले परदेशी जाऊन नोकरी व्यवसाय करू शकतात. भारतात दहावी-बारावी तसेच ग्रॅज्युएट झालेली मुले-मुली मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र ती महिन्याला फक्त १५-२० ते २५ हजार रुपये पर्यंत कमाई करू शकतात. परंतु तीच मुले परदेशात गेली तर पार्टटाईम १ लाख तर फुल टाईम २ ते ३ लाख रुपये पर्यंत महिन्याला कमवू शकतात. तसेच इथली मुले परदेशात शिक्षण सुद्धा घेऊ शकतात. त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी बँकांजवळ कर्जाची सुविधा उपलब्ध आहे आणि शिक्षण घेत असताना मासिक ७० हजार रुपये पर्यंतचा जॉब करू शकतात. त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे व्हिजन ॲब्रॉड ने म्हटले आहे.
सन २०१० पासून सर्व आवश्यक प्रोसिजरसाठी मार्गदर्शन व मदत करण्याचे कार्य सुरु केले आहे. यामध्ये पासपोर्ट, इव्हॅल्युऐशन, परमनंट व्हिसा, IELTS युनिव्हर्सिटी, पोलीस, मेडिकल, प्रुफ ऑफ फंड, परदेशात विमानतळावर उतरवून घेण्याची व राहण्याची व्यवस्था आदी बऱ्याच सुविधांचा समावेश आहे. असे व्हिजन ॲब्रॉड कडून सांगण्यात आले आहे. याबाबतची सर्व माहिती प्रत्यक्ष भेटूनच घ्यावी, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
परदेशात जाऊन जॉब करून किंवा व्यवसाय करून श्रीमंत झालेले भारतीय खूप आहेत. पण त्यामध्ये मराठी माणसांची संख्या फारच कमी आहे. मात्र पंजाबी (सर्वात जास्त) गुजराती-मारवाडी, तामिळ-केरळीयन यांची संख्या मोठी आहे, त्यांना ते जमते तर मराठी माणसांना का जमू नये? त्यांनीही जावे भरपूर पैसे मिळवावेत चांगल्या लाईफ स्टाईल मध्ये राहावे, असे आम्हाला मनापासून वाटते. हि एक चांगली संधी आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, माहीतच नाही असे होऊ नये म्हणून आमचा हा प्रयत्न आहे, याचा सर्वांनी प्रसार व प्रचार करुन स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती देखील व्हिजन ॲब्रॉड कडून करण्यात आली आहे.
व्हिजन ॲब्रॉडशी संपर्क साधण्यासाठी खालील फॉर्मवर आपली माहिती भरावी
एलपीजी सिलिंडर बातमी :आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार आता घरगुती स्वयंपाक सिलिंडर ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करताना आता कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन (Non Subsidy Connection) असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलिंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार याला आता बंधन आले आहे. त्यामुळे वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत.
अनुदानित सिलिंडरही ठराविक मिळणार आहे. तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज लागल्यास विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागतील.
नवी दिल्ली :मुंबई छत्रपती टर्मिनस स्टेशन आता नव्या स्वरूपात दिसणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्या स्टेशनच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. स्टेशन आणि आजूबाजूचा परिसरात आता पर्यटनाच्या दृष्टीने बांधकाम केले जाईल आणि पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण बनवण्यात येणार आहे.
एकूण १०,००० करोड मूल्याचे ३ प्रमुख स्टेशनचे पुनर्निर्माण आणि सुशोभीकरणाचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्री मंडळाने स्वीकृत केलेला आहे. त्यामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीतील ३ प्रमुख स्टेशनची नावे आहेत. तसेच हि ३ स्टेशन आणि देशातील इतर १९० रेल्वे स्टेशनच्या पुर्नबांधणीला एकूण ६० हजार करोड रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
Video Player
Media error: Format(s) not supported or source(s) not found