Author Archives: Kokanai Digital

एसटीची ‘रत्नागिरी दर्शन’ ही फेरी चालणार दर शनिवारी व रविवारी ! ‘ही’ पर्यटन स्थळे पाहता येतील

रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी  चालू केलेली  ‘रत्नागिरी दर्शन’ ही विशेष सेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे  दर शनिवारी व रविवारी चालू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
वर्षाअखेरीस सोडलेल्या ह्या पर्यटक बससेवेस पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी होत होती.
या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
1.आडिवरे
2. कशेळी कनकादित्य मंदिर,
3. गणेशगुळे,
4. पावस,
5. कोळंबे कातळशिल्प
6. थिबा राजवाडा,
7. भगवती किल्ला,
8. लोकमान्य टिळक जन्मस्थान,
9. गणपतीपुळे
10. आरेवारे समुद्रकिनारा
टीप:  प्रवास येथे अल्पोहार म्हणून खिचडी प्रसाद देण्यात येईल.
तिकीट दर
ह्या फेरीचा दर अगदी माफक ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण प्रवासासाठी पौढांसाठी तिकीटदर ३०० रुपये तर लहान मुलांसाठी १५० दर आकारण्यात येणार आहे.
संपर्क
अधिक माहितीसाठी रत्नागिरी स्थानक आगारास  भेट द्यावी किंवा आगारव्यवस्थापक 7588193774 / स्थानकप्रमुख 9850898327 ह्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा

Loading

एसी लोकलने प्रवास करता यावा ह्यासाठी वापरला जात आहे चक्क बनावट पास

Mumbai Local News:एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी प्रवासी चक्क बनावट Fake पास वापरत असल्याचे प्रकार उघडकीस यायला लागले आहेत. चर्चगेट ते विरार ह्या मार्गावर  दोन दिवसांपूर्वी तिकीट तपासणीसांच्या एका गस्त पथकाने अशाच एका बनावट पास धारकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीवर फसवणूकी संबधित कलमे लावून अटक केली आहे.
चौकशीत त्याने तो पास विरारला एका मोबाईल रीचार्ज शॉप मधून 600 रुपयांना विकत घेतला होता असे कबूल केले आहे. विरार ते चर्चगेट एसी  प्रवासभाडे वर वर पाहता हा पास खरा वाटत असला तरी काही बारकाईने निरीक्षण केल्यास फरक लक्षात येतो. तिकीट तपासणीसाने जेव्हा ह्या बनावट पासधारकास पास दाखविण्यास सांगितले तेव्हा एका प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेला तो पास दाखवला. थोडीसी शंका आल्याने तपासणीसाने तो प्लास्टिक कव्हर मधून बाहेर काढला आणि साधारण एका मिनिटच्या बारीक निरीक्षणाने तो पास बनावट असल्याचे त्याचा लक्षात आले.
विरार ते चर्चगेट एसी लोकल चे प्रवासभाडे महिना 2005 एवढे आहे तर हा बनावट पास 600 रुपयामंध्ये बनवून भेटत आहे.

Loading

एसटीच्या ‘अच्छे दिन’ साठी ‘हि’ त्रिसूत्री आवश्यक

MSRTC NEWS: राज्यातील एसटी महामंडळ नफ्यात आणण्यासाठी राज्य सरकारने त्रिसूत्री कार्यक्रम राबविल्यास आशिया खंडातील सर्वात मोठे महामंडळ नफ्यात येण्यास वेळ लागणार नाही, असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी  कामगारांच्या संवाद बैठक मेळाव्यात व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, राज्यातील इतर महामंडळापेक्षा एसटी महामंडळ हे राज्य सरकारला उत्पन्न मिळवून देत राज्याच्या विकासात आर्थिक हातभार लावत असते राज्य सरकारने एसटी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी त्रिसूत्री राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे हि त्रिसूत्री?
1) एसटी टोलमुक्त करावी.
राज्यात आता महामार्गाचे जाळे विणले जात आहे हि एक सकारात्मक गोष्ट आहे. पण ह्या महार्गावरील आकारण्यात येणारी टोल रक्कम जास्त असल्याने काहीवेळा ती एसटीला परवडण्यासारखी नाही आहे. काही फेऱ्या जनहितासाठी कमी प्रवासीसंख्या असतानासुद्धा चालू ठेवाव्या लागतात ह्याचा विचार करून एसटीला पूर्ण राज्यात टोल मुक्ती देण्यात यावी.
2)डिझेलवरील अबकारी कर राज्य सरकारने माफ करावा. 
पेट्रोल आणि  डिझेल वरील केंद्र सरकार द्वारे लावण्यात येणाऱ्या कर कमी होण्याची शक्यता नाही कारण तो पूर्ण देशात सर्व राज्यांना निश्चित स्वरूपाचा असतो. पण राज्यस्तरावर  लावण्यात येणाऱ्या अकबारी करात सवलत किंवा तो एसटीसाठी माफ केल्यास वाहतूक खर्चात बचत होऊन एसटी महामंडळ फायद्यात राहील. एसटी महामंडळ हे राज्याचा अंगीकृत व्यवसाय असल्याने एसटी महामंडळाला राज्यसरकारकडून हि अपेक्षा आहे.
3)प्रवासी कर कमी करावा.
संदीप शिंदे यांनी महामंडळ चालवण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळ भरत असलेल्या  प्रवासी कर कमी करावा अशी मागणी केली आहे. देशातील इतर राज्याची तुलना करता महाराष्ट्रात हा कर जास्त आहे.
राज्यसरकारने जाहीर केलेल्या विविध वर्गासाठी विविध सवलती म्हणजे वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, अपंगासाठी तसेच विध्यार्थ्यांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दराने प्रवास इत्यादी एसटी कडून राबवण्यात येत असतात. काही वेळा प्रवासीसंख्या कमी असूनही जनहितासाठी काही खेडोपाडी बसफेऱ्या चकवाव्या लागतात. हे सर्व विचारात घेऊन राज्यसरकारने एसटीच्या बचावासाठी हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Loading

रत्नागिरी विमानतळाच्या कामास गती मिळणार! पालकमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार

रत्नागिरी:  रत्नागिरीकरांसाठी  एक चांगली बातमी आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.  जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ह्यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी विमानतळासाठी प्रस्तावित २८ हेक्टर जमिनीपैकी २० हेक्टर भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन जानेवारीअखेरीस  होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक ७७.७० कोटींचा निधीही शासनाकडून मिळाला आहे. भूसंपादन झाल्यानंतर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार आहे. जमिनिचा ताबा मिळाल्यानंतर लगेचच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून काम सुरू करण्यात येणार आहे.
 विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनामध्ये तुवंडेवाडी येथील २० हेक्टर आणि मिरजोळे येथील ८.६ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यापैकी तुवंडेवाडी येथील जागेचे निवाडे प्रांताधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत तर मिरजोळेतील संबंधित जमीनमालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात त्यापैकी चार खातेदारांना भूसंपादनाचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. भूसंपादनाला लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता लवकरच संबंधित जमीनमालकांना उर्वरित जमिनीसंदर्भातील निधी वितरित करण्याचे काम निवाडे घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.

Loading

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात भीषण अपघात..

रत्नागिरी :खेड तालुक्याचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.पोलादपूरजवळ कशेडी घाटात चोळई येथे काल (शुक्रवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.

आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.

यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.

हा अपघात म्हणजे एक घातपात असल्याचा संशय आता आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

(हेही वाचा>मोपा विमानतळावरून पहिले विमान उडाले…मुंबई ते गोवा प्रवासभाडे रेल्वेच्या एसी फर्स्टक्लास (1A) पेक्षाही कमी)

Loading

मोपा विमानतळावरून पहिले विमान उडाले…मुंबई ते गोवा प्रवासभाडे रेल्वेच्या एसी फर्स्टक्लास (1A) पेक्षाही कमी

MOPA Airport news :उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून सुरु झाले आहे. गुरुवारी हैद्राबाद-गोवा ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली. हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेले इंडिगो कंपनीचे 6E6145 हे विमान मोपा येथील मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचले. या विमानाने हैद्राबाद ते गोवा अंतर 1 तासांत पूर्ण केले. विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत मोपा विमानतळावर स्वागत करण्यात आले

उत्तर गोव्यातील मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून विमान कंपनी इंडिगोने देशातील 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. त्याबरोबरच गो फर्स्ट आणि अकसा एअर ह्या कंपन्यांनी ह्या विमानतळावरून सेवा चालू करण्याचे जाहीर केले आहे. .

(Also Read>मोपा विमानतळ ! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे ‘द्वार’)

इंडिगोने मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. गुरूवारपासून ही उड्डाणे सुरू झाली.

मुंबई ते गोवा अकसा एअर विमानाचे इकॉनॉमी क्लासचे प्रवासभाडे २३९३ रुपयांपासून सुरू होत आहे. विमान कंपन्या, प्रवासाची तारखेनुसार हे भाडे कमी जास्त आहे. हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जवळ असल्याने जलद आणि आणीबाणीच्या Emergency वेळेस तळकोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय ह्या विमानतळाच्या रूपाने निर्माण झाला आहे.

सध्या मुंबई ते गोवा आणि परतीसाठी इंडिगो आणि गो फर्स्ट कंपनीचे प्रत्येकी एक उड्डाण ह्या विमानतळावरून होत आहे.  पुढच्या आठवड्यात अकसा एअर कंपनीपण ह्या मार्गावर येथून आपली सेवा चालू करणार आहे.

(Also Read>तरच आपली लालपरी वाचेल…. )

Loading

सिंधुदुर्गात भव्य दिव्य अशा १७ फूट उंचीच्या मारुती मूर्तीची स्थापना.. पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल अशी आशा..

सिंधुदुर्ग:आचरा येथील श्री निलेश नंदकुमार सरजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आचरा देवराई परिसरात बुधवार दि. ४ जानेवारी रोजी श्री मारुती च्या भव्य दिव्य मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती पर्यटकांचे आकर्षण ठरेल अशी येथील ग्रामस्थांची आशा आहे.

या स्थापना सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी श्री विनीत मिराशी, श्री कपिल गुरव, श्री मुकुंद घाडी , श्री दशरथ घाडी , श्री रमेश पुजारे , श्री गावकर , श्री अरविंद सावंत , श्री आशिष सावंत यांसह श्री जगदीश तावडे, श्री पवन पराडकर आदी उपस्थित होते. सर्व मानकरी यांचा पद्धतीप्रमाणे श्रीफळ दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला.

सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विलास मांजरेकर व श्री ओमकार मांजरेकर या पिता पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. त्यांचा श्री निलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. . सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे श्री मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.. उपस्थित सर्वांना तीर्थ, प्रसाद वाटप करण्यात आला. . देवराई परिसरात येत्या काही काळातच श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. . देवराईतील औषधी वनस्पती , देव वृक्ष ,नवग्रह मंदिर आणि साथीला आजची श्रीं ची भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षण ठरेल असे उद्गार यावेळी प्रत्येकाच्या मुखातून निघत होते.

 

Loading

मुंबई-गोवामहामार्गाच्या अपुऱ्या कामावरून NHAI ला उच्च न्यायालयाचे खडे बोल

Mumbai Goa Highway News :मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे काम पूर्ण झाल्याचा खोटा दावा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकार्‍यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. मागील 14 वर्षांपासून रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.

महामार्गाचे अपुरे काम आणि त्यामुळे लोकांना ये-जा करताना त्रास होऊ नये म्हणून ह्या मार्गावरील निदान खड्डे भरून काढावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोकणसुपुत्र अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

(Also Read>मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी ‘स्वाक्षरी’ मोहीम… मुंबई आणि आजूबाजूच्या ‘ह्या’ शहरांत होणार आयोजन..)

न्यायालयात सादर केलेल्या NHAI च्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे पूर्ण काम झाले आहे असे लिहिले आहे. पण जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमा केलेल्या फोटों आणि व्हीडिओंमध्ये ह्या पट्ट्यातील खड्डे स्पष्ट दिसत होते. हा पुरावा अॅड ओवेस पेचकर यांनी न्यायालयात सादर करून NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा खोटेपणा सिद्ध केला. न्यायालयाने ह्या सर्व प्रकाराबाबत फटकारले असता आपण दिनांक 25 जानेवारी 2023 पर्यंत ह्या मार्गावरील खड्डे बुजवून देवू आणि 2023 अखेपर्यंत हे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण करू असे NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी ह्यावेळी सांगितले आहे.

न्यायालयाने पुढील सुनावणी ३१ जानेवारी रोजी असेल असे जाहीर केले. तत्पूर्वी सविस्तर प्रतिज्ञा पत्र सादर करा असे आदेश NHAI दिले आहेत.

Loading

कोकण रेल्वेमार्गावर शुक्रवारी धावणार एकेरीमार्गी विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway News 04/01/2023 : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने दक्षिण रेल्वेच्या साहाय्याने कोंकण रेल्वेमार्गावर अहमदाबाद ते मंगुळुरु दरम्यान एक एकेरीमार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  Train No. 06072 Ahmedabad Jn – Mangaluru Jn. Special  हि विशेष गाडी अहमदाबाद जंक्शन येथून शुक्रवारी दिनांक ०६ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ०४:०० वाजता सुटेल ती मंगुळुरु जंक्शन येथे दुसऱ्यादिवशी संध्याकाळी १८:३० वाजता पोहोचेल.
.
ह्या गाडीचे थांबे 
वडोदरा,सुरत,वापी,वसई रोड, पनवेल, रोहा (RN), खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल
डब्यांची रचना
एकूण २२ डबे = ३ टायर एसी – ०५ + स्लीपर – १२ + सेकंड सीटिंग – ३ + एसलआर – ०२
या गाडीच्या अधिक माहितीसाठी www.enquiry indianrail.gov.in ह्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन कोकणरेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.

Loading

मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी ‘स्वाक्षरी’ मोहीम… मुंबई आणि आजूबाजूच्या ‘ह्या’ शहरांत होणार आयोजन..

मुंबई :मागील 14 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश ध्येयपूर्ती समिती स्वाक्षरी मोहीम राबवत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या समस्त कोकणी बांधवाना ह्या स्वाक्षरी मोहिमेत सामील होण्याचे आवाहन जनआक्रोश समितीने केले आहे.

ह्या मोहिमेची ठिकाणे आणि वार पुढीलप्रमाणे राहतील. 

शुक्रवार  दि ०६/०१/२०२३ 
   ठिकाण – भांडुप स्टेशन (पश्चिम)
   वेळ – सायंकाळी ५ ते ९
   संपर्क – प्रसाद भोगले ९९६७८१४९१०
शनिवार दि ०७/०१/२०२३
१) ठिकाण-सांताक्रूझ पुर्व रेल्वे स्टेशन जवळ
     संपर्क –  1)प्रशांत परब  ८९७६५६७७२२
                   2)संजय सावंत ९८९२७०३६७६
२) ठिकाण – परेल, KEM  हॉस्पिटल समोर
     वेळ – सकाळी ८.३० वाजता
     संपर्क – सुदाम गवळी – ७९७७०९३८१५
रविवार दि.  ८/१/२०२३
1) ठिकाण – बोरीवली रेल्वे स्टेशन (पूर्व)
     वेळ – सकाळी ९ ते १२
     संपर्क – राजेश मुलुख ८४५१०९७१३६
2) ठिकाण – नालासोपारा,डम्पिंग ग्राऊंड
     वेळ – सकाळी ८ ते ११
     संपर्क -नितीन खानविलकर ८१०८४०७४७२
3) ठिकाण – विरार स्टेशन (पूर्व)
     वेळ – सकाळी ८ ते ११
     संपर्क– दिनेश दुर्गवले – ९८६७३८४१४०
4) ठिकाण –चारकोप गोराई,चारकोप मार्केट सूरगंगा बिल्डिंग नोबल केमिस्ट्र जवळ कांदिवली पश्चिम मुंबई 67
     वेळ –  ते सकाळी १० ते १

     संपर्क – शामसुंदर मालवणकर  – ९१३७४५३२७५

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search