Author Archives: Kokanai Digital

कोंकण रेल्वे मार्गावर रविवारी धावणार एकमार्गी विशेष गाडी

Konkan Railway News: दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कोंकण रेल्वे मार्गावर कासरगोड ते निजामुद्दीन दरम्यान एक एकमार्गी स्पेशल One Way गाडी चालविण्यात येणार आहे. .

 कसारगोड  निजामुद्दीन स्पेशल (06007) ही वनवे  गाडी दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 17:05 वाजता सुटेल आणि दिल्लीला हजरत निजामुद्दीन स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी 18:00 वाजता पोहोचेल.

या गाडीचे मडगाव स्थानकापासून थांबे
मडगाव करमाळी थिवी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर,सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा,पनवेल, कल्याण नाशिक मार्गे इटारसी, मथुरा

डब्यांची संरचना

एसएलआर – 02  + सेकंड सीटिंग – 10 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 01 असे मिळून एकूण 23 डबे







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

केरळमध्ये रेल्वेचा ब्लॉक; कोकण रेल्वेच्या ‘या’ गाड्यांवर परिणाम

संग्रहित फोटो

Konkan Railway News | दक्षिणेकडील केरळ राज्यातील करुकुट्टी – चालाकुडी या रेल्वेस्थानकां दरम्यान  दिनांक २७ एप्रिल रोजी  एक दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक चा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार आहे.

कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

12202 – कोचुवेली – एलटीटी एक्सप्रेस ही गाडी दिनांक २७/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.
12201 – एलटीटी – कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी दिनांक २८/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.

तर गाडी क्रमांक 20923 तिरुनवेल्ली गांधीधाम एक्सप्रेस दिनांक २७/०४/२०२४ रोजी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून तिच्या दक्षिणेकडील राज्यातील स्थानकांच्या थांब्यामध्ये बदल करण्यात आला आहे, कोकणातील स्थानकांच्या थांब्यामध्ये काही बदल केला गेला नाही आहे.

प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाच्या योजनेत बदल करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी पुलावर सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात

रत्नागिरी – मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पुलावर काल गुरुवारी  सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी  निर्माण झालेली होती. हा अपघात गुरुवार सकाळी 10:50 च्या दरम्यान घडला आहे.पुलावर अपघात घडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाड्या बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरू झालेली आहे. 
सोनवी पूल हा अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी कों होते. काही दिवसापूर्वी
या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्री च्या दिशेने जाणारे क्रेटा गाडी आणि रत्नागिरी हुन डेरवणला च्या दिशेने जाणारी गाडी या गाड्यांमध्ये अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू आणि खनिज वाहतूकीवर वेळेची मर्यादा.

सिंधुदुर्ग – जिल्‍ह्यातील व जिल्‍ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून चालकांनी आज २१ एप्रिलपासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करावी, असे निर्देश देतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी काल के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

जिल्‍हयातील वाळू/रेती व अन्‍य गौण खनिजाच्‍या वाहतुकीवेळी झालेल्‍या अपघातांमुळे काही ना‍गरिकांना आपला जीव गमवावा लागला. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या अध्‍यक्षतेखाली गौण खनिजाच्‍या अवैध उत्‍खनन व वाहतुकीवर आळा घालण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत या वाहतुकीवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सदस्‍य सचिव जिल्‍हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीसह उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी व कणकवली हे अधिकारी उपस्थित होते.

बेजबाबदारपणे, अतिजलदगतीने, मद्यप्राशन करुन, अनियंत्रितपणे वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर व वाहन चालकांवर सक्‍त कारवाई करण्‍याच्‍या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.

अखेर कंत्राटदाराच्या मागणीची सरकारकडून दखल; परशुराम घाट ‘या’ कालावधी दरम्यान वाहतुकीस बंद

 

रत्नागिरी | दि.२० एप्रिल २०२३ |मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम विना अडथळा आणि जलद गतीने करता यावे यासाठी कंत्राटदार कंपनीने हा घाट वाहतुकीस बंद ठेवण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीची सरकारकडून दखल घेतली गेली आहे.

या घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान दुपारी 12 ते 5 पर्यंत वाहतुकीस राहणार बंद राहणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परशुराम घाट बंद असला तरी या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे.तसेच डोंगर कटाई करताना मोठे दगड रस्त्यावर येऊन अपधात होऊ नये या साठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.


महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाट अत्यंत अवघड टप्पा आहे. वाहतुक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी होत्या त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला होता. अखेर जिल्हाधिकारी यांनी घाट सादर कालावधीत घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

कोविडचे कारण पुढे करून ‘मराठी’ भाषेचा बळी – मनसेचा शासन निर्णयावर आक्षेप.

मुंबई – राज्य शासनाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी ह्या विषयाचे मूल्यांकन एकत्रित मूल्यांकनामध्ये धरू नये आणि त्यांना केवळ श्रेणी द्यावी असा निर्णय काल महाराष्ट्र शासनानं जाहीर केला. हा निर्णय चूकीचा आहे आणि शासनानं तो मागे घ्यावा. 

वास्तविक शासनानं १ जून २०२० म्हणजे सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्यातील सर्व म्हणजे सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे केले होते. हे एक चांगले पाऊल होते. शासनानं तोच स्वत:चा निर्णय आता फिरवला आहे. 

हा निर्णय फिरवताना शासन म्हणतंय की हा निर्णय कोविडच्या महामारीच्या काळात आला असल्याने शाळा नियमीत चालू नव्हत्या. म्हणून मराठी भाषा शिकण्यासाठी अडचणी आल्या. पण प्रश्न असा पडतो की, शाळा सुरू नव्हत्या तर मराठीच कशाला इतरही शिक्षण अडचणीचं झालं होतं. मग मराठीचाच का वेगळा विचार? 

हे खरं आहे की मराठी विषय काही शाळांमध्ये नवीन होता परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या शाळांना तीन वर्ष होती. मग ह्या तीन वर्षात त्या शाळांना मराठी शिकवण्याची व्यवस्था का उभी करता आली नाही? तीन वर्ष काही कमी नाहीत, मग तरीही मराठी शिकवण्याबाबत ह्या शाळांचा निरूत्साह का? असेल तर ह्या निरूत्साहावर शासन काय करत आहे?

शासन निर्णयात असं म्हटलं आहे की “मराठी विषयाच्या अध्ययनामध्ये आणि पर्यायाने संपादणूकीमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत असे दिसून येते”. शासन हे कशाच्या आधारावर म्हणत आहे? त्याचा काही अहवाल आहे का? 

आज एप्रिल महिना आहे. शाळा सुरू व्हायला अजून अडीच महिने आहेत. मराठी शिकवण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न करायला आणि व्यवस्था सिध्द करायला पुरेसा वेळ आहे. शासनानं हा निर्णय मागे घ्यावा आणि शाळांना पुढील अडीच महिन्यात तयारी करायला सांगावी. 

राज्यात इतर परीक्षा मंडळाच्या शाळांत मराठीविषयी एक प्रकारची अनास्था आहे. म्हणून त्यांच्याकडून शासनावर दबाव येत असणार. कदाचित पालकांचीही मराठी बाबत अनास्था असणार. परंतु ह्यावर मात करून महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी शिकवली जावीच ह्यासाठी शासन ठाम असावं. महाराष्ट्रात रहातात त्यांनी मराठी शिकावं, स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर राखावा ह्या आग्रहात काहीच गैर नाही. 

मराठी भाषेचा सन्मान राखणे, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे आणि मराठीचा प्रसार करणे ह्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबध्द असलं पाहिजे. किंबहुना जेंव्हा भाषावार प्रांतरचना झाली तेंव्हा महाराष्ट्र सरकारवर आलेली, राज्यघटनेनं दिलेली ही एक महत्वाची जबाबदारी आहे. 

महाराष्ट्र शासनानं स्वतः:ची ही जबाबदारी पार पाडावी आणि नवा मराठीविरोधी आदेश त्वरित मागे घ्यावा. 

अनिल शिदोरे

नेते आणि प्रवक्ते – महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

 

मुंबई-गोवा महामार्गावर राजापुर येथे आराम बस आणि कार समोरासमोर धडकली; सहा प्रवासी गंभीर जखमी…

रत्नागिरी – काल बुधवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथे कोदवली उपकेंद्र नजीक खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा खाजगी कारचालक समोरून जोरदार धडकला त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी पाठवण्यात आले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे , साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे रा. जालना यांचा समावेश आहे. या अपघाताचे वृत्त कळतात अनेक स्थानिकानी अपघात स्थळी धाव घेतली व जखमीना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या रुग्णांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित मीना डॉ. लक्ष्मण शर्मा डॉ. मोनिका व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले. 

या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी हलविण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त कळतात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे

 

अल्कोहोल टेस्ट नंतरच वाहकांच्या हातात मिळणार बसचे स्टेअरिंग; महामंडळाचे आदेश..

MSRTC News :एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र काही वाहक मद्यप्राशन करून गाडी चालवत असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत अशा तक्रारी अलीकडे वारंवार येवू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणुन वाहकांची अल्कोहोल टेस्ट घेण्याचे आदेश आदेश प्रत्येक आगाराला दिले आहेत.

वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्तव्यावर पाठवावे असे स्पष्ट आदेश महामंडळाने काढले आहेत.

एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक, वाहन परिक्षक यांनी तातडीने स्थानक, आगार प्रमुख यांना त्याची माहिती ताबडतोब द्यावी. त्यानंतर त्याला कामगिरीवरुन उतरुन घेतील. तसेच त्वरित ड्रायव्हरची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात येऊन खातेंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. वाहकांची नोकर भरती करताना त्याच्या आरोग्य चाचण्या केल्या जातात. त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण देवूनच त्यांच्या हातात गाडीचे स्टेअरिंग दिले जाते. खाजगी वाहतुकीशी तुलना करता एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण पण खूप कमी आहे. मात्र अलीकडे काही वाहक मद्यप्राशन करून गाड्या चालवत अशा तक्रारी प्रवाशांकडून यायला लागल्या होत्या त्यामुळे महामंडळाने असे आदेश काढल्याचे समजते.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या निधी वाटपात कोकणाला दुजाभाव का? जनआक्रोश समितीचा सवाल…

Mumbai Goa Highway News | रुपेश दर्गे| एखादा अपघात घडतो त्यावेळेस मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहिर करण्यात येते तर जखमीवर मोफत उपचार करण्यात येतात यावर आमचा काहीही आक्षेप नाही कारण एखाद्याच्या घरचा कर्ता कमावता जातो त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला आधार देण गरजेचं आहे.

पण हे आधार कोकणाच्या बाबतीत कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसत आहेत. एकाच दिवशी दिनांक- १९.०१.२०२३ रोजी रायगड जिल्ह्यातील रेपोली येथे अपघात होऊन १० कोकणकरांना आपला प्राण गमवावा लागला तर सिंधुदुर्गमध्ये बस अपघातात ०२ कोकणकरांचा प्राण गेला. सरकारच्यावतीने अद्यापही त्यांना ना कोणती मदत जाहीर करण्यात आली ना कोणते भाष्य करण्यात आले. यानंतर एक ना अनेक अपघात सतत मुंबई गोवा महामार्गांवर घडत आहेत परंतू शासन मदत म्हणून कोकणाला वाट्याला देताना दिसत नाहीत याउलट आपलीच चुकी दाखविण्यात दंग होऊन जातात.

काही दिवसांपूर्वी तावडे कुटुंब या अपघाताचे बळी ठरले परंतु शासनाने त्यांना देखील मदत जाहीर केली नाही.

शनिवारी सुखेळी खिंड येथे पहाटे झालेल्या अपघातात ०२ जखमी झाले शासनाने यांच्यावर मोफत उपचार करण्याची कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही.

योग्य दिशादर्शक फलक नसल्याने आज दिनांक-१८.०४.२०२३ रोजी माणगाव इंदापूर हद्दीत अपघात घडला यामध्ये एका तरुणाला आपला प्राण गमवावा लागला तर दोघेजण जखमी आहेत.

याआधी ज्यांना मदत जाहिर केलेली आहे ती अद्याप पोहचलेली नाही.

हे सर्व प्रकार कोकणाला कुठेतरी दुजाभावा देताना दिसत आहेत.एकतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम सरकार जलदगतीने पूर्ण करताना दिसत नाही.ठेकेदार कामचुकार करून अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी घालून राजकीय आशीर्वादाने कोकणाच्या पदरी निराशा येत आहे.

सरकारी चुकीमुळेच होत असलेल्या अपघाताची जबाबदारी देखील घ्यायला तयार नाहीत.

रुपेश दर्गे

जनआक्रोश समिती

 

 

खारघर घटनेतील बळींना प्रत्येकी २० लाखांची मदत जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रातून मागणी…

मुंबई – खारघर येथील घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार असून त्यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अशा मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

पत्रात ते असे म्हणतात की खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला,त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. निवृत्ती न्यायाधीशांमार्फत या घटनेची चौकशी केली गेली पाहिजे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केलेली मदत अगदी तुटपुंजी असून किमान प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली गेली पाहिजे असे ते या पत्रात म्हणाले आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search