मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आज बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज एक बैठक आयोजित केली होती.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.
प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने खड्डे भरण्याचे काम पूर्ण करणार तसेच याबाबत कोकणातल्या लोकप्रतिनिधींना घेऊनच ते स्वतः सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष स्थळावर जाऊनच घेणार असे ते बोलले.
याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतुक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही या बैठकी दरम्यान वाहतूक विभागाला दिले आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.
या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक,आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. जाधव आदी उपस्थित होते.
कालच माध्यमांवर सर्वत्र मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागाचा खड्ड्यांमुळे झालेल्या अवस्थेचा विडिओ व्हायरल झाला होता. पुढच्याच आठवडय़ात गणेशोत्सवासाठी ह्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी होणार आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे समजते.
रत्नागिरी : कालची बातमी मीडियाकडून चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे. जनतेला घटनास्थळी नेमके काय घडले होते हे सांगण्यासाठी मी हा विडिओ पोस्ट करत आहे असे आज माजी खासदार निलेश राणे हे म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या बोलण्याच्या पूर्ण विडिओ आज ट्विटर वर पोस्ट केला आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप होता कि माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याने शिवी घातली, कदाचित अनावधानाने असा प्रकार घडला असेल त्यामुळे मी माफी मागितली. मी माघार घेतली कारण ती सर्व आपलीच माणसे होती आणि काही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ नये आम्ही थोडे नमते घेतले, कारण काही विपरीत घडले असते तर माझ्या त्या आई बहिणींवर केसेस पडल्या असत्या आणि मला ते नको होते, म्हणून मी हात जोडलेत. एवढेच नाही तर मी त्यांना तुम्ही मला बोलवाल तिथे मी चर्चेसाठी यायला तयार आहे. त्यांचे ते आंदोलन यशश्वी झाले असून पूर्ण देशभर पोहोचले आहे त्यामुळे आता त्यांनी हे आंदोलन थांबवावे ह्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. पण हि सर्व बातमी काहीश्या चुकीच्या पद्धतीने मीडिया वर दाखवली गेली होती त्यामुळे मला हा विडिओ पोस्ट करावा लागला आहे असे ते म्हणाले आहेत.
सरकारद्वारे रास्त दराने दिले जाणारे रेशनकार्ड वरील धान्य घेणारी व्यक्ती खरोखर गरजू आहे का, त्याचे उपन्न त्या कसोटी मध्ये बसत आहे का नाही ह्याची पडताळणी पुढच्या महिन्यात होणार आहे. उत्पन्न वाढलेल्या धारकाचे रेशनवरील धान्य ह्या पडताळणीनंतर बंद करण्यात येणार आहे.
कमी उत्त्पन्न गटामध्ये मोडत असलेली गरीब जनता उपाशी राहू नये म्हणून सरकराद्वारे गरीब कुटुंबाना स्वस्त दरात रेशन दिले जाते. मात्र काही लोकांचे उत्पन्न वाढले तरी त्यांचे ह्या सुविधेमध्ये नाव असल्याने त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. काही लोक हेच धान्य त्यांना मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विकून ह्या सुविधेचा गैरवापर करत आहेत. काही लोक तर चक्क जनावरांना हे धान्य खायला घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
ह्या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व प्रत्येक रेशनधारकांची धान्य निरीक्षकांमार्फत पडताळणी होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. खोट्या माहितीद्वारे कमी उत्पन्न दाखवून जर कोणी ह्या सुविधेचा दुरुपयोग केला असेल तर त्यांच्याकडून मागील धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या उत्साह वाढत चालला आहे. मागील २ वर्षाप्रमाणे काही निर्बंध नसल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग. पण ह्या महामार्गाची आताची अवस्था पाहता ह्या मार्गे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.
ह्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची रांगोळी तयार झाली आहे. हि सर्व परिस्थती खूपच चीड निर्माण करणारी आहे. गणेशोत्सव काळात ह्या रस्त्यावर किती रहदारी असते ह्याची कल्पना असून सुद्धा ह्यावर उपाय होत नाही आहे. दरवर्षीचे हे रडगाणे झाले आहे. मुंबई – गोवा महामार्ग तयार होण्याचा कमला पण कमालीची दिरंगाई होताना दिसत आहे.
याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा विषय विधानसभेमध्ये मांडला. कोकणातील सर्वच आमदारांनी या विषयावरुन सरकारला प्रश्न विचारमाऱ्या जाधव यांची पाठराखण केली. अखेर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलं.
सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवून तात्पुरत्या स्वरूपात हा महामार्ग वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी होत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर नियमित फेऱ्यांशिवाय काही विशेष गाड्या ह्या आधीच सोल्डल्या आहेत. त्या गाड्यांचे आरक्षण जवळपास फुल झाले आहे. प्रवासाचा वाढत प्रतिसाद पाहता कोकण रेल्वेने ह्या कालावधी साठी आजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे
LTT MAJN AC SPL (01173)
दिनांक २४.०८.२०२२, ३१.०८.२०२२ आणि ०७.०९.२०२२ रोजी बुधवारी हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरु दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
LOKMANYATILAK T
20:50
1
2
THANE
21:15
1
3
PANVEL
22:00
1
4
ROHA
23:20
1
5
MANGAON
23:52
1
6
KHED
00:56
2
7
CHIPLUN
01:34
2
8
SAVARDA
02:06
2
9
SANGMESHWAR
02:32
2
10
RATNAGIRI
03:15
2
11
ADAVALI
03:52
2
12
VILAVADE
04:12
2
13
RAJAPUR ROAD
04:50
2
14
VAIBHAVWADI RD
05:12
2
15
KANKAVALI
05:42
2
16
SINDHUDURG
06:12
2
17
KUDAL
06:24
2
18
SAWANTWADI ROAD
07:02
2
19
THIVIM
07:32
2
20
KARMALI
07:52
2
21
MADGAON
09:20
2
22
CANCONA
09:58
2
23
KARWAR
10:32
2
24
ANKOLA
11:02
2
25
GOKARNA ROAD
11:12
2
26
KUMTA
11:32
2
27
HONNAVAR
11:46
2
28
MURDESHWAR
12:12
2
29
BHATKAL
12:30
2
30
MOOKAMBIKA ROAD
12:50
2
31
KUNDAPURA
13:22
2
32
UDUPI
14:04
2
33
MULKI
15:02
2
34
SURATHKAL
15:22
2
35
MANGALURU JN
17:05
2
MAJN LTT AC SPL (01174)
दिनांक २५.०८.२०२२, ०१.०९.२०२२ आणि ०८.०९.२०२२ रोजी गुरुवारी हि गाडी मंगळुरु ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
MANGALURU JN
20:15
1
2
SURATHKAL
21:11
1
3
MULKI
21:21
1
4
UDUPI
22:12
1
5
KUNDAPURA
22:52
1
6
MOOKAMBIKA ROAD
23:20
1
7
BHATKAL
23:38
1
8
MURDESHWAR
23:58
1
9
HONNAVAR
00:20
2
10
KUMTA
00:36
2
11
GOKARNA ROAD
00:58
2
12
ANKOLA
01:12
2
13
KARWAR
01:42
2
14
CANCONA
02:12
2
15
MADGAON
03:25
2
16
KARMALI
04:02
2
17
THIVIM
04:22
2
18
SAWANTWADI ROAD
05:02
2
19
KUDAL
05:22
2
20
SINDHUDURG
05:34
2
21
KANKAVALI
05:52
2
22
VAIBHAVWADI RD
06:52
2
23
RAJAPUR ROAD
07:22
2
24
VILAVADE
07:42
2
25
ADAVALI
08:02
2
26
RATNAGIRI
09:36
2
27
SANGMESHWAR
10:12
2
28
SAVARDA
10:52
2
29
CHIPLUN
11:32
2
30
KHED
11:52
2
31
MANGAON
13:32
2
32
ROHA
14:35
2
33
PANVEL
15:45
2
34
THANE
16:25
2
35
LOKMANYATILAK T
17:30
2
डब्यांची स्थिती – FIRST AC – 01 COACH + 2 TIER AC – 03 COACHES + 3 TIER AC – 15 COACHES + PANTRY CAR- 01 + GENERATOR CAR – 02
ह्या गाड्यांचे आरक्षण आणि अधिक माहितीसाठी https://enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्या.
कुडाळ :मराठी माणसं व्यवसाय करत नाहीत, व्यवसायात करण्यात कमी पडतात. मागे पडतात आणि म्हणुन दुसर्या राज्यातील लोक ईथे येऊन उद्योगधंदे करतात हे कुठे तरी थांबले पाहीजे म्हणुन सगळेच बोलतात, लिहीतात आणि जोरदार टिका पण करतात पण ह्यात बदल घडवून आणायचा असेल तर फक्त बोलून लिहून नाही चालणार तर गरज आहे प्रत्यक्षात कृती करण्याची आणि आपल्या मातीतल्या उद्योजकांना साथ देण्याची.
आपल्या मालवणी, कोकणी, मराठी माणसांना व्यावसायिक बनवण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला प्रसिद्धी देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सतत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.
गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर अभिनवच्या टीमने कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांचा भव्य शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केला आहे.
कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल परिसरात हा शॉपिंग फेस्टिव्हल 26-27-28-29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत असणार आहे.
ह्या परीसरातील प्रत्येकाने या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या स्थानिक लोकांकडून खरेदी करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे
ठाणे : तुम्हाला AC लोकल्स वाढवायच्या असतिल तर खुशाल वाढवा, पण त्यासाठी आमच्या रेग्युलर लोकल बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका असे सामान्य लोकल प्रवाशांचे म्हणने आहे. आधीच मध्य रेल्वेच्या 56 रेग्युलर गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केलेल्या होत्या आणि ह्या आठवड्यात आजून 10 सामान्य गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला त्यामुळे आज कळवा येथे AC लोकल्स थांबवून प्रवाशांनी आंदोलन केले.
सव्वा आठची कळवा कारशेड मधून सुटणारी ठाणे- सीएसमटी लोकल आहे. जी पूर्वी साधी होती. त्यामुळे कळव्यातील अनेक प्रवासी या गाडीतून कारशेडने प्रवास करत होते. आता ही लोकल एसी केल्याने प्रवाशांना लोकल मिळाली नाही. त्यामुळे कारशेडजवळ सुमारे पाऊण तास लोकल थांबवून ठेवली होती.
संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. मात्र त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना तिथून हटवलं. यानंतर लोकल वाहतूक पूर्ववत केली गेली. याशिवाय, रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना ताब्यात देखील घेतले आहे.
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांची ट्विट
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून सामान्य लोकल्स AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्याचा विरोध केला आहे.
ए.सी लोकल रिकाम्या धावत असताना त्यांच्या फेऱ्या वाढवण्याची व इमारती मधील रहिवासी घरे पाडण्याची रेल्वे ला गरज काय? ज्या साध्या लोकल आहेत त्यांची संख्या वाढवा, फेऱ्या वाढवा, डब्बे तरी वाढवा तेवढेही होत नसेल तर फलाटाची उंची वाढवा काय बरोबर ना फुटपट्टी वाले ?#कळवा_स्थानक_आंदोलनpic.twitter.com/tnuxczvTuq
देशातील सर्वात लांबीची मालगाडी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असून ती देशातील सर्वात लांबीची मालगाडी मानली जाते. हि मालगाडी छत्तीसगडमधील बिलासपूर सेक्शनमध्ये भिलाई ते कोर्बा ह्या स्टेशन दरम्यान चालवली जाते. ह्या मार्गाची लांबी सुमारे २२४ किलोमीटर आहे.
ह्या मालगाडी ला एकूण २९५ डबे आहेत तर एकूण ६ इंजिन्स जोडली आहेत. ह्या मलगाडीची लांबी सुमारे ३.५ किलोमीटर आहे. हि गाडी सुमारे २७००० टन कोळसा एकावेळी वाहून नेते. ह्या मालगाडीचे नाव ‘सुपर वासुकी’ असे देण्यात आले आहे.
ही मालगाडी सुरू करून आपण वेळ, पैसे आणि मनुष्यबळाची बचत केली आहे असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. एवढ्या लांबीची मालगाडी चालवणे हे एक प्रकारे आव्हान होते. अनेक तांत्रिक बाबी पहाव्या लागल्या आहेत, तसेच सुरक्षिततेच्या बाजूने पण विचार करण्यात आलेला आहे.
संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत ऑस्ट्रेलिया येथील The Australian BHP Iron Ore .हि सर्वात लांब मालगाडी म्हणून नोंद केली गेली आहे. हि मालगाडी ७.३५३ किलोमीटर लांबीची असून त्याला ६८२ डबे आहेत.
राजापूर:शिवसेनेचा कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. शिंदे गटात जाऊ शकणारा हा शिवसेनेचा आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून राजन साळवी हे आहेत ह्या आशयाच्या बातम्या काल प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला अजून एक धक्का बसतो की काय अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. अधिवेशन सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राजन साळवी यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजन साळवी आता शिंदे गटात प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला होता.
पण आज ट्विटर च्या माध्यमातून ह्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केले आहे. ”आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी….काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… ”
”निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही….” ह्या ट्विट सोबत त्यांनी स्व. बाळासाहेबांसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे.
राजन साळवी हे कोकणातील लांजा-राजापूर-साखरपा ह्या मतदार संघातून सलग 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत.
मुंबई : पुणे मंडळामार्फत म्हाडा च्या विविध योजनतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज पार पाडण्यात आली. ह्या सोडतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला.
विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या सोडतीमधील विजेत्यांचे आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे म्हाडाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित केले असून खालील लिंक वर क्लिक करून आपण ती यादी पाहू शकता.