सावंतवाडी: आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी बस कर्मचार्यांनी संप पुकारून ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांना वेठीस धरले आहे. सावंतवाडी आगार आज पूर्ण बंद असून तिथून एकही बस सुटली नसल्याने शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे आणि गावाकडे येणार्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि शहर यातील अंतर जास्त असल्याने एसटी बस चा सोयीचा पर्याय बंद असल्याने आज येथे येणार्या चाकरमान्यांना घरी पोहोचण्यासाठी मोठा आर्थिक फटका बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसेस नसल्याने आज शाळेत पोहोचू शकले नाहीत. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थी सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. राज्य शासनाने हा संप लवकरात लवकर मिटवून एसटी बसेस चालू कराव्यात अशी मागणी होत आहे
मुंबई: यावर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार? हे पाहावे लागेल.
याशिवाय, एसटी स्थानकांवर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही डेपोत एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयात दिल्या जातील. जेणेकरून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्याची बसेसची सोय केली जाईल.
Mumbai Goa Highway:३ सप्टेंबरपूर्वी वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणीदरम्यान जाहीर केले होते. प्रत्यक्षात या दुसऱ्या बोगद्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. गणेशोत्सवात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर बनली आहे; परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ५ सप्टेंबरला काहीही करून बोगद्यातील वाहतूक सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
पाहणीदरम्यान ३ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यासह ठेकेदारांनी दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे यांनीही दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल अन् कोकणात जाणारे चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. प्रत्यक्षात दुसऱ्या बोगद्याचे काम संथगतीने सुरू आहे. दुसऱ्या बोगद्याच्या भोगावकडील बाजूला अजून भराव करण्याचे काम सुरू आहे. बाजूपट्ट्या असलेल्या पुलाजवळील रस्ताही अद्याप जोडण्यात आलेला नाही. दुसऱ्या बोगद्याच्या कामादरम्यानची गटारे अपूर्णावस्थेत आहेत. पोलादपूरकडून खेडकडे येणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. अंतर्गत कामेही अपूर्ण आहेत. दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक कितपत सुरू होईल याबाबत सांशकता आहे.
मुंबई: यावर्षीपासून आपण कोकणात कोल्हापूर मार्गे जाऊया नको आपण कोकणातूनच जावा असे आवाहन समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष्य संजय यादवराव यांनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना केले आहे.
कोकण महामार्ग काही ठिकाणी खराब असला तरी पूर्वीपेक्षा खूप चांगली परिस्थिती आहे.जिथे खराब आहे तिथे पर्यायी रस्ते आहे ते वापरले तर आपण आपल्या निसर्गभूमीतून निसर्गाचा आनंद घेत कोकणात जाऊ शकू. हायवे वरचे पेट्रोल पंप हॉटेल बाजारपेठा कोकणी चाकरमानी शिमग्याला गणपतीला येतात आणि त्यांच्या पाठबळावर असतात. हे सगळे व्यवसाय गेली आठ दहा वर्षे खूप अडचणीत आले आहेत. मात्र यावर्षीपासून रस्ता चांगला असल्यामुळे ही परिस्थिती बदलेल असा विश्वास आहे. पण यासाठी सर्व कोकण वासियांनी कोकणातूनच कोकणात आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याबरोबरच त्यांनी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पर्यायी मार्गाबद्दलही माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे
कोकणात जाण्यासाठी मार्ग
मार्ग पहिला
मुंबई
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे
खोपोली टोल नाका बाहेर पडा
पालीचा गणपती गावात शिरा
वेळेभागाड एमआयडीसी
निजामपूर
निजामपूर रायगडच्या दिशेने जा
दहा किलोमीटर मध्ये उजवीकडे एक फाटा आहे
या फाट्याने आपण माणगावच्या पुढे जातो. माणगाव मधील ट्रॅफिक टाळता येते.
लोणेरे ते संगमेश्वर चांगला रस्ता आहे
संगमेश्वर ते लांजा खराब रस्ता आहे
पण ज्यांना राजापूर आणि सिंधुदुर्गात जायचे आहे त्यांनी संगमेश्वरला लेफ्ट घेऊन देवरूखला जा. देवरुख वरून साखरपा
साखरप्यावरून दाभोळे
दाभोळ्यावरून भांबेड मार्गे वाटूळ
संगमेश्वर ते वाटुळ हा अतिशय देखणा सह्याद्री मधला रस्ता आहे एक खूप सुंदर अनुभव आहे.
वाटुळच्या पुढे सिंधुदुर्ग सगळीकडे चांगला रस्ता आहे.
ज्यांना रत्नागिरी मध्ये जायचे आहे त्यांना दोन रस्ते आहेत
1) संगमेश्वरच्या अलीकडे फुनगुस जाकादेवी मार्गे गणपतीपुळे आणि रत्नागिरी मध्ये जाता येईल
किंवा
2) संगमेश्वर च्या पुढे उजवीकडे उक्षी फाटा आहे उक्षी वरून जागा द्यावी आणि रत्नागिरीत जाता येईल हा रस्ता सुद्धा चांगला आहे.
त्यामुळे हे रस्ते वापरून आपल्याला कोकणात कुठेच अडचण न येता खूप चांगल्या रस्त्याने आपल्या गावी जाता येईल.
Bhartiy Railway News: हरित Green हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीसाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे यावर्षी आपली पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर आणणार असल्याची माहिती भारतीय रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या वर्षी सुरू करण्यात येणार असून सन २०४७ पर्यंत संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या सुमारे ५० गाड्या सुरू करण्याची भारतीय रेल्वे मंत्रालयाची योजना असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य अनिल कुमार खंडेलवाल यांनी दिली आहे.
हायड्रोजन ट्रेनचे फायदे
पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषणरहित रेल्वे यंत्रणा उभारण्याच्या दिशेने देशाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हायड्रोजन ट्रेन ट्रेनमधून होणारे ध्वनिप्रदूषणही अतिशय कमी आहे. हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेमुळे कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनात कित्येक टनांनी घट होणार आहे. तसेच या ट्रेनमुळे दरवर्षी कित्येक लाख लिटर डिझेलची बचत होणार आहे. हायड्रोजन इंधनावरील रेल्वे जाळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे.
हायड्रोजनवर धावणारी जगातील पहिली ट्रेन सुरु करण्याचा मान जर्मनीला जातो. २०१८ साली ही ट्रेन जर्मनीने चालू केली होती. त्यावेळी चालविण्यात आलेल्या हायड्रोजन ट्रेनचा वेग १४० प्रति किलोमीटर एवढा होता. त्यानंतर चीन, जर्मनी, जपान, तैवान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांनी अशा प्रकारच्या ट्रेन आपल्या देशात चालू केल्या आहेत.
Konkan Railway News: मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे दिवाळी विशेष गाड्यांची यादी जाहीर केली आहे. देशाचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला गाडयांना मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासन नियमित गाड्या व्यतिरिक्त काही विशेष गाड्या चालविते. यावर्षीही मध्यरेल्वे प्रशासनने दिवाळीसाठी काही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या दिनांक २५ ओक्टो. ते ०७ नोव्हें. दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या.
1) 01463/01464 एलटीटी-कोचुवेली विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01463 विशेष गाडी दिनांक २४ ऑक्टो. ते १४ नोव्हे. पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून संध्याकाळी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.४५ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 विशेष गाडी दिनांक २६ऑक्टो. ते १६ नोव्हे. पर्यंत दर शनिवारी कोचुवेली या स्थानकावरून संध्याकाळी १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २१.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – ०६, सेकंड स्लीपर – ०८, जनरल – ०३, एसएलआर – ०१, जनरेटर कर – ०१ असे मिळून एकूण २१ LHB डबे.
2) 01175/01176 पुणे – सावंतवाडी – पुणे विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01175 विशेष गाडी दिनांक २२ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर मंगळवारी पुणे या स्थानकावरून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01176 विशेष गाडी दिनांक २२ ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर बुधवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – १५, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे.
3) 01177/01178 पनवेल – सावंतवाडी – पनवेल विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01177 विशेष गाडी दिनांक २२ ऑक्टो. ते १३ नोव्हे. पर्यंत दर बुधवारी पनवेल या स्थानकावरून सकाळी ०९.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.०५ वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01178 विशेष गाडी दिनांक २३ ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर गुरुवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.४०वाजता पनवेल येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – १५, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे.
4) 01179/01180 एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01179 विशेष गाडी दिनांक १८ ऑक्टो. ते ०८ नोव्हे. पर्यंत दर शुक्रवारी एलटीटी, मुंबई या स्थानकावरून सकाळी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01180 विशेष गाडी दिनांक १८ ऑक्टो. ते ०८ नोव्हे. पर्यंत दर शुक्रवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटी, मुंबई येथे पोहोचेल.
Konkan Railway News:रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांचा विचार करायला सुरवात केली असून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर आता जनरल डब्यात करण्याचा सपाटा भारतीय रेल्वेने लावला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अजून जून एका गाडीच्या जनरल डब्यांत वाढ करून डब्यांची संरचना बदलण्यात आली आहे.
१६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, स्लीपर – १२, जनरल – ०२, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०४, स्लीपर – १२, जनरल – ०३, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसीच्या एका कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
Konkan Railway: येत्या आठवड्यात दक्षिण रेल्वे आणि मध्य रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक नसला तरी या या दोन्ही विभागातून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकांवर त्याचा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी – भुसावळ विभागात लूपलाइनच्या विस्ताराचे काम हाती गेले असल्याने खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२७४१ वास्को दा गामा – पाटणा एक्सप्रेस आणि दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०११४० मडगाव जं. – नागपूर विशेष या दोन्ही गाड्यांचा वेग मध्य रेल्वे विभागात १ तास ३० मिनिटे नियमित केला जाणार असल्याने त्या उशिराने धावणार आहेत.
याच बरोबर दक्षिण रेल्वेच्या अंगमली यार्डमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे. या कारणास्तव दक्षिण रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
या कामा दरम्यान कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या खालील तीन गाड्यांचा वेग दक्षिण रेल्वे विभागादरम्यान नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या उशिराने धावणार आहेत.
1)दिनांक ३१ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस २ तास १० मिनिटे.
2)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०९०९ कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेस २ तास २० मिनिटे
3)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) १ तास ५० मिनिटे
Konkan Railway: काल दुपारी बोरिवली स्थानकात शुभारंभ करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेसचे कोकणातील स्थानकांत जंगी स्वागत करण्यात आले. ही गाडी उशिरा सुटल्याने ती कोकणातील स्थानकांवर उशिरा पोहचली असली तरी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजर राहून या गाडीचे स्वागत केले.
वीर स्थानक
चिपळूण स्थानक
रत्नागिरी स्थानक
सावंतवाडी स्थानक
वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेस मध्यरात्री अडीच वाजता सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीचे सावंतवाडीत जंगी स्वागत केले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, सल्लागार महेश परुळेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, राज पवार आदी उपस्थित होते.
रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कारवाई चालू केली असून प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हे काम केले नाही. त्यामुळे या महामार्गावर अपघात होऊन होऊ लागले. २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले. त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले. त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार करीत आहेत.
महामार्गाचे निकृष्ठ काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी तक्रारी केली होती. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकी करणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहिन काम केले.