Author Archives: Kokanai Digital

Mumbai Local : मुंबईमध्ये लोकल ट्रेनला भीषण आग

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी रात्री कचरा उचलणाऱ्या ‘मक स्पेशल’ लोकलला भीषण आग लागल्याची घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही आग लागली. ही आग कचरा उचलणाऱ्या मक स्पेशल लोकलच्या पहिल्या डब्याला लागली होती. या डब्यामध्ये रेल्वे रुळांवरून गोळा केलेला कचरा आणि गाळ भरलेला होता. आग लागली तेव्हा हा डबा कुर्ल्यातील ईएमयू सायडिंगवर उभा होता.

​आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तातडीने ओव्हरहेड केबलचा वीज पुरवठा खंडित करावा लागला.विद्याविहार आणि सायन दरम्यान रात्री ८:३८ ते ८:५५ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे थांबली होती, ज्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

​सुदैवाने, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कचऱ्याला आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरले होते, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

संगमेश्वर स्थानकावर होळी विशेष एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा; निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपची आग्रही मागणी

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम/ सायले: संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांचा कायम पाठपुरावा करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुप च्या सदस्यांनी आज दि. ७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. शैलेश बापट यांची भेट निवेदन सादर केले. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावातील रेल्वे प्रवाशांच्या होळी उत्सवातील सुखकर प्रवासाचा विचार करून हे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी चर्चा करताना संगमेश्वर स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या ध्यानात घेऊन, उत्पन्न वाढी सोबत सुखकर प्रवास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे फुकट्या प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनाचा रेल्वेला बसणारा फटका, त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या चर्चेत ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, रुपेश मनोहर कदम, अशोक मुंडेकर हे सहभागी झाले होते.कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळाला तर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास नक्कीच सुखकर होणार!

महानगरपालिका क्षेत्रांत १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर; कामानिमित्त क्षेत्राबाहेर असलेल्यांना…..

   Follow us on        

​मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केली आहे.

​लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्यपालांच्या आदेशानुसार ही सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी केवळ संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील कार्यालयांनाच नव्हे, तर खालील घटकांनाही लागू असेल:

​शासकीय व निमशासकीय कार्यालये: सर्व सरकारी कार्यालये, महामंडळे आणि मंडळे.

​बाहेर असलेले मतदार: जर एखादा मतदार निवडणूक क्षेत्रातील रहिवासी असेल परंतु कामानिमित्त क्षेत्राबाहेर असेल, तर त्यालाही मतदानासाठी ही सुट्टी लागू राहील.

​केंद्र सरकारची कार्यालये व बँका: संबंधित क्षेत्रातील केंद्र सरकारची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँकांनाही ही सुट्टी लागू असेल.

​कोणत्या महानगरपालिकांचा समावेश आहे?

​प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार, कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या विभागांमधील एकूण २९ महानगरपालिकांचा यात समावेश आहे.

​बृहन्मुंबई महानगरपालिका

​ठाणे महानगरपालिका

​नवी मुंबई महानगरपालिका

​उल्हासनगर महानगरपालिका

​कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

​भिवंडी-निजामपूर महानगरपालिका

​मिरा-भाईंदर महानगरपालिका

​वसई-विरार महानगरपालिका

​पनवेल महानगरपालिका

​नाशिक महानगरपालिका

​मालेगाव महानगरपालिका

​अहिल्यानगर महानगरपालिका

​जळगाव महानगरपालिका

​धुळे महानगरपालिका

​पुणे महानगरपालिका

​पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

​सोलापूर महानगरपालिका

​कोल्हापूर महानगरपालिका

​इचलकरंजी महानगरपालिका

​सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

​छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

​नांदेड-वाघाळा महानगरपालिका

​परभणी महानगरपालिका

​जालना महानगरपालिका

​लातूर महानगरपालिका

​अमरावती महानगरपालिका

​अकोला महानगरपालिका

​नागपूर महानगरपालिका

​चंद्रपूर महानगरपालिका

 

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत १२ जानेवारीपासून बदल

   Follow us on        

​ठाणे: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची हक्काची गाडी असलेल्या ‘दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने एक बदल केला आहे. रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या वेळापत्रकानुसार या गाडीची वेळ आता ‘प्रीपोन’ म्हणजेच नियमित वेळेच्या काही मिनिटे आधी करण्यात आली आहे. हे सुधारित बदल १० जानेवारी २०२६ ऐवजी १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.

​नव्या बदलांनुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता दिवा स्थानकावरून पूर्वीच्या वेळेपेक्षा साधारण १० ते १५ मिनिटे लवकर सुटेल. रोहा स्थानकावर ही गाडी सध्या सकाळी ०९:०० वाजता पोहोचत होती, ती आता सकाळी ०८:५० वाजता पोहोचेल आणि ०८:५५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, ही गाडी रोहा स्थानकावर संध्याकाळी ५:२० ऐवजी ५:०५ वाजता पोहोचेल.

मोठी बातमी! पश्चिम घाट बचाव मोहिमेचे प्रणेते, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन

   Follow us on        

पुणे: भारताच्या पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पश्चिम घाट बचाव मोहिमेचे प्रणेते, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांचे काल रात्री पुणे येथे निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी पर्यावरण संरक्षण, संशोधन आणि लोकचळवळींना दिशा देण्याचे काम केले.

​डॉ. गाडगीळ यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ई. ओ. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण केले होते. परदेशात संधी उपलब्ध असूनही, त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. आधुनिक विज्ञानाची सांगड त्यांनी भारतातील पारंपारिक ज्ञान प्रणालींशी घातली. विशेषतः जैवविविधता संवर्धनासाठी त्यांनी स्थानिक समुदायांच्या सहभागावर नेहमीच भर दिला.

​डॉ. गाडगीळ यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे:

​सायलेंट व्हॅली आंदोलन: ७०-८० च्या दशकात सायलेंट व्हॅली वाचवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​बस्तर वनरक्षण: ८० च्या दशकात बस्तरमधील जंगलांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेले हस्तक्षेप निर्णायक ठरले.

​संस्थात्मक बांधणी: त्यांनी ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ आणि ‘झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थांना नवीन दिशा दिली.

​गाडगीळ समिती अहवाल: २०११ मध्ये त्यांनी सादर केलेला पश्चिम घाट पारिस्थितिकी तज्ज्ञ समितीचा (WGEEP) अहवाल हा पर्यावरण रक्षणातील एक मैलाचा दगड मानला जातो. हा अहवाल अत्यंत लोकशाहीवादी आणि संवेदनशील पद्धतीने तयार करण्यात आला होता.

​डॉ. गाडगीळ हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते, तर ते अनेक विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांसाठी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होते. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, “डॉ. गाडगीळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांची विद्वत्ता अफाट होती, पण त्यासोबतच त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि सहानुभूतीपूर्ण होता.”

​त्यांच्या पत्नी सुलक्षणा गाडगीळ या मान्सून अभ्यासक आहेत, तर त्यांचे वडील धनंजयराव गाडगीळ हे भारताचे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते, ज्यातून त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू समोर आले.

​डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने भारताने एक निष्ठावान शास्त्रज्ञ आणि निसर्गाचा खरा रक्षक गमावला आहे. पर्यावरण संतुलन आणि संरक्षणासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांच्या निधनाने पर्यावरणाप्रती कमालीची तळमळ असलेलं नेतृत्व आपण आज गमावलं आहे. कोकण आणि पश्चिम घाटाच्या संरक्षणाबाबत त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

67-Year-Old Konkani Senior Citizen to Launch Fast Unto Death for Sawantwadi Railway Terminus

   Follow us on        

Sawantwadi, January 7, 2026 – In a major escalation of the long-standing demand for a fully functional railway terminus at Sawantwadi, 67-year-old Surendra Nemlekar, a Mumbai-based Konkani senior citizen, has announced a fast unto death. The protest, aimed at securing the rights of the “Chakarmani” (Peoples from the Konkan region working in Mumbai), is set to begin later this month.

The Maharashtra Railway Pravasi Mahasangh, representing Mumbai-based Konkani passengers, has officially served a notice of the hunger strike to the Konkan Railway Corporation.

While most people his age look forward to a peaceful retired life with their grandchildren, Mr. Nemlekar has chosen a different path. Driven by a selfless desire to ensure a smooth and comfortable travel experience for the youth of Konkan and the lakhs of people who travel between Mumbai and the coast, he has decided to take this extreme step.

“This fight is not for me; it is for the comfortable travel of the peoples of my Konkan,” Nemlekar stated emotionally.

The long-standing demand for a Complete Railway Terminus and Coaching Depot at Sawantwadi has evolved from a local infrastructure request into a critical necessity for the Konkan region. Despite years of persistent advocacy and official assurances, the project remains in a state of administrative limbo, leaving the local community to grapple with the fallout of stalled progress. Without a dedicated terminus, commuters are forced to endure significant travel delays and logistical inefficiencies that hinder daily life.

The absence of a coaching depot—essential for the maintenance and origination of trains—means that Sawantwadi cannot effectively serve as a transit hub, stifling its economic growth and preventing it from alleviating the pressure on neighboring stations. This continued inaction not only inconveniences thousands of passengers but also prevents the town from fulfilling its geographic potential as a gateway for tourism and commerce.

 

In a significant move to address long-standing infrastructure grievances, a protest has been organized at Konkan Bhavan in Belapur, Navi Mumbai, scheduled for January 26, 2026. Aimed at the Konkan Railway Corporation and the Central Government, the movement calls upon the youth, the local people of Konkan to assemble starting at 9:00 AM on Republic Day.

The primary objective of this demonstration is to secure the immediate completion of the Sawantwadi Railway Terminus and ensure it becomes fully operational to its total capacity. Protesters are demanding enhanced connectivity to provide a hassle-free and comfortable journey for the vital Mumbai-Konkan commuter base. By choosing this symbolic date, organizers hope to highlight these long-ignored regional issues and force a definitive timeline for the terminus’s completion.

 

Mumbai Local: मुंबईत लवकरच १८ डब्यांच्या लोकल्स धावण्याची शक्यता

   Follow us on        

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी क्षमतेत मोठी वाढ करण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी विरार-डहाणू रोड विभागावर १८ डब्यांच्या लोकल ट्रेनची विशेष चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही चाचणी १४ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, याद्वारे मुंबईच्या रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या चाचणीमध्ये प्रामुख्याने ‘इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टन्स’ (EBD) आणि ‘कपलर फोर्स’ म्हणजेच डब्यांमधील जोडणीवर येणारा ताण यांची तांत्रिक तपासणी केली जाईल. आपत्कालीन परिस्थितीत वेगाने धावणारी १८ डब्यांची गाडी किती अंतरावर सुरक्षितपणे थांबू शकते, हे पाहणे या चाचणीचा मुख्य उद्देश आहे.

या प्रक्रियेत बॉम्बार्डियर (Bombardier) आणि मेधा (Medha) या दोन वेगवेगळ्या बनावटीच्या १८ डब्यांच्या गाड्यांची ताकद अजमावली जाणार आहे. बॉम्बार्डियर क्लासची चाचणी ११० किमी प्रतितास, तर मेधा इलेक्ट्रिकलची चाचणी १०५ किमी प्रतितास या वेगाने घेतली जाईल. विरार-डहाणू पट्टा हा विनाअडथळा वेगवान धावण्यासाठी योग्य असल्याने या भागाची निवड करण्यात आली आहे. सध्या मुंबईत १२ आणि १५ डब्यांच्या लोकल धावत असल्या तरी १८ डब्यांची सेवा सुरू झाल्यास एकाच वेळी हजारो जादा प्रवाशांना प्रवास करता येईल. या चाचण्यांचे निकाल सकारात्मक आल्यास, मुंबईच्या रेल्वे इतिहासात हा एक ऐतिहासिक बदल ठरेल आणि भविष्यात गर्दीच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पाठोपाठ कोकण रेल्वेच्या अजून दोन गाड्या कायमस्वरूपी मुंबईच्या बाहेर नेण्याचा डाव

   Follow us on        

मुंबई: मुंबईहून कोकण आणि किनारपट्टी कर्नाटककडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्या पुन्हा एकदा पनवेलला ‘शॉर्ट-टर्मिनेट’ करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशाची गैरसोय होत असून रेल्वेच्या दीर्घकालीन हेतूंवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५/१६३४६) आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६१९/१२६२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहेत.

​​मध्य रेल्वेने ‘एलटीटी’ यार्डातील पिट लाईन क्रमांक ३ च्या देखभालीचे कारण देऊन या गाड्या महिनाभर पनवेलला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण विकास समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे ४० दिवस गाड्या रोखण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रवाशांना हळूहळू पनवेल टर्मिनसची सवय लावून या गाड्या कायमस्वरूपी तिथूनच चालवण्याचा घाट घातला जात असल्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पूर्वी रत्नागिरी-दादर पॅसेंजर कोव्हिडचे कारण देऊन तात्पुरत्या काळासाठी दादर ऐवजी दिवा स्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र कोव्हिड काळानंतर ही ट्रेन कायमची दिवा स्थानकावर हलवण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आता तोच प्रकार आता नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बाबतीत तर होणार नाही ना? अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.

​पनवेलला गाडी थांबल्यामुळे वृद्ध, महिला आणि जड सामान असलेल्या प्रवाशांना लोकलने पुढचा प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. खाजगी वाहनांनी प्रवास करताना वेळ आणि पैसा यांचा मोठा फटका बसत आहे.

​कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक व्यावहारिक पर्याय मांडला आहे:

सध्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा गाड्यांचे रेक एलटीटी स्थानकावर उभे करून ठेवावे लागतात. या दोन्ही गाड्यांच्या रेकचे (Rake Linking) एकत्रीकरण करून त्या ‘प्लॅटफॉर्म-रिटर्न’ पद्धतीने चालवाव्यात. यामुळे गाड्यांना बराच वेळ यार्डात उभं राहण्याची गरज उरणार नाही आणि पिट लाईनवरील ताणही कमी होईल.

​समितीच्या प्रमुख मागण्या:

समितीने रेल्वे प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत.

​१. नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या रेक लिंकिंग प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी.

२. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वेची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा.

३. तात्पुरत्या कामांचे कारण देऊन प्रवाशांच्या हक्काच्या मुंबई जोडणीला कायमस्वरूपी सुरुंग लावू नये.

​याप्रश्नी रेल्वे प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

मुंबई | ५ जानेवारी २०२६:

​कोकण रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि मागणी लक्षात घेता, गाडी क्रमांक २२११५ / २२११६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – करमाळी – लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी आता करमाळीऐवजी मडगाव जंक्शन स्थानकापर्यंत धावेल आणि तेथूनच परतीचा प्रवास सुरू करेल.

आठवड्यातुन एकदा धावणार्‍या या गाडीला आता १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या गाडीचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘NTES’ ॲपचा वापर करावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Railway Updates: आधार-व्हेरिफाईड प्रवाशांसाठीच्या तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल; आजपासून नवे नियम लागू

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आयआरसीटीसी (IRCTC) द्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ५ जानेवारी २०२६ पासून आधार-प्रमाणित (Aadhaar-authenticated) वापरकर्त्यांसाठी तिकीट बुकिंगची वेळ वाढवण्यात आली आहे. प्रवाशांना सुलभता मिळावी आणि दलालांच्या गैरप्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.

​काय आहे नवा बदल?

​बुकिंगची नवीन वेळ: ज्या वापरकर्त्यांचे IRCTC खाते आधारशी लिंक आहे, त्यांना आता रिझर्व्हेशन विंडो उघडण्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत तिकीट बुक करता येईल.

​जुना नियम: ४ जानेवारीपर्यंत ही वेळ केवळ सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत मर्यादित होती.

​कोणासाठी लागू? हा बदल केवळ ऑनलाइन (IRCTC वेबसाइट किंवा ॲप) तिकीट बुकिंग करणाऱ्या आधार-लिंक वापरकर्त्यांसाठी आहे. रेल्वे स्टेशनवरील पीआरएस (PRS) काउंटरवरील प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही.

​चार्ट तयार होण्याच्या वेळेतही बदल

​रेल्वेने गाड्यांच्या चार्ट तयार करण्याच्या वेळेबाबतही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत:

​सकाळी ५:०१ ते दुपारी २:०० दरम्यान सुटणाऱ्या गाड्यांचा पहिला चार्ट प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री ८:०० वाजेपर्यंत तयार केला जाईल.

​दुपारी २:०१ नंतर सुटणाऱ्या किंवा रात्री उशिरा सुटणाऱ्या गाड्यांचा पहिला चार्ट गाडी सुटण्याच्या किमान १० तास आधी तयार केला जाईल.

​महत्त्वाचे मुद्दे

​रेल्वेने गेल्या वर्षीपासून जनरल रिझर्व्हेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांसाठी आधार पडताळणी अनिवार्य केली होती.

​२९ डिसेंबर २०२५ रोजी हा कालावधी दुपारी १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आला होता, जो आता ५ जानेवारीपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आला आहे.

​या निर्णयामुळे खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळणे सोपे होणार असून अनधिकृत एजंट्सवर लगाम बसेल, अशी रेल्वेला अपेक्षा आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search