Author Archives: Kokanai Digital

कोंकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती पनवेल स्थानकावर साजरी

   Follow us on        
पनवेल: कोंकण रेल्वेचे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री स्वगीय प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती आज मंगळवार दि.२१ जानेवारी,२०२५ रोजी पनवेल रेल्वे स्टेशनवर साजरी करण्यात आली. यासमयी पनवेल स्टेशन मॅनेजर केएस अग्रवाल व पनवेल रेल्वे पोलीस ठाणेचे पोनि तांबोळी यानी प्रतिमेस हार घालून आदराजली वाहीली,
यावेळी  महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघ  व नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असो. अध्यक्ष तथा सेंट्रल कमिटी सदस्य ( ZRUCC Member ) श्री.अभिजीत  धुरत व आर.पी.आय्.(आर्.के )चे अध्यक्ष मा.राजाराम खरात साहेब,अश्वत्थामा ज्येष्ठ  नागरिक संघ नवीन पनवेलचे  अध्यक्ष श्री.प्रकाश विचारे,समाजसेविका रत्नमाला पाबळेकर,अॅड संजय गंगनाईक, डिप्टी स्टेशन मॅनेजर राकेश तिवारी, अॅड  यशवंत पाटील, महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,रेणूका सांळुखे, संजीवनी पोसतांडेल सुरेन्द्र नेमळेकर,, श्रीविदया सरवणकर,एसके पाटील, डीजी मगरे, साहेबराव जाधव, काशीनाथ भोईर, चंदोदय वाघमारे इतर,मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते

Konkan Railway: तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

   Follow us on        

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मात्र या मार्गावरील काही गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. तर आज प्रस्थान करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस आज संध्याकाळी १८.०५ वाजता पुनर्नियोजित Rescheduled करण्यांत आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रत्नागिरी करबुडे दरम्याने आली असता या गादीचे इंजिन अचानक बंद पडले. हा प्रकार मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठीक ठिकाणी थांबवण्यात आल्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला.

रत्नागिरी रेल्वे स्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन तेजस एक्सप्रेस ही गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. तेजस या गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या मार्गावरील दिवा – सावंतवाडी, सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस, मडगाव – सीएसएमटी मांडवी, सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस या  गाड्या २ ते ३ तास उशिराने धावत आहेत.

Mumbai Local: पाश्चिम रेल्वे मार्गावर रुळाला तडे; मोठा अनर्थ टळला, वाहतुक रखडली

 

   Follow us on        

Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या वैतरणास्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

महत्वाचे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग उद्यापासून ‘या’ वेळे दरम्यान तीन दिवस बंद रहाणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. या कारणाने दि. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक ण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या अधिकार्‍यां तर्फे करण्यात आले आहे.

 

रत्नागिरीत प्रथमच होणार क्षेत्रीय वैदिक संमेलन; १०० वैदिक पंडितांच्या उपस्थितीत होणार वेदमंत्रांचा जागर

   Follow us on        

रत्नागिरी:महर्षी हर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन दिनांक ७,८,९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेद पाठशाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवाय वेदातील क्रमांत, घनांत असे अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.

हे संमेलन रत्नागिरी शहरातील माधवराव मुळ्ये भवन येथे संपन्न होणार असून संमेलनात वेद, वेदविज्ञान या संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा संमेलनाला वेदप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे

२१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तितिथि-सप्तमी – 12:42:52 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 23:37:32 पर्यंत
  • करण-भाव – 12:42:52 पर्यंत, बालव – 26:03:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 27:48:37 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-राशि-कन्या – 10:04:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:45:59
  • चंद्रास्त- 11:46:59
  • ऋतु- शिशिरतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय आलिंगन दिन.
महत्त्वाच्या घटना:
  • १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
  • १७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
  • १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
  • १८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
  • १९५८: कॉपीराईट चा नियम आजच्या दिवशीच लागू केला गेला.
  • १९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट
  • १९७२: मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.
  • २०००: ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
  • २००९: भारतीय वायुसेनेचे सूर्यकिरण नावाच्या एका प्रशिक्षण विमानाचा कर्नाटक च्या बिदर येथे अपघात झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (मृत्यू: २० जुलै १९४३)
  • १८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)
  • १९१०: शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ’भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ’संत तुकाराम’ चित्रपटातील ’आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकारामांचाच आहे असे वाटते. (मृत्यू: २ मे १९७५)
  • १९२२: पंजाब चे माजी मुख्यमंत्री हरचरण सिंग ब्रर यांचा जन्म.
  • १९२४: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)
  • १९४३: प्रसिद्ध भारतीय लेखिका प्रतिभा राय यांचा जन्म.
  • १९५२: भारतीय चित्रपट अभिनेता प्रदीप रावत यांचा जन्म.
  • १९५३: पॉल अ‍ॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक
  • १९८६: भारतीय चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)
  • १९०१: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८३५)
  • १९२४: ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७०)
  • १९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)
  • १९४५: रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)
  • १९५०: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (जन्म: २५ जून १९०३)
  • १९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
  • १९६३: ला भारतीय प्रसिद्ध कादंबरीकार शिवपूजन सहाय यांचे निधन.(जन्म: १२ ऑगस्ट १८८१)
  • १९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री (जन्म: ? ? १९३०)
  • १९९७: ला भारताचे माजी नौदल प्रमुख सुरेंद्रनाथ कोहली यांचे निधन.
  • १९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६)
  • २०१६: ला भारताची प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा निष्फळ, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी २६ जानेवारीला रेल रोको आंदोलन करण्यावर ठाम.

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकावर परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व्हावे, या ठिकाणी नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग व्हावी, या स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा तसेच सावंतवाडी स्थानकावरून कोरोना काळात काढून घेण्यात आलेला १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस व १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही अराजकीय संघटना रेल रोको आंदोलन करणार आहे. त्याबाबत ची नोटीस संबंधित प्रशासनाला दिलेली होती त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री शैलेश आंबर्डेकर यांनी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रेल रोको करू नये असा आशयाचे पत्र संघटनेला सुपूर्द केले.परंतु कोकण रेल्वेने दिलेल्या पत्रात संघटनेच्या मागण्यांसंदर्भात एकही सकारात्मक बाब नसल्याने संघटनेने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत अशा आशयाचे पत्र क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री आंबर्डेकर यांना सुपूर्द केले. तसेच आमच्या मागण्यांसंदर्भात बेलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांचा अध्यक्षतेखाली २३ जानेवारीच्या अगोदर बैठक आयोजित करावी अशी विनंती संघटनेने केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड श्री संदीप निंबाळकर, सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पद एवढे महत्वाचे कां?

   Follow us on        

विश्लेषण: महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची नुकतीच घोषणा झाली. यादी निघाल्या नंतर काही मंत्र्यांकडून नाराजीचा सूर निघायला सुरुवात झाला. यावरून महायुतीतील सुद्धा घमासान सुरू झाले. हा वाद एवढा टोकाला गेला की दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय विद्यमान सरकारला स्थगित करावा लागला. पालकमंत्री पदासाठी एवढी मारामारी कशाला हा प्रश्न साहजिकच पडतो.

महाराष्ट्रातील राजकारणात पालकमंत्री पद अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे कारण या पदाच्या माध्यमातून राज्य सरकार स्थानिक प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्य शासकीय प्रतिनिधी असतो आणि त्याला त्या जिल्ह्याच्या विकासाबाबत जबाबदारी असते.

प्रशासनिक नियंत्रण:
पालकमंत्री जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यकाळासाठी एक प्रमुख प्रशासनिक व्यक्ती म्हणून कार्य करतो.तो जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिकारी,आणि इतर सरकारी विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवतो.

विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी:
जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणीला चालना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. यात ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

राजकीय प्रभाव:
स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव असलेला पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे त्याच्या समर्थनाच्या आधारावर शासकीय कामे व इतर निर्णय होतात.

कायदा व सुव्यवस्था:
पालकमंत्री हा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घेतो. त्याच्या अधीन असलेल्या जिल्ह्यातील भागात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला विशेष अधिकार मिळतात.

जिल्ह्याच्या सर्व विकासात्मक आणि प्रशासकीय निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका:

कोणत्याही जिल्ह्यातील सरकारी योजनांचे निर्णय घेण्यास आणि त्या क्षेत्रातील आवश्यक निर्णय घेण्यास पालकमंत्री प्रमुख भूमिका निभावतो.

रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्यासाठी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार

   Follow us on        

मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.

याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.

त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार  सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.

Mumbai Local Trains : मुंबईला लवकरच 238 एसी लोकल मिळणार

   Follow us on        

Mumbai Local : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत.शनिवारी अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रकल्पांवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी एसी लोकल खरेदीबाबत माहिती दिली.

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या फेज 3 आणि 3 A अंतर्गत, मुंबईत लवकरच २३८ एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एसी लोकल ट्रेनसाठी जागतिक निविदा काढल्या होत्या. खरेदी रखडल्याने हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला. आता १८ महिन्यांनंतर एसी लोकल खरेदीवर भर देण्यात येत आहे.

एमयूटीपी म्हणजेच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या मूळ योजनेनुसार, फेज 3 मध्ये ४७ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे ३,४९१ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो. तर फेज 3 A मध्ये १९१ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे १५,८०२ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.एसी लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात एसी लोकलने प्रवास करता येईल. शिवाय याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तरी या २३८ एसी ट्रेन मुंबईत कधी धावणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search