Author Archives: Kokanai Digital

पर्यटकांना खुशखबर! सावंतवाडी येथील जंगल सफारी ३१ मार्च पर्यंत मोफत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २३ मार्च : शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.

आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे

Loading

Nagpur Goa Highway Updates | शेतकरी आक्रमक; प्रति एकरी कमीत कमी दोन कोटी मोबदला देण्याची मागणी

   Follow us on        
Nagpur Goa Highway Updates:सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 7 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढण्यात आली असून त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या हरकती, आक्षेप 21 दिवसात अर्जाद्वारे लिखित स्वरूपात कारणासह कळविणेबाबत नमूद केले आहे. या अधिसुचनेनुसार, शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने सांगोला तालुक्यातील १३ गावांतील  शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी  बुधवारी हरकती व आक्षेप अर्ज व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मंगळवेढा यांना देण्यात आले. महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
बाधित शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनीमधून महामार्ग गेला आहे. कुटुंब वाढीमुळे एकराच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या 6 ऑक्टोबर 2021 रोजीचे मोबदल्या बाबतच्या परिपत्रकेनुसार गुणांक एक नुसार मोबदला मिळणार आहे व तोही रेडीरेकनरनुसार त्यामुळे आमची एक एकर जमीन घेवूनही शासन मोबदल्यात एक गुंठा पण जमीन मिळणार नाही. यामुळे बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
शक्तिपीठ महामार्गांचे भूसंपादन अधिनियम 1955 नुसार सार्वजनिक हितार्थ म्हणून सक्तीने करणार असल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे बाधीत क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर खासगी वाटाघाटी करून थेट खरेदी ने एकसमान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला, जिथे एमआयडीसी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत – कमी चार कोटी रुपये द्यावा आणि मगच सार्वजनिक हितार्थ महामार्ग करावा अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Loading

Konkan Diary | कोकणातील ओसाड पडत चाललेली गावे आणि गावापासून तुटत चाललेला ‘चाकरमानी’…

कोकणातील रायगड, रत्नागिरीसह राज्यातील विविध ठिकाणाहून नागरिक आता मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध शहराच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. मात्र शहराकडील हे स्थलांतर वेळीच थांबणे शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. यासाठी कोकणातील तरुणांनी आपल्या गावाकडे लक्ष देऊन आधुनिक शेतीकडे लक्ष दयायला हवे. विविध जोडधंदे करुन स्वःतासह कुटूंबाचा विकास साधायला हवा.

कोकणात छोटी-मोठी गांव, वाड्या आहेत. परंतु अशा ठिकाणी केवळ वयोवृद्ध आजी-आजोबा व क्वचित तरुणवर्ग दिसतो. बहुसंख्य घरे ही कुलूपबंद आहेत. तर शेती ओसाड पडली आहे. साहजिकच रोजगार नसल्याने तरुणवर्ग हा छोटी- मोठी नोकरी करण्यासाठी शहराकडे वळत आहे. गणेशोत्सव, होळी, दसरा, जत्रा असे पारंपारिक सण आले तरच हा तरुणवर्ग गावाकडे हजेरी लावतो. एरवी सगळीकडे शांतताच-शांतता पसरलेली असते. हे सर्व भयानक आहे, काही वर्षांत ही गावे स्मशानागत बनायला वेळ लागणार नाही.म्हणून कोकणातील तरुण-तरुणी यांनी खेड्यापाड्यातच राहून करण्या योग्य स्वंयरोजगार करुन समृद्ध कोकण बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

गावे, गावातील शाळा बंद होत आहेत. हे सर्व का घडतंय? कारण रोजगार नाही, शेती आहे पण चांगले पीक नाही. वर्षभर पुरेल इतके उत्पन्न नाही, मुलांना चांगले शिक्षण नाही, वैद्यकीय उपचार पुरेसे नाही, असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात भेडसावत आहेत. 

किंबहुना या भागामध्ये शेती करायला कोणी तयार होत नाही, शेती करावी तर मुबलक पाण्याचा साठा नाही, शेतीविषयक मार्गदर्शक नाही, शेती करण्यास शासनाकडून कोणतीच मदत नाही, मजूर मिळत नाही, शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत, रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे, असे अनेक प्रश्न पदरात पडलेली आहेत. त्यामुळे ना-इलाजाने स्थानिक नागरिकांना शहराची वाट धरावी लागत आहे. पण भविष्यात असेच होत राहिले तर गाव ओस पडतील. 

चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळत नाही म्हणून भुमिपुत्र आपली शेती, जागा कवडीमोल किंमतीत विकून मोकळे होतील. पण याचा फायदा परप्रातियांना होईल. सर्वांत धक्कादायक म्हणजे भुमिपुत्र आज परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यातून बाहेरून आलेले लोंढे स्वतःचे व्यवसाय टाकून घर करून बसले आहेत. सरकार कोणाचेही असो, कायम या ठिकाणी दुर्लक्ष झालेला आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं ; पण या पुढे सर्व प्रश्नाची दखल घेऊन काळजीने लक्ष दिले पाहिजे. 

जेवढ्याही शासकीय योजना असतील त्या लोकांसमोर आणून लोकांपर्यंत खेड्या-पाड्यात पोहचवाव्यात. रुग्णालयात सुविधा देणे यावर विशेष भर दिले पाहिजे. विशेषतः खेड्यांमध्ये वैद्यकीय उपकेंद्रे जी वाळवी खात बसलेली आहेत, ती पुन्हा चालू करावी, शैक्षणिकदृष्ट्या बळकट करणे गरजेचे आहे. छोटे-मोठे उद्योग आणले पाहिजे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल, पर्यटन स्थळ यांचा विकास करणे गरजेचे आहे, पर्यटकांची वाढलेली गर्दी ही स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो. “तुज आहे तुझ्या पाशी पण वेड्या तु जागा चुकलाशी” या प्रमाणेच कोकण भुमिपुत्रचे झाले आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यामधील गावा-गावात, वाडी-वाडीपर्यंत नागरिकांना भेडसावणार्‍या प्रश्नांवर सरकारने, सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन, येथील जनतेच्या हितासाठी एकत्रित येऊन, या सर्व अडचणी दूर करणे काळाची गरज आहे. वेळ न दडवता आतापासूनच अंमलबजावणीला सुरुवात व्हायला पाहिजे. नाही तर उद्या उशिर झालेला असेल. अशी परिस्थिती निर्माण झाली तरच शहराकडे जाणारे नागरिक थांबतील व छोटी-मोठी गावे, वाड्या हे सर्व ठिकतील, अन्यथा पुढील येणारा काळ खूप कठीण असेल हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. तेव्हा कोकणातील तरुणांनो जागे व्हा… आपल्या जमिनी न विकता विकसित करा. आपली मानसिकता बदलून योग्य मार्गदर्शन घ्या. स्वंयरोजगारचे हजारो प्रकल्प उभे कसे करता येतील व स्थानिकांना रोजगार कसे उपलब्ध होतील याकडे लक्ष द्या. प्रकल्प उभारणीसाठी योग्य प्रशिक्षण घ्या. निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी संघटीतपणे सोडण्यासाठी एकत्र या. हापूस आंबा, कृषी उत्पादने, पर्यटन, फलोद्यान, इ. संघटीत मार्केटिंग करा. त्यासाठी व्यावसायिक संघटना निर्माण करा. पुढील १५-२० वर्षांत कोकण जागतिक दर्जाचे आर्थिक विकासाचे केंद्र कसे करता येईल यासाठी प्रमाणिक प्रयत्न करा. कोकणाता नद्या, निसर्ग, धबधबे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांना आकर्षित करणे होते आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करा. मत्स्योद्योग, शेती, पर्यटन, फलोद्यान इ. क्षेत्रात कोकण जागतिक स्तरावर जाणे सोपे आहे. गरज आहे ती तुमच्या प्रमाणिक प्रयत्नांची. तुम्ही कोकण भुमिपुत्र आहात… भुमिपुत्र राहा… नाही तर उद्या आपल्याला आपल्याच गावात… वाडीत पाहुणे व्हावे लागेल. तेव्हा तरुण-तरुणींनो पुन्हा खेड्याकडे चला…आधुनिक शेती, व्यवसाय, स्वयंरोजगार करा. आपले कोकण समृद्ध करा.

 

 

 

Loading

नारायण राणे की किरण सामंत? सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता

   Follow us on        

Loksabha Election 2024|लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अजून जाहीर करण्यात आला नसून हा विषय महायुतीसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरणभैय्या सामंत ही दोन नाव प्रामुख्याने या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. आज भाजपची महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या जागेसाठी दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आजतरी या ही उत्सुकता संपणार अशी आशा निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जनसंपर्क मोठा आहे. सर्वपक्षीय असलेले राणे यांचे संबंध, राणे यांची काहीशी आक्रमक शैली, तसेच राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले निलेश राणे याच मतदारसंघात यापूर्वी खासदार राहिले आहेत. त्यांचाही संपर्क आजवर या मतदारसंघात कायम राहिला आहे. या नारायण राणे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू असलेले किरण भैय्या सावंत हे शासनाच्या रत्न सिंधू योजनेचे सदस्य आहेत. त्यांनी गेले काही महिने लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी संपर्क सुरू केला आहे. इतकेच नाही तर उदय सामंत यांच्या यशस्वी कारकिर्दीमागे आणि उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीत किरणभैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ही दोन वेळा भेट घेत किरण सामंत यांनी आशीर्वाद घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नारायण राणे यांच्या ऐवजी किरणभैय्या सामंत यांना मिळू शकते.

दिपक केसरकर यांचे विधान चर्चेत.. 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी आंगणेवाडी यात्रेच्या दरम्यान माध्यमांजवळ बोलताना मोठे वक्तव्य केलं होतं. महायुती जेव्हा मजबूत आहे त्यावेळेला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं याला फार महत्त्व नसतं, कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला पालघरची सीट शिवसेनेला दिली त्यावेळेला भाजपने आपला उमेदवार सुद्धा दिला होता, त्यामुळे जिथे जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता अधिक असते तिथे आपला उमेदवार द्यायला कोणताच कमीपणा नसतो, नाहीतर मग युती कशाला म्हणायची? असं मोठे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यामुळे किरणभैय्या सामंत यांना लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू शकतात, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

 

 

 

 

Loading

“सावधान! पुढे … ” काळजीपोटी जनआक्रोश समितीने मुंबई गोवा मार्गावर लावले मार्गदर्शक फलक..

   Follow us on        

मुंबई, दि. २२ मार्च : शिमग्यास कोकणात जाणऱ्या कोकणकरांची अपुऱ्या दिशादर्शक व सुरक्षा सुविधामुळे होणाऱ्या वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर मार्गदर्शक फलक लावण्याची मोहीम मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन काल समितीच्या वतीने महामार्गावर काही ठिकाणी हे फलक लावले गेले आहेत.

महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही आहे. अनेक ठिकाणी काम चालू आहे, अनेक ठिकाणी धोकादायक स्पॉट निर्माण झाले आहेत. अशा ठिकाणी वाहन चालकांना सावध करण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक फलक लावणे अपेक्षीत होते. जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी अपघाताचा धोका ओळखून असे स्पॉट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले तरी त्या ठिकाणी फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे समितीने लोकसहभागातून हे फलक लावण्याचे कार्य हाती घेतले आहे. यामध्ये पळस्पे ते वाकेड दरम्यान दिशादर्शक व दिशापरिवर्तन फलक , वाहतुक नियंमांचे नियम व सुचना तसेच रिफलेक्टर ( परावर्तक) , सोलर बिल्कर, रम्बल स्ट्रीप लावण्यात येत आहेत.

मागील आठवड्यात या महामार्गावरील तीन अपघात त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक असले असते तर टळले असते असे समितीचे म्हणने आहे. अनेक ठिकाणी काम चालू आहे, तर काही ठिकाणी अचानक एकेरी वाहतूक चालू होत आहे. मात्र तसे फलक नसल्याने अपघात होत आहेत. शिमग्यामुळे रस्तावर वर्दळ वाढली व लवकर पोहचण्याच्या प्रयत्नात चालक गाड्या बेदारकरपणे वेगात चालवतात व एकेरी मार्ग व दिशा परावर्तनाचे फलक नसल्याने त्याचे पर्यावसन अपघातात होते आहे त्यामुळे समितीने वाहन चालकांना सावकाश व सावधगिरीने वाहने चालवा असे आवाहन केले आहे.

 

 

Loading

नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसवेला कोकणातूनही विरोध

महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले जात असल्याचा वनशक्ती संस्थेचा आरोप. 
   Follow us on        
सावंतवाडी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.  या महामार्गामुळे येथील अल्पभूधारक भमिहीन होतील तसेच महामार्ग झाल्यास पुराचा धोका वाढेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणून तेथील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आता तर कोकणातही या महामार्गास विरोध होण्यास सुरवात झाली आहे. 
या महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग कोकणावर लादला जात आहे. हा महामार्ग ज्या भागातून जाणार त्या भागातील निसर्गाला मोठी हानी पोचणार आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत असे येथील वनशक्ती संस्थेने जाहीर केले आहे  
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गावातून हा मार्ग जात असल्याने या दोन्ही तालुक्यांसाठी हा महामार्ग विनाशकारी ठरणार आहे. त्यामुळे गरज नसलेल्या या महामार्गाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहे. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले गेले आहे. त्यामुळे कोकणाला गुलामगिरीमध्ये आणायचं का? हा विचार करून येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Loading

Konkan Railway | होळीला कोकण रेल्वेचे ‘रिग्रेट’ गाणे चालू

मुंबई:होळीचा सण आणि लागोपाठ तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी जायला निघाला असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेटिंग तिकीटही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना वाहतुकींच्या अन्य पर्यायांकडे वळावे लागणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांच्या दिनांक 22, 23 आणि 24 या दिवसांच्या आरक्षणाची स्थिती पाहता मांडवी आणि जनशताब्दी या गाड्यांच्या सेकंड स्लीपर श्रेणीचे आरक्षण Regret असे दाखवत असून तुतारी, कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव गाड्यांच्या आरक्षणाची स्थितीही जवळपास 400 वेटिंग लिस्ट असल्याने ती Regret होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.

रेल्वे प्रशासनाने या मार्गावर काही विशेष गाड्या चालविल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. या गाड्यांच्या आरक्षणाची स्थितीही 200 वेटिंग लिस्ट वर पोहोचली आहे. विशेष गाड्या सोडताना रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप प्रवासी संघटनाकडून होत आहे. खास शिमग्यासाठी विस्तारित केलेली रोहा चिपळूण गाडी रद्द करण्यात आली पण तिच्या बदल्यात दादर ते चिपळूण/रत्नागिरी अनारक्षित गाडी चालवणे अपेक्षित होते,तशी मागणी प्रवासी संघटनांनी निवेदने देवून केली होती. मात्र त्या मागणीला रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. 

सध्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कोकण रेल्वेने गर्दीतून, हालअपेष्टा सहन करत गाव गाठायचे किंवा हंगामाचा फायदा घेऊन लुटणाऱ्या खासगी वाहनातून परवडत नसले तरीही प्रवास करणे. 

 

नियमित गाड्यांच्या आरक्षणाची सध्याची स्थिती 

Train Name 22-Mar 23-Mar 24-Mar
11003 – TUTARI EXPRESS WL223 WL394 WL395
11099 – LTT MADGAON EXP WL108 WL392 WL357
12051 – MAO JANSHATABDI REGRET WL400 REGRET
10105 – DIVA SWV EXPRESS WL106 WL241 WL254
10103 – MANDOVI EXPRESS WL262 REGRET REGRET
20111 – KONKAN KANYA EXP WL396 WL397 WL280

Loading

Konkan Biodiversity | तिलारी ते आंबोलीपर्यंतच्या पट्ट्यात सहा पट्टेरी वाघांचा वावर

   Follow us on        
दोडामार्ग, दि. २० मार्च २०२४:चार दिवसांपूर्वी तळकट-खडपडे दरम्यान एक पट्टेरी वाघ आढळला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या भागात पट्टेरी वाघांचे अस्तित्व अधोरेखरेखील झाले असून हा भाग इको सेन्सेटिव्ह झोन (संवेदनशील भाग) जाहीर करावा या मागणीला बळ मिळाले आहे. वन विभागाला सुद्धा तिलारी ते आंबोलीपर्यंतच्या पट्ट्यात सहा वाघांचे अस्तित्व असल्याचे मान्य करावे लागले आहे. 
मांगेली ते राधानगरी अभयारण्यपर्यंतच्या सह्याद्री पट्ट्यात बावीस पट्टेरी वाघांचे अस्तित्व राष्ट्रीय संशोधन अनुसंज्ञान संस्था देहराडून यांच्या सर्वेक्षणात आढळले असतानाही वनविभाग ते नाकारत होते. तालुक्यात तळकट-खडपडे दरम्यान आढळलेल्या पट्टेरी वाघामुळे वन विभाग उघडा पडला आहे. त्यांना तिलारी ते आंबोलीपर्यंतच्या पट्ट्यात सहा वाघ अस्तित्वात असल्याचे मान्य करावे लागले. यामुळे हा भाग इको सेन्सेटिव्ह झोन (संवेदनशील भाग) जाहीर करावा, यासाठी उच्च न्यायालयात वनशक्ती संस्थेने दाखल केलेल्या याचिकेला भक्कम पुरावा मिळाला आहे, असा दावा याचिकाकर्त्या वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
वनशक्ती संस्थेने मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असून तो भाग संरक्षित करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. दीर्घकाळ यावर सुनावणी सुरु आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याचे वन शक्तीने वेळोवेळी उच्च न्यायालयात सांगितले होते. वाघाचे वास्तव्य चार दिवसांपूर्वी मिळालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे सिद्ध झाले. त्यामुळे या संदर्भात न्यायालयाला पुरावा सादर करण्याच्यादृष्टीने श्री. दयानंद आणि त्यांची टीम तळकट-खडपडे येथे गेली होती. तेथे त्यांना पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. या संदर्भात त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने २०१३ ला दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी लागू केली असतानाही तेराशे एकर जमिनीत वृक्षतोड झाली आहे. जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक याला जबाबदार असल्याने त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत संदिप सावंत, नंदकुमार पवार उपस्थित होते.

Loading

Revas Reddi Coastal Highway | समुद्री पुलामुळे कुणकेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार

   Follow us on        
Revas Reddi Coastal Expressway Updates: प्रस्तावित रेवस रेडी सागरी मार्ग कुणकेश्वर तीर्थक्षेत्राच्या अगदी समोरून समुद्राच्या दिशेने जाणार आहे. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी या जागी नव्याने पूल उभारला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत.
या पुलाचा कच्चा आराखडा बनविण्यात आला आहे. हे सागरी पूल १.६ किलोमीटर एवढ्या लांबीचे असणार आहे. या सागरी महामार्गामुळे कुणकेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पुलाशिवाय या सागरी महामार्गावर खालील ५ पुलांसाठी नवीन मागविण्यात आल्या आहेत. या सर्व पुलांसाठी 3 हजार 105 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे
• कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-सालाव – 3.8 किमी
• बाणकोट खाडीवर कोलमांडिया-वेश्वी – 1.7 किमी
• दापोली-गुहागर दाभोळ खाडीवर – 2.9 किमी
• जयगड खाडीवर तवसाळ-जयगड – 4.4 किमी
• काळबादेवी खाडीवरील पूल, रत्नागिरी – 1.8 किमी

Loading

Konkan Biodiversity | अलिबाग येथे आढळले दुर्मिळ वाघाटी रानमांजर

   Follow us on        
अलिबाग– अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर मंदिरालगत असलेल्या जंगल परिसरात दुर्मिळ अशा वाघाटी रानमांजराचे Rusty Spotted Cat प्रथमच दर्शन झाले आहे. सर्वात लहान आकारातील मांजरांची प्रजाती म्हणून ही मांजर ओळखली जाते.
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य अदिती सगर आणि समीर पालकर हे कणकेश्वर मंदीर परिसरालगतच्या जंगल परिसरात भ्रमंती करत असताना त्यांना ही मांजर आढळून आली. रस्टी स्पॉटेड कॅट नावाने ओळखली जाणारी ही मांजर यापूर्वी कधीही अलिबाग लगतच्या परिसरात आढळून आली नव्हती.
ही रानमांजर प्रामुख्याने ओल्या दमट पानगळीच्या जंगलात आढळून येते. राज्यात ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात या मांजरांचे वास्तव्य आढळून आले आहे. वाघाटीच्या  चेहऱ्यावर दोन गडद पांढऱ्या रेषा, तर चार गडद काळ्या रेषा असतात. सदर रेषा या नाकापासून वर डोक्यापर्यंत स्पष्ट असतात. या मांजरीचे डोळे खूप मोठे असतात आणि त्यांच्या बुबुळांचा रंग निळसर ते राखाडी तपकिरी असतो. त्यांचे कान गोलाकार आणि लहान असतात आणि पाठीवर राखाडी ठिपके असतात. वाघाटी प्राणी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे नामशेष होण्याची भीती असलेल्या यादीत आहे. मार्जारकुळात समावेश असलेल्या वाघाटीचा समावेश नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांमध्ये होतो.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search