Author Archives: Kokanai Digital

अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी कोकणरेल्वे मार्गे २ विशेष फेऱ्या

Konkan Railway News: फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन कोकणातील स्थानकांवर थांबणार असून १२ फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे. या गाडीच बुकिंग हे फक्त आय.आर.सी.टि. सी. च्या माध्यमातून केल जाणार असून देशभरातून 66 स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत. याच बुकिंग राउंड ट्रिप मधे केल जाणार आहे. लवकरच IRCTC च्या वेबसाईटवर हे बुकिंग उपलब्ध होईल. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा अस आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केल आहे. त्यांनी नुकतीच कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्ये साठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. सदर विशेष ट्रेन कोकण रेल्वेमार्गावरुन सोडल्याबद्दल त्यांनी IRCTC तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.
गाडी क्रमांक ०६२०५ वास्को – दर्शन नगर- वास्को द गामा स्पेशल एक्सप्रेस 
ही गाडी दिनांक १२ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी (सोमवारी) चालविण्यात येणार आहे. रात्री १० वाजून १० मिनिटांनी ही गाडी  वास्को स्थानकावरून सुटून तिसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता अयोध्येला  पोहोचणार आहे.
परतीचा प्रवासात म्हणजे दुसऱ्या दिवशी  ही गाडी दिनांक १६ फेब्रुवारी आणि ०१ मार्च (शुक्रवारी) रोजी  रात्री  ८ वाजता ही गाडी सुटून तिसऱ्या दिवशी रात्री  १२ वाजता  वास्को या स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाडीचे कोकणात मडगाव , थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि वसई या स्थानकावर थांबे आहेत.
ही गाडी २० सेकंड स्लीपर आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २२ कोचसहित चालविण्यात येणार आहे.

Loading

कोकणात रुजतोय ‘डेस्टिनेशन बीच वेडिंग’ चा ट्रेंड; निर्माण करतोय रोजगाराच्या नवीन संधी

सिंधुदुर्ग : हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग. भारतात बीच वेडिंगसाठी गोवा हे सगळ्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. मात्र आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर आणि जगभरात ब्लु फ्लॅक नामांकन असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर असे लग्न करू शकता.

सध्या प्री विडिंग फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर होतात. मात्र आता लग्न सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होत आहेत. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपलं लग्न खास व्हावे यासाठी धडपडत असतो. हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग मुंबई, पुणे सारख्या शहरातील युवा पिढी कोकणातील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर लग्न करत आहेत. हल्लीच सोलापूर येथील डॉ. चिराग होरा आणि स्नेहल शिंपी ठाणे यांनी आपलं लग्न अविस्मरणीय व्हावा यासाठी भोगवे समुद्र किनारी लग्न केलं.

नवा ट्रेंड नेमका काय?
सध्या लग्नसोहळे हे ट्रेंडनुसार केले जातात. काही जणं मोकळ्या मैदानात, काही जणं आलिशान जागेत लग्न सोहळा आयोजित करतात. त्यातच आता समुद्र किनारी लग्न सोहळे आयोजित करणं हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. यामुळे बऱ्याचदा अस्ताला जाणाऱ्या सुर्याचा मुहूर्त निवडला जातो. निळाशार समुद्र हा नव्या नात्यांचा साक्षीदार देखील होतोय. यामुळे तो लग्नसोहळा हा फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्याच नाही तर कुटुंबाताली प्रत्येक जणाच्या लक्षात राहण्यासारखा केला जातोय.

रोजगाराच्या संधी उपलब्ध
कोकणात जर ट्रेंडमुळे रोजगाराच्या संधी कोकण वासीयांना उपलब्ध होणार आहेत. या नव्या ट्रेंड मूळे हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार येवू शकतील. तसेच लग्नसोहळा संबधित व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.

Loading

Mumbai Goa Highway | हळवल फाट्यावर कारला अपघात; तिघेजण जखमी

Accident News : आज मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर कार अपघात झाला. या अपघातात ३ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात  दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणारी कार (एमएच १४ एफ एस ९८५१) ही कार दुपारी १२: ३० वा. च्या सुमारास महामार्ग सोडून दोन तीन पलटी खात महामार्गालगतच्या जागेत जाऊन थांबली.या अपघातात तीन जणांना दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापू खरात व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Loading

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार

पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
परीक्षेपूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Loading

VIDEO: शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर पहिल्या अपघाताची नोंद; अपघाताचा विडिओ समोर

उरण : शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर रविवारी दुपारी ३ वाजता पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आठवड्याभरात पहिला अपघात झाला आहे. हे वाहन उरणच्या चिर्लेकडून मुंबईकडे जात असताना हा किरकोळ अपघात झाला आहे. पुलावर उरणच्या दिशेने १२ किलोमीटर अंतरावर एका वाहनाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकाला धडक दिली. हे वाहन एक महिला चालवीत होती. वाहनात एक पुरुष आणि एक लहान मूल होते. यावेळी तातडीने अपघात स्थळी मदत पोहचविण्यात आली आहे.
या अपघातात वाहन चालक महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नेले आहे. त्याचप्रमाणे अपघातस्थळी अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित होते. “रविवारी दुपारी अटलसेतुवर किरकोळ अपघात झाला आहे. चिर्लेच्या दिशेने हे वाहन मुंबईला जात असताना हा अपघात झाला”, अशी माहिती माहिती न्हावा शेवा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली.

Loading

मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर परवा मंगळवार दिनांक २३ जानेवारी रोजी कोकण रेल्वेच्या वीर ते अंजनी स्थानक या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण अडीच तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १३:१० ते १५:४० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central ‘Netravati’ Express 
दिनांक २३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते वीर या स्थानकांदरम्यान ४० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते चिपळूण या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
३) Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Express
दिनांक २२ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते चिपळूण या स्थानकांदरम्यान ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.

Loading

महत्वाची बातमी : २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे.हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रापूर्वी अनेक राज्यात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील ६ हजाराहून अधिक व्हिआयपी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात राजकीय नेते, अभिनेते,उद्योगपती तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान, प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी केंद्रीय संस्था आणि इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. त्या दिवशी दुपारी अडीच वाजता कार्यालयीन कामकाज सुरू होईल.
आता महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. तसेच उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम व ओडिशा या राज्यांनी २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.

Loading

नागपूर – पत्रादेवी ‘शक्तिपीठ’ महामार्ग ‘समृध्दी’ पेक्षाही मोठा; ८०५ किमी लांबीचा हा महामार्ग ठरणार राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग.

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग  यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून जाणार आहे. 

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक गाडी LHB कोचसहित धावणार

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12741/12742 वास्को द गामा – पटना सेमी फास्ट एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 जानेवारी पासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे. 

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वास्को द गामा ते पटना (12741) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 24 जानेवारी 2024 च्या फेरीपासून तर पटना ते वास्को (12742) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 27 जानेवारी 2024 च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी 22 डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती 21 एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे. 

या साप्ताहिक गाडीला कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी आणि चिपळूण या स्थानकांवर थांबे आहेत. 

 

Loading

सिंधुदुर्गात १६२६ ‘आदिम’ लोकसंख्येचा पीएम जनमन योजनेअंतर्गत होणार विकास

सिधुदुर्ग: केंद्राने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान तथा पीएम जनमन अभियान सुरू केले असून त्यामध्ये जिल्ह्याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत १६२६ आदिम समाजाचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० वाड्यांमध्ये या समाजाचे वास्तव्य असल्याचेही पुढे आले आहे. आता या समाजाला रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, नळपाणी पुरवठा योजना आदी महत्त्वाच्या सुविधा या अभियान अंतर्गत देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (पीएमएवाय – जी) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला आहे 
दुर्लक्षित घटकातील अगदी शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांच्या अंत्योदयाच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, 15 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने, विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या (पीव्हीटीजीएस) सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आले.
सुमारे  24,000 कोटी रुपयांची पीएम जनमन योजना  9 मंत्रालयांच्या माध्यमातून 11 प्रमुख उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते.विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहातील (पीव्हीटीजीएस) कुटुंबे आणि  लोकवस्त्यांना सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, वीज, रस्ते आणि दूरसंचार  यासारख्या मूलभूत सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करून या घटकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.


देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले या पाच तालुक्यांत ही वस्ती आहे. यातील १६ वाड्यांतील आदिम समाजाजवळ कच्चे घर सुद्धा राहण्यासाठी आढळलेले नाही. केवळ एकच वाडी जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सहा वाड्यांत प्राथमिक शाळा नाहीत. चार वाड्यांना अंगणवाडी केंद्र नाही. तीन वाड्यांना आरोग्य केंद्र नाही. १९ वाड्यांत कौशल्य विकास केंद्र नाही. १३ वाड्यांत स्वच्छ पाणी नाही. सात वाड्यांत नळपाणी पुरवठा करणारी योजना नाही. १३ वाड्यांत वीज पुरवठा नाही. १५ घरांत सार्वजनिक शौचालय नाही, असे या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.
जिल्ह्यात आदिम समाजाचे वास्तव्य आढळलेल्या २० वाड्यांमध्ये केंद्राच्या प्रत्येक योजना अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. ज्या योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. व्यक्तिगत लाभ मिळालेला नसल्यास तोही दिला जाणार आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search