मुंबई :सर्व राजकीय पक्षांनी येत्या 2024 लोकसभा निवडणुकी साठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत लढवणार हे निश्चित झाले आहे, मनसे खाली नमूद केलेल्या लोकसभा क्षेत्रात सध्या चाचपणी करत असून त्यातील पाहिले संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी कडवाई – रत्नागिरी या मार्गावर सकाळी ०७:४० ते १०:४० या वेळेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रक परिणाम होणार आहे.
दिनांक १० ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी खेड ते चिपळूण दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मडगाव – कुमता या मार्गावर सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रक परिणाम होणार आहे.
1) Train no.06602 Mangaluru Central – Madgaon Jn. Special
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कुमता ते मडगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2) Train no. 06601 Madgaon Jn. – Mangaluru Central – Special
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते कुमता दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची रामटेक या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी. तसेच महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेसचे जुने डबे बदलून मिळावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
मंत्री केसरकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यांना रेल्वे प्रवासात यापूर्वी लागू असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याकडे केली आहे. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच त्यांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे तिरूपती तसेच मुंबई येथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. यासाठी उपलब्ध असलेल्या हरिप्रिया तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे जुने आणि गैरसोयीचे झाले असल्याने ते बदलून मिळण्याबाबत भाविक आणि प्रवाशांकडून विनंती करण्यात येत आहे. हे डबे बदलून नवीन डबे मिळाल्यास प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखद होऊ शकणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांना सांगितले.
पुणे: राज्य उत्पादन शुल्क पथक क्रमांक 1 ने आज पुण्यातील कात्रज परिसरात एका लक्झरी बसमधून गोव्याच्या दारूचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे. या कारवाईत अवैध धंद्यात गुंतलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध धंद्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस.एल. पाटील यांच्या पथकाने जुना पुणे-सातारा रोडवरील कात्रज परिसरात गस्त घालत असताना भारत पेट्रोल पंपासमोर सहा चाकी लक्झरी बस अडवल्या.
तपासणी केल्यावर, त्यांना बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या 180 सील न केलेल्या बाटल्या (15 बॉक्स) सापडल्या, हा ब्रँड महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे परंतु गोव्यात कायदेशीर आहे. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे.
गणेश बाळकृष्ण चव्हाण (वय 50, रा. सिंधुदुर्ग), अक्षय अनंत जाधव (वय 32, रा. नालासोपारा पश्चिम) आणि उमेश सीताराम चव्हाण (वय 37 रा . सिंधुदुर्ग) तिघांनाही ताब्यात घेण्यात आले
Sleeper Version Of Vande Bharat : आरामदायी, वेग आणि अत्याधुनिक अशी ओळख असलेल्या वंदे भारतचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. ट्रेनमध्ये नवा स्लिपर व्हर्जन येणार आहे.
केंदीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या स्वरुपातील स्लिपर व्हर्जनचे फोटो शेअर केले आहेत. ट्रेनमधील स्लिपर कोच अतिशय आरामदायी असून, यामुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे.
नव्याने प्रस्तावित स्लिपर कोच पुढील वर्षाच्या (२०२४) सुरवातीला येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग :एसटीच्या अस्तित्वात चालकासोबतच वाचकाचा (कंडक्टर) चा वाटा पण महत्त्वाचा मानला जातो. वाहकाची वागणूक जर विनम्र आणि सोज्वळ असेल तर प्रवासी एसटीला प्राधान्य देतो. त्यामुळे वाहकाने गर्दी आणि कामाच्या ताणला न कंटाळता अगदी प्रवाशांबरोबर चांगले वागणे गरजेचे आहे.
कित्येक वेळा एसटीच्या प्रवासात खूप चांगले अनुभव वाहकांकडून प्रवाशांना येत असतात. असाच एक अनुभव पुणे ते विजयदुर्ग या मार्गावर गणेश चतुर्थीदरम्यान प्रवास करणार्या एका प्रवाशाला आला. वाहकाच्या प्रवाशांना दिल्या गेलेल्या चांगल्या वागणुकीमुळे भारावून गेलेल्या या प्रवाशाने विजयदुर्ग आगाराला चक्क पत्र लिहून त्या वाहकाचे कौतुक केले आहे.
गाडी मध्ये गर्दी असूनही वाहक शिरसाट यांचा व्यवहार खूपच चांगला आणि प्रवाशांना मदत करणारा होता. अशा वाहकांमुळे एसटीची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्याने या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या पत्रास एसटीचा गौरव मानून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर प्रसिद्ध केले आहे.
चिपळूण : चिपळूण येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. गेले काही महिने ते तेथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवादविरोधी पथकाने (Anti Terrorism Squad Ratnagiri) कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. बांगलादेशहून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खेर्डी मोहल्ला परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करत होते.
याविषयीची रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. ३) रात्री १०.३० वा. कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पारपत्र अधिनियम ३ (ए) ६, परकीय नागरिक आदेश कायदा ३ (१) (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल उदय चांदणे, आशिष शेलार यांनी ही कारवाई केली. या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.
मुळचे बांगलादेशी असलेले गुल्लू मुल्ला व त्याच्या दोन्ही मुलांकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधारकार्ड, निवडणूक मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे नागरिकत्त्व नसताना देखील ही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कोणकोणते व्यवहार केले, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘गडकरी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची रीं भूमिका कोण साकारेल? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गडकरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि टीझरची प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट बघत आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’ 27 ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.
Konkan Railway News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनजीकच्या वाडी बंदर यार्डामधील रेल्वे लाईन 3 ते 7 साठी कनेक्टिव्हिटीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दिनांक ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील खालील गाड्यांवर या कामाचा परिणाम होणार आहे.
मालगाडी अपघातानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक चुकीच्या पद्धतीने हाताळली गेल्याचा आरोप..
मुंबई :गेल्या आठवड्यात कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचे कारण साफ आणि स्वच्छ होते. पनवेल स्टेशनच्या पुढे दोन फरलांगावरती नवीन पनवेल जुना पनवेलच्या पुलाखाली मालगाडी घसरली पण ही मालगाडी घसरण्याचे कारण आता पुढे येत आहे तेथे असलेल्या नाल्यावर टाकलेले पाच स्लीपर चुकीच्या पद्धतीने टाकले गेले होते त्या स्लीपर च्या वरती अचानक लोड आल्यामुळे रेल्वे रूळ वाकले आणि मालगाडी घसरली असे समजते परंतु त्याच वेळेला कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून जवळपास च्या लाईन वरून कोकण रेल्वेची दुसरी गाडी येत नव्हती अन्यथा हा अपघात भीषण असा झाला असता.
या अपघाताची पार्श्वभूमी अशी आहे अगोदर शनिवारपासून हार्बर लाइन मार्गावरती बेलापूर ते पनवेल मेगाब्लॉक घेण्यात आला होता आणि तो मेगाब्लॉक चालू असताना बेलापूर पासून रेल्वे मार्ग पनवेल पर्यंत बंद करण्यात आला होता. परंतु ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली असती परंतु मालगाडीमुळे ही वाहतूक पुढे होऊ शकणार नव्हती याचे निदान स्पष्ट झाल्यानंतर त्वरित मेगा ब्लॉक रद्द करणे गरजेचे होते व कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या पनवेल पर्यंत आणून तिथे रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावर वळवून पुढे उभ्या करून ठेवता आल्या असत्या, परंतु हे न करता सरळ पुढे गाड्या येऊन देण्याचा मूर्खपणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला यावर कोणाचाच लक्ष जात नाही आहे कसे? पनवेलच्या पुढे रेल्वे घसरली म्हणजे पनवेल पर्यंत गाड्या आरामात येऊ शकत होत्या .पनवेलला एकंदरीत तीन गाड्या येऊन लागू शकत होत्या या तीन गाड्या रिकाम्या करून पुन्हा कुठेतरी पुढे कर्जत उरण मार्गावरती पाठवून येणाऱ्या गाड्यांना पनवेल पर्यंत येऊ द्यायला पाहिजे होते व मेगाब्लॉक रद्द करून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन चार वरून ठाणा गोरेगाव आणि सीएसटी वडाळा अशा लोकल सेवा चालू ठेवल्या पाहिजे होत्या परंतु मेगा ब्लॉक का रद्द केला गेला नाही ?तसेच या गाड्या पनवेल पर्यंत येऊ शकत होत्या पनवेलला त्या गाड्या रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावरती नेऊन कुठेतरी सायडींगला उभ्या करून ठेवल्या पाहिजे होत्या तेवढी जर समय सुचकता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली असती तर किमान गणपतीला गावाला गेलेले सगळे चाकरमानी सुखरुप पणे पनवेल पर्यंत येऊ शकले असते आणि मेगा ब्लॉक रद्द केला असता तर पनवेल पासून पुढे प्रवास करून लोक सुखरूप घरी गेली असती.तीस तीस तास रखडपट्टी झाली नसती
त्यात आणखीन एक शहाणपणा केला तो म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस लोढा मिरज मार्गे वळवली त्यामुळे पनवेलच्या पुढे मडगाव पर्यंत ती गाडी कुठेही स्टॉप वर थांबणार नव्हती ती गाडी लोढा मिरज मार्गे मडगाव करून मडगावला गेली मडगावला गेल्यानंतर तिथे नेत्रावती एक्सप्रेस तिथल्या लोकांना पाच मिनिटांसाठी चुकली मडगावच्या अधिकाऱ्यांनी पाच मिनिटं नव्हे तर अर्धा तास तरी नेत्रावती एक्सप्रेस थांबवुन ठेवली असती तर मडगाव पासून ते चिपळूण पर्यंतच्या प्रवाशांना नेत्रावती मध्ये जागा करून घेता आली असती कारण गाडीचा खोळंबा झाल्यामुळे नेत्रावतीचीअनेक तिकिटे रद्द झालेली होती आणि प्रवास फक्त पाच तासाचा होता रेल्वेच्या ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिसपस्तिस तास मनस्ताप प्रवाशांनी का बरं सोसावा? याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे आणि या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
कोकण रेल्वेचे रेल्वे रूळ हार्बर लाइन मार्गावरती आज तीस वर्षे झाली अजून जोडलेले नाहीत ते जर जोडले असते तर गाडी ठाणा हार्बर मार्गे सुद्धा नेता आली असती याबाबतचे पत्र मी दोन ऑगस्ट २३ रोजी पा ठवलेले होते आता तरी गंभीर होऊन कोकण रेल्वे मार्ग हार्बर लाइन ला जोडला जावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोकण रेल्वे वाशी ठाणा मार्गे सीएसटी पर्यंत पोहोचू शकते आपला एक शेअर कोकण रेल्वेचे भविष्य बदलू शकते.
मे महिन्यात गणपती मध्ये वाशी बेलापूर येथून थेट केरळ कन्याकुमारी पर्यंत गाड्या सोडता येतील गणपती मध्ये बेलापूर वाशी येथून थेट गाड्या सावंतवाडी चिपळूण रत्नागिरी ला सोडता येतील